- मुख्यपृष्ठ
- INDIA AT 2047
- IPL 2024
- क्रिकेट
- निवडणूक
- अयोध्या राम मंदिर
- भारत
- विश्व
- महापालिका निवडणूक 2022
- टेलिव्हिजन
- सिनेमा
- औरंगाबाद
- उस्मानाबाद
- मुंबई
- पुणे
- नाशिक
- नागपूर
- कोल्हापूर
- सोलापूर
- क्रीडा
- फोटो
- राशीभविष्य
- वेब स्टोरी
- वर वधू
- धार्मिक
- शिक्षण
- ट्रेंडिंग न्यूज
- आरोग्य
- लाईफस्टाईल
- क्राईम
- राजकारण
- शेत-शिवार
- व्यापार-उद्योग
- पर्सनल फायनान्स
- म्युच्युअल फंड्स
- आयपीओ
- जॅाब माझा
- ऑटो
- टेक-गॅजेट
- ब्लॉग
- उपयुक्तता
- संपर्क करा
- IDEAS OF INDIA
Maharashtra Live blog Updates: केंद्र सरकारकडून दिवाळी धमाका; आता जीएसटीचे दोनच स्लॅब, सर्व घडामोडी, एका क्लिकवर
Maharashtra Live blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...
पार्श्वभूमी
Maharashtra Live blog Updates: सणासुदीच्या काळात, दिवाळीच्या तोंडावर केंद्र सरकारने सर्वसामान्यांना आणि व्यापाऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतलाय आहे. आधी असलेल्या जीएसटीच्या चार स्लॅबपैकी 12 टक्के आणि 28 टक्क्यांचा स्लॅब रद्द...More
मराठा आरक्षणाच्या GR वर मंत्री पंकजा मुंडे यांच महत्वच विधान
मला हे वाटत ते आधी ही वाटत आले आहे आणि पुढे ही तेच वाटत राहील त्यात बदल होणार नाही.
आर्थिक मागासलेपण आणि सामाजिक मागासलेपण हा वेगळा विषय आहे.
मराठा समाजासाठी GR काढला तर ओबीसीवर अन्याय होऊ नये यासाठी समिती ही काढली आहे.
राज्य सरकार यावरून सुवर्ण मध्य काढला जाईल ही प्रार्थना केली आहे
सगळे समाज आनंदात नांदावे ही इच्छा व्यक्त करते
सामाजिक मागासलेपण असलेल्या ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही अशी भूमिका सरकार घेईल असा विश्वास आहे
GR मुळे ओबीसी वर अन्याय होणार एस वाटत असेल तर दोन महिने वेळ आहे . आम्ही तपासून पाहू .
ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही हा शब्द आमचा ओबीसीना आहे
Akola Flash :
अकोल्यात OBC कार्यकर्ते आक्रमक.... अकोल्यात आज ओबीसीच्या शिष्टमंडळात गेलेल्या माजी आमदारांना आणि कार्यकर्त्यांना पोलिसांची धक्काबुक्की....
ओबीसी कार्यकर्ते जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आले होते जिल्हाधिकारी कार्यालयात....
2 सप्टेंबर रोजी मराठा समाजाला ओबीसी आरक्षणात सहभागी करून घेण्याचा घेतलेला निर्णय रद्द करण्याच्या विरोधात निवेदन देण्यासाठी आले होते OBC कार्यकर्ते. जिल्हाधिकारी यांची मिटिंग सुरु असल्याने कार्यकर्त्यांना थांबावं लागलं.... त्यामुळे आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना अडवण्यासाठी गेले असता त्यांना लोटालोटी तथा धक्काबुक्की झाली आहे....
धक्काबुक्की झाल्याचा आरोप या ठिकाणी माजी आमदार तथा ओबीसी नेते हरिदास भदे यांनी केला आहे....
