Maharashtra Breaking News: मालेगाव स्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष सुटका
Maharashtra Breaking News: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लाईव्ह घटनांचे अपडेटस् मिळवण्यासाठी क्लिक करा. जाणून घ्या सर्व बातम्या एका क्लिकवर....
पार्श्वभूमी
Maharashtra Breaking News: अमेरिकेनं भारतीय उत्पादनांवर २५ टक्के आयातशुल्क लावलंय. खुद्द अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याबद्दल एक्स पोस्ट केलीय. हा निर्णय जाहीर करताना ट्रम्प यांनी बरंच काही म्हटलंय. भारत स्वतः...More
पिंपरी चिंचवड : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी हिंजवडी ग्रामपंचायतचे सरपंच गणेश जांभुळकर यांना चांगलेच खडे बोल सुनावले होते. यावर गणेश जांभूळकर यांनी अखेर त्यांची भूमिका मांडली आहे. अजित पवारांच्या विकास कामांना आमचा विरोध नाही. परंतु ते आम्हाला विचारात घेऊन काम करत नाहीत, असा थेट आरोप त्यांनी अजित पवार यांच्यावर केला असून केवळ ते आयटीयन्स यांचं ऐकतात, आम्हाला बैठकीला बोलावलं जात नाही. मुळात हिंजवडी गावच्या समस्या नसताना नाव हिंजवडीच खराब होत आहे. गावकऱ्यांच म्हणणं ऐकून घ्यावे. अनेक मंदिर, शाळा, घरे रोड मध्ये जाणार आहेत. त्यामुळे अजित पवारांना सरपंच गणेश जांभुळकर यांनी हात जोडून विनंती केली आहे की, यापुढे तरी आम्हाला विश्वासात घेऊन हिंजवडीतील कामे करावीत.
मुंबई : महादेव मुंडे प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस महासंचालकांना तात्काळ विशेष तपास पथक (एसआयटी) गठीत करण्याचे आदेश दिले आहेत. पीडित पत्नीच्या मागणीनुसार पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्यात येणार आहे. या पथकात PI संतोष साबळे (जालना) आणि API सपकाळ (बीड) यांचाही समावेश आहे.
पुणे : यंदा अनंत चतुर्दशीच्या दिवशी पुण्यातील मानाचे पाच गणपतीची मिरवणूक मार्गस्थ झाल्यानंतर त्यांच्यामागे अखिल मंडई मंडळ आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी सहभाग घेण्याचा निर्णय घेतला आहे. मानाच्या पाच गणपतींमध्ये शेवटचा म्हणजेच मानाचा पाचवा कसबा गणपती मार्गस्थ होताच हे दोन्ही मंडळं मुख्य विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार असल्याची घोषणा आज मंडळांच्या अध्यक्ष यांनी पत्रकार परिषदेतून केली. ७ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३७ वाजता चंद्रग्रहण सुरू होत आहे. हिंदू धर्म शास्त्रानुसार, ग्रहण काळात देवतांच्या मूर्ती झाकून ठेवाव्या लागतात. त्यामुळे त्यावेळेच्या आधी म्हणजेच दुपारी १२ वाजण्यापूर्वी सर्व गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी दिली.
महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी कोल्हापूरमध्ये मोहीम सुरू
रविवारी नांदणीपासून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढली जाणार आत्मक्लेश पदयात्रा
सर्वपक्षीय नेत्यांनी, महादेवीवर प्रेम करणाऱ्या सगळ्यांनी आत्मक्लेश पदयात्रेत सहभागी होण्याचं आवाहन
माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलं आत्मक्लेश पदयात्रेत सहभागी होण्याचं आवाहन
जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंत पदयात्रा काढून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत राष्ट्रपतींना देणार निवेदन
मुंबई : माणिकराव कोकाटे यांचे खाते बदलण्यासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. माणिकराव कोकाटेंना कृषी खात्याऐवजी दुसऱ्या खात्याची जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. कोकाटेंचा राजीनामा न घेता खाते बदलण्याचा बैठकीत निर्णय झाल्याचे समजते.
- माजी खासदार किरीट सोमय्या आज घेणार नाशिक पोलीस आयुक्तांची भेट...
- दुपारी चार वाजता किरीट सोमय्या नाशिक पोलीस आयुक्तालयात जाणार...
- नाशिक मधील भोंग्यांच्या प्रकरणी सोमय्या पोलीस आयुक्तांशी करणार चर्चा...
- पोलीस आयुक्तांच्या भेटीनंतर माजी खासदार किरीट सोमय्या माध्यमांशी संवाद साधणार..
लातूर : जिल्ह्यातील औसा येथील ग्रामीण रुग्णालयाच्या शासकीय रुग्णवाहिकेला अचानक आग लागली. ही घटना रुग्णालयाच्या बाहेर घडल्याने परिसरात घबराट उडाली. आग रुग्णवाहिका निघताना लागल्याचं निदर्शनास आलं. अग्निशमन दलाने वेळीच धाव घेत आग आटोक्यात आणली. सुदैवाने कुणालाही इजा झाली नाही, मात्र संपूर्ण रुग्णवाहिका 100 टक्के जळून खाक झाली आहे. आगीचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
अँकर - भरदिवसा तरुणीचे अपहरण करणाऱ्या आरोपीची आज नांदेड पोलीसांनी धिंड काढली ... काल नांदेड शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातून काल दोघांनी एका तरुणीचे अपहरण केले होते .. मुलीचा बळजबरीने उचलून दुचाकीवरुन नेतानाचा व्हिडियो देखील व्हायरल झाला होता .. दरम्यान काही तासात पोलीसांनी त्या तरुणीची सुखरुप सुटका केली होती .. 23 वर्षीय आरोपी महोमद खाजा आणि अन्य एक अल्पवयीन आरोपीला वजिराबाद पोलीसांनी अटक केली .. आज आरोपी महोमद खाजा याला बेड्या ठोकून रेल्वे स्टेशन परिसरात त्याची धिंड काढण्यात आली ... ज्या ठिकाणाहून आरोपी महोमद खाजा याने तरुणीचे अपहरण केले होते ... त्याच भागात त्याला बेड्या ठोकून पोलीसांनी रस्त्याने फिरवले... आरोपी आणि त्या तरुणीची जूनी ओळख होती .. काल आरोपी तिला भेटायला गेला होता .. दोघांमध्ये वाद झाला त्यातून आरोपी खाजा याने तरुणीला बळबरीने उचलून नेले होते असं पोलीसांनी संगीतल ..
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील विशेष एनआयए न्यायालयाचा निकाल केवळ न्यायालयीन निर्णय नाही, तर तो एका दीर्घकाळ चाललेल्या राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश आहे. सर्व आरोपांमागे कोणताही ठोस पुरावा नाही, हे न्यायालयाने स्पष्टपणे नोंदवलं. पण याहून गंभीर बाब म्हणजे काँग्रेसनं जाणीवपूर्वक “हिंदू दहशतवाद” हा शब्दप्रयोग प्रचारात वापरत हिंदू समाजाला, श्रद्धेला, जगभरात बदनाम करण्याचा प्रयत्न केला. शतकानुशतकं मानवतेचं आणि सहिष्णुतेचं प्रतीक असलेल्या हिंदू धर्माला दहशतवाद्यांच्या रांगेत उभं करण्याचा अक्षम्य गुन्हा काँग्रेसने केला. आज कोर्टाने सत्य मांडलं, आता काँग्रेसनं हिंदू समाजाची माफी मागायला हवी. हिंदू कधीच दहशतवादी नव्हता आणि नसेलही. न्यायालयाच्या आजच्या निर्णयाने हिंदूंना बदनाम करणाऱ्यांना मोठी चपराक मिळाली आहे, असे म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर निशाणा साधलाय.
*नितेश राणे*
हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणून आम्ही स्पष्ट बोलतो
हिंदू कधीही दहशतवादी होऊ शकत नाही
दुसऱ्याचा धर्म संपवून स्वत:चा धर्म वाढावा असं कधीही करत नाही
काहींचे आज तोंड काळं झालं असेल
कधीही दुसरा हिंदू अतिक्रमण करत मंदिर बनवतो
हिंदू समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला त्यांना चपराक मिळाली आहे
*आतंकवादाचा रंग आणि जिहादचा रंग हिरवाच आहे*
हिंदुत्ववाद्यांना कांग्रेस काळात खोट्या केसेस टाकल्या अडकवण्याचा प्रयत्न झाला
मात्र आता आमचे सरकार असताना ते शक्य नाही
*आॅन शरद पवार, सुशीलकुमार शिंदे आणि चिदंबरम हिंदू दहशतवाद*
हिंदू समाजाची यांची आज माफी मागितली पाहिजे
आज त्यांनी नतमस्तक झालं पाहिजे
हे तिघेही हिंदू आहेत
हिंदूंनीच हिंदू समाजाची बदनामी करावी हे चुकीचं
बीड: मुंडेंना शह देण्यासाठी मुंडे पिता-पुत्रांचा प्रवेश नाही - आमदार प्रकाश सोळंके
मंत्रीपदाबाबत पुन्हा बोलून दाखवली खंत; धनंजय मुंडे यांना मंत्री पदासाठी शुभेच्छा - सोळंके
Anc:अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारसंघात पुन्हा ॲक्टिव्ह झालेत. 35 वर्षांपासून दिवंगत मुंडेंसोबत राहिलेल्या मुंडे पिता-पुत्रांना अजित दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश देण्यासाठी सोळंके यांची महत्त्वाची भूमिका आहे.
राजकारणात विरोध कायमस्वरूपी करायचा नसतो. कधीतरी विरोधकांना सोबत घेऊन राजकारण करायचे असते. मुंडेंना शह देण्यासाठी मुंडे पिता-पुत्रांचा प्रवेश नाही. तर मतदार संघात जी परिस्थिती आहे. त्या परिस्थितीप्रमाणे त्यांचा प्रवेश निश्चित झाल्याचं सोळंके यांनी म्हटलं. तर पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांना मंत्री पदासाठी शुभेच्छा देत मराठा समाज आणि बहुजन समाजावर मंत्रिपद मिळण्यासाठी अन्याय झाल्याची खंत प्रकाश सोळंके यांनी बोलून दाखवली.. प्रत्येक जण आपापली बाजू राजकारणात मांडत असतो. मी देखील केवळ वस्तूस्थिती मांडल्याचं सोळंके यांनी म्हटलं...
बाईट: प्रकाश सोळंके - आमदार
भंडारा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उर्वरित सहा जागांचे निकाल आज घोषित झाले. या सहाही जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आलेत. दोन दिवसापूर्वी १५ जागांचा निकाल घोषित झाला होता. त्यात महायुतीचा ११ जागांवर विजय झाला होता. तर, काँग्रेसला केवळ ४ जागा जिंकता आल्या होत्या. न्यायालयीन प्रक्रियेमुळं थांबलेल्या ६ जागांचे निकाल आज घोषित करण्यात आलेत. यात सर्व सहाही जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झालेत. विशेष म्हणजे आज निकाल घोषित झालेल्या विजय उमेदवारांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माझी राज्यमंत्री तथा भंडारा जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे यांचाही मोठ्या मताधिक्यानं विजय झाला. २१ संचालकापैकी १७ संचालक महायुतीचे निवडून आले असून त्यांची जिल्हा मध्यवर्ती बँकेवर एकहाती सत्ता आली आहे. तर, काँग्रेसला केवळ ४ जागांवर विजय मिळाल्यानं नाना पटोले यांचा दारुण पराभव झालाय.
*ब्रेकिंग*
मालेगाव निकालावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया
‘दहशतवाद ना कधी भगवा होता, ना कधी राहणार’ - फडणवीस
2008 मध्ये झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणावर आज NIA न्यायालयाने निकाल दिला .यात सर्व आरोपींना निर्दोष ठरवण्यात आलं असून साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह 9 जणांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे .
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल आल्यानंतर यातील आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे. या केस संदर्भात वकील म्हणून मालेगावात ज्यांनी काम बघितले होते. त्या ॲड. इरफाना हमदानी यांनी निकालावर नाराजी व्यक्त करत वरील कोर्टात जाणार असल्याचे सांगितले आहे.
मालेगाव : बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल आज लागणार आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून अतिरिक्त कुमक पोलिसांकडून मागविण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न उपस्थित होऊ नये म्हणून मालेगावच्या भिकू चौकात विशेष खबरदारी घेण्यात आली असून दोन दिवसापासून संशयित व्यक्ती आणि गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांसंदर्भात प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन देखील घेण्यात आल्याची माहिती नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे.
अकोला : 2024 लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार राहिलेले डॉ. अभय पाटील यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. प्रदेश कार्यकारिणीत स्थान न मिळाल्यामुळे आणि पक्ष निर्णय घेताना विश्वासात घेत नसल्याने ते नाराज होते, अशी चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपचे अनुप धोत्रे यांना जोरदार टक्कर दिली होती, मात्र 40,626 मतांनी पराभव स्विकारावा लागला. निकालानंतर पक्षात दुर्लक्षित झाल्याने डॉ. पाटील नाराज होते. त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
- मंगळसूत्र चोरी करणाऱ्या चोराला चोप
- देवदर्शनासाठी घरातून निघालेल्या महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र चोरी करून चोरटा काढत होता पळ
- मात्र पाठलाग करून या महिलेने चोरट्याला पकडून दिला चोप घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद
- नाशिकच्या नाशिक रोड परिसरातील जय भवानी रोड भागात घडली घटना
- आरडा ओरडा केल्यानंतर इतर नागरिक देखील या महिलेच्या मदतीसाठी धावले
- मंगळसूत्र आणि दुचाकी सोडून चोरटापळ काढण्यात यशस्वी
- चोरट्याचा ओळख पटवण्यात पोलिसांना यश चोरट्याचा शोध सुरू
अकोला : शहरातल्या राजू गांधीनगरमध्ये अज्ञात व्यक्तीकडून मध्य रात्रीच्या सुमारास तीन दुचाकी जाळण्यात आल्यात. या दुचाकी कुणी आणि का जाळल्यात?, हे कळू शकले नाही. दुचाकी मालकांनी अज्ञात व्यक्ती विरोधात सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
नवी दिल्ली : महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या वाढत असल्याने महाराष्ट्र सरकारने सरकारने तातडीने शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आदेश द्यावा व कर्जमाफी करायला सांगावी, अशी मागणी अमरावती जिल्ह्याचे काँग्रेस पक्षाचे खासदार बळवंत वानखडे यांनी लोकसभा सभागृहात केली.
महाराष्ट्र सरकारने निवडणुकीच्या आधी आपल्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. पण अद्याप सरकारने कर्जमाफीबाबत कोणतीही ठोस घोषणा केलेली नाही. ना कोणती तारीख दिली तर महाराष्ट्र सरकार पंतप्रधानांचे म्हणणे शंभर टक्के मानते. त्यामुळे पंतप्रधानांनी स्वतः पुढाकार घेऊन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफी मिळावी, यासाठी निर्देश द्यावेत. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे, अशी मागणी खासदार बळवंत वानखडे यांनी केंद्र सरकार कडे केली...
अमरावती : विर्शी गावात जमीन वादातून शारदा बाभुळकर नामक महिलेला तिघा पुरुषांनी व एका महिलेनं जबर मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यात एक महिला काठीने मारहाण करताना, तर तिघे पुरुष केस धरून लाथा-भुक्क्यांनी मारहाण करत असल्याचं दिसतं. या प्रकरणी वलगाव पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नांदणी मधील महादेवी हत्तीनीला परत आणण्यासाठी जनचळवळ सुरु.
लोकप्रतिनिधीनी सुरु केली सह्याची मोहीम..
तर कोणी संसदेत प्रश्न मांडण्यासाठी पुढे सरसावले .
