मुंबई : राज्यात दैनंदिन कोरोना (Maharashtra corona cases) बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ  लागली आहे. आज 6,600  नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 7 हजार 431 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 60 लाख 83 हजार 319 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.61टक्के आहे. 


राज्यात आज 231 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.01 टक्के झाला आहे. तब्बल 30 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या  77 हजार 494 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. नंदूरबार (9), जालना (92), हिंगोली (70), वाशिम (84), गडचिरोली (54)या पाच जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 16, 001 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 


भिवंडी निजामपूर महानगपालिका, जळगाव महानगरपालिका, नंदूरबार, अकोला, भंडारा  आज शून्य रुग्ण आढळले आहेत. तर साताऱ्यात सर्वाधिक 830 रुग्णांची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4, 77,60, 862 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 62,96, 756 (13.18 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 4,79,553 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 3,289 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 


मुंबईत गेल्या 24 तासात 323 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद


मुंबईत गेल्या 24 तासात 323 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 366 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,11,073 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 5,082 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1434 दिवसांवर गेला आहे. 


गेल्या 24 तासांत 43,509 नव्या कोरोनाबाधितांची नोंद


 गुरुवारी सकाळी आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 43,509 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 640 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. केरळमध्ये सर्वाधिक 22,056 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांत 38,465 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 15 लाख 28 हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे.