Maharashtra Live Blog Updates: महाराष्ट्रासह देश-विदेशातील विविध घडामोडी, वाचा सर्व अपडेट्स...
Maharashtra Live Blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लाईव्ह घटनांचे अपडेटस् पाहण्यासाठी क्लिक करा.
पार्श्वभूमी
Maharashtra Live Blog Updates: महाराष्ट्रात आलेले 107 पाकिस्तानी नागरिक बेपत्ता आहेत. राज्य सरकारच्या शोधमोहिमेत धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्यात पाच हजार तेवीस पाकिस्तानी नागरिक असून फक्त 51 लोकांकडेच वैध...More
बीड ब्रेक: जिल्हा कारागृहातील महिला पोलीस कर्मचाऱ्यासह वरिष्ठ तुरुंग अधिकारी निलंबित
दक्षता पथकाच्या तपासणी दरम्यान आढळला होता गैरप्रकार
अहवाल आल्यानंतर आज निलंबनाचे आदेश
वाल्मीक कराडसह संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी बीडच्या जिल्हा कारागृहात
कारागृह प्रशासनावर आरोप झाल्यानंतर वरिष्ठ कार्यालयाकडून गंभीर दखल
वारंवार केली जात आहे तपासणी
सीमा गोरे असं निलंबित झालेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव तर डी.डी. कवाळे असे वरिष्ठ तुरुंग अधिकाऱ्याचे नाव
डी.डी.कवाळे यांनी नुकताच स्वीकारला होता पदभार
महाराष्ट्र सरकारचे मंत्री वाचाळ वीर... भाजपा दोन समाजामध्ये तेढ निर्माण करताय...पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिहारच्या निवडणुकीत व्यस्त : नाना पटोले यांच्या टोला....
Anchor : महाराष्ट्र राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी रत्नागिरीच्या सभेमध्ये ज्याप्रमाणे पहलगाममध्ये धर्म विचारला गेला त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण दुकानदारकडे जाऊन त्यांच्या धर्म विचारावा आणि त्यांना हनुमान चालीसा पठण करायला लावा असे वक्तव्य केले होते . त्याच्या समाचार घेत असताना काँग्रेसचे माजी प्रदेश अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की भाजपाने आपल्या वाचाळवीरांना पहावं. एका बाजूला नरेंद्र मोदी एक है तो सेफ आहे असे नारे देतात. असे वक्तव्य करून धर्माधर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम भाजपा करीत आहेत. त्यांच्या वक्तव्याचे परिणाम आज देश भोगत आहेत. ज्याप्रमाणे काश्मीरमध्ये अनेक मुस्लिम बांधवांनी पर्यटकांना वाचवलं त्याने सहकार्य केलं. एवढेच नाही तर देशभरामध्ये मुस्लिम समाजाने पाकिस्तान मुर्दाबाद चे नारे दिले. ज्याप्रमाणे भाजपाचे खासदार, मंत्री वागत आहेत हे चुकीचे असल्याचे नाना पटोले म्हणाले. उलट राहुल गांधी यांनी जम्मू-काश्मीरमध्ये जाऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. मात्र पंतप्रधान यांनी याकडे दुर्लक्ष करीत मात्र बिहारच्या निवडणुकीकडे आपलं लक्ष केंद्रित करण्यात करीत असल्याचा टोला यावेळी नाना पटोले यांनी लगावला. उलट इंदिरा गांधींनी अशा प्रकारच्या हल्ला जेव्हा भारतावर झाला त्यावेळेस लाहोर मध्ये जाऊन पाकिस्तानची विभागणी केली. परंतु हा आपल्या देशावर हमला आहे आणि या हमल्या विरुद्ध काँग्रेस ही सरकारच्या सोबत असल्याची भूमिका नाना पटोले यांनी मांडले.....
: नाना पटोले ऑन नितेश राणे
2)राजीनामा च्या बाबतीत गृहमंत्री अमित शहा यांनी निर्णय घ्यावा... जनाची नाही तर मनाची लाज बाळगावी ...नाना पटोले यांच्या अमित शहा यांना टोला....
गेंड्याच्या कातडीच्या सरकार....नाना पटोले....
एका बाजूला संजय राऊत हे गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनामा मागत आहेत तर शरद पवार यांनी दहशतवादी विरोधी धोरण ठरवावे असे वक्तव्य केले यावरून गृहमंत्री शहा यांच्या राजीनामाच्या विरुद्ध महाविकास आघाडीमध्ये मतभेद आहेत का यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की ज्याप्रमाणे देशाची माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री आणि असे अनेक नेते आहेत ज्यांच्या कार्य काळामध्ये अशा घटना झाल्या अशा नेत्यांनी स्वतःहून राजीनामा दिला आहे त्यामुळे "जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगावी"अशी भूमिका काँग्रेसची आहे. पण ज्यांना सत्ताच पाहिजे गेंद्याच्या कातडीची सरकार असलेले लोक आहेत. झालेल्या घटनेची चूक लक्षात घेऊन याबाबतीत त्यांनी निर्णय घ्यावा. मात्र ज्याप्रकारे देशावर हल्ला झाला आहे त्याला उत्तर देणे फार गरजेचे आहे जेणेकरून पुढे देशावर असं कोणत्याही प्रकारचा हमला होणार नाही अशी भूमिका काँग्रेसची असल्याचे वक्तव्य त्यांनी गोंदिया जिल्ह्यात येथे केले....
:- नाना पटोले ऑन अमित शहा राजीनामा
3)मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आत्मपरीक्षण करावं ....नाना पटोले...
Anchor :- धर्म विचारुन मारलं का याबाबतचं सत्य माहित नाही असं पवार म्हणाले. आधीच्या घटनांमध्ये धर्मावरुन चर्चा नव्हती आता चर्चा का असा सवालही त्यांनी केला.. तर पवारांनी मृतांच्या आप्तेष्टांकडून घटना ऐकावी असा सल्ला फडणवीसांनी दिलाय यावर बोलताना काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की त्यांच्या आत्ता परिवारांना विचारण्यापेक्षा ही घटना झालीच कशी त्याच्या खरा दोषी कोण.. याच्यावर आत्मपरीक्षण करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ आहे असा टोला नाना पटोले यांनी लगावला. भाजपाने जो विभाजन वाद निर्माण केला त्याची फळ आम्हाला भोगावे लागत आहे अशी जनमानसाची भावना आहे. यामध्ये आम्हाला पळायचे नाही अशी भूमिका काँग्रेसची आहे. मात्र या घटनेच्या जशास तसे उत्तर द्यावे असे वक्तव्य नाना पटोले यांनी केले....
गायींना गुंगीचे औषध देणाऱ्यांना तात्काळ अटक करून कारवाई करण्याच्या पोलिसांना सूचना
परळी वैजनाथ।दिनांक २५।
गायींना गुंगीचे औषध देऊन त्यांची तस्करी करण्याचा प्रयत्न काही नागरिकांच्या सतर्कतेमुळे फसल्याचा प्रकार शहरात घडल्यानंतर राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकारामागे जे कोणी असतील त्यांना तात्काळ अटक करावी अशा सूचना त्यांनी पोलिस प्रशासनाला दिल्या आहेत.
शहरातील स्नेहनगर भागात काल रात्री गायींना खाण्याच्या पदार्थांमधून औषध देण्याचा संतापजनक प्रकार घडला. गायींना बेशुद्ध करून त्यांची तस्करी करण्याचा अज्ञात चोरट्यांचा प्रयत्न होता असा संशय स्थानिक रहिवाशांना आला, त्यांनी सतर्कता दाखवून हा प्रयत्न हाणून पाडला. राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांना हा प्रकार समजताच त्यांनी तातडीने पोलिस अधीक्षक व स्थानिक पोलिस निरीक्षक यांना संपर्क साधून या प्रकारामागे जे कोणी असतील त्यांना तातडीने अटक करून कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. गुंगीचे औषध मिश्रित पदार्थ खाल्याने ज्या गायी बाधित झाल्या होत्या त्यावर त्वरेने उपचार करण्यास त्यांनी सांगितल्यानंतर पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी उपचार करून चार गायींना धोक्यात बाहेर काढले, एका गायीवर उपचार सुरू आहेत.
अवघ्या अर्ध्या तासात रिक्षा चालकाचा शोध घेऊन दागिने महिलेला केले परत
अँकर:- मुंबईच्या दहिसर परिसरातून पुण्याला जाण्यासाठी निघालेल्या एका महिलेचे तब्बल 12 लाखांचे सोन्याचे मौल्यवान दागिने असलेली एक बॅग रिक्षात विसरली गेली. मात्र अवघ्या अर्धा तासात दहिसर पोलिसांनी वीसहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासून रिक्षाचा शोध घेऊन महिलेला तिचे दागिने परत मिळवून दिले. दहिसर पोलिसांच्या या तत्परतेबद्दल आता सर्वत्र कौतुक होत आहे. महिलेला आपले दागिने परत मिळाल्यामुळे तिच्या आनंदाला पारावर उरला नाही. बॅग परत मिळाल्यानंतर महिलेने दहिसर पोलिसांचे आभार मानले आहेत.
एकनाथ शिंदे भाषण pointers
* आजचा दिवस ठाणेकरांच्या दृष्टीने आनंदाचा आणि महत्वाचा दिवस
* समाधान आणि आनंद आशा दोन्ही भावना मनात आहेत
* अभय ओक यांचे अतिशय जिव्हाळ्याचे नाते आणि ऋणानुबंध आहेत
* ते ठाण्याचे सुपुत्र आहेत त्याचा अभिमान आहे
* ओक साहेबांनी न्यायदान करताना सर्व सामान्य माणसानं न्याय द्यायच काम केलं .
* पर्यावरणाचा समतोल राखून विकास करा असा ओक यांचे विचार
* ओक साहेबांचे आदर्श घेऊन आपलं सरकार सर्वसामान्यांचे सरकार पर्यावरणाचा विचार करून विकास करत आहेत
* सर्व वकिलांच्या बांधव भगिनींच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे .
* न्याय केवळ मिळून चालत नाही दिसावं लागत
* हे सरकार लोकांचे सर्वसामान्यांचे आहे
* कॅबिनेट मधे न्यायव्यवस्थेचा कोणताही प्रश्न आला तर आम्ही एक सेकंड ही लावत नाही
* बघतो करतो असा आमच्याकडे नाही नो रिझन ऑन दि स्पॉट डिसिजन
* बार रूम मध्ये AC पाहिजे नाहीतर वकील तापतील
* सभागृहात सगळे आमदार बोलून जायचे मी शेवटपर्यंत थांबून कोण काय बोलतायत हे ऐकायचो म्हणून. मी मुख्यमंत्री झालो
* न्यायालय वाढवण ही काळाची गरज आहे .
* तुम्ही सांगायच आणि आम्ही ऐकायचं हे सरकारचे काम आहे
Anchor :
काश्मीर येथील पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादयांनी पर्यटकांवर हल्ला केला. त्यानंतर या दहशतवाद्यांचे फोटो आले. देहूरोड मधील रहिवासी असलेले श्रीजीत रमेशन हे देखील त्याचवेळी काश्मीर मध्ये परिवार सोबत पर्यटनासाठी गेले होते. पहलगाम पासून साडेसात किलोमीटर वर असलेल्या बेताब व्हॅली याठिकाणी श्रीजीत आणि त्यांचे कुटुंबीय गेले होते. मात्र बेताब व्हॅली याठिकाणी गेल्यानंतर श्रीजीत हे आपल्या मुलीचा रिल्स काढत होते. हे रिल्स काढणं सुरू असतानाच संशयित दोन दहशतवादी या मुलीच्या पाठीमागून जात असल्यानं कैद झालं आहे. श्रीजित रमेशन यांनी याबाबतची माहिती NIA (national intelligence agency) ला दिली असून या व्हिडिओ आणि फ़ोटोची संपूर्ण तपासणी ही NIA कडून केली जात आहे.
# ग्राफीक्स :
मात्र यामुळे काही महत्वाचे प्रश्न निर्माण होत आहेत..
1) बेताब व्हॅली मध्ये हे दहशतवादी मागील अनेक दिवसांपासून वास्तव्यास होते का..?
2) बेताब व्हॅली या परिसरात ते मागील अनेक दिवसांपासून रेकी करत होते का.?
3) बेताब व्हॅली मध्ये या दहशतवाद्यांना पळून जाण्यासाठी किंवा लपण्यासाठी जागा नव्हती.. त्यामुळे त्यांनी पहलगाम व्हॅली निवडली का..?
4) बेताब व्हॅली पेक्षा पहलगाम या ठिकाणी सर्वात जास्त पर्यटक येत असतात. त्यामुळे या दहशतवाद्यांनी पहलगाम हे ठिकाण निवडले का..?