बाईट : हरिदास भदे ( माजी आमदार तथा ओबीसी नेते )
Ac - बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील मांडवा पठाण परिसरात गेल्या काही दिवसापासून बिबट्याचा वावर असल्याने ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मांडवा पठाण या डोंगराळ भागात बिबट्याचा मुक्त संचार सुरू असून आजवर या बिबट्याने शेतकऱ्याच्या गाई, बैल,वासरे,शेळ्या,वघार यासारख्या पशुधनाचा फडशा पाडला आहे.रात्रीच्या वेळेला गावात आणि शिवारात बिबट्याचा संचार वाढल्याने गावकरी लहान मुलांना घराबाहेर काढत नाहीयेत.वनविभागाने आता गावात पिंजरे लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात असून पशुधन गमावलेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे
Byte - मुख्यमंत्री -
On गुन्हे दाखल
माननीय उच्च न्यायल्याचा निर्देशनुसार दाखल झाले आहे.
जो काही निर्णय आहे तो उच्च न्यायल्याच्या निदर्शनास आणून घ्यावा लागेल.
On आभार
काही लोकं जाणीवपूर्क गैरसमज निर्णमान करतात
आंम्ही जे राजकारण शिकलो. त्यामध्ये पथका अंतिम लक्ष नही है सिंहासन चढते जाना सब समाज को लिए साथ मे आगे है बढते जाना है आमचं ब्रीद वाक्य आहे.
सगळ्यांना सोबत घेऊन आम्हाला पुढे जायचं आहे.
मराठा समाज एक महत्वाचा समाज आहे. महाराष्ट्र जडणं घडनीतील एक मोठं योगदान दिलं आहे या समाजाचं कल्याण झालाच पाहिजे
On
वन नेशन वन टॅक्स प्रमाणे मोदींनी gst लागू केलाय
On
छगन भुजबळ कुठे ही केबिनेट मधून कुठेही निघून गेलेले नाही त्यांच्यासोबत माझी चर्चा झाली आहे मी त्यांना आश्वस्त केलं आहे हा जो gr आपण काढलेला आहे त्यावर obc समाजावर कुठलाही परिणाम नाही हा पुरावयाचा gr आहे मराठवाड्यामध्ये इंग्रजंचं राज्य नव्हतं निझामच राज्य होतं. इंग्रजाच पुरावे इतर ठिकाणी मिळतात पण मराठवाड्यात नाही. मराठवाड्यातले पुरावे निझामाकडे म्हणजे हैद्राबाद मधरे मिळतात तिथले पुरावे आपण ग्राह्य धरले आहे जे खरे हक्कदार आहेत.. कोणालाही खोटं पणा करता येणार नाही. अनेक obc संघटनानी स्वागत केलं आहे.
आमच्या मनात शंका नाही असं सांगितलं आहे.
भुजबळ यांच्या मनातील शंका दूर करू इतरांच्याही मनातील शंका दूर करू
Obc ना सुद्धा माहित आहे जो पर्यंत हे राज्य आहे तो पर्यत obc वर अन्याय होणार नाही.
एका समाजाचं काढून दुसऱ्या समाजाला देणार असं होणार नाही. मराठ्यांच मराठ्यांना देणार obc च obc ना देणार
कोणाचं काढून कोणाला देणार नाही दोन समाजाला एकमेकांसमोर कधी आणणार नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कुशल नेतृत्व यासाठीच भाजपमध्ये पक्षप्रवेश
काही परिहार्य कारणामुळे पक्षप्रवेश लांबणीवर, मात्र काही दिवसातच पक्षप्रवेश होणार - वैभव खेडेकर
पुन्हा मनसे पक्षात सक्रिय होण्यासाठी अनेकांचे फोन - वैभव खेडेकर
Anchor -- जरांगे यांचे आंदोलन बदनाम करण्यासाठी मुंबईत दंगली घडविण्याचा होता डाव .. शहाजी बापू पाटील यांनी महाविकास आघाडीवर डागली तोफ ..
मग लालबागच्या राजाचे जेवण कसे बंद झाले .. संजय राऊत यांना केला सवाल
V/O -- मनोज दादा जरांगे यांचे आंदोलन मुंबईत पोचल्यावर दुर्दैवाने काही लोकांनी मुंबईत दंगली घडविण्याचा डाव आखला होता .. मुख्यमंत्र्यांनी तातडीने दंगलीसाठी रसत पुरविणाऱ्यांची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी शहाजी बापूंनी केली आहे. मनोज दादा यांचे आंदोलन मुंबईत पोचल्यावर महाविकास आघाडीचे काही मराठा नेत्यांनी असा प्रयत्न केला असल्याचा गौप्य स्फोट शहाजी बापू यांनी केला आहे. त्यात नामांकित घराणे आणि त्यातील युवक नेत्याचाही समावेश असल्याचा टोला रोहित पवार यांचे नाव न घेता लगावला.
