Maharashtra Breaking Updates: महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, वाचा, एका क्लिकवर
Maharashtra Breaking Updates: राज्यात विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. या बातम्यांसह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, एका क्लिकवर...
पार्श्वभूमी
Maharashtra Breaking Updates: राज्यात विविध ठिकाणी पाऊस कोसळत आहे. मुंबईसह उपनगरात देखील आज पहाटे पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. तसेच राज्यात विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. या बातम्यांसह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी,...More
सोलापूर : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोट येथे काळं फासण्यात आलं. प्रवीण गायकवाड हे अक्कलकोट येथे फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी आले असताना ही घटना घडली. शिवधर्म फाउंडेशन आणि शिवभक्तांनी काळं फसल्याची प्राथमिक माहिती आहे. प्रवीण गायकवाड यांनी आपल्या संघटनेच्या नावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने शिवधर्म फाउंडेशन आक्रमक होते. त्याचबरोबर स्वामी समर्थांचा एकेरी उल्लेख करून त्यांचा अवमान केल्याचा देखील राग पदाधिकाऱ्यांच्या मनात होता. यापूर्वी शिवधर्म फाउंडेशनने संभाजी ब्रिगेडच्या विरोधात उपोषण देखील केले होते. दरम्यान आज अक्कलकोटमध्ये प्रवीण गायकवाड यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्यांना काळं फासण्यात आलं.
परभणीच्या सेलू तालुक्यातील मोरेगाव परिसरातील एक सुमसान शेत रस्त्यावर एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती घटना कळताच परभणीच्या पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी हे घटनास्थळी पोचले असुन मयत तरुण ओमकार गायकवाड असल्याचे समोर आले आहे त्याला त्याच्या ३-४ मित्रांनी आर्थिक वादातून अपहरण करत खुन केला असल्याचे उघड झाले आहे.या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी पथक रवाना केले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक रवींद्रनाथ परदेशी यांनी दिली आहे.परभणी जिल्ह्यात एका आठवड्यातील हा ३ रा खुन असुन दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालली आहे..
परभणीच्या सेलू तालुक्यातील मोरेगाव परिसरातील एक सुमसान शेत रस्त्यावर एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती घटना कळताच परभणीच्या पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी हे घटनास्थळी पोचले असुन मयत तरुण ओमकार गायकवाड असल्याचे समोर आले आहे त्याला त्याच्या ३-४ मित्रांनी आर्थिक वादातून अपहरण करत खुन केला असल्याचे उघड झाले आहे.या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी पथक रवाना केले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक रवींद्रनाथ परदेशी यांनी दिली आहे.परभणी जिल्ह्यात एका आठवड्यातील हा ३ रा खुन असुन दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालली आहे..
Beed Crime News: बीड शहरातील पेठबीड भागात ज्ञानराधा मल्टिस्टेटचा अध्यक्ष सुरेश कुटे याचे कपड्याचे दुकान आहे. कुटे कारागृहात असल्याने दुकान बंद आहे आणि हीच संधी साधून परिसरातील लोकांनी दीड महिन्यापासून या दुकानातून लाखो रुपयांचे कपडे लंपास केल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी पेठबीड पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतले असून पंचनामा करण्यात आला. यापूर्वीही कुटेच्या मालमत्तांमधून अनेक साहित्य, वस्तू चोरी गेल्याचे उघड झाले होते. या प्रकरणात पोलिसांकडून अधिक तपास केला जातोय..
बच्चू कडू यांच्या सातबारा कोरा पदयात्रेचा आजचा सातवा दिवस.
कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांच्या सह शेतकऱ्यांच्या डोळ्याला काळ्या पट्ट्या, हातात विळा आणि रूमन घेऊन आंबोड्याच्या दिशेने कुच करत सुरू केला पायदळ प्रवास.
सरकारने डोळ्यावर पट्टी बांधून ठेवली आहे. त्यामुळे त्यांचे डोळे उघडण्यासाठी प्रतीकात्मक आंदोलन
बच्चू कडू यांच्यासह कार्यकर्त्यांनी डोळ्याला बांधल्या पट्ट्या।
डोळ्याला पट्ट्या बांधून बच्चू कडूंची पदयात्रा सुरू
दिव्यांग बांधवांचाही पद यात्रेत सहभाग
सातारा : साताऱ्यातील कराड उत्तरचे विद्यमान आमदार मनोज घोरपडे यांनी यावेळीच्या पावसाळी अधिवेशनात बोगस तणनाशकाच्या साठ्या विषयी लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला होता. यानंतर सातारा पोलिसांनी सातारा शहरासह रेवडी वडूज फलटण या ठिकाणी छापे टाकून शेतीसाठी वापरले जाणाऱ्या तणनाशकाचा एकूण साडेबारा लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून सहा जणांवर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आ. मनोज घोरपडे यांनी कृषी सेवकांवर कारवाई करण्याऐवजी बनावट औषधे तयार करणाऱ्या कंपनीवर या कारवाई कराव्यात अशी मागणी केली आहे. या बनावट औषधांविषयी आपण शेवटपर्यंत आवाज उठवणार असल्याचे ते म्हणाले.
मराठा नेते मनोज जरांगे यांची सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी काल अंतरवली सराटी मध्ये जाऊन भेट घेतली, यावेळी जरांगे यांनी प्रणिती शिंदे यांचे स्वागत करत, आपल्या मागण्यांचे निवेदन त्यांना दिले,यापूर्वीच सर्व आमदाराना खासदारांना अंतरवली सराटीमध्ये येण्याची विनंती मनोज जरांगे यांनी केली होती ,मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे वर्षभरापासून आंदोलन करत असून 29 ऑगस्ट च्या मुंबई आंदोलनापूर्वी आपल्या मागण्यां सर्व आमदारांपर्यंत पोहोचवण्या साठी मनोज जरांगे यांनी आमदारांना अंतरवली मध्ये येण्याचा आवाहन केलं होतं,
यावेळी आपल्या सर्व मागण्यांचे निवेदन देत , जरांगे यांनी सरकार कडे पाठपुरावा करण्याची विनंती प्रणिती शिंदे यांना केली
भंडारा: मोटरपंप दुरुस्तीसाठी विहिरीत उतरलेल्या एका शेतकऱ्याचा वायू गळतीनं मृत्यू झाला. ही घटना भंडाऱ्याच्या लाखनी तालुक्यातील मरेगावं इथं घडली. छगन गोटे (४२) असं मृत शेतकऱ्याचं नावं आहे. सततच्या पावसामुळं मरेगावं येथील अंताराम गायधने यांच्या शेतातील विहिरीत मोठ्या प्रमाणात पाण्यानं भरली. त्यामुळं विहिरीवर असलेली मोटरपंप बाहेर काढण्यासाठी मृतक छगन हा विहिरीत उतरला असता ही घटना घडली. भंडारा येथील अग्निशमन दलाच्या पथकानं अथक प्रयत्नानं मृतदेह बाहेर काढला.
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई नगर तालुक्यातून इंदौर- हैदराबाद मार्गसाठी 160 शेतकऱ्यांच्या जमिनी भू-संपादित केल्या आहेत. मात्र पुरेसा मोबदला मिळाला नसल्याने शेतकऱ्यांनी आमदर चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात आज पूर्णा नदीत जलसमाधी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिस आणि शेतकऱ्यांमध्ये मोठी धक्काबुक्की झाली. त्यात काही आंदोलक अत्यवस्थ झाले. त्यांना तातडीने इस्पितळात भरती करण्यात आले. शेतकऱ्यांनी यावेळी मोठा संताप व्यक्त केला आहे.
गडचिरोली : आदिवासीबहुल भामरागड तालुक्यातील दुर्गम भागात कार्यरत कर्मचाऱ्यांची आरोग्य वारी सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय आहे. सध्या पावसामुळे नदी नाले तुडुंब वाहत असताना आरोग्य कर्मचारी दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी नदी, नाल्यातून पायपीट करत आरोग्य सेवा पोचवत असल्याचे एका व्हिडिओच्या माध्यमातून समोर आले आहे. लाहेरी आरोग्य केंद्रातील कर्मचारी औषधी, गोळ्या, तपासणी साहित्याच्या किट घेऊन तब्बल 18 किलोमीटर पायी प्रवास करत नागरिकांची तपासणी करीत आहेत. या प्रवासात त्यांना कुठे नावेतून प्रवास करावा लागत आहेत तर कुठे पाण्यातून प्रवास करावा लागत आहे.
- मंत्री छगन भुजबळ आणि माणिकराव कोकाटे यांच्यात पुन्हा शाब्दिक चकमक...