एमएमआरडीएने आर्थिक वाढ आणि नाविन्यपूर्णतेमध्ये साध्य केला नवा मापदंड
नॉन-फेअर रेव्हेन्यू (प्रवासी भाड्याव्यतिरिक्त मिळणारे उत्पन्न) तिप्पट वाढून ₹१२२ कोटींवर, भविष्यसज्ज आणि परवडणाऱ्या मेट्रो व्यवस्थेला मिळाले पाठबळ
मुंबई, २५ एप्रिल २०२५ –
सार्वजनिक परिवहनाच्या आर्थिक मॉडेलमध्ये नवा मापदंड निश्चित करत, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) २०२४–२५ या आर्थिक वर्षात नॉन-फेअर रेव्हेन्यूमध्ये (प्रवासी भाड्याव्यतिरिक्त मिळणारे उत्पन्न) तिप्पट म्हणजेच जवळपास ₹१२२ कोटींची भरघोस वाढ नोंदवली आहे. गेल्या वर्षीच्या ₹४२.५ कोटी या उत्पन्नात यंदा थेट १८७ टक्के वाढ झाली आहे. या विक्रमी वाढीमुळे एमएमआरडीएने स्वयंपूर्ण, आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि प्रवाशांना सुलभ सेवा देणारी मेट्रो व्यवस्था उभारण्याच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले आहे.
एमएमआरडीएचा एकूण ऑपरेशनल रेव्हेन्यू (क्रियात्मक उत्पन्न) ₹१९० कोटींवरून वाढून थेट ₹२९२ कोटींवर पोहोचला. म्हणजे आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला ठरवलेले ₹२०० कोटींचे लक्ष्य मोठ्या फरकाने ओलांडण्यात आले आहे.
आमदार शशिकांत शिंदे पत्रकार परिषद पॉइंटर
आमदार महेश शिंदे यांनी ड्रग्स प्रकरणात केलेल्या आरोपांवर आमदार शशिकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिला आहे यामध्ये सरकार त्यांचे आहे. त्यांनी या विषयी तक्रार करावी... या प्रकरणात कस्टम, नार्कोटेक्स विभाग चौकशी करत आहे. त्यांना तर तसेच जाणवले असते तर त्यांनी कोरेगाव विधानसभा मतदारसंघात येऊन चौकशी केली असती. उगाच धागा पकडून स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न महेश शिंदे यांनी करू नये.... यांचे कोणासोबत काय व्यवसाय आहेत हे मी बाहेर काढू का
सातारा जिल्ह्यात आम्ही राजकारणाचे पावित्र्य राखला आहे. ते सोडून जर तुम्ही कुटुंबापर्यंत येत असाल तर आमची तयारी आहे. आम्ही जर प्रकरण बाहेर काढली तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही.
चिंचकर प्रकरणांमध्ये दहा कोटी मागणाऱ्या नेत्याची माहिती असेल तर त्यांनी चौकशी यंत्रणांना माहिती द्यावी. उगाच चुकीची संशयाचे बोट दाखवू नये.
महेश शिंदे यांचा मुलगा आणि पत्नी कोल्हापूरला होते तिथे जनावरांचा चाऱ्याचा घोटाळा झाला म्हणून आम्ही ते आरोप करायचे का? आम्हाला संस्कृती आहे. राजकारण कुटुंबापर्यंत न्यायचं नसतं.
माझा मुलगा कुठे शिकायला होता याविषयी महेश शिंदेंनी पुरावे द्यावेत.
कोरेगाव मध्ये सध्या कायदा सुव्यवस्था काय सुरू आहे खुलेआम तिथे मारामारी होते.... कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील पोलीस ठाण्यामध्ये किती क्रॉस कंप्लेंट होत आहेत याची माहिती घ्या.
तब्बल 10 तासानंतर सिक्कीममधील लाचूंग येथे भूस्खलनामुळे रस्त्यात अडकलेल्या महाराष्ट्रातील 100 पर्यटकांसह अकोल्यातील 16 पर्यटकांची सुटका. भूस्खलनामुळे ठिकठिकाणी कोसळल्या होत्या दरडी. सकाळी 6 ते साडेचार वाजेपर्यंत रस्त्यात अडकून पडले होते पर्यटक. प्रशासनाने हटवला रस्त्यावरील मलबा. आता अडकलेले प्रवासी हळूहळू निघालेत पुढच्या प्रवासाला.
अकोल्यातील 16 पर्यटकांसह महाराष्ट्रातील जवळपास 100 वर पर्यटक सिक्कीममध्ये भूस्खलन आणि हिमस्खलनामूळे अडकले होते. सिक्कीममधील लाचूंग येथे मोठ्या प्रमाणात झाले भूस्खलन. राज्यातील पुणे,मूंबई, अकोला आणि नागपुरातील पर्यटकांचा समावेश. यात अकोल्यातील चार नामांकित डॉक्टरांच्या कुटूंबातील 16 जण अडकलेत लाचूंगमध्ये. लाचूंग हे ठिकाण सिक्कीममधील मंगन जिल्ह्यातील नावाजलेले हिल स्टेशन. 16 जणांमध्ये पुरूष, महिला आणि लहान मुलांचा समावेश. अकोल्यातील डॉ. प्रशांत बारापात्रे, डॉ. शितल टोंगसे, डॉ. संजय शिंदे आणि डॉ. प्रभाकर जायभाये हे चार डॉक्टर कुटुंबियांसह अडकले होते. सर्वजण सुरक्षित. आता निघालेत पुढच्या प्रवासाला.
बीड: ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळ्याचा तपास आता सीआयडी करणार; शेकडो ठेवीदारांच्या कोट्यावधी रुपयांच्या ठेवी ज्ञानराधा मल्टीस्टेटमध्ये अडकून
वर्षभरापासून फरार असलेल्या अर्चना कुटेला अटक होणार?
Anc: बीड मधील ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळ्याचा तपास सीआयडी कडे वर्ग करण्यात आलाय. पूर्वी या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे होता. मात्र आता या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी हा तपास सीआयडी कडे वर्ग झाला आहे.
बीड येथील ज्ञानराधा मल्टीस्टेट गैरव्यवहार प्रकरणामुळे हजारो ठेवीदारांच्या कोट्यावधी रुपयांच्या ठेवी अडकून पडल्या आहेत. याचे पडसाद काही दिवसांपूर्वी सभागृहात देखील पाहायला मिळाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी होईल असे आश्वासन दिले होते. आता त्याच अनुषंगाने आर्थिक गुन्हे शाखेकडे असलेला हा तपास सीआयडी कडे वर्ग झालाय. त्यामुळे तपासाला गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय.
दरम्यान कुटे ग्रुपच्या सर्वेसर्वा अर्चना कुटे मागील वर्षभरापासून फरार आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी ठेवीदारांची झूम मीटिंग देखील घेतली होती. मात्र तरी देखील तपास यंत्रणेला अर्चना कुटे का मिळून येत नाही? असा सवाल ठेवीदारांनी उपस्थित केला होता. आता तपास सीआयडी कडे वर्ग झाल्याने अर्चना कुटेला अटक होणार का? याकडेच लक्ष असणार आहे.