अशी असली तरी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला न्याय देत ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता हा प्रश्न सोडवल्याने विरोध करणारे नेते तोंडावर पडली. या आंदोलनाला ज्यांनी भाजी भाकरी चांगली रसद पुरवली त्यांना यश आले आणि ज्यांनी दंगली घडविण्यासाठी रसद पुरवली ते तोंडावर पडले असा टोला लगावला.
संजय राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना हा संजय राऊत चा जळफळाट सुरू असून तो वाटच बघत होता कधी दंगल पेटती आणि हे सरकार अडचणीत येते .. मराठा आंदोलन मुंबईत आल्यावर संपूर्ण मुंबईकर विविध पद्धतीची मदत मराठा आंदोलकांना देत असताना लालबागच्या राजाच्या गणपती समोर सुरू असलेली जेवण कोणी बंद केली याचे उत्तर राऊत यांनी द्यावे असा सवाल केला.
Byte -- शहाजी बापू पाटील
मुंबईत जय जवान गोविंदा आणि कोकण नगर गोविंदा पथकांमधल्या स्पर्धेला राजकिय वळण
प्रताप सरनाईकांच्या दहहंडीत कोकण नगर गोविंदा पथकाला १० थर लावल्याबद्दल सिद्धीविनायक मंदीरात गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रमाणपत्र प्रदान
शिवसेनेचे युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांच्या उपस्थितीत प्रमाणपत्र प्रदान
तर, जय जवान गोविंदा पथकानंही कोकण नगर गोविंदा पथकाला १० थरांचं चॅलेंज देत वर्ल्ड रेकॉर्डवर दावा केलाय
पूर्वेश सरनाईक-
मी दहिहंडीत कुठेही राजकारण करत नाही, खेळ खेळसारखाच पहा
इथे काय चॅलेंज घॆण्यासाठी बसलो नाही
बाप्पाच्या आशिर्वादानं विश्वविक्रम झालाय, त्याचा सम्मान केला जातोय
जे संघ आरोप करतात त्यांचंही अभिनंदन
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या प्रोटोक़लचं आम्ही पालन केलं त्यांनी केलं तर त्यांनाही मिळेल
१० ऑगस्ट २०१२ मध्ये ठाण्यातील संस्कृती युवा प्रतिष्ठान दहीहंडीच्या विश्वविक्रमाची नोंद ही गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने केली होती, आणि आता तब्बल १३ वर्षा नंतर पुन्हा एकदा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने १० थराच्या विश्वविक्रमाची नोंद करून घेतली आहे.
