- मुख्यपृष्ठ
- INDIA AT 2047
- IPL 2024
- क्रिकेट
- निवडणूक
- अयोध्या राम मंदिर
- भारत
- विश्व
- महापालिका निवडणूक 2022
- टेलिव्हिजन
- सिनेमा
- औरंगाबाद
- उस्मानाबाद
- मुंबई
- पुणे
- नाशिक
- नागपूर
- कोल्हापूर
- सोलापूर
- क्रीडा
- फोटो
- राशीभविष्य
- वेब स्टोरी
- वर वधू
- धार्मिक
- शिक्षण
- ट्रेंडिंग न्यूज
- आरोग्य
- लाईफस्टाईल
- क्राईम
- राजकारण
- शेत-शिवार
- व्यापार-उद्योग
- पर्सनल फायनान्स
- म्युच्युअल फंड्स
- आयपीओ
- जॅाब माझा
- ऑटो
- टेक-गॅजेट
- ब्लॉग
- उपयुक्तता
- संपर्क करा
- IDEAS OF INDIA
Maharashtra Live blog Updates: पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान
Maharashtra Live blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...
पार्श्वभूमी
Maharashtra Live blog Updates: पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान केले आहे. जून ते आतापर्यंत दोन लाख 91 हजार 842 शेतकऱ्यांच्या 2 लाख 74 हजार 607 हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले....More
बीड : बीडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात आक्रमक झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस भवना बाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून दहन केले.. आमदार पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्याबाबत केलेल्या विधानावरून राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. आणि याच निषेधार्थ शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून बीडमध्ये ही तीव्र पडसाद दिसून आले. केंद्रात आणि राज्यात सत्ता असल्याने पडळकर असे बेताल वक्तव्य करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला..
गडचिरोली : सेवा पंधरवाडा उपक्रमात आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी थेट नागरिकांची निवेदने स्वीकारून त्यांच्या तक्रारी जाणून घेतल्या. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी आपापल्या तक्रारी, निवेदने सादर केली. प्राप्त तक्रारींवर त्वरीत कार्यवाही करण्याच्या सूचना मंत्रीद्वयांनी जिल्हाधिकारी, संबंधित उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, उपवनसंरक्षक व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
नाशिक : ऑगस्ट महिन्यामध्ये नाशिक जिल्ह्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते यामध्ये जिल्ह्यातील चाळीस गावांमधील तब्बल 7हजार 108 शेतकरी हे बाधित असल्याची नोंद कृषी विभागाने नोंदवली. कृषी विभागाने तात्काळ पंचनामे करून तीन कोटी 81 लाख रुपयांचा आर्थिक मदतीचा अहवाल सरकारकडे पाठवला आहे. कांदा ,सोयाबीनसह द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहेत.
धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात काल आग्रा रोडवरील भाजी विक्रेते आणि किरकोळ विक्रेत्या बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या शुभांगी पाटील आणि भाजपाचे हिरामण गवळी आणि जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्यात वाद झाल्याची घटना घडली होती... याप्रकरणी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांवर सुमोटो दाखल करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केली असून यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. एका महिलेवर आणि तिच्या पतीशी असभ्य वर्तन भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी केले असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने केली आहे.
'संजय राऊतांना घरात घुसून मारु'
शिवसेना आमदार राजेश मोरे यांची धमकी
डोंबिवलीत राऊतांविरोधातल्या आंदोलनात मोरेंनी दिली धमकी
आनंद दिघेंसंबंधीच्या राऊतांच्या वक्तव्याविरोधात डोंबिवलीत आंदोलन
राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आता वेब पोर्टल
लाडक्या बहिणींना करावी लागणार केवायसी
योजनेत पारदर्शकता यावी म्हणून वेब पोर्टलच्या मदतीने शासन करणार केवायसी
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर चाकोरे यांचे आवाहन
महिन्याचे मानधन वेळेत मिळण्यासाठी लाडक्या बहिणींनी केवायसी करण्याचे केले आवाहन
मुंबईतील रस्त्यांबाबत आज विधीमंडळात महत्त्वाची बैठक
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी बोलावली बैठक
मुंबईतील आमदार, मुंबई महापालिका आयुक्त आणि इतर महत्त्वाचे अधिकारी उपस्थित राहणार
रस्ते कामातील दिरंगाईवरून खडाजंगी होण्याची दाट शक्यता
थोड्याच वेळात बैठक सुरू होणार
मंत्र्यांनी विदर्भात पर्यटन म्हणून येऊ नये. इथे यायचं असेल तर योग्य रितीने आपल्या सहकाऱ्यांना मदत कशी होईल, अशा पद्धतीनं या. नाही तर दोन तासांच पर्यटक म्हणून यायचं आणि मुंबईत जाऊन दादा आणि तटकरे साहेबांसमोर येतात. फक्त झेंडा वंदनसाठी आपल्या पालकमंत्र्यांनी विदर्भात यावं. झेंडा वंदन जिल्हाधिकारी यांनी केलं तरी चालेल. पण पालकमंत्र्यांवर जबाबदारी दिली पाहीजे.
मुंबई उच्च न्यायालयाला पुन्हा धमकी
उच्च न्यायालयाच्या अधिकृत ईमेल आयडीवर बाँब ठेवल्याची धमकी आल्याची माहिती
धमकीची शहानिशा करण्यासाठी पोलीस घटनास्थळी
उच्च न्यायालया आणि परिसराची तपासणी सुरू
Beed News : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या आज बीडच्या केज आणि गेवराई दोन ठिकाणी महाएल्गार सभा होत आहेत. दरम्यान लक्ष्मण हाके यांनी जरांगे पाटील यांच्यावर कडाडून टीका केली. मनोज जरांगे पाटील यांनी ज्या भूमीतून ओबीसींचे आरक्षण संपविले.. त्याच भूमीत महएल्गार सभा होत आहेत. तर खासदार बजरंग सोनवणे यांच्या डोक्यावर परिणाम झाला त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्याच हाके यांनी म्हटलं.. छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या मराठा समाजाच्या गोलमेज परिषदेच्या माध्यमातून ओबीसींच्या मनात भ्रम निर्माण करून गाफील ठेवण्याचा प्रयत्न असून तुम्हाला काय भांडायचे ते भांडा आम्हाला अंडरस्टिमेट करू नका असं हाके म्हणतायत.
मराठा आंदोलनाच केंद्र राहिलेल्या बीड मधे ओबीसी समाजाचा एल्गार मेळावा
28 सप्टेंबरला बीड मधे ओबीसी समाजाची जाहीर सभा
छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात पहिली सभा पार पडणार
बीड नंतर लवकरच ओबीसी समाजाची मुंबईत देखील जाहीर सभा
राज ठाकरे आज कल्याण, डोंबिवली, अंबरनाथच्या दौ-यावर
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरेंच्या जोरबैठका
मुंबईसोबतच मनसेचं मुंबईशेजारच्या कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ या महापालिकांसाठी रणनीती
शिंदेंच्या बालेकिल्ल्यातही मनसे पालिकेला गड सर करण्याच्या तयारीत
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरेंच्या आज बैठका
राज ठाकरे यांचा दौरा कसा आहे?-
अंबरनाथ इथल्या सुदामा होटेल जवळ काही प्रमुख पदाधिका-यांसोबत भेट
तिथून अंबरनाथच्या पनवेलकर हॉल येथे पधादीकाऱ्यांसोबत बैठक
तर कल्याण डोंबिवली मधील पदाधिकाऱ्यांची बैठक गुरुद्वारा हॉटेल कल्याण येथे होणार
या मध्ये ते अंबरनाथ आणि कल्याण इथल्या शाखेचे उद्घाटन राज ठाकरे करणार
पुढच्या आठवड्यापर्यंत रस्त्यावरील सगळे खड्डे बुजवण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे सगळ्या महापालिकांना आदेश
पालिकांच्या निष्काळजीपणामुळे खड्ड्यांमुळे होणाऱ्या मृत्यू तसेच जखमींप्रकरणी राज्य सरकार काही धोरण आणणार आहे का उच्च न्यायालयाची राज्य सरकारला विचारणा
मागील सुनावणीत सगळ्या पालिकांच्या सहाय्यक आयुक्तांना हजर राहण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते
खड्ड्यांच्या संख्येत कमतरता आल्याचं मुंबई पालिकेकडून सांगितलं असता खड्डे असायलाच का पाहिजेत? अशा शब्दात उच्च न्यायालयाने केली मुंबई महापालिकेची कान उघडणी
खड्ड्यांमुळे कोणाचा मृत्यू अथवा कोणी जखमी झाल्यास पालिकेला जबाबदार धरायला पाहिजे तसेच नुकसान भरपाई ही जबाबदार अधिकाऱ्यांच्या पगारातून वसूल केली गेली पाहिजे: मुंबई उच्च न्यायालय
नुकसान भरपाईची किंमत कमी असता कामा नये अन्यथा जबाबदार अधिकाऱ्यांना त्याची झळ बसणार नाही
कंत्राटदराची देखील जबाबदारी निश्चित केली गेली पाहिजे: मुंबई उच्च न्यायालय
धाराशिव : गेली दोन दिवस झालेल्या पावसानंतर सकाळी सकाळीच धाराशिव शहरात धुक्याची चादर पाहायला मिळाली. शहर परिसरात धुकं पडल्याने वाहनधारकांना वाहनांच्या हेड लाइट्स लावून प्रवास करावा लागला. सकाळी सकाळीच शहरात पांढराशुभ्र धुकं पाहायला मिळाल्याने धाराशिवकरांना राजधानी दिल्ली सारख्याच धुक्याचा अनुभव आला.
धाराशिवच्या परंडा तालुक्यातील कांदलगाव परिसरात अतिवृष्टी झाल्यामुळे शेती पिकांचे मोठ नुकसान झालं. मोठा खर्च करून केलेली कांदा लागवड, मात्र पूर्ण कांदा पाण्यात गेल्याने तो सडण्याची भीती आहे. पूर्ण पिक हातचे गेले आहे. शिवाय सोयाबीन, तूर ऊस या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. गावापासून पर्जन्यमाप केंद्र दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावर असल्यामुळे अतिवृष्टी बाधित गावाची नोंदही झाली नाही त्यामुळे संतप्त शेतकऱ्याने याबाबत संताप व्यक्त केला आहे. त्वरित ओला दुष्काळ जाहीर करून मदत करावी अशी मागणी ही शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.
कांदा प्रश्नांवर महाविकास आघाडीचे लोकप्रतिनिधी आक्रमक
दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांच्यां पाठोपाठ नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे आहे यांची कांद्याला अनुदान देण्याची मागणी
- कांद्या निर्यातीला केंद्र सरकारने त्वरित अनुदान देण्याची नाशिक जिल्ह्यातील खासदारांची मागणी
- गुजरातल मध्ये कांद्याला अनुदान मिळतो त्याच धर्तीवर महाराष्ट्रात देखील सरकारने त्वरित कांद्याला अनुदान देण्याची मागणी
- कांद्याला किमान हजार रुपये पर्यंत अनुदान सरकारने द्यावे दिंडोरी खासदार भास्कर भगरे यांनी केली होती मागणी
याच मागणीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार राजाभाऊ वाजे यांचाही पाठिंबा
- सध्या कांद्याचे दर घसरल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत असल्याने अनुदानाची मागणी
नुकताच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला होता नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा मोर्चा
गोंदिया: रब्बी हंगामातील धान खरेदीला अखेर मुदतवाढ देत शासनाने गोंदिया जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला ५ लाख ६० हजार क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवून दिले. यामुळे शासनाच्या पोर्टलवर नोंदणी केलेल्या १५ हजारांवर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.... यावर्षी शासनाने रब्बी हंगामात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला सुरुवातीला केवळ ११ लाख क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट दिले; पण हे उद्दिष्ट फारच कमी असल्याने ते दीड महिन्यातच पूर्ण झाले. त्यानंतर शासनाने परत दोनदा उद्दिष्ट वाढवून दिले; पण यानंतरही शासकीय धान खरेदी केंद्रावर धान विक्री करण्यासाठी नोंदणी केलेले १५ हजारांवर शेतकरी वंचित राहिले होते. त्यामुळे खरेदीचे उद्दिष्ट वाढवून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. यानंतर शासनाने ५ लाख ६० हजार क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवून दिले. त्यामुळे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर धानाची विक्री करता येणार आहे. यामुळे हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे...
तुळजाभवानी नवरात्र महोत्सवात वापरले जाणार एआय कॅमेरे
नवरात्र उत्सवात होणाऱ्या चोऱ्यांना आळा घालण्यासाठी होणार पहिल्यांदाच एआय कॅमेऱ्याचा वापर
तुळजापूर आणि आजूबाजूच्या परिसरातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या फोटोसह इतर माहिती एआय सॉफ्टवेअरमध्ये अपलोड करण्यात आल्याची माहिती
चेहऱ्याची ओळख पटविण्यासाठी, गर्दीचे नियोजनासाठीही एआय कॅमेऱ्याचा वापर होणार, नवरात्र महोत्सवात किती भाविकांनी दर्शन घेतले याचीही नोंद होणार
दर्शन मंडप , तुळजाभवानी मंदिर, शहरात महत्वाच्या ठिकाणी एआय कॅमेरे बसवले जाणार
एआय कॅमेऱ्यामुळे गुन्हेगारांना पकडण्यात येणार यश
तर कायदा आणि सुव्यवस्थेसाठी यात्रा काळात शहरात 102 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार
देह व्यवसाय सुरू असलेल्या घरावर भंडाऱ्याच्या दहशतवादी विरोधी पथकानं छापा टाकला. या कारवाईत एका महिलेची सुटका करण्यात आली तर देह व्यवसाय करणाऱ्या दोन इसमांना विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करीत अटक करण्यात आली. ही कारवाई भंडाऱ्याच्या तुमसर इथं करण्यात आली. वैभव बोरकर (40) आणि भरत कोल्हाडकर (34) असं पोलिसांनी अटक केलेल्या दोघांची नावं आहेत. मागील काही दिवसांपासून हे दोघेही तुमसरच्या मेहेगाव येथील एका घरात हा देह व्यवसाय करीत होते. याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी विशेष पथक नेमून ही कारवाई केली. तुमसर पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नांदेडच्या तीर्थक्षेत्र माहूर जवळ असलेल्या मालवाडा घाटातील रस्त्याचे काम रखडले आहे, त्यामुळे या ठिकाणी सातत्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. नवरात्र उत्सव तोंडावर असताना या ठिकाणी राज्यभरातील भाविक तासंतास वाहतुकीच्या कोंडीत सापडत आहेत. इथे रखडलेल्या रस्त्याच्या कामाकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. अन्यथा नवरात्र यात्रा उत्सव काळात या ठिकाणी अप्रिय घटना होण्याची भीती व्यक्त केल्या जात आहे.
Nanded Crime : नांदेडच्या कंधार तालुक्यातील हाळदा गावात ग्रामसभा सुरू असताना दोन गट एकमेकांत भिडले. यावेळी गावातील दोन गटात चांगलीच हाणामारी देखील झाली. काही सुज्ञ गावकऱ्यांनी दोन्ही गटाला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन्ही गट ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यातून हाणामारीत चार जण चांगलेच जखमी झालेयत. ग्रामपंचायतीच्या निवडणुका आता जवळ आल्याने गावागावात वादविवाद वाढले असून त्यातून हाणामारी होण्यापर्यंत प्रकार वाढले आहेत. हाळदा इथल्या या हाणामारीच्या घटनेचे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
जगात जर्मनी आणि भारतात परभणी अशी म्हण परभणी बाबत प्रचलित होती मात्र मागच्या काही वर्षात जगात जर्मनी आणि खड्ड्यात परभणी म्हणण्याची वेळ परभणीकरांवर आली आहे त्यात भर पडली आता कचऱ्याची मागच्या आठवडाभरापासून कचरा उचलणाऱ्या एजन्सीने कचरा उचलला नसल्यामुळे शहरभरात कचरा झाला आहे 13 महिन्याचे 14 कोटी रुपये थकल्यामुळे कचरा उचलणाऱ्या एजन्सीने काम बंद केले ज्याचा परिणाम शहरावर झाला असून शहरात ठीक ठिकाणी गल्लीबोळामध्ये चौका चौकात कचरा पाहायला मिळत आहे आणि पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कचरा साठल्याने दुर्गंधी पसरून शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आलंय त्यामुळे परभणीला वाली कोणी उरलाय का असा प्रश्न उपस्थित झालाय.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Live blog Updates: पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान