Maharashtra Breaking News Live Updates: महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे सर्व अपडेट्स...वाचा एका क्लिकवर
Maharashtra Breaking News Live Updates: मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज शिवतीर्थ या निवासस्थानी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींसह देशभरातील इतर महत्वाचे अपडेट्स
पार्श्वभूमी
Maharashtra Breaking News Live Updates: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त त्यांच्या ठाणे येथील शुभ- दीप निवासस्थानाला रोषणाई करण्यात आली आहे. तसेच मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज शिवतीर्थ...More
धडगाव तालुक्यातील पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांचा गैर कारभार...
दीड हजाराहून अधिक आधार कार्ड फेकले उघड्यावर..
पोस्टात आलेल्या महत्त्वाचे कागदपत्रे वाटप न करता फेकल्याची धक्कादायक घटना......
कागदपत्रे वाटप केल्याचे भासवत नागरिकांच्या नकली सह्या कर्मचाऱ्यांनी केल्याचा प्रताप......
आधार कार्ड ,कोर्टाच्या नोटिसा ,बँक चेक यासह इतर महत्त्वाचे कागदपत्रे फेकले उघड्यावर....
पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणा आला समोर.....
वाटप होत नसल्याने महत्वाचे कागदपत्रे पोस्ट ऑफिस मध्ये पडून....
गेल्या अनेक महिन्यांपासून पोस्ट ऑफिस मध्ये गैरप्रकार सुरू असल्याची माहिती.....
एकीकडे आदिवासी बांधवांना एक आधार कार्ड काढण्यासाठी अनेक किलोमीटरची पायपीट करत तालुका स्तरावर यावं लागत असतं मात्र पोस्टमार्फत आलेले आधार कार्ड आणि इतर महत्त्वाचे कागदपत्र वाटप न करता उघड्यावर फेकल्याने नागरिकांकडून आता संताप व्यक्त करण्यात येत आहे.
धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथील ठाकरे गटाचे आमदार प्रवीण स्वामी उच्च न्यायालयात तारखेला गैरहजर राहिल्याने स्वामी यांच्या विरोधात एकतर्फा निकालासाठी ज्ञानराज चौगुले यांचा अर्ज दाखल
माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी आमदार प्रवीण स्वामी यांनी निवडणूक आयोगाच्या अटी, शर्थी नुसार निवडणूक लढवली नसल्याबद्दल औरंगाबाद खंडपीठात याचिका
सुनावणीअंती विद्यमान आमदार प्रवीण स्वामी हे नोटीस प्राप्त झाल्यापासून उच्च न्यायालयात गैरहजर
आमदार प्रवीण स्वामी यांनी स्वतःच्या बाजूने वकिल न दिल्याने माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्यामार्फत एकतर्फा आदेश पारित होण्यासाठी दाखल करण्यात आला अर्ज
दरम्यान, जनतेच्या दरबारात लढाई हरल्याने विरोधक हतबल झाल्याची स्वामी यांची टीका
जात वैधता प्रमाणपत्र अकरा वर्षापूर्वी प्राप्त झाल्याचा स्वामी यांचा दावा, सर्व नियम अटींची पूर्तता केल्याच मत
जनतेच्या दरबारात लढाई जिंकून दाखवावी असं आव्हान
सदर प्रकरणाच्या आदेशासाठी उच्च न्यायालयात 18 फेब्रुवारीला पुन्हा सुनावनी
नागपूरच्या नंदनवन पोलिसांनी शाळकरी मुलींची छेडखाणी करणाऱ्या आरोपीला केली अटक
रवी प्रकाश लाखे अस आरोपीचे नाव
शाळेच्या समोर असलेल्या दुकानाचे शटर दुरुस्त करण्यासाठी आरोपी आला होता त्यानंतर दुकानदार सोबत त्याची ओळख झाल्याने तो नियमित दुकानात येऊन बसायचा
त्या दुकानात शाळेतील मुली काही वस्तू खरेदी करायला यायच्या त्यांची तो छेडखाणी करायचा
मुलींनी पालकांना माहिती दिल्या नंतर पालकांनी याची माहिती शाळा प्रशासनाला दिली
शाळा प्रशासनाने मुलींकडून या संदर्भात चौकशी केली असता 17 मुलींनी शाळा प्रशासनाला छाडखाणी केल्याचं सांगितलं असल्याची माहिती
यावरून शाळा प्रशासनाने या संदर्भात पोलिसात तक्रार दिली असता पोलिसांनी केली आरोपीला अटक
पोलिसांनी छेडखाणी आणि पोक्सो अंतर्गत केला गुन्हा दाखल
सातारा : शहरानजीक असलेल्या कोंडवे परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी धीरज शेळके याच्या घरावर अज्ञातांकडून पेट्रोलची बाटली टाकून घर पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जकातवाडी परिसरात हा प्रकार घडला असून काही जागरूक नागरिकांनी लागलेली आग विझवली मात्र आग लावणारे त्या ठिकाणाहून पसार झाले आहेत.. या घटनेनंतर पुन्हा एकदा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.दोन दिवसापूर्वीच जकातवाडी परिसरामध्ये जमिनीच्या वादातून दोन गटात झालेल्या राड्यानंतर या भागात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र तरीदेखील या परिसरात असणारे संशयित आरोपीचे घर पेटवण्याची घटना घडल्यामुळे पोलीस प्रशासनाने हे प्रकरण गांभीर्याने घेऊन संबंधित आरोपींवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे
छत्तीसगडमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाल्याची माहिती पुढे आली आहे.