स्वप्नील डंगरीकर, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड निरीक्षक
आम्ही वर्ल्ड रेकॉर्ड घोषित करतांना तांत्रीक बाबी तपासतो
आमच्या निकषांमध्ये बसणा-या बाबी लक्षात घेतल्या जातात
इतर मंडळांनी केलेल्या अर्जावही कार्यवाही सुरु असेल
ब्रेकिंग
मुंबई शहर व उपनगरासाठी ईद ए मिलादच्या शासकीय सुट्टीत बदल
आता ५ सप्टेंबर ऐवजी ८ सप्टेंबरला शासकीय सुट्टी जाहीर
अनंत चतुर्दशी निमित्ताने मुस्लिम बांधवांनी केली होती मागणी
ईदनिमित्त शुक्रवार ऐवजी सोमवारी कार्यक्रमांचे केले नियोजन
मुंबई वगळता इतर जिल्ह्यांत मात्र ५ सप्टेंबरलाच ईदची सुट्टी कायम
आजच शासन निर्णय जारी होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती
गडचिरोली जिल्ह्यातील ताटीगुडम गावातील प्रकार
गडचिरोली : जिल्ह्यातील अहेरी तालुक्याच्या ताटीगुडम गावातील एका विहिरीतून चक्क गरम पाणी निघत असल्याने गावकऱ्यांमध्ये कुतूहलाचा विषय निर्माण झाला आहे. गेल्या सहा महिन्यापासून हा प्रकार सुरू असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे असले तरी भूगर्भातील उष्णतेचा परिणाम, खनिजांचा रासायनिक प्रभाव किंवा भूगर्भीय उष्णतेमुळे निर्माण झालेली नैसर्गिक प्रक्रिया यामुळे हा प्रकार घडल्याचे जाणकार सांगत आहेत. सत्याना मल्लय्या कटकू यांच्या मालकीची ही विहीर असून विहिरीतून सतत गरम पाणी येत आहे. पाणी इतके गरम आहे की ते थेट वापरणे शक्य नसून त्यात थंड पाणी मिसळवावे लागत आहे. विहिरीतून बुडबुडे आणि वाफाही निघताना दिसून येतात. या घटनेचा अनुभव घेण्यासाठी परिसरातील अनेक नागरिक गावात जात असून विहिरीतून पाणी काढून कुतूहलाने तपासणी करत आहेत. गरम पाण्याच्या झऱ्यांची नोंद अनेक ठिकाणी झालेली असली तरी गडचिरोली जिल्ह्यात प्रथमच अशी घटना समोर आल्याने प्रशासनाने याचे संशोधन करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
बाईट : श्रीधर दुग्गीरालापाटी, स्थानिक नागरिक
https://we.tl/t-7XEqICsyIg
Anchor अनियमित व तक्रार असलेल्या कृषी केंद्रांच्या विरोधात धुळे कृषी विभागाने कारवाई केली आहे. धुळे जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने कृषी बियाणं खातं विक्री करताना अनियमित ठेवणारे तसेच तक्रार प्राप्त झालेल्या 36 कृषी सेवा दुकानांचे परवाने एक महिन्यासाठी निलंबित केले आहेत. तर जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने दहा कृषी सेवा केंद्रांचे परवाने कायमचे रद्द केले आहेत. ऐन खरीप हंगामात बी-बियांवर खतांची विक्री करताना जिल्ह्यातील काही दुकानदारांच्या विरोधात शेतकरी तसेच पदाधिकाऱ्यांकडून तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगाने तपासणी करत धुळे जिल्हा कृषी विभागाने जिल्ह्यातील एकूण 46 कृषी सेवा केंद्र वर कारवाई केली आहे.
Byte- सुरज जगताप जिल्हा कृषी अधीक्षक
भिवंडी : ओबीसी आरक्षणावर गदा येत असल्याचा आरोप करत राष्ट्रीय ओबीसी महासंघ, भिवंडी तालुकाच्या वतीने संताप व्यक्त केला आहे. मराठा समाजाला ओबीसी आरक्षणात समाविष्ट करण्याचा निर्णय चुकीचा आहे. यामुळे ओबीसींच्या शैक्षणिक, नोकरी व सामाजिक हक्कांवर अन्याय होत आहे. सरकारने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. ओबीसी समाज अजूनही मागासलेला असून त्यांच्या प्रगतीसाठी स्वतंत्र आरक्षण आवश्यक आहे. हक्क अबाधित ठेवले नाहीत तर राज्यभर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
बीड: राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या 38 हजार कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला असून संपाचा आजचा सोळावा दिवस आहे. बीडमधील 1400 कर्मचाऱ्यांकडून मागील पंधरा दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने केली जात आहेत. दरम्यान या कर्मचाऱ्यांना तात्काळ कामावर रुजू होण्याचे आदेश एनएचएमच्या आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिले आहे. मात्र तरी देखील कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.
सेवेत कायम करण्यासह इतर प्रलंबित मागण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू आहे. कर्मचाऱ्यांच्या या पावित्र्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णसेवेवर परिणाम होतोय. मात्र याचा विचार आरोग्य विभागाने करावा आणि आमच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी आरोग्य कर्मचाऱ्यांनी केली. हे कर्मचारी तात्काळ कामावर रुजू न झाल्यास कारवाईची तंबी आयुक्तांकडून देण्यात आली आहे.
परभणी : महानगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना आज जाहीर करण्यात आली आहे. परभणी शहरामध्ये एकूण १६ वॉर्ड असुन ६५ प्रभाग आहेत. महत्त्वाचं म्हणजे 2017 च्या निवडणुकीनुसारच ही प्रभाग रचना जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. १५ वार्डा मध्ये ४ तर एका वार्ड मध्ये ५ जागा असणार आहेत. दुसरीकडे 15 सप्टेंबरपर्यंत या प्रभाग रचनेवर हरकती घेता येणार आहेत. आज या प्रारूप प्रभाग रचनेची माहिती महानगरपालिका वेबसाईट तसेच प्रभाग समिती कार्यालयात नकाशांसह लावण्यात आलेली आहे.
मिरा-भाईंदर : मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना निश्चित करण्यात आली आहे. राज्य शासनाने राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतर जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात एकूण २४ प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत.
यामध्ये २३ प्रभाग चार सदस्यीय तर १ प्रभाग तीन सदस्यीय असेल. पाच सदस्यीय प्रभागांचा समावेश या वेळेस करण्यात आलेला नाही. या रचनेनुसार एकूण ९५ नगरसेवकांची निवडणूक होणार आहे.
नगरविकास विभागाच्या आदेशानुसार, या प्रारूप अधिसूचनेवर नागरिकांनी हरकती अथवा सूचना द्याव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. या हरकती किंवा सूचना १५ सप्टेंबर २०२५ रोजी किंवा त्याआधी मिरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्तांकडे लेखी स्वरूपात सादर करता येतील. त्यानंतर आलेल्या हरकती व सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
- ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळांच्या नाशिकच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढवला.
- मंत्री छगन भुजबळांच्या भुजबळ फार्म या निवासस्थानी आणि कार्यालयाच्या बाहेर पोलिस बंदोबस्तात वाढ
- मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणासंदर्भात घेतलेली भूमिकेवरून प्रशासन अलर्ट
- मराठा आणि ओबीसी आरक्षण मुद्द्यावर पोलिसांची खबरदारी.
नांदेड: येथे पाच दिवसापासून पावसाने विश्रांती दिलीय मात्र पैनगंगा नदी अद्यापही खवळलेलीच आहे. नदीला अद्याप पुरसदृश्य पाणी आहे. पैनगंगेच्या पुराने नांदेडमध्ये शेकडो हेक्टर क्षेत्रातील पिके गिळंकृत केली आहेत.
कारखाने अधिनियमातील दुरुस्तीला मंत्रिमंडळाची मान्यता
आता दिवसाला ९ तासांऐवजी १२ तास काम करण्याची तरतूद
कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची माहिती
कामगारांना अधिकचा आर्थिक फायदा होणार
विश्रांती कालावधीमध्ये बदल करून ५ तासांनंतर ३० मिनिटे आणि ६ तासांनंतर पुन्हा ३० मिनिटे विश्रांती
आठवड्याचे कामकाजाचे तास ४८ तासांवरून ६० तासांपर्यंत वाढविले
कामगारांच्या अतिरिक्त वेळेत (ओव्हरटाईम) आता कमाल मर्यादा ११५ तासांवरून १४४ तासांपर्यंत वाढ
कामगारांना अधिकचा आर्थिक फायदा होणार
शासन मान्यतेशिवाय वेळेतील बदल कारखान्यांना परस्पर करता येणार नाही
कामगारांनी जास्तीचे काम घेतल्यास त्याचा पुरेपूर मोबदला आणि पगारी सुट्या देण्याबाबत बदल
मालेगाव : राज्य निवडणूक आयोगाकडून मालेगाव महापालिकेच्या निवडणुकांसाठी प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. एकूण 21 प्रभाग निश्चित करण्यात आले असून 2017 मधीलच साधारण रचना कायम ठेवण्यात आली आहे. प्रभागरचना निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आल्या आहेत. दरम्यान, प्रभाग रचना जाहीर करण्यात आल्याने आता इच्छुक उमेदवार व राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग येणार आहे. नागरिकांच्या हरकती व सूचना सादर करण्यासाठी 15 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली असून, त्यानंतर अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार आहे.
