- मुख्यपृष्ठ
- INDIA AT 2047
- IPL 2024
- क्रिकेट
- निवडणूक
- अयोध्या राम मंदिर
- भारत
- विश्व
- महापालिका निवडणूक 2022
- टेलिव्हिजन
- सिनेमा
- औरंगाबाद
- उस्मानाबाद
- मुंबई
- पुणे
- नाशिक
- नागपूर
- कोल्हापूर
- सोलापूर
- क्रीडा
- फोटो
- राशीभविष्य
- वेब स्टोरी
- वर वधू
- धार्मिक
- शिक्षण
- ट्रेंडिंग न्यूज
- आरोग्य
- लाईफस्टाईल
- क्राईम
- राजकारण
- शेत-शिवार
- व्यापार-उद्योग
- पर्सनल फायनान्स
- म्युच्युअल फंड्स
- आयपीओ
- जॅाब माझा
- ऑटो
- टेक-गॅजेट
- ब्लॉग
- उपयुक्तता
- संपर्क करा
- IDEAS OF INDIA
Maharashtra Live blog Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी; पाहा एका क्लिकवर...
Maharashtra Live blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...
पार्श्वभूमी
Maharashtra Live blog Updates: आम्ही आरक्षण दिलं होतं, ज्यांनी टिकवलं नाही त्यांना प्रश्न विचारा, असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाते प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला...More
नाशिक : कालपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. नाशिक जिल्ह्याला दोन दिवसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. उद्या होणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीवर देखील पावसाचे विरजण पहायला मिळत आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात देखील पावसाचा जोर कायम असल्याने नाशिकच्या गंगापूर धरणातून दोन हजार क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर, अहिल्यादेवी होळकर पुलाखालून ३ हजार ८०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे रामकुंड परिसरातील मंदिरांना पुन्हा पाण्याने वेढा दिल्याचं पाहायला मिळत आहे. पावसामुळे नदी- नाले , ओढे दुथडी भरून वाहत असल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
वाशिम : शहराजवळ असलेल्या काकडदाती गावावरून वाशिम शहराकडे येताना रस्ता ओलांडताना महाराजा ट्रॅव्हल्सने 16 वर्षीय मुलीला सायकलसह उडवल्याची धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. संध्या सारसकर असं अपघातात ठार झालेल्या मुलीचं नाव आहे. संध्या ही आपल्या सायकलने रस्ता पार करत असताना पुसदकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सने समोरून आडव्या आलेल्या संध्याला सायकलसह उडवले यात ती जागीच ठार झाली.
ठाणे : वैविध्यपूर्ण देखावे आणि सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असलेल्या पांचपाखाडी येथील नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार महाराष्ट्रातील अकरा जागृत मारूतीरायांचे दर्शन घडविले आहे. पुरातन मंदिराची प्रतिकृती साकारून अकरा मारूतींचे एकाच ठिकाणी दर्शन घडविणारा हा देखावा पाहण्यास भाविकांची रीघ लागली असते.
1979 मध्ये काही तरुणांनी एकत्र येत विधायक उद्देश ठेवून या गणेशोत्सवाची सुरुवात केली. आज हा गणेशोत्सव ठाण्याचा राजा म्हणून राज्यभर ओळखला जात आहे. मराठी माणूस हा जरी उत्कृष्ठ पर्यटक असला तरी त्याला देशभरातील मंदिरांची वारी करणे आर्थिकदृष्ट्या अन् सांसारिक अडचणींचा डोंगर पार करुन पूर्ण करणे शक्य होत नसते. याची जाणीव असलेल्या नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गणेशोत्सवात देशभरातील अनेक मंदिरशिल्पे साकारुन ठाणेकरांना भारतातील मंदिरांचे दर्शन पांचपाखाडीमध्येच घडविले आहे.
राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांसाठी राज्य सरकारने 2014 साली आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला होता. त्यानुसार राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांनी सीसीएमपी कोर्स पूर्ण केल्यानंतर त्यांची नोंद ही महाराष्ट्र वैद्यक परिषदेच्या (MMC) नोंदवहीत करण्यात यावी असा आदेश सरकारने 30 जून 2025 रोजी दिला होता. सरकारच्या या निर्णयाविरुद्ध इंडियन मेडिकल असोसिएशन पुणे शाखेने उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं . सदर प्रकरणी माननीय उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना कुठलाही दिलासा दिला नाही व राज्य सरकारच्या निर्णयास स्थगिती ही दिली नाही. त्यामुळे आज राज्य सरकारच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने आदेश काढून सीसीएमपी कोर्स केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांची नोंद वैद्यक परिषदेच्या स्वतंत्र नोंद पुस्तकात करण्याचे आदेश पारित केले आहेत. यामुळे राज्यातील एक लाख होमिओपॅथी डॉक्टरांना दिलासा मिळाला आहेत.मध्यंतरी होमिओपॅथी डॉक्टर्स विरुद्ध ऍलोपॅथिक डॉक्टर्स असा संघर्ष ही बघायला मिळाला होता.
राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांसाठी राज्य सरकारने 2014 साली आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला होता. त्यानुसार राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांनी सीसीएमपी कोर्स पूर्ण केल्यानंतर त्यांची नोंद ही महाराष्ट्र वैद्यक परिषदेच्या (MMC) नोंदवहीत करण्यात यावी असा आदेश सरकारने 30 जून 2025 रोजी दिला होता. सरकारच्या या निर्णयाविरुद्ध इंडियन मेडिकल असोसिएशन पुणे शाखेने उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं . सदर प्रकरणी माननीय उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना कुठलाही दिलासा दिला नाही व राज्य सरकारच्या निर्णयास स्थगिती ही दिली नाही. त्यामुळे आज राज्य सरकारच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने आदेश काढून सीसीएमपी कोर्स केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांची नोंद वैद्यक परिषदेच्या स्वतंत्र नोंद पुस्तकात करण्याचे आदेश पारित केले आहेत. यामुळे राज्यातील एक लाख होमिओपॅथी डॉक्टरांना दिलासा मिळाला आहेत.मध्यंतरी होमिओपॅथी डॉक्टर्स विरुद्ध ऍलोपॅथिक डॉक्टर्स असा संघर्ष ही बघायला मिळाला होता.
पदवीधर निवडणुकांसाठी भाजपची तयारी सुरु
पुणे, नागपूर व संभाजी नगरमध्ये भाजप पदवीधर निवडणूक लढणार
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी कंबर कसली
आमदार संजय केनेकरांवर संभाजी नगरची जबाबदारी
नागपूरसाठी सुधाकर कोहळे, तर पुण्यासाठी राजेश पांडे यांची निवड
सदस्य नोंदणीसाठी तीन नेत्यांवर विशेष जबाबदारी
आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या केंद्रीय लोकसेवा आयोगातील नेमणुकीची चौकशी करा. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांची मोठी मागणी. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचे नाव माहीत नसलेल्या महिला अधिकाऱ्याची नियुक्ती संशयास्पद. पूजा खेडकर प्रकरणाप्रमाणेच अंजना कृष्णा यांच्या निवड प्रक्रियेत घोळ झाला असल्याची आपल्याला शंका असल्याचं आमदार अमोल मिटकरी म्हणालेत. अंजना कृष्णा यांच्या नेमणुकी संदर्भात राज्य सरकार आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे तक्रार करणार असल्याची आमदार अमोल मिटकरी यांची स्पष्टोक्ती.
अजित पवारांचं काहीही चुकलेलं नाही. विरोधक विनाकारण या मुद्द्यावर आकांडतांडव करीत आहेत. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना ओळखत नसल्याचे म्हणणं हा संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान. अंजना कृष्णा या मग्रूर अधिकारी असल्याची अमोल मिटकरी यांची टीका.
बीड: वाल्मीक कराडच्या दाखल फौजदारी अर्जावर औरंगाबाद खंडपीठाची तपासी अधिकाऱ्यांना नोटीस
कराडच्या दोष मुक्तीबाबत तपासी अधिकाऱ्यांना न्यायालयात म्हणणे मांडावे लागणार
सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडच्या दाखल फौजदारी अर्जावर औरंगाबाद खंडपीठाने तपासी सीआयडी अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे.
वाल्मीक कराडच्या वकिलांनी बीडच्या जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात दोष मुक्तीचा अर्ज दाखल केला होता. आणि हाच अर्ज न्यायालयाने नामंजूर केला. याच अनुषंगाने कराडच्या वकिलांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. या प्रकरणी औरंगाबाद खंडपीठाने तपासी अधिकाऱ्यांना नोटीस बजावली असून तपासी अधिकाऱ्यांना त्यांचे म्हणणे औरंगाबाद खंडपीठात मांडावे लागणार आहे. तपासी अधिकाऱ्यांनी म्हणणे मांडल्यानंतर या प्रकरणात पुढील सुनावणी होणार आहे.
मोक्का कायद्यांतर्गतच्या गुन्ह्यातून नाव वगळण्यास नकार देणाऱ्या बीडच्या विशेष न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध वाल्मीक कराडने दाखल केलेल्या फौजदारी अर्जाच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. संदीपकुमार सी. मोरे आणि न्या. मेहरोझ के. पठाण यांनी शासनास नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे.
वसई विरार नालासोपारा मध्ये आज सकाळ पासून पावसाने हजेरी लावली आहे
रिमझिम पावसासह अधूनमधून जोरदार पाऊस पडत आहे
पडणाऱ्या पावसामुळे नालासोपारा पूर्व सकल भागातील मुख्य रस्त्यावर पाणी साचले आहे
आभाळ काळेकुट्ट झाले असून, दिवसभर पावसाची संततधार सुरूच राहण्याची शक्यता आहे
मुंबईत मानवी बॉम्बस्फोट करण्याची धमकी
वाहतूक पोलिसांच्या व्हाट्सअप नंबरवर आला धमकीचा मेसेज
ऐन अनंत चतुर्दशीच्या तोंडावर धमकी आल्याने मुंबई पोलीस सतर्क
34 गाड्यांमध्ये मानवी बॉम्ब असून स्फोटानंतर मुंबई शहर हादरेल मेसेजमध्ये उल्लेख
लष्कर-ए-जिहादी नावाच्या संघटनेचा धमकीत उल्लेख
१४ पाकिस्तानी आतंकवादी घुसल्याचा देखील दावा
४०० किलो आरडीएक्सच्या स्फोटामुळे १ कोटी लोक मारले जातील मेसेजमध्ये करण्यात आला दावा
चंद्रपूर जिल्ह्याच्या जिवती तालुक्यातील ११ गावांना मोठा दिलासा
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा निर्णय
वनेतर वापरातील ८ हजार ६४९ हेक्टर वगळण्याचा निर्णय
चुकीच्या डाटा एंट्रीमुळे वनक्षेत्रात समाविष्ट झालेली जमीन वगळण्याचा निर्णय
वनेतर वापरातील ३३ हजार १२८ हेक्टर पैकी ८ हजार ६४९ हेक्टर जमीन वगळणार
चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालानुसार घेतला निर्णय
तब्बल ५ हजार ६५९ हेक्टर जमीन वनखंडात समाविष्ट नसल्याचा अहवाल
२ हजार ८८९ हेक्टर जमिनीचे निर्वणीकर झाल्याची अहवालात माहिती
एकूण ८ हजार ६४९ हेक्टर क्षेत्र वगळण्याबाबत कार्यवाहीचे आदेश
सातारा : वडूज येथील ज्योतिबा मंदिरातील गरुडाची 7 किलोची मूर्ती आणि हनुमानाची 6 किलोची पितळेची मूर्ती अज्ञात चोरट्याने चोरी केल्याची घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली होती या चोरीची नोंद वडूज पोलीस ठाण्यात करण्यात आली होती दरम्यान पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत मूर्तींची चोरी करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात वडूज पोलिसांना यश आले आहे. दीपक माने वय 28 असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे .त्याच्याकडून चोरी केलेला सर्व मुद्देमाल वडूज पोलिसांनी हस्तगत केला आहे.
