मुंबई : राज्यातील  कोरोनाची रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या  46 हजार 393  नव्या रुग्णांची भर पडली असून 48 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 30,795 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.  काल राज्यात कोरोनाच्या  48 हजार 270 रुग्णांची नोंद झाली होती म्हणजे आज  कालच्या पेक्षा दीड हजाराने रुग्ण संख्या कमी झाली आहे. 
 
राज्यात आज 416 ओमायक्रॉनबाधितांची नोंद 


राज्यात आज  416 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.  आतापर्यंत 2759 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात  झाली आहे. त्यापैकी 1225 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. 


राज्यात आज 48 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद


राज्यात आज 48 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.91 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 70 लाख 40 हजार 618 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.03 टक्के आहे.  सध्या राज्यात 21 लाख 86 हजार 124 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 3382 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 31 लाख 74 हजार 656 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.


मागील काही दिवसांतील सर्वांत कमी रुग्णसंख्या


मागील 24 तासांत मुंबईत 3568 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 231 जणांनी कोरोनावर मात केली आहे. मागील 24 तासांत मुंबईत 10 जणांचा कोरोनावरील उपचार घेताना मृत्यू झाला आहे. महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार नव्याने आढळलेल्या 3 हजार 568 रुग्णांमुळे सक्रिय रुग्णांची संख्या 17 हजार 497 झाली आहे. तर 10 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ज्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 16 हजार 522 झाली आहे. तर 231 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे सध्या मुंबईचा रिकव्हरी रेट 96 टक्के इतका आहे. 


इतर महत्त्वाच्या  बातम्या 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha