Maharashtra Breaking LIVE Updates: अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी कोणी अहवाल मागवतं का? नीलम गोऱ्हेंनी सभागृहात भाजपच्या मंत्र्याला सुनावले खडेबोल
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा फक्त एका क्लिकवर...
LIVE

Background
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा फक्त एका क्लिकवर...
ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भाजपच्या संपर्कात?
सरकारने जाहीर केलेल्या हिंदीसक्तीच्या निर्णयाविरोधात सुमारे दोन दशकांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले.. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणांतून भाजपावर जोरदार टीका केली. आम्ही निवडणुकीसाठी नाही तर मराठीसाठी एकत्र आलो आहोत, असे ते म्हणाले.मात्र या मेळाव्यानंतर आता भाजपच्या गिरीश महाजन यांनी मोठा दावा केला आहे.. ठाकरेंच्या शिवसेनेते आमदार आणि खासदार भाजपच्या संपर्कात असल्याचा मोठा दावा जलसंपदामंत्री गिरीश महाजनांनी केलाय..गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गटाला गळती सुरु असल्याची पाहायला मिळत आहे. अशातच पुन्हा एकदा ठाकरेंचे आमदार खासदार भाजपच्या गळाला लागणार का अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे... तर महाजनांनी केलेला दावा आदित्य ठाकरेंनी फेटाळून लावला.
ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया
ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यावर आता काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. काँग्रेसच्या मूल्यांना जे स्वीकारतील त्यांच्यासोबत काँग्रेस पुढे जाईल. ठाकरे बंधू कोणकोणत्या मुद्द्यांवर एकत्र आले आहेत कळल्यावर पुढील निर्णय घेऊन अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली.
ठाकरेंच्या मेळाव्यावर प्रताप सरनाईक काय म्हणाले?
ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठ्या प्रमाणात टीका केली..यावेळी सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एक भावनिक पत्र लिहलं आणि त्या पत्रातून ठाकरे बंधूंवर निशाणा साधलाय.. मराठीच्या हितासाठी एकत्र आहोत असे सांगणारे काही वर्षांपूर्वी वेगवेगळे झाले ते कोणाच्या हितासाठी असा सवाल यावेळी प्रताप सरनाईकांनी उपस्थित केला.. तर दोन्ही ठाकरे बंधूंचा महापालिकेच्या तिजोरीत आत्मा अडकल्याचा आरोप करत सरनाईकांनी हल्लाबोल केलाय.
नीलम गोऱ्हेंनी भाजपच्या मंत्र्याला सुनावले खडेबोल; नेमकं काय घडलं?
विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी मंत्री अतुल सावे यांना सुनावले खडे बोल
शेवटच्या क्षणाला अहवाल कसा काय मागवता... सभागृहात यायच्या आधीच माहिती घ्यायची असते...
लक्षवेधी संदर्भात मंत्री अतुल सावे यांच्याकडे अपुरी माहिती असल्याने त्यांनी सभागृहात अहवाल मागवतो असं सांगितलं
दिव्यांग मंत्रालय उभारणी संदर्भात लक्षवेधी लावली होती
त्या लक्षवेधी बदल अर्धवट माहिती आणि अहवाल उपलब्ध नसल्याने अतुल सावे यांनी तात्काळ अहवाल मागवतो असं म्हटलं
मात्र शेवटच्या क्षणी अधिवेशनाच्या दिवशी अहवाल कसा काय मागवता असा खडा सवालभर सभागृहात नीलम गोरे यांनी मंत्री अतुल सावे यांना विचारला
पीएनपी नाट्यगृहाचे शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन, रायगडमधील कलाकारांना पुन्हा मिळणार नवीन संधी
रायगड : 15 जून 2022 रोजी अलिबागमधील आगीत भस्मसात झालेले पीएनपी नाट्यगृह अखेर तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा नव्याने उभे राहिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते या नाट्यगृहाचे आज अलिबागमध्ये उद्घाटन पार पडले. महाराष्ट्रातील एकमेव सहकार तत्वावर चालणारे हे नाट्यगृह आता पुन्हा एकदा मराठी कलाकारांना नवीन संधी देण्यासाठी सज्ज झाले आहे. शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी पुढाकार घेऊन हे नाट्यगृह उभारले आहे. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार निलेश लंके, शिवसेनेच्या सुषमा अंधारे उपस्थित होत्या.
