दोनशे स्क्वेअर फिटातील छोट्या छोट्या तीन खोल्यांमध्ये राहणाऱ्या भंडाऱ्यातील एका कामगाराला एका महिन्याचं चक्क अडीच लाखांचं विज बिल महावितरणनं थोपविलं आहे. ऑगस्ट महिन्याचं बिल हातात पडतात भंडाऱ्यातील हा कामगार चक्रावून गेला. भंडारा शहरातील लाला लजपतराय वार्डात राहणारे अन्वर रहमान खान हे महिन्याला पाच हजार रुपयात कमवितात. 200 स्क्वेअर फिटाचं त्यांच्याकडं तीन छोट्या छोट्या खोल्या आहेत. हॉल, बेडरूम आणि किचन या तिन्ही खोल्यांमध्ये तीन छोटे बल्ब आहेत. एक फॅन, टिव्ही आणि एक कुलर त्यांच्या घरात असून काही दिवसापूर्वी महावितरणनं त्यांची पूर्वपरवानगी नं घेता त्यांच्या घरातील जुना मीटर काढून नवीन स्मार्ट मीटर बसविलं. त्यानंतर ऑगस्ट महिन्याचं बिल त्यांच्या हातात आलं आणि तेही थेट 2 लाख 46 हजार 900 रुपयांचं..... हे बिल घेऊन अब्दुल रहमान खान यांनी महावितरणचं कार्यालय गाठलं. मात्र, त्यांना आलेलं बिल भरावचं लागेल, अशी तंबी महावितरण अधिकाऱ्यांनी दिल्यानं आता स्मार्ट मीटरधारक अब्दुल रहमान खान हे पेचात पडले आहेत. याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी याबाबत कुठलाही प्रतिसाद दिला नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पाठोपाठ आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून देखील शिबिराचे आयोजन
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच यंदा नाशिकला शिबिर तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच नागपूरला शिबिर पार पडणार
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेत पुणे मुंबई पाठोपाठ मोठ्या महापालिका आणि जिल्हा परिषदा असणाऱ्या शहरांना दोन्ही पक्षांची पसंती
14 आणि 15 सप्टेंबरला नाशिकला शरद पवारांच्या राष्ट्रवादीच शिबिर तर 19 सप्टेंबरला अजित पवारांच्या राष्ट्रवादीच नागपूरला शिबिर
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पाठोपाठ आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून देखील शिबिराचे आयोजन
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच यंदा नाशिकला शिबिर तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच नागपूरला शिबिर पार पडणार
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेत पुणे मुंबई पाठोपाठ मोठ्या महापालिका आणि जिल्हा परिषदा असणाऱ्या शहरांना दोन्ही पक्षांची पसंती
14 आणि 15 सप्टेंबरला नाशिकला शरद पवारांच्या राष्ट्रवादीच शिबिर तर 19 सप्टेंबरला अजित पवारांच्या राष्ट्रवादीच नागपूरला शिबिर
काशीमीरा : मध्यरात्री महामार्गालगत असलेल्या “टारझन डान्सबार”वर काशीमीरा पोलिसांनी मोठी धाड टाकली. या कारवाईत पोलिसांनी बारच्या आत बनवलेल्या दोन गुप्त केव्हेटीचा पर्दाफाश करून त्यामधून 5 बारबालांची सुटका केली. याशिवाय बारमध्ये काम करणाऱ्या एकूण १२ बारबालांचीही पोलिसांनी मुक्तता केली आहे. तसेच बार मालक, मॅनेजर, वेटर आदींसह एकूण 21 जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
बार माफियाने पोलिसांच्या नजरेआड करण्यासाठी बारच्या आत दोन गुप्त केव्हेटी तयार केल्या होत्या. एका केव्हेटीचा दरवाजा काचेमागे लपवण्यात आला होता. आत गेल्यावर आतून लॉक केल्यास बाहेरून उघडणे अशक्यप्राय होते. दुसऱ्या गुप्त दरवाजासाठी इलेक्ट्रिक बोर्डवर तीन पिनचा प्लग लावावा लागायचा आणि त्याच्या बाजूचा बटन ॲान केल्यावर, गुप्त दरवाजा वर जोरदार लाथ मारल्यावरच तो दरवाजा उघडायचा.
अशी भन्नाट व गुंतागुंतीची यंत्रणा बसवून बारमालक व मॅनेजर बारबालांना लपवत असत.
पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीद्वारे ही कारवाई करण्यात आली. रेडदरम्यान पोलिसांनी या गुप्त केव्हेटी शोधून काढत त्यातील मुलींची सुटका केली.
या धाडीत पोलिसांनी बार मालक, मॅनेजर, वेटर आदींसह एकूण 21 जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
या कारवाईमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी अशा अवैध बारमाफियांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.
आगामी महापालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रभागरचनेच्या प्रारूप आराखड्यावर नागरिकांनी मोठ्या संख्येने आक्षेप दाखल केले आहेत. आतापर्यंत दाखल झालेल्या एकूण आक्षेपांची संख्या 552 वर पोहोचली आहे. सर्व आक्षेप आता शासन नियुक्त अधिकाऱ्यांपुढे सुनावणीसाठी ठेवण्यात येणार आहे. संबंधित अधिकारी आक्षेप दाखल करणाऱ्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून घेणार आहे. आक्षेपामध्ये तथ्य आढळून आल्यास बदल केला जाणार आहे.