गोप्रेमी मधून व्यक्त होतोय संताप
झायलो किंवा इर्टिका गाडीतून गाई नेण्याचा प्रयत्न
बीडच्या परळी शहरात संतापजनक प्रकार समोर आला असून परळीतील स्नेह नगर भागात मध्यरात्रीनंतर गाईंना वेगवेगळ्या पदार्थाच्या माध्यमातून गुंगीचे औषध खाऊ घालून त्यांना पळून नेण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. मात्र हा प्रकार परिसरातील लोकांच्या लक्षात येताच आरडा ओरड झाल्याने हे चोरटे पळून गेले.विशेष म्हणजे झायलो किंवा इर्टिका गाडीतून गाई नेण्याचा प्रयत्न असल्याचे प्रत्यक्ष दर्शिने सांगितले.
ज्या गाईंनी हे पदार्थ खाल्ले होते त्या गाईंना हालचाल देखील करता येत नव्हती.यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले असून या सर्व प्रकरणाची दखल पोलिसांनी घ्यावी व अशा पद्धतीने गाई चोरी करणाऱ्यांचा शोध लावावा अशी मागणी आता गोप्रेमी नागरिक करत आहेत. सहा गल पैकी पाच गायींची तब्येत उपचारानंतर सुधारले असून आता एक गाय गंभीर असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.
चंद्रशेखर बावनकुळे भाषण
सत्कार तेव्हाच होतो जेव्हा आपण समाजासाठी जेव्हा आपण काही काम करतो, देशाकरिता राज्याकरिता जेव्हा काम करतो तेव्हा होतो...
आपल्या चुकीमुळे आपल्या आई-वडिलांच्या डोळ्यात पाणी येऊ नये याची काळजी प्रत्येक वडिलांनी घेतली पाहिजे..
अहमदनगरला अहिल्यानगर करण्याचे काम राम शिंदे यांनी केल आहे..
राम शिंदे यांनी धनगर समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही मागणी त्यांनी मोदींजी कडे केली होती..
राम शिंदे यांना जाणीवपूर्वक मतदार संघात पाडण्याकरता एखाद्या कार्यकर्त्याला पाडण्यासाठी षडयंत्र रचल्या गेले
सत्ते पासून पैसा, पैशा पासून सत्ता निर्माण करणाऱ्या धनधांडग्यानी मागच्या निवडणूकित पराभव केला.
या निवडणुकीत राम शिंदे मशीनवर जिंकले पण पोस्टल बॅलेट वर हारले..
पुढच्या निवडणुकीमध्ये राम शिंदे सर्वांची डिपॉझिट जप्त करून सर्वाधिक मतांनी निवडून येतील
हारकर जितने वाले को बाजीगर कहते है. हार कर जितने वालो को राम शिंदे कहते है..
धनगर समाजाला न्याय देण्याकरिता आरक्षण देण्याकरता राम शिंदेच काफी आहे..
राम शिंदे यांना सभापती पद देऊ नये यासाठी कोणी कोणी विरोध केला याची यादीच माझ्याकडे आहे
विरोध करणारे नाव माझ्याकडे येतात मग मी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जातो
देवेंद्र फडणवीस हे राम शिंदे यांच्यावर भावाप्रमाणे प्रेम करतात..
सरकार स्वतःच्या चुकांवर उत्तर देत नाही आणि केंद्रीय मंत्री सामान्य जनतेवर खापर फोडत आहे ; अशा मंत्र्यांचा राजीनामाच घ्यायला हवा
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांची मागणी
मुक्ताईनगर :- माध्यमांनी प्रतिक्रिया देताना केंद्रीय मंत्री पियूष गोएल यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ते म्हणाले जोपर्यंत देशातील १४० नागरिक देशभक्ती आणि राष्ट्रवादाला आपला धर्म मानता नाही तोपर्यंत अशा गोष्टी (पहलगाम हल्ला) होत राहतील. या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. अशा मंत्र्यांचा राजीनामाच घेतला पाहिजे अशा त्या म्हणाल्या.
प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे आपल्या पोस्टमध्ये म्हणाल्यात की
केंद्रीय मंत्री पियूष गोएल म्हणतात की जनतेच्या चुकीमुळे हल्ला झाला.
हल्ला झाला तिथे सुरक्षा यंत्रणा का नव्हती ? सरकारची गुप्तचर यंत्रणा काय करत होती ? गेल्या १० वर्षे संपूर्ण बहुमताचे सरकार असून सत्ताधारी दहशतवाद का संपवू शकले नाही ? या प्रश्नांचे उत्तर तर मिळालेच नाही. उलट आता केंद्रीय मंत्री सामान्य जनतेवर खापर फोडत आहे असा संताप त्यांनी व्यक्त केला तसेच केंद्रीय मंत्र्यांचे विधान अत्यंत बेजबाबदार आणि असंवेदनशील आहे. खरंतर यांचा राजीनामाच घ्यायला हवा अशी मागणीही त्यांनी केली.
जेसीबीतून फुलांची उधळण करत यूपीएससीत यशाला गवसणी घातलेल्या पंकज औटे यांचे ग्रामस्थांकडून जंगी स्वागत (खास ड्रॉन दृश्य)
Anc: बीड जिल्ह्यातील युपीएससीत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा नायगाव येथे नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जेसीबीच्या माध्यमातून फुलांची उधळण करत या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आलं.
नायगाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेऊन यूपीएससी उत्तीर्ण पंकज औटे गावात दाखल होताच ग्रामस्थांनी त्यांचा नागरिक सत्कार केला. ज्या जिल्हा परिषद शाळेत औटे यांनी शिक्षण घेतले. त्याच शाळेच्या प्रांगणात हा सत्कार समारंभ सोहळा पार पडला.
यावेळी पंकज औटे, डॉ.सुशील गीते, कोमल भोंडवे, राजेश निर्मळ आणि बिभीषण बेदरे या ग्रामीण भागातील यूपीएससी आणि एमपीएससी क्रॅक केलेल्या विद्यार्थ्यांचा हा सत्कार मोठ्या थाटात करण्यात आला. तरुणांनी मोबाईलच्या समाज माध्यमाच्या जगाला सोडून स्पर्धा परीक्षेत उतरावे असे आवाहन पंकज औटे यांनी केले. तर गावातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना यातून प्रेरणा मिळावी म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचं ग्रामस्थांनी सांगितले.
Akola Flash Update :
अकोल्यातील 16 पर्यटकांसह महाराष्ट्रातील जवळपास 100 वर पर्यटक सिक्कीममध्ये भूस्खलन आणि हिमस्खलनामूळे अडकलेत. सिक्कीममधील लाचूंग येथे मोठ्या प्रमाणात झाले भूस्खलन. राज्यातील पुणे,मूंबई, अकोला आणि नागपुरातील पर्यटकांचा समावेश. यात अकोल्यातील चार नामांकित डॉक्टरांच्या कुटूंबातील 16 जण अडकलेत लाचूंगमध्ये. लाचूंग हे ठिकाण सिक्कीममधील मंगन जिल्ह्यातील नावाजलेले हिल स्टेशन. 16 जणांमध्ये पुरूष, महिला आणि लहान मुलांचा समावेश. अकोल्यातील डॉ. प्रशांत बारापात्रे, डॉ. शितल टोंगसे, डॉ. संजय शिंदे आणि डॉ. प्रभाकर जायभाये हे चार डॉक्टर कुटुंबियांसह अडकलेत लाचूंगमध्ये. अडकलेल्या चारही कुटुंबांनी साधला आमदार अमोल मिटकरींशी संपर्क. अमोल मिटकरींनी यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील, जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांच्याशी केला संपर्क. या 16 लोकांच्या रेसक्यूसाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू. सिक्कीममधील सरकार आणि प्रशासनाशी संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू.
V/O - पहेलगामच्या हल्ल्यानंतर देशभरातील मोठ्या मंदिरांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असताना पंढरपुरातील विठ्ठल मंदिरातही अनेक कडक नियम सुरू करण्यात आले आहेत. मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली असून प्रत्येक भाविकाची ओळख पटवून आणि त्याच्याजवळ मोबाईल अथवा कॅमेरा नाही हे पाहूनच सध्या आज सोडण्यात येत आहे. येणाऱ्या प्रत्येक भाविकांसोबत असलेले सामानही बॅग स्कॅनर मधून तपासून सोडले जात असून मंदिरातील तपासणीही बॉम्ब शोधक पथकाकडून केली जात आहे.
मंदिरातील कर्मचारी अधिकाऱ्यांनाही आता मोबाईल बंदीचा आदेश लागू करण्यात आला असून प्रमुख अधिकारी वगळता इतर कोणालाही मंदिरात मोबाईल घेऊन जाण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे. याच पद्धतीने मंदिरात येताना असणाऱ्या सर्व साहित्याची तपासणी काटेकोर पुणे करूनच मंदिरात सोडण्यात येत आहे. ज्या बाबत संशय येतोय त्याची ओळखपत्र ही तपासण्यास सुरुवात केली असून मंदिरात सध्या सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड आणि ओळखपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. या सर्व कर्मचाऱ्यांची तपासणी करूनच त्यांना मंदिरात सोडले जात असून मंदिराच्या नियमित कर्मचाऱ्यांनाही आपली ओळखपत्र दर्शनी भागात लावण्यात सांगण्यात आले आहे.
मंत्री उदय सामंत On रत्नागिरी अयोध्या ट्रेन
जिल्ह्यातील 800 भाविक आज आयोध्येला जात याचं मनापासून आनंद आहे, दुसरी रेल्वे देखील सोडण्याचा निर्णय आजच घेतला आहे
दिलेला शब्द रत्नागिरीचा आमदार पाळतो हे सर्वांना पटलेलं आहे
अनेकांनी निवडणुकीच्या स्वार्थापोटी मला हिंदूद्वेष्ठा मला ठरवलं होतं त्यांना ही रेल्वे सोडून चपराक दिलेली आहे
या भविकांच्या हसण्यातच माझा आनंद
उदय सामंत on आमदार संजय गायकवाड
ते जर असं बोलले असतील तर त्यांच्या मताशी कोणीही सहमत होणार नाही, ते त्यांचं वैयक्तिक मत आहे
On नितेश राणे
रत्नागिरीतून अयोध्येसाठी सुटणाऱ्या ट्रेनवर आपण बोलू, आमच्यासाठी आजचा दिवस आनंदाचा
ज्यांनी कोणी टीका केली असेल, वाईट बोलले असतील त्यांची सर्व जबाबदारी मी प्रभू रामचंद्रावर सोडून दिलेली आहे
On काश्मीर हल्ला, पाकिस्तानी नागरिक
जिल्ह्यामध्ये कोणी पाकिस्तानी नागरिक असतील तर त्यांना तातडीने पाकिस्तानात पाठवावं अशा सूचना मी पालकमंत्री म्हणून प्रशासनाला दिल्या आहेत
पाकिस्तान धार्जिण्या माणसाला महाराष्ट्रातच नव्हे देशात राहण्याचा अधिकार नाही
नरेंद्र मोदी साहेबांबाबत आम्हाला पूर्ण खात्री आहे की ते पाकिस्तानचं थोबाड पाडल्याशिवाय राहणार नाहीत
On शरद पवार
कोण काय म्हणाले यापेक्षा कृतिशील नेतृत्व कसं असतं ते म्हणजे एकनाथ शिंदे साहेब
आभार दौरा असतानाही शिंदे साहेब काश्मीर होते,
ज्या मुस्लिम बांधवाने आपल्या पर्यटकांना वाचविण्याचा प्रयत्न करताना मृत्यूमुखी पडला, त्याला देखील मदत करण्याचं काम शिंदे साहेबांनी केलेलं आहे
बाकीच्यांनी देखील हाच आदर्श घ्यावा
On मनसे काश्मीर टूर
संदीप देशपांडे यांनी हा जो निर्णय घेतलेला आहे, त्यांनाच विचारा त्यांच्या पक्षाचं धोरण काय आहे
पर्यटकांनी घाबरून जाण्याचं कारण नाही
भविष्यात असा प्रसंग घडणार नाही एवढी अद्दल पाकिस्तानला घडवली जाईल हा मला विश्वास आहे
On मनसे प्रतीसभागृह
आज आपण अयोध्या ट्रेनवर बोलू म्हणत बोलण्यास नकार
अंधेरी पश्चिमेकडील लोखंडवाला ब्रोकलीन इमारतीला मोठी आग
पहाटे पावणेतीन च्या सुमाराची घटना
धुरामुळे 7 जण जखमी, जखमी पैकी एका महिलेचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू
जखमींना महापालिकेच्या कूपर, ट्रॉमा केअर आणि कोकिळाबेन अंबानी रुग्णालयात उपचारासाठी केले दाखल
एसी यंत्रणेत शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागल्याचा संसद
इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील एसी यंत्रणेत शॉर्टसर्किट झाल्यामुळे इलेक्ट्रिक वायरला आग लागून झाली दुर्घटना
धुरामुळे जखमी झालेल्यांमध्ये 2 महिला एक पुरुष दोन लहान मुलांचा समावेश
आगीत दोन पाळीव कुत्रे आणि एक मांजरीचाही समावेश
सध्या जखमीची प्रकृती स्थिर आहे
ब्रेकिंग:
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या रत्नागिरी दौर्यावर.
