Maharashtra Budget 2026: एक हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांना काँक्रिट रस्त्याने जोडण्याची महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. आज फडणवीस यांनी अजितदादांच्या पश्चात अर्थसंकल्प सादर केला. काँक्रिट रस्त्यांसह मुख्यमंत्री ग्रामीण पशूधन उद्योजक योजना, महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियान मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना आणि मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते योजनेची घोषणा अर्थसंकल्पातून करण्यात आली.
शेतीसाठी करण्यात आलेल्या घोषणा
- गोपीनाथ मुंडे अपघात योजनेत शेतमजूर यांचा हा सहभाग करणार
- पाणंद रस्त्यांना मान्यता दिली आहे
- ३० लाखांहून अधिक शेतकऱ्यांना हवामान, बाजारभाव माहिती दिली जात आहे
- चारही कृषि विद्यापीठात एआयजी मदत घेतली जात आहे
- शेतकर्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होत आहे
- अॅग्रीस्टॅक योजना राबविण्यात येत आबे
- १ कोटी ३१ लाख फार्मर आयडी फेब्रुवारी पर्यंत झाले आहे
- चार वर्षांत भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील
- आगामी दोन वर्षांत महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियानाची सुरुवात
- गोपीनाथ मुंडे मंडळात आता शेतमजुरांचा ही समावेश करणार
- महिला गोपालक, शेळी पालकांसाठी विशेष योजना राबविण्यात येईल
इतर महत्त्वाच्या बातम्या