आगामी महापालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रभागरचनेच्या प्रारूप आराखड्यावर नागरिकांनी मोठ्या संख्येने आक्षेप दाखल केले आहेत. आतापर्यंत दाखल झालेल्या एकूण आक्षेपांची संख्या 552 वर पोहोचली आहे. सर्व आक्षेप आता शासन नियुक्त अधिकाऱ्यांपुढे सुनावणीसाठी ठेवण्यात येणार आहे. संबंधित अधिकारी आक्षेप दाखल करणाऱ्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून घेणार आहे. आक्षेपामध्ये तथ्य आढळून आल्यास बदल केला जाणार आहे.
आगामी महापालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रभागरचनेच्या प्रारूप आराखड्यावर नागरिकांनी मोठ्या संख्येने आक्षेप दाखल केले आहेत. आतापर्यंत दाखल झालेल्या एकूण आक्षेपांची संख्या 552 वर पोहोचली आहे. सर्व आक्षेप आता शासन नियुक्त अधिकाऱ्यांपुढे सुनावणीसाठी ठेवण्यात येणार आहे. संबंधित अधिकारी आक्षेप दाखल करणाऱ्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून घेणार आहे. आक्षेपामध्ये तथ्य आढळून आल्यास बदल केला जाणार आहे.
लालबागच्या राजाची चरणस्पर्शाची रांग आता बंद करण्यात आली आहे. मात्र मुखदर्शनाची रांग अद्याप सुरू आहे. बाप्पाच मुखदर्शन घेण्यासाठी हजारो भाविक सध्या रांगेत पाहिला मिळत आहेत. कारण मुखदर्शनाची रांग देखील रात्री १२ वाजता बंद होणार आहे. त्यानंतर विसर्जनच्या तयारीला सुरुवात होईल. यंदा मंडळाच्या वतीने विसर्जनासाठी हायटेक तराफा आणण्यात आला आहे. तसेच विसर्जनासाठीचा रथ देखील सजवण्यात आला आहे.
भाविक बाईट १- मागचे ८ दिवस कसे निघून गेले कळाल नाही. भाविक ३० तास रांगेत उभे असल्याचं आम्ही पाहिल आहे.
भाविक बाईट २- मागच्या ८ दिवसांत दिवसाला ८ लाख भाविक दर्शन करत होते. यंदा लालबाग पासून विसर्जन मिरवणूक सुरू होईल. ती बकरी अड्डा मार्गे गिरगावला जाईल.
जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणुकांसाठीच्या नवीन सर्कल आरक्षण रोटेशन आदेशाला न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात राष्ट्रपाल पाटील व प्रकाश इवनाते यांनी हि याचिका दाखल केली.
आधीच अनुसूचित जाती व जमाती साथीचे आरक्षण रोटेशन पूर्ण झाले नसतांना राज्य सरकारकडून नवीन सर्कल आरक्षण रोटेशन लागू करण्यात आले, त्यामुळे नवीन रोशन आरक्षण लागून करू नये अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.
सोमवारला या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने 12 जूनला राज्यात जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणुकांसाठी कार्यक्रम जाहीर केला .
20 ऑगस्टला ग्रामविकास विभागाने अधिसूचना जाहीर करून नवीन आरक्षण रोटेशन लागू केले. निवडणूक आरक्षण रोटेशनची पहिली निवडणूक असे असे अधिसूचनेत म्हटले.
राज्य निवडणूक आयोगाने 22 ऑगस्ट ला नागपूर जिल्हा परिषदची सर्कल रचना करण्यात केली.
त्यामुळे न्यायालयाच्या सुनावणीत काय होते हे बघणे महत्वाचे राहणार आहे.
जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणुकांसाठीच्या नवीन सर्कल आरक्षण रोटेशन आदेशाला न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात राष्ट्रपाल पाटील व प्रकाश इवनाते यांनी हि याचिका दाखल केली.
आधीच अनुसूचित जाती व जमाती साथीचे आरक्षण रोटेशन पूर्ण झाले नसतांना राज्य सरकारकडून नवीन सर्कल आरक्षण रोटेशन लागू करण्यात आले, त्यामुळे नवीन रोशन आरक्षण लागून करू नये अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.
सोमवारला या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने 12 जूनला राज्यात जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणुकांसाठी कार्यक्रम जाहीर केला .
20 ऑगस्टला ग्रामविकास विभागाने अधिसूचना जाहीर करून नवीन आरक्षण रोटेशन लागू केले. निवडणूक आरक्षण रोटेशनची पहिली निवडणूक असे असे अधिसूचनेत म्हटले.
राज्य निवडणूक आयोगाने 22 ऑगस्ट ला नागपूर जिल्हा परिषदची सर्कल रचना करण्यात केली.
