Maharashtra Flood: राज्यभरात पावसानं हाहाकार माजवला आहे. सततच्या पावसामुळं रायगड, सातारा जिल्ह्यात दरडी कोसळण्याच्या घटनेत अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. या दरड दुर्घटनाग्रस्त घटनास्थळांसह पूर परिस्थितीचा दौरा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. 

Continues below advertisement


आज दुपारी 12 वाजता मुंबईहून हेलिकॉप्टरने महाडकडे रवाना होत आहेत.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज दुपारी 12 वाजता मुंबईहून हेलिकॉप्टरने महाडकडे रवाना होणार आहेत. महाड येथील एमआयडीसी हेलिपॅड येथे पोहोचून ते वाहनाने तळीये गावासाठी रवाना होतील. दुपारी १.३० वाजता तळीये येथे पोहचून ते दुर्घटनाग्रस्त गावाची पाहणी करतील. दुपारी ३.२० वाजता ते परत महाड होऊन मुंबईकडे हेलिकॉप्टरने रवाना होतील.


तर दुसरीकडे राज्याचे आपत्ती व्यवस्थापन आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार रायगड, रत्नागिरीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ते तळीये दुर्घटनाग्रस्त गावाची पाहणी करणार आहेत.