एक स्वाक्षरी महादेवीनी हत्तीनीला परत आणण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात सह्याची मोहीम सुरु
महादेवी हत्तीनीला प्रशासनाने सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे गुजरात मधील वनतारा पथकाला सुपूर्द केल्यानंतर कोल्हापूरकर आक्रमक
अनेक लोकप्रतिनिधी महादेवी हत्तीनीला परत आणण्यासाठी पुढे सरसवले.
भंडारा उपविभागातील भंडारा आणि पवनी तालुक्यातील २०२३ मध्ये ४८ पोलिस पाटील पदांची भरती झाली होती. मात्र, या भरती प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप परीक्षार्थ्यांनी करून त्याविरुद्ध नागपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यात न्यायालयानं महत्वपूर्ण निर्णय देताना ती भरती प्रक्रियाचं पूर्णपणे रद्द ठरवली आहे. या निर्णयामुळं दोन वर्षांपासून कार्यरत असलेले सर्व पोलिस पाटील आता आपल्या पदावरून दूर होतील. यामुळं त्यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. मात्र, भरती प्रक्रियेत पारदर्शकता नसल्यानं अन्याय झालेल्या अनेक उमेदवारांना या निर्णयामुळं मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, या भरती प्रक्रियेची चौकशी तत्कालीन भंडारा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केली असता त्यात अनियमितता झाल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर तत्कालीन भंडारा उपविभागीय अधिकारी रविंद्र राठोड, भंडारा तहसिलदार अरविंद हिंगे आणि पवनी तहसिलदार नीलिमा रंगारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. न्यायालयाच्या निर्णयानं पोलीस पाटलांची ही भरती प्रक्रिया पुन्हा एकदा घेण्यात येणार असून ज्यांच्यावर अन्याय झाला अशांना यातून दिलासा मिळाला आहे.
आज दौंड तालुका बंदची हाक सकल हिंदू समाजाच्या वतीने देण्यात आलेले आहे. तसेच दौंड तालुक्यातील यवत मध्ये हिंदू जनआक्रोश मोर्चाचे देखील आयोजन करण्यात आलेला आहे. या मोर्चाला किन्नर आखाड्याच्या हेमांगी सखीजी, आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार संग्राम जगताप उपस्थित असणार आहेत. दौंड तालुक्यातील यवत येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केली होती. त्याच पार्श्वभूमीवर आज दौंड तालुका बंदची हाक देण्यात आलेली आहे. तसेच जन आक्रोश मोर्चाचे देखील आयोजन करण्यात आला आहे संध्याकाळी पाच वाजता जन आक्रोश मोर्चाचे आयोजन यवत येथे करण्यात आलेला आहे
21 ऑक्टोबर 2023 रोजी महादेव मुंडे यांची तहसील परिसरात निर्घुण हत्या करण्यात आली होती.हत्येला 21 उलटूनही या प्रकरणातील आरोपी अद्यापही मोकाट आहेत.मुंडे कुटुंबीय न्यायासाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत वर्षा बंगल्यावर भेट घेऊन आपली कैफियत मांडतील.
जिल्हा परिषद शाळांमध्ये दिल्या जाणाऱ्या पोषण आहारातून विद्यार्थ्यांच्या आरोग्यांशी खेळ सुरू आहे. धाराशिवच्या लोहारा मधील नागराळ येथील जिल्हा परिषद शाळेत मध्यान पोषण आहारात देण्यात आलेलं साहित्य निकृष्ट दर्जाचे आढळले. पावसानं भिजलेले दुर्गंधीयुक्त तुरडाळ, मटकी, मसूर डाळ आढळली यामध्ये अळ्या आणि किडेही झाले होते. मुख्याध्यापकांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी शालेय शिक्षण समितीला ही बाब कळवली त्यानंतर संतप्त झालेल्या पालकांनी निकृष्ट पोषण आहार साहित्य बीडिओच्या दालनासमोर फेकले.
भंडारा उपविभागातील भंडारा आणि पवनी तालुक्यातील २०२३ मध्ये ४८ पोलिस पाटील पदांची भरती झाली होती. मात्र, या भरती प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप परीक्षार्थ्यांनी करून त्याविरुद्ध नागपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यात न्यायालयानं महत्वपूर्ण निर्णय देताना ती भरती प्रक्रियाचं पूर्णपणे रद्द ठरवली आहे. या निर्णयामुळं दोन वर्षांपासून कार्यरत असलेले सर्व पोलिस पाटील आता आपल्या पदावरून दूर होतील. यामुळं त्यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. मात्र, भरती प्रक्रियेत पारदर्शकता नसल्यानं अन्याय झालेल्या अनेक उमेदवारांना या निर्णयामुळं मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, या भरती प्रक्रियेची चौकशी तत्कालीन भंडारा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केली असता त्यात अनियमितता झाल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर तत्कालीन भंडारा उपविभागीय अधिकारी रविंद्र राठोड, भंडारा तहसिलदार अरविंद हिंगे आणि पवनी तहसिलदार नीलिमा रंगारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. न्यायालयाच्या निर्णयानं पोलीस पाटलांची ही भरती प्रक्रिया पुन्हा एकदा घेण्यात येणार असून ज्यांच्यावर अन्याय झाला अशांना यातून दिलासा मिळाला आहे.
आषाढी वारी निमित्त पंढरपूर येथे गेलेली श्री संत गजानन महाराजांची पालखी आज शेगावी विसावणार आहे. पालखीच्या अंतिम टप्प्यात खामगाव ते शेगाव सध्या पालखी आहे पालखी सोबत या अंतिम टप्प्यात जवळपास पाच लाख भाविक पालखीसोबत पायी वारी करत आहेत. तब्बल तब्बल चौदाशे किलोमीटरचा पायी प्रवास करत आज पालखी शेगावी विसरवणार आहे.
नांदेड शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातून एका मुलीला दोन मुलांनी बळजबरी उचलून नेले होते .. तो व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता .. अपहरण करण्यात आलेल्या मुलीचा नांदेड पोलिसांनी तातडीने शोध घेतला .. त्या मुलीची पोलीसांनी सुखरूप सुटका केली .. अपहरण करणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली.
रायगड जिल्ह्यातील पेण हे गणेश मूर्तींचे माहेरघर म्हणून जगप्रसिद्ध आहे. गणेश चतुर्थी ला अवघे काही दिवस उरले असताना इथले मूर्तिकार आता शेवटचा हात मूर्तीवर फिरवताना दिसत आहेत पेण मध्ये तयार केलेल्या मूर्तींना देश विदेशात मोठी मागणी असते. मूर्तींचे रंगकाम, मूर्तींची रचना, त्यांची सजावट, डोळ्यांची रचना आणि आकर्षक वस्त्रालंकार करून तयार करण्यात आलेल्या मूर्तींचे इथले खास आकर्षण असल्यामुळे पेण मधील गणेश मूर्तींना भौगोलिक मानांकन देखील प्राप्त झाले आहे. इथे 550 चित्रशाळा असून या चित्रशाळेत हजारो महिला देखील गणेश मूर्तींचे काम करतात.
भारतावर टॅरिफ लावणाऱ्या अमेरिकेची पाकिस्तानसोबत नवी डील...अमेरिकेत तेल साठे विकसित करण्यासाठीचा करार...राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची सोशल मीडियाद्वारे घोषणा...
अमेरिकेच्या टेरिफवर भारताचं उत्तर, शेतकरी आणि एमएसएमईंचं नुकसान टाळण्यासाठी सर्व आवश्यक पावलं उचलणार, पंतप्रधान मोदी मंत्र्यांशी चर्चा करणार...दुपारी संसद भवनात विशेष बैठक
अमेरिकेकडून भारतीय उत्पादनांवर २५ टक्के आयातशुल्क लागू...खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांची एक्स पोस्टमधून घोषणा, भारत-रशिया मैत्रीवर खोचक टिपण्णी...
बहुप्रतिक्षित मालेगाव स्फोट प्रकरणाचा आज निकाल...साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह सात जणांना मृत्यूदंडाच्या शिक्षेची एनआयएची मागणी... आजच्या सुनावणीकडे देशाचं लक्ष...
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Breaking News: मालेगाव स्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष सुटका