त्यामुळे न्यायालयाच्या सुनावणीत काय होते हे बघणे महत्वाचे राहणार आहे.
जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड वर बेस्ट बसने दोघांना चिरडल्याची घटना घडली आहे.
यात एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे.
घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.
जेव्हिएलआर वर पवई आयआयटी जवळील घटना
बुलढाणा : गुन्हा अन्वेषण विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर खामगाव जवळील पारखेड फाट्यावर एका ट्रक मधून 25 लाख 35 हजार रुपयांचा गुटख्यासह 50 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे जिल्ह्यात अलीकडे मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटक्याची वाहतूक व विक्री होत आहे याला अनुसरून जिल्हा पोलीस दलाने गुटख्या विरोधी कारवाई सुरु केली आहे.यादरम्यान ही कारवाई करण्यात आली.
बुलढाणा : गुन्हा अन्वेषण विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर खामगाव जवळील पारखेड फाट्यावर एका ट्रक मधून 25 लाख 35 हजार रुपयांचा गुटख्यासह 50 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे जिल्ह्यात अलीकडे मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटक्याची वाहतूक व विक्री होत आहे याला अनुसरून जिल्हा पोलीस दलाने गुटख्या विरोधी कारवाई सुरु केली आहे.यादरम्यान ही कारवाई करण्यात आली.
नागपूर शहरात वाढते अपघात व वाहतूक कोंडी लक्षात घेता जड वाहनांना सकाळी 9 ते रात्री 10 पर्यंत प्रवेश बंदी असणार आहे.
नागपूर पोलीसांनी याचे परिपत्रक काढले असून 7 सप्टेंबर पासून हा आदेश लागून होणार असल्याचे सांगितले आहे.
नवीन नियमावली नुसार दुसऱ्या राज्यात जाणाऱ्या वाहनांना आऊटर रिंग रोडचा वापर करणे बंधनकारक असणार आहे.
नियमाचे उल्लंघन केल्यास 10 हजाराचा दंड थोटवण्यात येणार आहे.
नियमाची अंबलबजावणी व्हावी यासाठी पोलीस विभागाकडून विशेष भरारी पथक तयार करण्यात येणार आहे.
नागपूर शहरात मागच्या पाच वर्षात जड वाहनांनी 457 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
कुर्डू प्रकरणात अजितदादांना अडचणीत आणणाऱ्या कार्यकर्त्यांसह 15 ते 20 ग्रामस्थांवर कुर्डूवाडी पोलीस स्थानकात चार दिवसानंतर गुन्हा दाखल ..
बेकायदा गौण खनिज उत्खनन करणे, जमाव जमवणे सरकारी कामात अडथळा आणणे आणि धमकावणे अशा पद्धतीच्या कलमानुसार बाबा गायकवाड, नितीन माळी संतोष कापरे अण्णा ढाणे यांच्यासह 15 ते 20 जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पंजाबमध्ये पावसाचा कहर, अनेक गावांना पुराचा वेढा तर भारत-पाकिस्तान सीमेवर मोठं नुकसान, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात..अभिनेता रणदीप हुड्डाकडून पूरग्रस्त भागात मदत
जातीय दंगलींमुळे होरपळणाऱ्या मणिपूरला पंतप्रधान मोदी अखेर भेट देणार, १३ सप्टेंबरला दौरा, विरोधकांच्या सातत्यानं होणाऱ्या टीकेला उत्तर देण्याचा प्रयत्न
दिव्यांगांच्या मानधनासाठी बच्चू कडूंच्या प्रहारचं वादळ मुंबईत धडकणार...आंदोलनासाठी वर्गणी जमा करण्याचं आवाहन...तर सात दिवसाचा शिधा जमा करून मुंबईत आंदोलन करण्याची घोषणा...
बारामतीत आज ओबीसी बचाओ आरक्षण मोर्चा...ज्या बारामतीतून जरांगेंना रसद पुरवली त्याच बारामतीत पवारांची भूमिका वाचण्यासाठी मोर्चा, लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया...
मराठा आरक्षणाचा जीआर सरसकट नसून पुराव्याचा जीआर, मुख्यमंत्री फडणवीसांचा पुनरुच्चार, ओबीसींवर अन्याय करणार नसल्याचीही हमी
आम्ही आरक्षण दिलं होतं, ज्यांनी टिकवलं नाही त्यांना प्रश्न विचारा, शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला..तर पालिका निवडणुकीत महायुतीचाच विजय होणार, ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांवरही प्रतिक्रिया
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Live blog Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी; पाहा एका क्लिकवर...