मुंबई : राज्यात इंधन आणि LPG तुटवडा असल्याच्या अफवा पसरत असताना अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पत्रकार परिषद घेत मोठं स्पष्टीकरण दिलं आहे. भारत सरकारकडे सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. ज्या शहरांमध्ये पीएनजीची सुविधा आहे आणि तरीही त्यासाठी अर्ज केला नाही तर त्या ठिकाणचा एलपीजी सिलेंडर तीन महिन्यांमध्ये बंद होऊ शकतो असं भुजबळ म्हणाले. 

Continues below advertisement

युद्धामुळे जागतिक स्तरावर परिणाम होत असला तरी भारतातील इंधन पुरवठा सुरळीत सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. रशिया आणि व्हेनेझुएलाकडून इंधन पुरवठा सुरू असून भारताची जहाजं नियमितपणे सोडली जात आहेत, असंही त्यांनी नमूद केलं.

Fuel Supply Status : इंधन पुरवठा सुरळीत

राज्यात कुठल्याही प्रकारचा इंधन किंवा गॅस तुटवडा नाही. भारत सरकारकडे पुरेसा साठा असून तुटवड्याच्या परिस्थितीवर उपाययोजना सुरू आहेत. मात्र युद्धाच्या पार्श्वभूमीवर अफवा जास्त प्रमाणात पसरत असल्याचं भुजबळांनी सांगितलं.

Continues below advertisement

LPG Rumors : सिलेंडर बंद होणार?

सिलेंडर बंद होणार असल्याच्या अफवा पूर्णपणे खोट्या असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. नागरिकांनी घाबरून साठेबाजी करू नये, असं आवाहन करण्यात आलं आहे.

PNG Pipeline Rule : पीएनजी लाईनबाबत नवा नियम

पीएनजी सुविधा उपलब्ध असलेल्या शहरी भागांमध्ये नागरिकांनी तीन महिन्यांच्या आत अर्ज करणं गरजेचं असणार आहे. जर पीएनजी लाईनचं काम पूर्ण झालं आणि अर्ज केला नसेल, तर तीन महिन्यानंतर LPG बंद होऊ शकतो. मात्र, ज्यांनी पीएनजीसाठी अर्ज केला आहे आणि तरीही पीएनजी लाईन बसवली गेली नाही, त्यांचा LPG सुरूच राहणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. हा नियम फक्त ज्या शहरांमध्ये पीएनजीचं काम सुरू आहे तिथेच लागू असेल, संपूर्ण महाराष्ट्रासाठी नाही असं छगन भुजबळांनी स्पष्ट केलं. 

Gas Supply Increase : व्यावसायिक गॅस पुरवठा वाढ

व्यावसायिक वापरासाठी गॅस पुरवठ्यात 50 टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. तसेच LPG साठ्यातही मोठी वाढ करण्यात आली असून पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत, असं छगन भुजबळ म्हणाले. 

Ration Stock Update : रेशन धान्य मुबलक

राज्यात धान्याचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांना तीन महिन्यांचं रेशन एकाचवेळी घेण्याची मुभा देण्यात आली आहे. साठवणुकीसाठी जागा कमी पडत असल्यामुळे तीन महिन्यांचं धान्य एकत्रित नेलं तरी काही अडचण नाही असं भुजबळांनी म्हटलं. तसेच केरोसीनही उपलब्ध करून देण्यात येणार असून यासंदर्भात न्यायालयालाही माहिती देण्यात आली आहे, असंही ते म्हणाले. 

Government Assurance : सरकारचं आश्वासन

पीएनजी लाईनसाठी वेगळी परवानगी लागणार नाही. अर्ज केल्यानंतर ती सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सरकारची असेल. ज्या भागात पीएनजी लाईन पोहोचली नाही, तिथे LPG सेवा सुरूच राहणार आहे. तसेच राज्यात कोणत्याही प्रकारचा लॉकडाऊन लागू होणार नसल्याचंही भुजबळांनी स्पष्ट केलं आहे.

ही बातमी वाचा: