Maharashtra Live Updates: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकच्या दौऱ्यावर, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आढावा

Maharashtra Live blog updates: राज्यातील ताज्या घडामोडी, बातम्यांचे अपडेटस् पाहण्यासाठी क्लिक करा. राज्यात नेमकं काय घडतंय? नागपूरमध्ये संचारबंदी शिथील करण्यात आली आहे.

रोहित धामणस्करLast Updated: 23 Mar 2025 02:31 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Live Blog Updates: नागपूरमध्ये संचारबंदी शिथील करण्यात आली आहे. काही भागांमध्ये संचारबंदी अजूनही कायम आहे. ही संचारबंदी टप्याटप्याने शिथील करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. पंतप्रधान...More

दादर कबुतरखाना हटविण्याच्या हालचाली; वरळी किंवा प्रभादेवीत स्थलांतराचा विचार

मुंबई : दादर पश्चिमेतील प्रसिद्ध कबुतरखाना हटविण्याच्या हालचाली अखेर मुंबई महापालिका स्तरावर सुरू झाल्या आहेत. कबुतरांच्या विष्ठा आणि पिसांमुळे होणाऱ्या आरोग्यधोक्याच्या तक्रारींमुळे हा कबुतरखाना वरळी अथवा प्रभादेवी येथे स्थलांतरित करण्याचा विचार महापालिकेने सुरू केला आहे. यामुळे आता शहरातील इतर कबुतरखाने देखील हटवावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होऊ लागली आहे.


गेल्या अनेक वर्षांपासून दादर येथे हा कबुतरखाना असून, येथे कबुतरांची संख्या बेसुमार वाढली आहे. याचा थेट परिणाम स्थानिक रहिवाशांच्या आरोग्यावर होत आहे. घरांच्या खिडक्या, गॅलऱ्यांमध्ये कबुतरांचा वावर वाढला असून, विष्ठेमुळे परिसर अस्वच्छ होत आहे. कपडे सुकविण्यासाठी लावलेल्या दोऱ्यांवरही कबुतरांचा कब्जा असून, नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आंदोलन केले होते. त्यानंतर महापालिकेने या प्रश्नाची दखल घेत पुढील कार्यवाहीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत.


यासंदर्भात महापालिकेच्या हेरिटेज विभाग, आरोग्य विभाग आणि परिरक्षण विभागाची २५ मार्चला बैठक होणार होती. मात्र, ती पुढे ढकलण्यात आली आहे. तरीही हा कबुतरखाना प्रभादेवीतील कीर्ती महाविद्यालय परिसर किंवा वरळीतील मोकळ्या जागेत हलविण्याचा विचार महापालिका करत आहे. लवकरच याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.