या चकमकीमध्ये 12 नक्षलवादी ठार झाल्याची प्रथमिक माहिती पुढे आली आहे.
गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या बिजापूर जिल्ह्याच्या इंद्रावती राष्ट्रीय अभयारण्याच्या जंगलात अद्याप चकमक सुरू आहे.
दरम्यान, ठार नक्षलवाद्यांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
स्थानिक पोलीस आणि केंद्रीय निमलष्करी दलाने हे संयुक्त अभियान राबवले आहे.
Sangli Crime News: शेअर मार्केटमधून जादा परताव्याच्या आमिषाने तब्बल एक कोटी 32 लाखांचा दोघांना गंडा घालण्यात आलाय. या प्रकरणी तिघाविरुद्ध सांगलीची विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. याप्रकरणी सांगलीतील अनिल पाटील यांनी तिघांविरुद्ध पोलिसात तक्रार दिलीये. यामध्ये सांगली, कोल्हापूर आणि मुंबईतील संशयीतांचा समावेश आहे. तिघा संशयितांनी दोघांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परतावा देण्याचे आमिष दाखवले. सुरुवातीला काही रक्कम देखील परत दिली. त्यानंतर विश्वास संपादन करून एक कोटी 47 लाख 87 हजार रुपये शेअर मार्केट मधील कंपनीत गुंतवण्यास सांगितले. दोघांनी ही रक्कम गुंतवल्यानंतर त्यांना मूळ रकमेतील 15 लाख रुपये आणि ज्यादा परतावा म्हणून 19 लाख रुपये परत देण्यात आले. परंतु गुंतवलेले रकमेपैकी एक कोटी 32 लाख रुपये परत न देता फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी तिघांविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात पुन्हा दाखल करण्यात आलाय.
Sangli Crime News: शेअर मार्केटमधून जादा परताव्याच्या आमिषाने तब्बल एक कोटी 32 लाखांचा दोघांना गंडा घालण्यात आलाय. या प्रकरणी तिघाविरुद्ध सांगलीची विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. याप्रकरणी सांगलीतील अनिल पाटील यांनी तिघांविरुद्ध पोलिसात तक्रार दिलीये. यामध्ये सांगली, कोल्हापूर आणि मुंबईतील संशयीतांचा समावेश आहे. तिघा संशयितांनी दोघांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परतावा देण्याचे आमिष दाखवले. सुरुवातीला काही रक्कम देखील परत दिली. त्यानंतर विश्वास संपादन करून एक कोटी 47 लाख 87 हजार रुपये शेअर मार्केट मधील कंपनीत गुंतवण्यास सांगितले. दोघांनी ही रक्कम गुंतवल्यानंतर त्यांना मूळ रकमेतील 15 लाख रुपये आणि ज्यादा परतावा म्हणून 19 लाख रुपये परत देण्यात आले. परंतु गुंतवलेले रकमेपैकी एक कोटी 32 लाख रुपये परत न देता फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी तिघांविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात पुन्हा दाखल करण्यात आलाय.
छत्तीसगडमध्ये पोलीस नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक
12 नक्षलवादी ठार झाल्याची माहिती
गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या बिजापूर जिल्ह्याच्या इंद्रावती राष्ट्रीय अभयारण्याच्या जंगलात सुरू आहे चकमक
अजूनही चकमक सुरू आहे
ठार नक्षलवाद्यांचा आकडा वाढण्याची शक्यता
स्थानिक पोलीस आणि केंद्रीय निमलष्करी दलाचे संयुक्त अभियान
रायगड ब्रेकिंग
मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात
3 जन गंभीर जखमी .. जखमींवर एम जी एम रुग्णालयात उपचार सुरू
मुंबईच्या दिशेने जात असलेला ट्रेलर अचानक पलटी
वेगात पलटी झालेला ट्रेलर कार वर आदळला
अपघातांत कारचा चेंदामेंदा... कार मधील 3 जन गंभीर जखमी
मुंबई गोवा महामार्गावरील कर्नाळा खिंडीत घडला अपघात ..