पनवेल : येथे मर्डर केसमधून जामीनावर बाहेर आलेल्या सोबन महातू या आरोपीने पोलिसांवर चाकू आणि कुर्हाडीने हल्ला केला. काल रात्री त्याने एका इमारतीत घुसून जबरदस्तीने रूम बळकावण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी समजावून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता त्याने अचानक हल्ला चढवला. या घटनेत दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले असून, त्यांना कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
बुलढाणा : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कुठे जोरदार तर कुठे संततधार पाऊस पडत आहे. यामुळे सोयाबीन पिक धोक्यात आले असून अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीन शेतात अद्याप पाणी साचलेले आहे. त्यामुळे सोयाबीन पिक संकटात आले असून सोयाबीन पिकांची मुळं खराब होत आहे. तर काही ठिकाणी पाणी साचल्याने सोयाबीन पिकांची वाढ खुंटली आहे. परिणामी सोयाबीन उत्पन्न कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आल्याचे पाहायला मिळते.
बीड : नवसाला पावणारा गणपती म्हणून ख्याती असलेल्या बीडच्या माजलगाव येथील निजामकालीन टेंबे गणपतीची स्थापना करण्यात आलीय. तत्कालीन निझाम सरकारने परवानगी नाकारल्याने या गणपतीची स्थापना भाद्रपद एकादशीच्या दिवशी व विसर्जन पाच दिवसांनी पौर्णिमेला करण्यात येते. यंदा या गणपतीचे 125 वे वर्ष आहे. काल एकादशीच्या दिवशी या गणपतीची मिरवणूक काढून स्थापना करण्यात आली.
तत्कालीन निझाम सरकारने या गणपती मिरवणुक अडवली होती. त्यामुळे सदस्यांनी मिरवणूक अडविलेल्या ठिकाणाहून घोड्यावर जात हैदराबादहून स्थापना करण्याची परवानगी आणली. याच कारणामुळे पाच दिवस गणपती त्याच ठिकाणी थांबविण्यात आला होता. स्थापनेपासूनच या गणपतीची मूर्ती माती, शेण, चिखल, सारवणाच्या मिश्रणातून साकारली जाते. एवढी वर्षे लोटली, काळ बदलला तरीदेखील इकोफ्रेंडली मूर्तीची परंपरा मंडळाने आजही टिकविलेली आहे.
बाणगंगा तलावात शाडू मातीच्या गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यास परवानगी मिळावी, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून शाडूच्या मूर्तींचं विसर्जन येथे होत असतानाही यंदा पालिकेने मनाई केल्याने ही याचिका दाखल झाली. याचिकेत अशा मनाईमुळे मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होत असल्याचा दावा करण्यात आला असून, ती रद्द करून परवानगी द्यावी, अशी मागणी आहे. मुंबई उच्च न्यायालयाने यावर तातडीची सुनावणी घेण्यास सहमती दर्शवली असून आज सुनावणी होणार आहे.
मनसे नेते वैभव खेडेकर यांचा पक्ष प्रवेश लांबणीवर
आज मुंबईत वैभव खेडेकर यांचा भाजपमध्ये होणार होता पक्ष प्रवेश
आज होणारा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला
भाजप प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थिती होणार होता पक्ष प्रवेश
छत्रपती संभाजीनगर : आगामी मनपा निवडणुकीसाठी तयार करण्यात प्रभागरचनेच्या आलेल्या प्रारूप आराखड्यावर नागरिकांकडून मोठ्या संख्येने आक्षेप दाखल होत आहेत. आतापर्यंत 359 जणांनी हरकती नोंदवण्यात आल्या आहेत. यामुळे प्रशासनासमोर एक मोठे आव्हान उभे राहिले आहे. दरम्यान, आज दुपारी तीन वाजेपर्यंत आक्षेप दाखल करण्याची वेळ आहे.
वाशिम : जिल्ह्यात सतत बरसत असलेल्या पावसामुळं जिल्ह्यातील नदीनाले ओसंडून वाहत आहेत. तर अनेक ठिकाणी नैसर्गिक धबधवे दिसून येत आहे. मानोरा तालुक्यातील रतनवाडी प्रकल्प ओव्हरफ्लो झाला असून धबधब्यावर आनंद लुटण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत.
वाशिम जिल्ह्यात सतत बरसत असलेल्या पावसामुळं जिल्ह्यातील नदी ओसंडून वाहत आहेत..तर अनेक ठिकाणी नैसर्गिक धबधबा दिसून येत आहे...मानोरा तालुक्यातील रतनवाडी प्रकल्प ओव्हरफ्लो झाला असून तिथं धबधब्यावर आनंद लुटण्यासाठी नागरिक दिसत आहेत...
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजकारणात भाजपमध्ये जोरगेवार विरुद्ध मुनगंटीवार हा वाद गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने पाहायला मिळत आहे, याच वादाच्या शृंखलेत आता एक नवीन एपिसोड पाहायला मिळत आहे आणि हा वाद रंगला आहे गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत स्वागत स्टेज लावण्यावरून... गेले अनेक वर्ष मुनगंटीवार म्हणजेच पर्यायने भाजपकडून लोकमान्य टिळक विद्यालयासमोर मिरवणुकीच्या स्वागतासाठी स्टेज लावण्यात येतो, यावर्षी देखील मुनगंटीवार गटाचे माजी शहराध्यक्ष राहुल पावडे यांनी स्टेज लावला मात्र या स्टेजला जोरगेवार गटाचे नवनियुक्त शहराध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांनी आक्षेप घेत हा स्टेज त्यांना देण्याची मागणी केली आहे, जोरगेवार म्हणजेच आता भाजप हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे, त्यामुळे यावर्षीच्या मिरवणुकीत जोरगेवार आणि मुनगंटीवार यांचे स्वतंत्र स्टेज असतील का हे देखील पाहणं रंजक ठरेल म्हणजेच पर्यायाने चंद्रपूर शहरात दोन भाजप दिसतील का हा प्रश्न आहे.
नंदुरबार:- हवामान खात्याचा चार आणि पाच तारखेला नंदुरबार जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट...
रात्रभरापासून सुरू असलेल्या रिमझिम पावसाचा जोर वाढला..
सातपुड्याच्या दुर्गम भागात जोरदार पावसाला सुरुवात..
पावसाचा जोर वाढल्याने नदी नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता...
हवामान खात्याने दोन दिवस ऑरेंज अलर्ट जाहीर केल्यानंतरप्रशासनाच्या वतीने नदीकाठावरील गावांना सावधानतेचा इशारा
नागपूर जिल्ह्यातील बाजारगाव जवळील सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीत काल मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण स्फोटात 1 कामगाराचा मृत्यू झाला असून 17 कामगार जखमी झाल्याची माहिती आहे.. सर्व जखमींना नागपूरच्या विविध खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून 4 जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
जम्मूमध्ये पावसाचा कहर..मुसळधार पावसाचा वाहतूक व्यवस्थेला फटका, अनेक ठिकाणी भूस्खलन..तर पंजाबमध्ये ३० वर्षांंतर महापूर.. १ हजारहून अधिक गावांना पुराचा फटका..
भुजबळ नाराज आहेत याचा अर्थ जीआर पक्का, मनोज जरांगेंचा टोला...चुकलं असेल तर जीआर पुन्हा काढायला लावू, अफवांवर विश्वास ठेवू नका, जरांगेंचं आवाहन...
मराठा आरक्षणाच्या जीआरविरोधात गरज पडल्यास कोर्टात जाणार, सरकारविरोधात भुजबळांनीच थोपटले दंड...मंत्रिमंडळ बैठक आणि वर्षा निवासस्थानावरील स्नेहभोजनाकडे पाठ
जीएसटीचे १२ आणि २८ टक्के स्लॅब रद्द, केंद्र सरकारचा मोठा निर्णय, फक्त ५ आणि १८ टक्क्यांचाच स्लॅब लागू राहणार, कपडे, इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह घरंही स्वस्त होणार, २२ सप्टेंबरपासून निर्णय लागू ..
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Live blog Updates: केंद्र सरकारकडून दिवाळी धमाका; आता जीएसटीचे दोनच स्लॅब, सर्व घडामोडी, एका क्लिकवर