चिपळूण मधील सावर्डे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र गौरव रथयात्रेचा कार्यक्रमाचा अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पाडणार शुभारंभ.
संगमेश्वर मधील छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रस्तावित स्मारकाच्या जागेची उपमुख्यमंत्री करणार पाहणी.
संगमेश्वर मधील छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाबाबत अधिकाऱ्यांशी अजित पवार यांची पार पाडणार बैठक.
ब्रेकिंग:
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या रत्नागिरी दौर्यावर.
चिपळूण मधील सावर्डे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र गौरव रथयात्रेचा कार्यक्रमाचा अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पाडणार शुभारंभ.
संगमेश्वर मधील छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रस्तावित स्मारकाच्या जागेची उपमुख्यमंत्री करणार पाहणी.
संगमेश्वर मधील छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाबाबत अधिकाऱ्यांशी अजित पवार यांची पार पाडणार बैठक.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या रत्नागिरी दौर्यावर.
चिपळूणमधील सावर्डे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र गौरव रथयात्रा कार्यक्रमाचा अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पाडणार शुभारंभ.
संगमेश्वरमधील छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रस्तावित स्मारकाच्या जागेची उपमुख्यमंत्री करणार पाहणी.
संगमेश्वरमधील छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाबाबत अधिकाऱ्यांशी अजित पवार यांची पार पाडणार बैठक.
बुद्धगया महाबोधी महाविहार राज्यव्यापी मुक्ती आंदोलन 16 एप्रिल पासून राज्यात ठिकठिकाणी करण्यात येत आहे. ठाण्यात देखील कोर्टानाका येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याखाली 16 एप्रिल पासून साखळी उपोषणाकरिता अनेक अनुयायी बसले होते. याच साखळी उपोषणाचा उद्या ठाणे रेल्वे स्थानकातून कोर्ट टाका परिसरात विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. या साखळी उपोषणाचा उद्या समारोप होणार आहे. दरम्यान या मोर्चाच्या माध्यमातून अनेक अनुयायी हे महाबोधी विहार मुक्ती करिता लक्षवेधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व ठाणे जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार आहेत.
नाशिक : पहलगाम येथे पर्यटकांवर अतिरेक्यांनी केलेल्या अमानुष हल्ल्याचे नाशिकच्या मनमाडमध्ये तीव्र पडसाद उमटले असून , सकल हिंदू समाजातर्फे मोर्चा काढून या घटनेचा निषेध करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून निघालेल्या मोर्चात हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांसह विविध संस्था संघटनाचे पदाधिकारी भगव्या टोप्या घालून सहभागी झाले होते. एकात्मता चौकात मोर्चाचा समारोप झाला. यावेळी पाकिस्तान विरोधी घोषणा देत दहशतवाद्यांच्या प्रतिमांना जोडे मारून दहन करण्यात आले.
नागपूर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला मोठे खिंडार ..
जिल्हा परिषदच्या माजी सभापती उज्वला बोढारे सह 16 सरपंच, 6 नगरसेवक, 12 कृषी उत्पन्न बाजारसमिती संचालकांचा भारतीय जनता पक्षात केला प्रवेश ...
चंद्रशेखर बावनकुळे व आमदार समीर मेघे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षात प्रवेश ...
भिवंडी तालुक्यातील राहणाल गावच्या हद्दीत स्वागत कंपाउंड मधील फर्निचरच्या गोदामाला भीषण आग
फर्निचर ची 7 ते 8 गोदाम जळून खाक
फर्निचरची पूर्ण इमारत आगीच्या भक्षस्थानी
धुराचे लोळ पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावरून पाहिले जात आहे
आगीच्या आसपास रहीवाशी परिसर असल्याने सर्वांना सुरक्षित हलवण्यात आले
घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तीन ते चार गाड्या दाखल
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थिचे प्रयत्न सुरू
आजीचे कारण अजूनही अस्पष्ट
आजी वर नियंत्रण मिळण्यासाठी अजूनही किती वेळ लागेल सांगता येत नाही
फर्निचर गोदामाच्या शेजारी कापडाचा मोठा गोदाम
बीडच्या आष्टी तालुक्यातील खडकत येथे एका चौकातील झेंडा काढण्याच्या कारणावरून दोन गटात वाद झाला होता.. यावेळी पोलीस उपस्थित असताना दगडफेक आणि लाठ्या-काठ्याने मारहाणीचा प्रकार देखील घडला होता.
त्यामुळे पोलिसांनी सौम्य लाठीमार करत परिस्थिती नियंत्रणात आणली.. आता या प्रकरणात 45 जणांविरोधात आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तर 21 आरोपींना अटक करण्यात आली आहे.. उर्वरित आरोपींना देखील लवकरच अटक केली जाईल अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी दिली..
आज दगडूशेठ गणपति दर्शन घेतल
आशीर्वाद मिळवण्यासाठी गणपती दर्शन घेतले
जमू काश्मीर पहलकाम येथे ज्याप्रकारे आतंकवादी हल्ला केला.
देशा संकटातून मजबुतीने पुढे जाऊ
त्याच्या दोशी असणाऱ्यांना उत्तर दिलं जाईल
भारतीय संकटातून बाहेर येईल
मोदीजींच्या नेतृत्वात याला उत्तर दिले जाईल
पहलगाम हल्ला झाला सरकारने कठोर कारवाई पावले उचलली आहेत
त्यासाठी आम्हाला देवाने ताकद द्यावी अशी मागणी केली आहे
तुमसर पंचायत समितीच्या इमारतीला भीषण आग
रेकॉर्ड रूमला लागलेल्या आगीत संपूर्ण रेकॉर्ड जळून झालं खाक
# भंडाऱ्याच्या तुमसर पंचायत समितीच्या रेकॉर्ड रूमला आज सकाळी भीषण आग लागली.
# या आगीत रेकॉर्ड रूमधील संपूर्ण महत्वाचे दस्तावेज आगीच्या विळख्यात आल्यानं ते पूर्णपणे जळून खाक झाले.
# या आगीत पंचायत समितीमधील १९६५ पासूनचा संपूर्ण रेकॉर्ड जळून खाक झाल्याची भीती वर्तविण्यात येत आहे.
# सकाळच्या सुमारास फिरायला जाणाऱ्या नागरिकांना पंचायत समितीच्या रेकॉर्ड रूममधून धूर निघत असल्याचं लक्षात आलं. त्याची माहिती पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना आणि तुमसर नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला देण्यात आली.
# आग आटोक्यात आणण्याचा शर्तीचा प्रयत्न सुरू असून आतापर्यंत संपूर्ण रेकॉर्ड या आगीत जळून खाक झाल्याची भीती वर्तविण्यात येत आहे.
# आगीचं नेमकं कारण सध्या तरी कळू शकलं नाही.
रत्नागिरी - मुंबई - गोवा महामार्गावर संगमेश्वर येथे रिक्षावर कोसळली दरड
महामार्गाचे काम सुरू असताना शास्त्री पूल येथे 35 फुट दरड कोसळली
सुदैवानं यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही
ही दरड धोकादायक असल्याची माहिती यापूर्वीच प्रशासनाला ग्रामस्थांनी दिली होती
प्रशासनानं कोणतीच दखल न घेतल्यान आज सकाळी दरड कोसळली
त्यामुळे संतप्त जमावानं केला रास्ता रोको
गोदावरी नदीच्या पाणी वापरवार बंदी आणण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल
-गोदावरी नदीचे पाणी प्रदूषित आहे, प्रदूषण रोखण्यासाठी मनपा आणि इतर यंत्रणांकडून उपाययोजना केल्या जात नसल्याने याचिका दाखल
गोदावरी नदीत स्नान करण्यासाठी तसेच पिण्यासाठी बंदी आणण्याची मागणी
-
जोपर्यंत गोदावरी नदी प्रदूषण मुक्त होत नाही तोपर्यंत बंदी कायम ठेवण्याची मागणी
कुंभमेळा पर्यत गोदावरी प्रदूषण मुक्त झाली नाही तर कुंभमेळातील शाही स्नानला ही बंदी घालण्याची मागणी
मागील कुंभमेळाच्या आधीही गोदावरी प्रदूषण मुक्ति साठी याचिका दाखल करण्यात आली होती मात्र गोदवरी प्रदूषण मुक्त न झाल्याने पर्यावरण प्रेमीकडून पुन्हा याचिका दाखल
मे आणि जून महिन्यात महायुतीच्या पदाधिकऱ्यांचे अच्छे दिन
मे महिन्यात राज्य सरकारच्या तालुका आणि जिल्हा समित्यांवरील नियुक्त्या होणार
एसईओ, राज्य पातळीवरील समित्या आणि महामंडळांवरील नियुक्ती जूनमध्ये होणार
एसईओ, तालुका स्तरावरील २७ समित्या आणि जिल्हा पातळीवरील ३२ समित्यांवरील सदस्य, अध्यक्षांची भाजपच्या कोट्यातील नावे ही पक्षाच्या जिल्हा कोअर कमिटीकडून प्रदेशाध्यक्षांकडे पाठविली जाणार
१ ते ३१ मे दरम्यान सर्व नियुक्त्या करण्याचा सरकारचा प्रयत्न
राज्य पातळीवरील समित्या, महामंडळांवरील नियुक्ती या १ जून ते ३० जून दरम्यान होणार
महायुतीमध्ये ज्या जिल्ह्यात ज्या पक्षाचा पक्षाचा प्रभाव आहे तिथे त्या पक्षाला जवळपास ६५ ते ७० टक्के पदे दिली जाणार
मनसेच्या प्रतिसभागृहात सहभागी होण्यास भाजपचा नकार
यापूर्वी मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरेंच्या नेतृवाखाली सत्ताधारी असलेल्या शिवसेनेने मुंबईची वाट लावली
मनसेने पाठवलेल्या पत्रात मुंबई भाजपचा आरोप
शिवसेना ठाकरेगटालाही प्रतिसभागृहासाठी मनसेने आमंत्रित केल्याने भाजपचा सहभागी होण्यास नकार
महापालिका मुख्यालयासमोर असलेल्या पत्रकार भवनात आज प्रतिसभागृहाचे आयोजन
आशिष शेलार आदित्य ठाकरें यांच्यासह अनेक राजकिय पक्षांच्या नेत्यांना मनसे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी पाठवले होते पत्र
आपला प्रतिनिधी प्रतिसभागृहात पाठवण्याची पत्राद्वारे केली होती विनंती
उन्हाळ्यात जंगलांना वणवा लागण्याच्या घटना घडतात. मात्र, संरक्षित आणि ज्याच्या रक्षणसाठी खास कर्मचारी तैनात असतात, अशा रोपवनाला आग लागून लाखो रुपयांचे ५ हजार रोपटे जळाल्याचा प्रकार भंडाऱ्यात घडला. भंडारा उपवनसंरक्षक कार्यालयाच्या अधिनास्थ येणाऱ्या अड्याळ वनपरिक्षेत्रातील देवरी नियत क्षेत्रातील लोहारा इथल्या रोपवनाला ही आग लागून ५ हेक्टरमध्ये लावण्यात आलेल्या सुमारे ५ हजार ३२ मिश्र रोपट्यांना आगीची झळ पोहोचली. राज्य योजना वनीकरण अंतर्गत २०२२-२३ मध्ये लोहारा येथील गट क्रमांक १७१/२ व १७२/२ मध्ये मिश्र रोपवन तयार करण्यात आलं. जांभूळ, आंजन, आवळा, बेहडा, चिचवा, कडू निंब, अशा प्रजातीची सुमारे ५०३२ रोपं दोन वर्षांपूर्वी लावण्यात आली. या प्रकरणी अड्याळ वनपरिक्षेत्राधिकारी, क्षेत्र सहाय्यक आणि वनरक्षक या तिघांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून वेळप्रसंगी त्यांच्याकडून याची आर्थिक वसुली केली जाईल, अशी माहिती उपवनसंरक्षक राहुल गवई यांनी दिली. संपूर्ण घटनेची चौकशी सहायक उपवन संरक्षक सचिन निळख करीत असून मंगळवारपर्यंत चौकशी अहवाल वरिष्ठांना सादर करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
गणेशोत्सव पर्यावरणपूरक सण साजरा करण्यासाठी मुंबई महापालिकेने बोलवलेली मूर्तिकारांची बैठकीत हाणामारी
मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणी बोलत आहेत की, कधी ना कधी पीओपी सोडून दुसरा विचार करावा लागेल आमच्या बैठका देखील सुरू आहेत, आम्ही न्यायालयाने दिलेले आदेशाचे आणि नियमांचे पालन करत आहोत. पण पालिकेने बोलावलेल्या बैठकीत मूर्तिकार परस्परांना भिडल्याची बाब समोर आलेली आहे.
बैठकीत पाण्याच्या बाटल्या, खुर्च्या एकमेकांवर फेकण्यात आल्यानंतर हा वाद अधिकच चिघळला. पीओपी मूर्तींच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या कार्यकर्त्याला बैठकीनंतर रस्त्यावर मारहाण करण्यात आली
या प्रकरणी शाडू मूर्तींसाठी लढा देणारे वसंत राजे या मारहाणीत जखमी झाले असून याप्रकरणी त्यांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे
मुंबई उच्च न्यायालयाने पीओपी (प्लास्टर ऑफ पॅरिस) मूर्तीवर बंदी घालण्याचे आदेश दिल्यानंतर मुंबई महापालिका आणि पोलिसांनी यंदाच्या माघी गणेशोत्सवात त्याची अंमलबजावणी केली
ही बंदी येत्या ऑगस्ट-सप्टेंबरमधील गणेशोत्सवातही लागू राहणार असून त्यानुसार आतापासूनच मुंबई महापालिकेने कंबर कसली आहे
गणेशोत्सव पर्यावरण पूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने मूर्तिकारांची बैठक बोलवली होती
परळ येथील पालिकेच्या एफ दक्षिण कार्यालयात ही बैठक आयोजित करण्यात आली होती
या बैठकीत केवळ मुंबईतील शाडू मातीपासून गणेशमूर्ती साकारणारे मूर्तिकार आणि पीओपी मूर्तीचे निर्माते यांना बोलावण्यात आले होते
शंभराव्या अखिल भारतीय विभागीय नाट्य संमेलनाचे आज नागपूर मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन होत आहे. जेष्ठ सिनेदिग्दर्शक जब्बार पटेल यांची यासाठी विशेष उपस्थिती असणार आहे ... त्या आधी नागपूरच्या शिवाजी चौक ते भट सभागृह अशी नाट्य दिंडी निघाली आहे ...या नाट्यदिंडीत विदर्भातील अनेक लोककला कलाकारांनी सहभाग सहभाग घेतला आहे ..
रायगड जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरान ला पर्यायी मार्ग मिळावा याकरिता गेली अनेक वर्षापासून इथले स्थानिक मागणी करत आहेत. इथल्या रोपवे प्रकल्पाला मंजुरी देखील मिळाली आहे मात्र अद्यापही हा प्रकल्प कागदावरच असल्याच इथले व्यावसायिक म्हणत आहेत. त्यामुळे रोपवे किंवा फिनाक्युलर सारखा प्रकल्प अशा ठिकाणी आला तर पर्यटक हे थेट मुख्य बाजारपेठ परिसरात उतरतील आणि इथून पर्यटकांना मुख्य पॉईंट कडे जाता येईल. यामुळे माथेरानच पर्यटन दृष्ट्या चांगला विकास होईल असा माथेरान करांना आहे.
वाशिम जिल्ह्यात सप्टेंबर २०२४ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळं खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, तूर या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. तब्बल ७८ हजार ४१५ शेतकरी या अतिवृष्टीमुळं बाधित झाले होते. यापैकी ५९ हजार शेतकऱ्यांना ६ कोटी ९७ लाख रुपयांची मदत आतापर्यंत वितरित करण्यात आलिये मात्र १८ हजार ९११ शेतकऱ्यांना पैसे मिळणं अजून बाकी आहेत. यापैकी १० हजार ५०४ शेतकऱ्यांची केवायसी नसल्यानं मदत रखडल्याचं जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. तर मदत न मिळालेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ आपली केवायसी करून घ्यावी असं आवाहन उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी केलय.
एल्फिस्टन पूल वाहतुकीसाठी पुन्हा खुला
रात्री झालेल्या आंदोलनानंतर पुल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला मागे
त्यामुळेच पुलावरील वाहतूक पुन्हा झाली सुरू
जोपर्यंत स्थानिक रहिवाश्यांच्या मागण्या पूर्ण केल्या जात नाही, त्यांचे पुनर्वसन केले जात नाही, त्यांना विश्वासात घेतले जात नाही तोपर्यंत पुल बंद करू नये यासाठी काल रात्री झाले मोठे आंदोलन
आंदोलनानंतर सोमवारी बैठक घेऊन पुढील निर्णय घेणार असल्याचे एमएमआरडीएने केले जाहीर
रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात असणाऱ्या आंबेवाडी ते नीवी कालव्याची खासदार सुनील तटकरे यांच्या कडून काल पाहणी करण्यात आली कालवा दुरुस्तीची कामांना वेग देऊन कालव्याच्या संदर्भात अधिकाऱ्यांना यावेळी त्यांनी कामे लवकरात लवकर करण्याच्या सूचना दिल्या यावेळी शेतकरी सुद्धा होते.
नंदुरबार:- पाण्याची बचत करण्याचा संदेश देणारा फलक ठरतोय लक्षवेधी...
पाटबंधारे विभागाच्या कार्यालय बाहेर लावण्यात आलेला बोर्ड ठरला आहे चर्चेचा विषय....
आज पाण्याची बचत केली नाही तर भविष्यात पेट्रोल पंप सारखे पाण्याचे पंप लावून पाणी खरेदी करावे लागेल...
जल है तो कल है म्हणत पाण्याच्या काटकसरीचा वापर करण्याचा संदेश...
येणाऱ्या पावसाळ्यात भूजल पातळी वाढवण्यासाठी सर्वांनी करावेत प्रयत्न असे आहवान
मुंबई नाशिक महामार्गावर खाजगी बसचा भीषण अपघात 10 ते 12 जण जखमी, एका आठ वर्षीय मुलीचा मृत्यू
महामार्गावरील पडघा गावाजवळ घडला अपघात
खडवली येथे पिकनिक साठी गेलेल्या भिवंडीतील कुटुंबीयांचा अपघात 10 ते 12 जण जखमी
जखमींपैकी 3 जणांची प्रकृती गंभीर, तर एका 8 वर्षीय मुलीचा मृत्यू
या खाजगी बस मध्ये 20 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती
बस चालक अतीवेगात असल्याने बसचा टन न बसल्याने बस थेट उड्डाणपुलाखालील बोगदाला धडकली
जखमींना भिवंडी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी केले दाखल
भिवंडी पूर्व चे आमदार रईस शेख रुग्णालयात दाखल
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Live Blog Updates: महाराष्ट्रासह देश-विदेशातील विविध घडामोडी, वाचा सर्व अपडेट्स...