- नाशिकच्या जिल्हा बँकेवरून कोकाटे आणि छगन भुजबळांमध्ये आरोप प्रत्यारोप
- जिल्हा बँक सर्वपक्षीय नेत्यांनी बुडवली, भुजबळांच्या वक्तव्यावर कोकाट्यांचा पलटवार
- छगन भुजबळ यांचा गैरसमज- कोकाटे, माणिकराव कोकाटे यांनी स्वतःच्या आत्म्याला विचाराव छगन भुजबळांचा सल्ला ...
सिगरेट न दिल्याच्या रागातून पुण्यात गुंडांनी फोडले दुकान
कोयत्याच्या धाकाने पैसे लंपास
उत्तमनगर परिसरात सिगरेट न दिल्यामुळे संतापलेल्या काही गुंडांनी हातात कोयते घेऊन एका दुकानावर हल्ला केला. त्यांनी दुकान फोडून रोख रक्कम चोरी केली. या धक्कादायक घटनेचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून, त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
खोपोली: अंधेरी (पूर्व) येथील २० वर्षांचा अभियांत्रिकीचा विद्यार्थी प्रियांशू गेडाम हा तरुण काल खोपोलीतील केपी धबधब्याकडे ट्रेक करताना मार्ग चुकला आणि एका थरारक खडकाळ भागात अडकून पडला.त्यानंतर या तरुणांने महाराष्ट्र माउंटेनिअरिंग रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटरशी संपर्क साधला. यानंतर खोपोलीतील यशवंती हायकर्स-खोपोली रेस्क्यु टीमच्या या पथकाने धुके आणि खडकाळ भागात जाऊन एक तासाच्या प्रयत्नांनंतर त्याला सुखरूप बाहेर काढले.
- नाशिक जिल्हा बँक संदर्भात छगन भुजबळांचा गैरसमज झालाय
- सर्वपक्षीय नेत्यांनी बँक बुडवले नाही कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची प्रतिक्रिया
- काही प्रमाणात चुकीच्या पद्धतीने आणि अनावश्यक कर्ज वाटप झाल्याने बँक अडचणीत
- कुठल्याही राजकीय नेत्याकडे बँकेचे कर्ज नाही
- सर्वपक्षीय सोकॉल्ड नेत्यांनी बँक संपवल्याचा आरोप काल मंत्री छगन भुजबळ यांनी केला होता
- जिल्हा बँकेची निवडणूक घेऊ नये भुजबळ यांच्या या मताशी मी देखील सहमत मात्र राजकीय नेत्यांनी बँक अडचणीत आणले नाही माणिकराव कोकाटे यांची प्रतिक्रिया
उज्वल निकम यांची राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून नियुक्ती
लोकसभा निवडणूक हरल्यानंतर राज्यसभेवर राष्ट्रपती कोट्यातून नियुक्ती
भाजपमध्ये प्रवेश करत त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती, पण पराभूत झाले होते
सातारा: छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले हे जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित झाले.या 12 किल्ल्यांमध्ये साताऱ्यातील प्रतापगड किल्ल्याचा देखील समावेश आहे.यामुळे प्रतापगड किल्ल्यावर आनंदाचे वातावरण आहे.पुरातत्त्व विभागाने प्रतापगडावरील नागरिकांना घेऊन गडावर प्रतापगड जागतिक वारसास्थळ अशा फलकाचे अनावरण केलं.यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या.राज्यातील या सर्व किल्ल्यांमधील प्रतापगड किल्ला हा राबता आहे या ठिकाणी शिवप्रतापदिन,मशाल महोत्सव असे अनेक कार्यक्रम घेतले जातात त्यामुळे प्रतापगड किल्ल्याचा जागतिक वारसास्थळ जाहीर झाल्याचा अभिमान वाटत असल्याचे ग्रामस्थानी सांगितलं आहे.
धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत काल जिल्हाधिकारी कार्यालयात संध्याकाळी उशिरापर्यंत जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली या बैठकीत जयकुमार अहवाल यांनी विविध विभागांचा सविस्तर आढावा घेतला आहे...
धुळ्यातील शासकीय गुलमोहर विश्रामगृहात सापडलेल्या एक कोटी 84 लाख प्रकरणी दखलपात्र गुन्हा दाखल झाला असून पोलीस प्रशासन आणि आयकर विभागाकडून या प्रकरणाची सविस्तर चौकशी सुरू आहे हे पैसे कोणी आणि कशासाठी आणले होते याचा तपास करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे असे मत व्यक्त करीत गुलमोहर विश्रामगृहात रोकड सापडल्यानंतर आपण त्या ठिकाणी आज जाणे टाळल्याचे म्हणत जयकुमार रावल यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे... यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला...
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील सावंगी येथील समृद्धी महामार्गाच्या टोल नाक्यावर शुक्रवारी रात्री 9 वाजता 'पिस्तूल खरी की खोटी' हे दाखविताना गोळी झाडली गेल्याने एक जण गंभीर जखमी झाला होता. या प्रकरणातील दोन्ही कर्मचारी रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती सोमर येतेय. सावंगी येथील भरत विजय घाटगे आणि करण सोमीनाथ भालेराव हे दोघे मित्र समृद्धी महामार्गाच्या सावंगी टोल नाक्यावर काम करत होते. 12 जुलै रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास टोल नाका येथील एका खोलीत दोघे बसलेले असताना करण याने त्याच्याजवळचे पिस्तूल काढले. यावेळी भरतने हे पिस्तूल नकली असल्याचे सांगितले. त्यानंतर करणने हे खरे आहे, तुला चालवून दाखवू का? असे म्हणून बंदुकीचे बटन दाबले. त्याक्षणी त्यामधून गोळी सुटली आणि समोर बसलेल्या भरतच्या पोटात घुसली. त्याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र समृद्धी सारख्या महत्त्वाच्या महामार्गाच्या टोलनाक्यावर कर्मचारी घेताना पार्श्वभूमी तपासल्या जात नाही का असा प्रश्न निर्माण होतोय.
बीडच्या केज तालुक्यातील देवगाव येथील गणेश मुंडे, रामदास मुंडे, पांडुरंग मुंडे आणि एका अज्ञात व्यक्तीने एका हॉटेलमध्ये बसून पिस्तूल सोबत फोटो काढले आणि तेच फोटो व्हाट्सअप स्टेटसला लावले. यानंतर पिस्तूल सोबतचे हे फोटो सर्वत्र व्हायरल झाले आहेत. या प्रकरणात ARM ACT नुसार चार आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी बीड जिल्ह्यात अनेक वेळा विनापरवाना पिस्तूल बाळगणाऱ्यांवर कारवाया झालेल्या आहेत. आता या प्रकरणाचा तपास केज पोलिस करत आहेत.
तुळजाभवानी मंदिर पहाटे एक ऐवजी आता चार वाजता उघडणार
मंगळवार, शुक्रवार, रविवार व पौर्णिमेला मंदिर पहाटे एक वाजता उघडण्याचा निर्णय मागे
भाविकांची गर्दी कमी झाल्यामुळे मंदिर प्रशासनाकडून मंदिर पहाटे एक ऐवजी चार वाजता उघडण्याचा निर्णय
मात्र गर्दीच्या दिवशी मंदिर संस्थानच्या निर्णयाचा भाविकांना फटका बसण्याची शक्यता, भाविकांना दर्शनासाठी ताटकळत थांबावे लागू शकते
मध्य रेल्वेवरील सिग्नल यंत्रणा, ओव्हरहेड वायर, रेल्वे रुळांची देखभाल-दुरुस्ती करण्यासाठी आणि इतर अभियांत्रिकी कामांसाठी आज मेगाब्लॉक
सकाळी 8 ते दुपारी 1.30 दरम्यान विद्याविहार आणि ठाणे स्थानकांदरम्यान पाचव्या व सहाव्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येईल.
ब्लॉक कालावधीत पाचव्या आणि सहाव्या मार्गावरील रेल्वेगाड्या अप जलद आणि डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत.
हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 दरम्यान कुर्ला-वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
सकाळी 10.34 ते दुपारी 3.36 पर्यंत सीएसएमटी-वाशी/बेलापूर/पनवेल येथे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकल फेऱ्या आणि पनवेल / बेलापूर /वाशी येथून सकाळी 10.16 ते दुपारी 3.47 या वेळेत सीएसएमटीला जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत.
ब्लॉक काळात सीएसएमटी-कुर्ला आणि पनवेल-वाशी विभागात विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत.
मुंबईकरांचे पाणीकपातीचे संकट दुरावले
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलाव क्षेत्रात दमदार पाऊस पडत असल्याने सद्यस्थितीत 1077907 दशलक्ष लिटर पाणी झाले आहे.
मुंबईला दररोज होणारा 3850 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा पाहता हे पाणी एप्रिल 2026 पर्यंत पुरणारे आहे.
विशेष म्हणजे आजच्या जलसाठ्याने गेल्या तीन वर्षांचे रेकॉर्ड मोडले आहे. गेल्या दोन वर्षांत १२ जुलैचा जलसाठा पाहता आजचा जलसाठा तिप्पट आहे.
सात धरणातील पाणीसाठा
* अप्पर वैतरणा - 170035 दशलक्ष लिटर
* मोडक सागर - 128925 दशलक्ष लिटर
* तानसा - 115836 दशलक्ष लिटर
* मध्य वैतरणा - 1799493 दशलक्ष लिटर
* भातसा - 4666116 दशलक्ष लिटर
* विहार - 13450 दशलक्ष लिटर
* तुळशी - 4051 दशलक्ष लिटर
महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेत आता शरद पवार विरुद्ध अजित पवार असा सामना पाहायला मिळणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण आता मला कबड्डीमध्ये पुन्हा लक्ष घालावे लागेल, असा सूचक इशारा शरद पवार यांनी दिला आहे.
ज्येष्ठ क्रीडा पत्रकार विनायक दळवी लिखित कबड्डीतील किमयागार या संदर्भ ग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.
राज्य कबड्डी संघटनेत काही लोकांनी चुकीचा मार्ग अवलंबला आहे.
ते संस्था आपल्या मुठीत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप शरद पवारांनी शनिवारी यशवंतराव चव्हाण सेंटरमधल्या सोहळ्यात बोलताना केला.
राज्य कबड्डी असोसिएशनची सूत्रं सध्या अध्यक्ष असलेल्या अजित पवारांच्या हाती आहेत.
आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये निकृष्ट जेवण मिळाल्याने शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेला राडा संपूर्ण राज्याने बघितला..., मात्र बुलढाण्यातही आता संजय गायकवाड पुन्हा संतापले आहेत. बुलढाण्यातील पैनगंगा आश्रम शाळेतील एकोणावीस विद्यार्थिनींना परवा भात आणि कढी तून विषबाधा झाली होती. आता यावर तुम्ही काय कारवाई करणार...? या प्रश्नावर आमदार संजय गायकवाड चांगले संतापले ते म्हणाले की, ह**** फूड अँड ड्रग चे अधिकारी माझा फोन घेत नाहीत, मी आत्ताच मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे तक्रार केली आहे. मात्र हे लोक लोकांच्या जीवाशी खेळतात. यापुढे आता तुम्हाला कळेल की लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या लोकांना कोणती भाषा समजते...! यातून अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना आ संजय गायकवाड यांनी एक प्रकारचा इशाराच दिला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार मेट्रो लाईन तीन हिंजवडी ची पाहणी केली
-थोडासा पाऊस पडला तरी हिंजवडीमध्ये हिंजवडीत वॉटर पार्क याच ठिकाणी पाहणी करत उपमुख्यमंत्री अजित पवार ज्या ठिकाणी मोठा नाला बुजवत बहुमजली इमारती,कंपन्या बांधल्या त्याठिकाणी अजित पवारांनी पाहणी केली
-दोन मोठे प्रकल्प आणि एक कंपनी यांनी मिळून एक मोठा नाला बुजवत त्या ठिकाणी बांधकाम केला आहे त्यामुळे हिंजवडीच्या फेज थ्री मध्ये थोडा पाऊस पडला तरी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी साठत त्याठिकाणी अजित पवारांनी पाहणी केली
-आता उपमुख्यमंत्री अजित पवार यावर काय कारवाई करतात हेच पाहणे महत्त्वाचे राहणार आहे
सकाळी सहा वाजल्यापासून अजित पवार ऍक्टिव्ह मोडवर...
पिंपरी चिंचवड शहरातील मेट्रोच्या कामांची पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार करत आहे..
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त, पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व मेट्रोचे सर्व अधिकारी उपस्थित आहेत..
जुन्या मुंबई महामार्गावर खोपोलीजवळ बोरघाटात झालेल्या अपघातात दोन महिला जागीच ठार झाल्याची माहिती समोर आली आहे तर या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले आहेत. खोपोलीच्या बोरघाटातून पुण्याकडे चाललेल्या ट्रकच्या चालकाने एचओसी ब्रीजजवळ अचानक ब्रेक मारल्याने ट्रकमधील लोखंडी पाईप बाहेर आले आणि ते मागून चाललेल्या कार आणि दुचाकीवर धडकले.या अपघातात कारमधील एक आणि दुचाकीवरील एक महिला ठार झाली. तर चौघे जखमी झाले आहेत.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Breaking Updates: महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, वाचा, एका क्लिकवर