मुंबई : राज्यात आज  4,869 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 8 हजार 429 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 61 लाख 03 हजार 325 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.65 टक्के झाले आहे. 


राज्यात आज कोरोनामुळे 90 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.1 टक्के झाला आहे. तब्बल 38 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 75  हजार 303 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. एकूण सहा जिल्ह्यांमध्ये अॅक्टिव्ह रुग्ण 100 च्या खाली आहेत. नंदूरबार (9), हिंगोली (64), अमरावती (82) वाशिम (89), गोंदिया (97), गडचिरोली (16)   या सहा जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 15, 476 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 


नंदूरबार, हिंगोली, वर्धा, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये आज शून्य रुग्ण आढळले आहेत. तर अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक 762 रुग्णांची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,83,52,467 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 63,15,063 (13.6 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 4,61,637 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 3,103 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 


मुंबईत गेल्या 24 तासात 259 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद


मुंबईत गेल्या 24 तासात 259 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासात 391 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत मुंबईत 7,12,311 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के आहे. सध्या मुंबईत 4744 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर मुंबईत रुग्ण दुपटीच दर 1500 दिवसांवर गेला आहे. 


देशात गेल्या 24 तासांत 40,134 कोरोनाबाधितांची नोंद


सोमवारी आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 40,134 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तसेच 422 रुग्णांनी जीव गमावला आहे. काल (रविवारी) केरळमध्ये सर्वाधिक 20,728 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, देशभरात गेल्या 24 तासांत 36,946 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.