Maharashtra Breaking LIVE Updates: सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा, अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद घेतले ताब्यात
Maharashtra Breaking LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...

पार्श्वभूमी
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्या, अन्यथा मंत्रालयासमोर उपोषण करणार; अशोक खरात प्रकरणी करुणा मुंडेंचा इशाराराज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर करुणा...More
Anchor - कॅप्टन खरात प्रकरणी भाष्य करणाऱ्या ठाकरे सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांना 8 धमकी कॉल आल्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी याबाबत भाष्य करत देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केलीय. महात्मा गांधीचा ज्याप्रमाणे घोडसेंनी थंड डोक्याने खून केला त्यांचीच ही पिलावळ असून देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व करत असल्याच म्हणत सपकाळ यांनी फटकारले आहे.
वाशिम जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस बरसलाय मानोराच्या विठोली परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसत असून काही ठिकाणी हलक्या स्वरूपाची गारपीटही होत असल्याचे चित्र आहे. गहू, हरभरा तसेच इतर रब्बी पिके सध्या काढणीच्या टप्प्यावर आहे अश्यातच या अवकाळी पावसामुळे पिकां सह फळबागांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे..
अँकर - बीड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या अवकाळी आणि गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्याचे निर्देश मंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.जिल्ह्यात बीड, आष्टी,वडवणी,केज तालुक्यात झालेल्या
अवकाळी पाऊस आणि गारपीटीची मंत्री पंकजा मुंडे यांनी माहिती घेतली.यामध्ये फळबागांसह पिकांचेही मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांवर आलेले संकट पाहता या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे मुंडे यांनी सांगितले आहे.याबाबत मंत्री पंकजा मुंडे यांच्या कार्यालयाकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती देण्यात आलीय.
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षांनी आपली भुमिका स्पष्ट करावी लोकसभा ,विधानसभा निवडणूकीत हि जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने लढवली होती ते जर लढत नसतील तर त्यानंतर आमच्या कडे अनेक पर्याय असतील असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय. बारामती पोट निवडणुकीत त्यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केलीय. बारामतीची जागा ही मुळात राष्ट्रवादीकडे आहे. मागील दोन्ही निवडणुका तुतारी चिन्हावर लढविली होती त्यामुळे त्यांनी याबाबतची भूमिका स्पष्ट करणे गरजेचे आहे अस सपकाळ म्हणालेत.आज महाड येथील चवदार तळे सत्याग्रह दिनी आले असता त्यांनी ही विधान केलं आहे.
पुण्यात उच्चभ्रू भागात हळदीच्या पाकिटांतून गांजाची विक्री
हळदीच्या पाकिटांमधून गांजा विक्री करणाऱ्या दोघांना अटक
बाणेर पोलिसांनी केलेल्या कारवाई मध्ये तब्बल १६ किलो गांजा जप्त
अभिषेक भिका बोरसे आणि अक्षय भिका बोरसे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन तरुण बाणेर परिसरात एका दुचाकीवरून गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती बाणेर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी बाणेर भागातील महापालिकेच्या जलतरण तलावाजवळ सापळा रचून या दोघांना अडवले आणि त्यांना चौकशी करायला सुरुवात केली. झडतीदरम्यान त्यांच्या ताब्यात एक पिशवी मिळून आली ज्यामध्ये हळदीची पाकिटे होती. या पाकिटांची तपासणी केल्यानंतर त्या पाकिटांमध्ये गांजा लपविल्याचे उघड झाले
सुरुवातीला पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून सुमारे तीन किलो गांजा जप्त केला. चौकशीत आरोपींनी पिंपरी-चिंचवड येथील घरात अमली पदार्थांचा साठवून ठेवल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकून आणखी १३ किलो गांजा जप्त केला
आरोपी एका खासगी कंपनीत नोकरी करत असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे
*मंत्री जयकुमार गोरे मंत्री शिवेंद्रराजे भोसले विजयानंतर गळाभेट..
Zp अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत ना. शिवेंद्रसिंहराजेंकडून राष्ट्रवादी- शिवसेना चितपट..
सातारा झेडपीत बहुमताचे संख्याबळ असुनही भाजपपुढे राष्ट्रवादी कॉंग्रेस-शिवसेनेला अपयश
सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी करुन दाखवले
नाट्यमय घडामोडीनंतर अखेर सातारा झेडपीत भाजपचीच सत्ता
राष्ट्रवादी कॉंग्रेस-शिवसेनेला अध्य़क्षपदासाठीचे संख्याबळ गाठता आले नाही.
सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी अखेर भाजपच्या प्रिया शिंदेची निवड
उपाध्यक्षपदी राजू भोसले यांना संधी
भाजपचे सातारा जिल्ह्यातील सर्व मंत्री,आमदार माजी खासदार आणि पदाधिकारी पंचतारांकित हॉटेलमध्ये भेटले.
महाड येथील ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाला आज 99 वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर देशभरातून आलेले भीम अनुयायांनी चवदार तळे परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. चवदार तळे परिसरातील मुख्य गेट समोर या नागरिकांनी गर्दी करत घोषणाबाजी सुरू केलीय..
मालाड पूर्वेतील कुरार पोलीस स्टेशनसमोरील शिवभोजन केंद्रावर व्यावसायिक गॅसच्या तुटवड्यामुळे बंद करण्याची वेळ आली आहे. गॅस उपलब्ध नसल्याने केंद्राचे कामकाज ठप्प झाले असून याचा फटका दररोज जेवण घेणाऱ्या 200 हून अधिक गरजू नागरिकांना आणि कुरार पोलीस स्टेशनमधील अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून गॅस टंचाईमुळे परिसरातील सुमारे 90 टक्के हॉटेल्सही बंद असल्याची माहिती आहे. दरम्यान, केंद्राच्या मालकाने राज्य सरकारकडे व्यावसायिक गॅस सिलेंडर उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा...
32 जागांवर संख्याबळ दाखवत घेतले अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पद घेतले ताब्यात...
भाजपचा प्रिया शिंदे अध्यक्ष तर राजू भोसले उपाध्यक्ष...
राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचे 31 संख्याबळ दाखवू शकले...
भाजपकडून ऑपरेशन लोटस सक्सेस..
सातारा जिल्हा परिषद वर अध्यक्ष भाजपचा झाला..
शिवसेना आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी प्रिया महेश शिंदे या जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्या..
नाट्यमय घडामोडीनंतर भाजपने बाजी मारली..
मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची जादू चालली..
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंचा साताऱ्यात करिष्मा...
पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना आसमान दाखवत भाजपने सातारा जिल्हा परिषदेवर लावला झेंडा...
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सदस्य एसआयटी प्रमुखांच्या भेटीला
कॅप्टन अशोक खरात च्या महिला अत्याचार प्रकरणाचा तपास करण्यासाठी नेमण्यात आली आहे SIT
SIT प्रमुख तेजस्विनी सातपुते यांच्यां कडे अंधश्रद्धा निर्मुलन समिती निवेदन देणार
भोंदू अशोक खरात वर कठोर करवाई करण्याची अनिस ची मागणी
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दौंड तालुक्यातील पाटस येथे मध्यरात्री अक्कलकोटवरून पुण्याकडे जाणाऱ्या एसटीला अपघात झाला. यामध्ये काही प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळत असून सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र बसचं नुकसान झालं आहे.
सांगली: जिल्ह्यातील भिवघाट परिसरामध्ये काल दीड तास झालेल्या गारपिटीमुळे द्राक्षांच्या बरोबरच शेडवरचा बेदाणा देखील भिजला आहे. बेदाणा भिजून जाऊन आता बेदाणा कुजू लागल्यामुळे द्राक्षांबरोबरच बेदाण्यातून देखील द्राक्ष बागायतरांना हाती काहीच लागणार नाही, अशी परिस्थिती आहे. यामुळे एकीकडे द्राक्ष घड गारपिटीमुळे फुटून कुजू लागले तर दुसरीकडे शेडवर टाकलेला बेदाणा देखील या पावसामध्ये भिजल्याने तो देखील आता कुजू लागला आहे.
मालाड पूर्वेत बांधकामाच्या खड्ड्यात पडून ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
चेंडू काढताना पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडल्याची घटना
कुरार व्हिलेज पोलिसांनी मुलाला बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले
कांदिवलीच्या बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात डॉक्टरांनी मृत घोषित केले
दिव्यांश राजेश मौर्य (वय ८) असे मृत मुलाचे नाव
मौली कन्स्ट्रक्शनने खोदलेला खड्डा असल्याची माहिती
पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू
जालना जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून अल्पभूधारक शेतकरी सर्वाधिक अडचणीत सापडले आहेत. बदनापूर तालुक्यातील देवपिंपळगाव येथील चंदू शेळके या शेतकऱ्याच्या भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले असून काकडी, वांगे, टोमॅटो, कोथिंबीर आणि पालेभाज्यांचा अक्षरशः चिखल झाला आहे. या नुकसानीमुळे शेळके यांना अश्रू अनावर झाले असून अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.
निलेश लंके यांच्याकडून पारनेर तालुक्यातील ढवळपुरीत नुकसानीची पाहणी...
अहिल्यानगरच्या ढवळपुरीत गारपिटीने झालंय मोठं नुकसान...
कलिंगड, गहू , कांदा पिकांना गारपिटीने फटका...
शेतकऱ्यांना किमान 50 हजारांची तात्काळ मदत करण्याची खा.निलेश लंके यांची मागणी...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिणार असल्याचेही निलेश लंके यांची माहिती....
बाईट- निलेश लंके, खासदार अहिल्यानगर
हिंगोली: काल जोरदार स्वरूपाच्या झालेल्या वादळी वारे अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. गहू, ज्वारी, हरभरा, हळद यासह भाजीपाला पिकांना या पावसाचा जोरदार फटका बसलेला आहे. बासंबा गावचे शेतकरी दत्ता घुगे यांच्या शेतातील एक एकर वरील गव्हाच्या पिकाचे नुकसान झालेलं आहे. वादळवाऱ्यामुळे गव्हाचे पीक जमीनदोस्त झालेले आहे. याचबरोबर आंब्याच्या फळबागांना सुद्धा कालच्या पावसाचा फटका बसला आहे.
अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यात गारपीटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान...
ढवळपुरी येथील शेतकऱ्यांना हकीकत सांगताना अश्रू झाले अनावर...
पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे कलिंगड, गहू, कांदा पिकांचे मोठे नुकसान...
काल सायंकाळपासून अहिल्यानगर जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले...
गारपीट आणि पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान...
पीक काढणीला आलेली असतांना झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला...
Swami Samartha Prakat Din 2026: अक्कलकोटमध्ये आज श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन मोठ्या भक्तीभावात साजरा होत आहे. “अनंत कोटी ब्रह्मांड नायक” अशी ओळख असलेल्या स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी राज्यभरातून हजारो भाविक अक्कलकोटमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे मंदिर परिसर भाविकांनी अक्षरशः फुलून गेला आहे. पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून सर्वत्र भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे. आज दुपारी बारा वाजता पारंपरिक पाळणा सोहळा पार पडणार आहे. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाने विशेष व्यवस्था केली आहे. भक्तांना सुरळीत दर्शन मिळावे यासाठी मंदिर तब्बल 22 तास दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले आहे.
Beed News: बीडच्या डोंगर पट्ट्यामध्ये झालेल्या गारपीटीचे विदारक दृश्य समोर आले आहेत. बीडच्या कोरडेवाडी आणि काशीद वाडी भागात काल झालेल्या गारपीटी नंतर तब्बल दोन इंच गारांचा खच पडल्याचे दिसून आले.या गारपीटी मुळे गहू - ज्वारी आंबा, आणि भाजीपाल्याच नुकसान झाले असून काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचा तोंडचा घास गेल्याने शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलाय.
Pune News: आज आणि उद्या विदर्भ आणि मराठवाड्यात हवामान खात्याकडून येलो अलर्ट
मध्य महाराष्ट्रात देखील काही भागात तुरळक पावसाची शक्यता
पुणे शहरात दुपारनंतर पुरण पावसाची शक्यता
आज येलो अलर्ट असणारे जिल्हे
सोलापूर
नांदेड
लातूर
धाराशिव
चंद्रपूर
यवतमाळ
उद्या 21मार्च सोलापूर, धाराशिव आणि लातूर या तीन जिल्ह्यांना येलो अलर्ट
31 मार्चपासून राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी तापमान वाढण्याची शक्यता
Bhandara News: घराशेजारी राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या तरुणाला भंडारा पोलिसांनी अटक केली. अल्पवयीन मुलगी ही 17 वर्षाची असून तिला वडील नाही. मोलमजुरी करून आई तिचं पालनपोषण करीत असून भंडारा शहरातील एका नामांकित महाविद्यालयात 11 वी चं शिक्षण घेतं आहे. आरोपी तरुण हा 20 वर्षांचा असून आहे. अल्पवयीन मुलीच्या आईनं भंडारा पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीत, यापूर्वी या तरुणाच्या कुटुंबीयांना समज देण्याबाबत सांगितलं असता त्यानं फिर्यादी आणि तिच्या मुलीला मारून टाकण्याची धमकी दिल्याचा या तक्रारीत नमूद आहे. या घटनेची माहिती भंडाऱ्यातील विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलच्या कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून पोलिसात ही तक्रार दाखल करण्यात आली. भंडारा पोलिसांनी या प्रकरणी आरोपी तरुणा विरोधात पॉक्सोसह विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे.
Parbhani News: परभणी जिल्ह्यात रात्री उशिरा वादळी वाऱ्यासह हलका पाऊस झाला.पावसापेक्षा वादळी वारेच जास्त असल्याने जिल्ह्यातील आंब्यांच्या बागा मात्र उध्वस्त झाल्या आहेत.पूर्णा तालुक्यातील धानोरा काळे पाथरी तालुक्यातील गुंज आणि इतर ठिकाणी असलेल्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या आंब्यांच्या झाडांना लागलेले मोठ्या प्रमाणातील आंबे हे गळून पडले आहेत.ज्यामुळे आंबा उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे अक्षरशः आंब्याच्या झाडांना केवळ काड्याच शिल्लक राहिल्या आहेत जवळपास सगळे आंबे वाऱ्याने खाली गळून पडल्याने यंदा परभणीकरांना गावरान आंबा खायला मिळणे कठीण झाले आहे.
Beed News: बीडच्या आष्टी तालुक्यातील मच्छिंद्रनाथ गडावर समाधी दर्शन सोहळा पार पडला. वर्षातून एकदाच भाविकांना समाधी दर्शन घेता येते. यावर्षी पाडव्यानिमित्त दहा लाखांहून अधिक भाविकांनी समाधीचे दर्शन घेतले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भाविकांची संख्या एक लाखाने वाढल्याचं ट्रस्टींकडून सांगण्यात आलं. काल सुरू झालेले दर्शन आज सकाळ पर्यंत सुरू होते. विशेषतः कावडधारक भाविकांसाठी विशेष सोय यावेळी करण्यात आली होती. ओल्या वस्त्राने मच्छिंद्रनाथ समाधीचे दर्शन भाविकांना घ्यावे लागते. तर दरवर्षीप्रमाणे आमदार सुरेश धस यांनी देखील या दर्शन सोहळ्यात सहभाग नोंदवला.. तर भाविकांच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनासह पोलिसांचा चोख बंदोबस्त मच्छिंद्रनाथ गडावर लावण्यात आला होता.
Buldhana Rains: हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार बुलढाणा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून अवकाळी पावसाचा कहर बघायला मिळत आहे. काल दुपारनंतर बुलढाण्यातील मेहकर लोणार चिखली तालुक्यात गारपिटीसह अवकाळी पाऊस बरसला. यामुळे फळ पिकांचं मोठ्या नुकसान समोर येत आहे. केळी संत्रा निंबू यासह काढणीला आलेले रब्बी गहू हरभरा कांदा या पिकांचेही नुकसान झालेला आहे. अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या या पिकांच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास फिरवल्या गेल्याने बळीराजा पुन्हा संकटात सापडला आहे.
Satara News: सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षची निवड आज होणार आहे.. मात्र सत्ता समीकरणाची अजून पर्यंत कोणतेही हालचाल किंवा संकेत देखील देण्यात आले नाही.. अत्यंत गोपनीय पद्धतीने सत्ता समीकरणाची चाल खेळली जात आहे. राष्ट्रवादी अजितदादा गट आणि शिवसेना शिंदे गट यांनी आपल्या जिल्हा परिषद सदस्यांना गेल्या 35 दिवस झालं अज्ञात स्थळे हलवण्यात आला होते. अज्ञात स्थळे असलेले 36 सदस्य उद्याच्याला सातारा जिल्हा परिषद मध्ये येऊन सत्ता स्थापन करणार का? की यातील काही सदस्य फुटून भाजपसोबत जाऊन सत्ता स्थापन करून अध्यक्ष,उपाध्यक्ष व बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.. सातारा जिल्हा परिषद च्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
Jalna News: जालना जिल्ह्यात रात्री झालेल्या धुवाधार पाऊस आणि गारपीटीने शेतकऱ्यांचं मोठ नुकसान झालंय, रात्रीतून पावसाचा बसलेला तडाखा, शेतकऱ्यांच्या अश्रू साठी पुन्हा कारणीभूत ठरला,पावसाने गहू ज्वारी, हरभरा, बाजरी पिकांसह फळपिकांच मोठ नुकसान केलय.
Bhandara News: गावातील मुख्य वर्दळीच्या चौकात मधमाशांनी नागरिकांवर अचानक हल्ला केला. यामुळं नागरिकांनी स्वतःचा जीव वाचवत इतरत्र पळ काढला. मात्र, यावेळी दिव्यांग असलेल्या लिंबराज रहांगडाले (50) हे माधमाशांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यानं त्यांचा मृत्यू झाला. ही घटना भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील एकोडी गावात घडली. मधमाशांच्या हल्ल्यात अन्य एक किरकोळ जखमी झाला. या घटनेनं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
Ashok Kharat Case: स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात प्रकरणी SIT चौकशीला वेग
डिजिटल आणि फॉरेन्सिकच्या आधारे तपासाला सुरुवात
फोन कॉल तपासण्यासह तांत्रिक पुरावे गोळा करण्याचं काम सुरू
पोलिसांच्या हाती लागलेल्या व्हिडिओमधील पीडितांना न्याय देण्यावर भर
आर्थिक व्यवहार, खरातच नेटवर्क, सहकारी आरोपींचा शोध घेतला जाणार
खरातचा दरबारात अनेक प्रशासकीय अधिकारी
प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नातलगांसोबत अनेक ठिकाणी जमिनी खरेदी केल्याचा संशय
पाथर्डी गवळाणे, सिन्नर आणि शिर्डी ओझर परिसरात कोट्यावधींची गुंतवणूक
अनेकांच्या जमिनी हडपल्याची तर काहींवर अवैध कब्जा केल्याची चर्चा,पोलीस तपासात होणार स्पष्ट
Pune News: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर यशस्वी ॲन्जिओप्लास्टी
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर पुण्यातील रूबी हॉल क्लिनिक येथे हृदयाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.
काल दुपारी छातीत दुखू लागल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांची अँजिओग्राफी केली.
त्यानंतर ॲन्जिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही शस्त्रक्रिया हृदयरोग तज्ज्ञ डॉ. समिन शर्मा यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
डॉक्टरांच्या माहितीनुसार, सध्या प्रमोद सावंत यांची प्रकृती स्थिर असून त्यांना आयसीयूमध्ये निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.
त्यांच्या प्रकृतीबाबत अधिक माहिती लवकरच दिली जाणार असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे.
MHADA Scam Case: म्हाडा भूखंड फसवणूक प्रकरणात सरकारवाडा पोलिस ठाण्यात 195 जमिन मालक, विकासक, बांधकाम व्यावसायिकांच्या विरोधात दाखल गुन्ह्यात पोलिसांनी अटक केलेल्या संशयित सोनू मनवाणी यास न्यायालयात हजर केले असता आणखी 4 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.गेल्या आठवड्यात भूमिअभिलेख विभागाचे अधिकारी यांच्या तक्रारीनुसार गंगापूर, आंनदवल्ली, विहीतगाव, मखमलाबाद, आडगावसह परिसरातील 200 हेक्टर जागेवरील मूळ मालक व त्यांच्याकडून जमीन खरेदी करताना शासकीय नियम धाब्यावर बसवत व्यवहार केल्याचे आढळून आले आहे. यात संशयित बांधकाम व्यावसायिक, लॅण्ड डेव्हलपर यांनी बनावट नकाशे तयार करून भूमिअभिलेख कार्यालय व म्हाडाच्या एलआयजी-एमआयजीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करीत त्यांच्याविरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल केले. यामध्ये शासनाची 400 कोटींची फसवणूक झाल्याचे म्हटले आहे. पहिलाच संशयित सोनू मनवाणी याला न्यायालयाने 4 दिवसांची कोठडी सुनावली आहे तर 45 संशयितांच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी पार पडणार आहे.
Navnath Ban On Raj Thackeray: राज ठाकरे यांनी भाषणात मांडलेला कर्जाचा मुद्दा अपुऱ्या माहितीच्या आधारावर आहे. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सुमारे 16.49 लाख कोटी होती, तर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कारकिर्दीत ती वाढून 54 लाख कोटींवर पोहोचली आहे म्हणजेच अवघ्या 10 वर्षांत तिपटीहून अधिक वाढ झाली आहे. देवाभाऊंच्या नेतृत्वात राज्याची आर्थिक क्षमता, उत्पन्न आणि गुंतवणूक यामध्येही प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे कर्जाकडे फक्त आकड्यांच्या भीतीतून पाहण्याऐवजी, ते विकासासाठी वापरलेलं भांडवल म्हणून पाहणं महत्त्वाचं आहे.
Nagpur Rains: नागपूरच्या काही भागात अवकाळी पावसाची हजेरी ...
एकाएक पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची दाणादाण ...
नागपूर वेध शाळेकडून पुढची दोन विदर्भात अवकाळी पावसाचा इशारा
Palghar Accident: मुंबई–अहमदाबाद महामार्गावर पालघर जिल्ह्यातील वरई गावाजवळील वांद्री नदी पुलावर भीषण अपघात झाला. गुजरातच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने चालक दुचाकीसह थेट नदी पात्रात कोसळला. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून महामार्ग सुरक्षा पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीने त्याला मनोर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
Chiplun News: चिपळूणमधील सर्वात जुनी असलेल्या चिपळूण अर्बन बँकेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पार पडले. यावेळी चिपळूण संगमेश्वर मतदार संघाचे आमदार शेखर निकम आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव हे देखील उपस्थित होते. रिझर्व बँकेच्या स्थापने आधी सुरु झालेली कोकणातील एकमेव बँक म्हणून चिपळूण अर्बन बँकेची ओळख आहे. यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी बँकेचे कौतुक करत असताना जिल्ह्यातील जास्तीत जास्त उद्योगातील ग्राहक तुमच्या बँकेत खाते काढतील असे म्हणत मोठ्या ठेवी असणाऱ्या बँकेमध्ये तुमचा समावेश होईल अशा शुभेच्छा दिल्या. तर सहकार वाचवण्याच्या दृष्टीने लोकप्रतिनिधी म्हणून आवश्यक मदत करू असे भास्कर जाधव आणि शेखर निकम यांनी म्हटले. चिपळूण शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नूतन इमारती चे उदघाट्न मोठ्या थाटात झाली.
Buldhana Accident: बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव जालना महामार्गावरील अमडापूर टोल प्लाझा वर अमरावतीहून पुण्याला जाणारी परिवहन महामंडळाची शयनयान बस रात्रीच्या वेळेस परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे चालकाला अंदाज न आल्यामुळे टोल नाक्यावरील खांबाला धडकली. या अपघातात चार ते पाच प्रवासी जखमी झाले असून रोडवरील पावसाच्या पाण्यामुळे बसचे ब्रेक न लागल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. जखमीवर चिखली येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Breaking LIVE Updates: सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा, अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद घेतले ताब्यात