दोन्हीं वाहणे मुंबईच्या दिशेने जात असताना घडला अपघात
अपघात घटनास्थळी मनसे सैनिक आणि रायगड पोलिसांची मदत
मला बदनाम करण्यासाठी मुद्दामहून तडीपारीत पाहुणेरावळे घेतले असतील... मेव्हण्याच्या तडीपारी वरती मनोज जरांगेची प्रतिक्रिया
मुद्दामहून मी कुठे सापडत नाही म्हणून, हे केलं..
एखाद्या वेळेस षड्यंत असू शकतं माझी बोलती बंद करण्यासाठी... मनोज जरांगे.
फडणवीस यांच्या जवळ धनंजय मुंडे यांच्या सारखी टोळी आहे..
मला पाहुणा कोणी नाही. समाजापुढे मी आई बापाला किंमत देत नाही-जरांगे.
अँकर -जालना प्रशासनाने नऊ वाळू माफिया वरती तडीपारीची कारवाई केली असून, यात मनोज जरांगे यांचा मेव्हणा विलास खेडकर चा देखील समावेश आहे, यावर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया आली असून.
एखाद्या वेळेस माझं तोंड बंद करण्यासाठी हे षडयंत्र असेल, मला बदनाम करण्यासाठी मुद्दामहून पाहुणे घेतले असतील, पण माझा पाहुणा कोणी नाही मी समाजापुढे आई बापाला किंमत देत नाही अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली आहे.
अंजली दमानिया
दोन महिने उलटले पण काही पुढे सरकताना दिसत नाही .९ डिसेंबर ला एक स्कॉर्पिओ जप्त झाली होती, त्यात दोन मोबाईल जप्त झाले होते
फॉरन्सिक डेटा रिकव्हरी अजून नाही.कारण त्यात एक बड्या नेत्याचा फोन आला होता, त्याचे नाव उघड होणार की नाही.राजकीय दबाव मुळे कारवाई योग्य दिशेने होत नाही
धनंजय मुंडे राजीनामा देणार नाही तो पर्यंत दिशा योग्य मिळणार नाही.
धनंजय मुंडे वाल्मिकी कराड आर्थिक एकत्र होते, दहशत एकत्र होती .त्यांना वाचविण्याच काम धनंजय मुंडे करीत होते म्हणून त्यांचा राजीनामा झाला पाहिजे .सगळ्यांना पत्र करून झाले , अजित पवारांना भेटून झाले ऑफिस ऑफ प्रॉफिट चे पेपर दिले .टोलवा टोलव सुरू झाले आता डिटेल पत्र लिहिले आहे , ते मुख्यमंत्री, अजित पवार, सीजे, कॅग आणि इलेक्शन कमिशन ला पत्र पाठवले आहे मंत्री पद काय आमदारकी ही रद्द झाली पाहिजे
मुख्यमंत्र्याना भेटले तेव्हा त्यांनी ते माझ्या पक्षात नाही सांगितले म्हणून मी अजित पवार यांना भेटले .पण टोलवा टोलव सुरू आहे
पण आता हे पत्र पाहून तरी निर्णय घेतील .आरोपी शोधला तर मिळेल .पोलिसांना हवा तर २४ तासात आरोपी सापडतो पण राजकीय दबाव असेल
काही डॉक्टरांनी पोस्ट मार्टम रिपोर्ट पुन्हा उघडला होता, पण काहीच झाले नाही .लोक विसरतील असा वेळकाढू पणा सुरू आहे हे पत्र सर्वांना पाठवले आहे तर कृषी घोटाळा आहे तो पावणे तीनशे कोटीचा आहे, कॅग ने याची चौकशी करावी
मला वाईट याचे वाटते की सामन्य माणसाला न्याय का मिळत नाही यंत्रणा बड्या नेत्यांना वाचवतात
हे सर्व बंद व्हायला हवे त्या दिशेने आपल्याला काम करायला हवे .धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे हा माझा प्रश्न मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवा त्यांचे उत्तर घ्या
उदय सामंत
सामंत बंधूंना राजन साळवी यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशाला विरोध नसल्याचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीत किरण सामंत यांनी राजन साळवी यांचा पराभव केला आहे. त्याच्या जवळचे सर्व कार्यकर्ते शिवसेना पक्षात आले आहे व येत आहे. त्यामुळे राजन साळवी यांना पक्षात घेतांना एकनाथ शिंदे सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घेईल असे उदय सामंत म्हणाले.
संदिप देशपांडे
पक्षवाढीसाठी बैठक झाली .. संघटनात्मक पातळीवर चर्चा ..
दिल्लीची परिस्थिती आणि महाराष्ट्रातील परिस्थिती वेगळी शंका उपस्थित होते पारदर्शकता अपेक्षित ..
ॲान अजित पवार
पवार साहेबांच्या पत्नी मुलगा जिंकुन आली नाही भाजपचा पदर पकडला म्हणून मिळाली भाजपसोबत लग्न गाठ बांधली म्हणून ते जिंकले एकट्याच्या जिवावर त्यांनी लढुन दाखवावे
ॲान शिवाजी पार्क आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरेंच्या हट्टामुळे शिवाजी पार्क मैदानात माती टाकण्यात आली त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला पाहिजे त्यांच्यामुळे आज लोक आजारी पडतात आयआयटीच्या अहवालानंतर माती हटवण्यात येणार नाही त्यामुळे काही बदल होणार नाही
डोंबिवलीत खळबळजनक घटना
जेवण सांडल्याने एका मजुराने दुसऱ्या मजुराची केली हत्या... आरोपी अटक
anchor: डोंबिवलीतील विष्णू नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत क्षुल्लक कारणावरून एका मजुराने दुसऱ्या मजुराचा खून केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. गौरव ऊर्फ चित्तमन जगत असे मृताचे नाव आहे.
आरोपी जयसान मांझी आणि गौरव उर्फ चित्तमन जगत हे दोघे एका बांधकामाचा ठिकाणी एकत्र राहत होते. दोन दिवसांपूर्वी बांधकामाच्या साइटवर पडलेल्या जेवणावरुन या दोघा कामगारांमध्ये वाद झाला,
रात्री झोपेत जगत याच्या डोक्यात आरोपी जयसान मांझी याने बांबूच्या काठीने प्रहार केल्याने त्याचा मृत्यू झाला. आरोपी जयसान मांझी याला अटक करण्यात आली असून, पुढील तपास विष्णूनगर पोलिस करत आहेत
कराडला मुक्या प्राण्यांना जीवनदान देण्यासाठी रेस्क्यू सोसायटी
वाइल्डहार्ट रेस्क्यूअर नाईटस् सोसायटी
मानवी वस्तीत तसेच डोंगर दऱ्यात अडचणीत सापडलेल्या वाघ, बिबट्या, साप यासह मुक्या प्राण्यांना पकडून सहीसलामत जंगलात सोडून त्याचा जीव वाचवण्यासाठी गेल्या तीन वर्षापासून काम करणाऱ्या 30 प्राणीमित्र युवकांनी एकत्रित येऊन वन्य प्राण्यांच्या मदतीसाठी वाइल्डहार्ट रेस्क्यूअर नाईटस् सोसायटी संस्थेची स्थापना केली आहे. यावेळी वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक महेश झांजुर्णे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते
Nashik: आदिवासी मंत्र्यांच्या आदेशानुसार आदिवासी विभागाच्या राज्य आयुक्त नयना गुंडे या नाशिक जिल्ह्यातील डोल्हारे आश्रम शाळा व वस्तीगृह या ठिकाणी पाहणी साठी आणि खास मुक्कामासाठी गेल्या होत्या मात्र त्या ठिकाणची परिस्थिती पाहून आयुक्त गुंडे या त्या ठिकाणी थांबू शकले नाहीत अखेर त्यांना आपला मुक्काम आंबाटा येथील एका खाजगी विद्यालयात करण्याची वेळ आली. आश्रम शाळांची सत्य परिस्थिती समोर आल्यानंतरही कामकाज योग्य चालू असल्याचा अभिप्राय आयुक्त गुंडे यांनी दिला. सविस्तर अहवाल आल्यावर निर्णय घेऊ असे देखील त्यांनी यावेळी सांगितले मात्र आश्रम शाळेत शिकणाऱ्या 250 विद्यार्थ्यांना वर्षभर काय सुविधा पुरवल्या जात असतील याचा अंदाज आता न केलेला बरा मात्र आदिवासी मंत्री अशोक उईके यांच्या संकल्पनेतून संवाद चिमुकल्यांशी या अभियानाची सुरुवात करण्यात आली आणि त्यानुसार आदिवासी राज्य आयुक्त नयना गुंडे ह्या ज्या आश्रम शाळेत गेल्या त्या ठिकाणची सत्य परिस्थिती समोर आली आहे.
संजय राऊत
- अमित शहांनी शब्द पाळला असता तर ती घडामोड झाली नसती
- २०१९ ला आम्ही चर्चा केली असं ते म्हणतं आहेत मग २०१४ ला काय झालं होतं
- का भाजपने तेव्हा युती तोडली
- शिवसेना प्रमुख नाहीत या आनंदात भाजपने निवडणूका लढवल्या
- फडणवीस यांना विजयाचं हॅग ओव्हर झालयं, किंवा ते सारखा विजय पाहून डिपरेस झालेल
- शिंदेंचं आॅपरेशन कधी अमित शहा करतील हे त्यांना ही कळणार नाही.
- आरोपींना अटक होत नसेल तर फडणवीस म्हणतात कोणाला सोडणार नाही. मग आरोपीला अटक का होतं नाही.
- बीडमध्ये जाऊन मुख्यमंत्री हारतुरे काय स्विकारत आहेत. ही त्यांची मिलीभगत आहेत
- जरांगे पाटील यांचे मुद्दे पाठीशी टाकण्यासाठी धस याना पुढे आणलं जातं आहे का ?
- मुख्यमंत्री नेमकं कोणाला पाठीशी घालतं आहेत
- बीडची जनता मुर्खवाटली का?
संजय राऊत
- राजकारणात संसदीय लोकशाहीत जय पराजय हार जीत होत असते
- मात्र मागच्या दहा वर्षात भाजप सत्तेत आल्यापासून त्या संविधानिक पद्धतीत निवडणूक होत नाही आहेत
- विजयासाठी साम दाम दंड भेद वापरलं जात आहे
- मतदार यादीतील घोळ महाराष्ट्रप्रमाणे इतरही राज्यात आहेत
- काॅग्रेस आप एकत्र लढले असते तर निकाल वेगळा लागला असता
- यातून शिकायला हवा
- आण्णा हजारे काय बोलतात त्याला अर्थ नाही
- मोदींच्या कार्यकाळात झालेल्या भ्रष्टाचार झाले त्यावेळी ते होते कुठे
- केजरीवाल यांचा पराभव झाला याचा आनंद आण्णांना झाला
- देश लुटला जातोय एकाच उद्योगपतीच्या घशात सर्व घातलं जातयं याने लोकशाही टिकेल का
-आम्ही खूर्चीसाठी लढत होतो तर ते कशासाठी लढत होते
- महाराष्ट्रातलं सरकार ही एढ्याची जत्रा आहे
- मुख्यमंत्री पदाची खूर्ची गेल्यावर फडणवीस यांचा तो चेहरा पाहिलाय
- तर ज्यांची खूर्ची गेली ते कसे रूसून बसत आहेत तेही पाहतोय
सांगलीत शेअर मार्केट मधून जादा परताव्याच्या आमिषाने तब्बल एक कोटी 32 लाखांचा दोघांना गंडा .. तिघाविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
सांगलीत शेअर मार्केट मधून जादा परताव्याच्या आमिषाने तब्बल एक कोटी 32 लाखांचा दोघांना गंडा घालण्यात आलाय. या प्रकरणी तिघाविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. याप्रकरणी सांगलीतील अनिल पाटील यांनी तिघांविरुद्ध पोलिसात तक्रार दिलीये. यामध्ये सांगली, कोल्हापूर आणि मुंबईतील संशयीतांचा समावेश आहे. तिघा संशयितांनी दोघांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परतावा देण्याचे आमिष दाखवले. सुरुवातीला काही रक्कम देखील परत दिली. त्यानंतर विश्वास संपादन करून एक कोटी 47 लाख 87 हजार रुपये शेअर मार्केट मधील कंपनीत गुंतवण्यास सांगितले. दोघांनी ही रक्कम गुंतवल्यानंतर त्यांना मूळ रकमेतील 15 लाख रुपये आणि ज्यादा परतावा म्हणून 19 लाख रुपये परत देण्यात आले. परंतु गुंतवलेले रकमेपैकी एक कोटी 32 लाख रुपये परत न देता फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी तिघांविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात पुन्हा दाखल करण्यात आलाय.
मॉर्निंग वॉक ला जाणाऱ्या दोन युवकांना बसची धडक.
एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी.
चिखली-बुलढाणा मार्गावर सवना गावानजीक सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या दोन युवकांना पाठीमागून येणाऱ्या भरधाव एसटी बस ने धडक दिली. या भीषण अपघातात एक युवक जागीच ठार झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.या अपघातात तीस वर्षीय आलोक शामलाल शिंगणे याचा जागीच मृत्यू झाला. तर अक्षय रमेश पट्टे हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर चिखलीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चिखलीहून जळगावकडे जाणारी एसटी बस भरधाव वेगाने जात असताना सवना गावाजवळ हा अपघात घडला.
ठाणे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध लोकार्पण सोहळा
आरोग्य सेवा होणार बळकट आणि वेगवान
मोबाईल व्हॅन ,रुग्णवाहिकांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज लोकार्पण
राज्यात कर्करोग तपासणी आणि जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून कर्करोग दिन निदान व उपचारासाठी आणि राज्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम दर्जेदार आणि नागरिकांना सहजपणे उपलब्ध करून देण्यासाठी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात विविध आरोग्य सुविधांचे लोकार्पण होणार आहे...
शेतकरी आपल्या शेतातील गुरांची स्वतःच्या लेकराप्रमाणे काळजी घेत असतात त्यामध्ये बैल असो वा गाई याचाच प्रत्यय काल हिंगोली चा वरुड चक्रपान या गावांमध्ये आला आहे शेतकरी शिवाजी फाले यांच्याकडे असलेल्या गाईच्या डोहाळे जेवणाचा काल आयोजन करण्यात आलं होतं ज्या पद्धतीने आपल्या संस्कृतीमध्ये महिलांच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला जातो त्याच पद्धतीने या गाईच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम काल आयोजित करण्यात आला होता. गाईला चांगल्या पद्धतीने सजवून गोडधोड खायला देऊन हा डोहाळे जेवण कार्यक्रम करण्यात आला यावेळी घरातील महिलांनी सुद्धा साज शृंगार करत या गाईच्या डोहाळे जेवणासाठी पाळणे गीत सुद्धा गायले आहेत आपल्याकडे असलेल्या गाईच्या पायगुणाने घरात चांगले दिवस येत असतात असा समज ठेवून या शेतकऱ्याने या गोमातेच्या डोहाळे जेवणाचे कार्यक्रम साजरा केला आहे.
बीड वाहतूक पोलिसांनी रात्री उशिरा मोहीम राबवून दोनशे ऑटोरिक्षा जप्त केल्या आहेत. त्याबरोबरच कर्कश्य आवाज करणाऱ्या बुलेट सायलेन्सर वर देखील कारवाई केली आहे.
बीड शहरातील अण्णाभाऊ साठे चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, सुभाष रोड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात मोठ्या प्रमाणात ऑटो रिक्षा उभे असतात. वाहतूक पोलिसांनी अचानक सर्च मोहीम राबवत ऑटो रिक्षाची कागदपत्र ड्रायव्हिंग लायसन्स फॅन्सी नंबर विमा नसणे अशा ऑटो रिक्षावर कारवाई करत जप्त केले आहेत. यामध्ये दोनशे रिक्षांचा समावेश आहे.
ऑटो रिक्षा बरोबरच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बुलेटवर देखील दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे.
प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक प्रीतम चक्रवर्ती यांच्या कार्यालयातून ४० लाख रुपयांची चोरी झाली.
या चोरीच्या घटनेबाबत प्रीतमच्या मॅनेजरने मुंबईतील मालाड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केली दाखल .
प्रीतमचे व्यवस्थापक विनीत छेडा यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले की, काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने प्रीतमच्या कामासाठी ४० लाख रुपये कार्यालयात आणले होते, जे विनीतला मिळाले होते आणि त्याने ते पैसे मुंबई कार्यालयात ठेवले होते.
प्रीतमच्या मॅनेजरने हे ४० लाख रुपये त्याच्याकडे सोपवले तेव्हा प्रीतमच्या ऑफिसमध्ये काम करणारा आशिष सायल नावाचा एक व्यक्ती ऑफिसमध्ये उपस्थित होता.
राजन साळवी यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशाचा मुहूर्त ठरला
भाजपचे राज्यसभा खासदार अजित गोपछडे यांना व्हाय प्लस दर्जाची सुरक्षा
गृहखात्याचा निर्णय
व्हीआयपी सुरक्षा उपायुक्तांचे आदेश
अजित गोपछडे यांना व्हाय प्लस दर्जाची सुरक्षा
रामजन्मभूमी आंदोलन आणि फुटिरतावाद्यांच्या विरोधातील भूमिकेच्या अनुषंगाने अजित गोपछडेंना सुरक्षा देण्याचा निर्णय
रस्ते सुरक्षा संदेश देण्यासाठी कराड उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रोड सेफ्टी मॅरेथॉन पार पडली, या मॅरेथॉनमध्ये अडीच हजाराहून अधिक धावपटूंनी सहभाग घेतला. कबूतर पक्षी आकाशात सोडून या स्पर्धेची सुरुवात करण्यात आली.
आज पलूस तालुक्यातील कुंडल मध्ये ऐतिहासिक कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आलेय. या कुस्ती मैदानामध्ये प्रथम क्रमांकासाठी यंदाचा महाराष्ट्र केसरी पदाचा मानकरी ठरलेला पुण्याचा मल्ल पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध पंजाब च्या मछवाडा आखाड्याचा मल्ल गुरव मछवाडा यांच्यात कुस्ती होणार आहे. या कुस्ती मैदानाची वैशिष्ट्ये म्हणजे नैसर्गिक बशीच्या आकाराचे हे मैदान असून प्रेक्षक कुठेही बसले तरी संपूर्ण कुस्ती स्पष्टपणे दिसते. कुंडलच्या या कुस्ती मैदानाला स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचे महत्त्व आहे. महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेला समृद्ध करणारे असंख्य पैलवान या कुंडलच्या मातीत घडले. कुस्ती पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरच्या खासबाग कुस्ती मैदानाची जशी माती पैलवानाच्या अंगाला लागली पाहिजे, तसाच अलिखित नियम कुंडलच्या या कुस्ती मैदानाचा आहे.
आज सकाळी ९ वाजता शिवतीर्थ या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी मनसेची बैठक
सर्व मनसे नेत्यांना उपस्थित राहण्याचे पक्षाकडून आदेश...
आगामी पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे मनसे नेत्यांना करणार मार्गदर्शन..
बुलढाणा जिल्ह्यातील दुर्गम अशा संग्रामपूर तालुक्यात काल बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी शस्त्रासह संग्रामपूर शहरातून पथसंचलन केलं. यावेळी जवळपास 2000 बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांना त्रिशूल हे शस्त्र वाटप करण्यात आलं. धर्माच्या रक्षणासाठी धर्मांतर रोखण्यासाठी हिंदू धर्मातील महिलांच्या व मुलींच्या रक्षणासाठी या शस्त्राचा वापर करावा अस आवाहन यावेळी बजरंग दलाचे विदर्भ प्रांताचे संयोजक एड.अमोल अंधारे यांनी केलं. शिवाय त्यांनी काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांच्यावरही जोरदार टीका केली.
पुण्यात पुन्हा ब्रँडेड कंपनीच्या डुप्लिकेट शर्टची विक्री
ब्रँडेड कंपनीचं नाव वापरत पुण्यात कपड्यांची विक्री
पुण्यातील लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घटना
US POLO कंपनीचे नाव व लोगो वापरत बनावट शर्टची विक्री
लोणी काळभोर परिसरातील दोन विक्रेत्यांवर कारवाई
पोलिसांकडून ४ लाख ८ हजार ५०० रुपयांचे एकुण ८१७ शर्ट जप्त
लोणी काळभोर पोलिसांची कारवाई
अविशा मौला सय्यद, स्वरुपसिंग अशोकसिंग राजपुरोहित असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन आरोपींचे नावे
पुण्यात वाहतूक पोलिसांवर दगडाने हल्ला करणारा आरोपी अटकेत
वाहतूक पोलिसावर दगडाने हल्ला करून पळून जाणाऱ्या तरुणाला फुरसुंगी पोलिसांकडून अटक
आदिनाथ ऊर्फ बबलू भागवत मसाळ असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव
मोबाईलवर बोलत गाडी चालवत असल्याने वाहतूक पोलिसाने आरोपीला रोखले होते याचाच राग मनात धरून वाहतूक पोलिसांना आरोपीकडून करण्यात आले होती दगडाने मारहाण
या हल्ल्यात कर्तव्यावर असलेले पोलीस हवालदार राजेश गणपत नाईक झाले होते जखमी
विशाळगडावरील अतिक्रमणे 30 दिवसात काढून घ्या
पुरातत्त्व विभागाचे विशाळगडावरील 23 जणांना आदेश
तीन ते चार महिन्यांपासून अतिक्रमण हटाव मोहीम थांबली होती
मात्र आता पुरातत्त्व विभागाच्या आदेशानुसार संबंधितांना 30 दिवसात अतिक्रमण हटवावी लागणार
सोमनाथ सुर्यवंशी मृत्यू प्रकरण १ पोलीस अधिकारी ३ कर्मचारी निलंबित
परभणी ते मुंबई लाँग मार्च दरम्यान नाशिक येथे पालकमंत्री मेघना बोर्डीकर आणि आमदार सुरेश धस आणि पोलीस अधिकारी आंदोलकांना भेटले
आंदोलकांच्या भेटीनंतर १५ मागण्या मान्य करण्याबाबत देण्यात आले पत्र
पोलीस उपनिरीक्षक कर्तिकेश्र्वर तूरनर,कर्मचारी सतीश दैठणकर,मोहित पठाण,राजेश जठाल यांचे निलंबन
आंदोलकांकडून मागण्या मान्य करण्याबाबत देण्यात आला १ महिन्याचा वेळ
आठवडाभरात जवळपास तीन माजी आमदार उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंसोबत जातील
प्राचार्याने आपल्याच विद्यालयात शिकत असलेल्या विद्यार्थ्यावर केला अनैसर्गिक लैंगिक छळ...
अहिल्यानगर शहरातील केडगाव उपनगरातील धक्कादायक प्रकार...
प्राचार्यावर कोतवाली पोलीस ठाण्यात बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ८, १०, १२ प्रमाणे गुन्हा दाखल...
संतोष सुधाकर देवरे असे गुन्हा दाखल झालेल्या प्राचार्याचे नाव...
आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत प्राचार्याने केला अत्याचार...
गुन्हा दाखल होताच प्राचार्य संतोष देवरे फरार...
संतोष देवरे याला पकडण्यासाठी तीन पोलीस पथके विविध जिल्ह्यात रवाना...
जत तालुक्यातील करजगी येथील बालिका अत्याचार प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा मिळण्यासाठी पाठपुरावा करू आणि या प्रकरणी अत्यंत कमी कालावधीत पंधरा दिवसात दोषारोपपत्र दाखल केले जाईल असे महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी म्हंटलेय. करजगीत जाऊन चाकणकर यांनी या घटनेचा आढावा घेतला. घटनेचा आढावा घेतल्यानंतर चाकणकर यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच, पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले व त्यांना धीर घटनेचा आढावा घेतल्यानंतर श्रीमती चाकणकर यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच, पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले व त्यांना धीर दिला.
तीन दिवसापूर्वी अहिल्यानगरच्या बोल्हेगाव या ठिकाणी कचरा वेचक महिला ज्योती घोडके आणि प्रमिला घोडके यांना एका विशिष्ट समाजाच्या (मुस्लिम) काही तरुणांनी मारहाण केली होती...यामध्ये दोन्ही महिला गंभीर जखमी झाल्या होत्या...या महिलांची आमदार संग्राम जगताप यांनी भेट घेतली...यामध्ये एका आरोपीला अटक केली आहे, परंतु आरोपीच्या इतर साथीदारांना देखील लवकरात लवकर अटक करावी यासाठी आ.जगताप यांनी तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांची भेट घेतली असून आरोपींवर 307 कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त दहिसर येथे महिलांसाठी क्रिकेट स्पर्धांचे आयोजन
दहिसर पूर्वेकडील अलकनंदा मैदानावर लाडकी बहीण चषक क्रिकेट सामन्यांचे आयोजन
आमदार प्रकाश सुर्वे यांच्या माध्यमातून आणि महिला विभाग प्रमुख मीना पानमंद यांच्या टीम कडून महिलांसाठी च्या क्रिकेट सामन्यांच्या आयोजन
आमदार प्रकाश सुर्वे यांनी श्रीफळ वाढवून केले क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
महिलांचे क्रिकेट सामने पाहण्यासाठी दहिसरकारांची गर्दी...
उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा..
शुभ-दीप निवासस्थान आकर्षित विद्युत रोषणाई.. मोठ्या प्रमाणात फुलांची आरस...
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ६२ व्या वर्षात पदार्पण...
एकनाथ शिंदे यांच्या ठाण्याच्या शुभ- दीप या निवासस्थानी शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते..
तसेच मंत्री उदय सामंत, मंत्री भरत गोगावले, माजी मंत्री दीपक केसरकर, खासदार श्रीकांत शिंदे,खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रकाश सुर्वे,माजी आमदार रवींद्र फाटक , विजय चौगुले यांनी देखील शिंदेंना शुभेच्छा दिल्या..
मनोज जरांगे यांच्या मेहुण्या सह 9 वाळू माफिया आणि अटल गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई..
जालन्यात वाळू माफीया आणि अट्टल गुन्हेगारांच्या विरोधात प्रशासन ॲक्शन मोडवर..
वाळू प्रकरणासह आंतरवाली सराटीतील आंदोलनात असलेल्या जाळपोळीच्या घटनेतीलगुन्ह्यात आरोपी असलेले 9 आरोपी जालना जिल्ह्यासह बीड ,संभाजीनगर ,परभणी जिल्ह्यातून तडीपार...
अंबड उपविभागीय न्याय दंडाधिकारी यांच्या आदेशाने तडीपारीची कारवाई...
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मेहुना विलास खेडकर यांच्यावर देखील तडीपारीची कारवाई...
या आरोपींविरोधात जालन्यातल्या अंबड ,घनसावंगी आणि गोंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे दाखल आहेत..
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Breaking News Live Updates: महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे सर्व अपडेट्स...वाचा एका क्लिकवर