Maharashtra Breaking LIVE Updates: मुंबई-पुण्यात मुसळधार पावसाने झोडपले; राज्यभर पावसाची हजेरी
Maharashtra Rain Today: महाराष्ट्रातील विविध घडामोडींसह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, एका क्लिकवर...
पार्श्वभूमी
Maharashtra Rain Today: राज्यभर अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने (Maharashtra Rain Upadates) हजेरी लावली असून मुंबई (Mumbai Rain) आणि पुण्याला (Pune Rain) चांगलेच झोडले आहे. मुंबईतील अनेक ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पाऊस...More
अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या वेबसाईट मध्ये तांत्रिक अडचणी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना अडचणी
राज्यात अकरावी प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया आज पासून सुरू होत आहे, सकाळी 11 वाजल्यापासून ही प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने सुरू होणे अपेक्षित होते
आज पासून विद्यार्थ्यांना कॉलेज पसंती क्रमांक आणि ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात होत आहे
मात्र ऑनलाइन प्रवेशाच्या संकेतस्थळावर तांत्रिक अडचणी येत असल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करता येत नाहीये
यावर शिक्षण संचालनालायकडून ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरळीत करण्यासंदर्भात काम सुरू आहे
Crime News: नवी मुंबईतील पंकेश पाटील या भाजीपाला निर्यात व्यवसायिकाचे अपहरण करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र, नवी मुंबई पोलिसांनी २४ तासांत पंकेश ची पाटील यांची सुखरूप सुटका केली असून, या प्रकरणी वाशीम येथील तिघांना अटक करण्यात आली आहे. पंकेश पाटील यांचे एपीएमसी मधून तीन आरोपींनी धारदार शस्त्राने मारहाण करून अपहरण केले होते. स्वीफ्ट गाडीत टाकून नाशिक च्या दिशेने आरोपीने गेले होते. याबाबत एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच. पोलीसांचे पथक आरोपींच्या मार्गांवर गेले. वाशिमच्या दिशेने जाणाऱ्या गाडीला पोलिसांनी रस्त्यात आढवून पंकेश पाटील यांची सुटका केली. रुशिकेश इंगोळे , मंगेश अस्तरकर, सागर मानवर या तीन आरोपींना अटक केली असून आर्थिक वादातून हे अपहरण करण्यात आले होते.
विदर्भ, मराठवाड्याकडे पाठ फिरवणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दणका
विदर्भ आणि मराठवाड्यातील रिक्त पदे सर्वात आधी भरा
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाच्या सूचना
सर्व मंत्र्यांना विभागीय बदल्या आणि पदभरती करताना सूचना
कोकण, पश्चिम महाराष्ट्र व मुंबईतील पदे शेवटी भरा
मराठवाडा व विदर्भातील प्रलंबित कामे तात्काळ मार्गी लावण्याचे आदेश
कर्मचारी आणि अधिकाऱ्यांविना कामे रखडल्याने सरकारचा निर्णय
विदर्भ, मराठवाड्याकडे पाठ फिरवणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दणका
विदर्भ आणि मराठवाड्यातील रिक्त पदे सर्वात आधी भरा
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाच्या सूचना
सर्व मंत्र्यांना विभागीय बदल्या आणि पदभरती करताना सूचना
कोकण, पश्चिम महाराष्ट्र व मुंबईतील पदे शेवटी भरा
मराठवाडा व विदर्भातील प्रलंबित कामे तात्काळ मार्गी लावण्याचे आदेश
कर्मचारी आणि अधिकाऱ्यांविना कामे रखडल्याने सरकारचा निर्णय
भिवंडी शहरा लगत वाहणारी कामवारी नदी सध्या मोठ्या प्रमाणावर जलपर्णीच्या विळख्यात अडकली आहे . प्रदूषण नियंत्रण महामंडळ व महानगरपालिका प्रशासन यांच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. केमिकल युक्त रसायन आणि घरगुती सांडपाणी थेट नदीत मिसळले जात असल्याने जलपर्णीला पोषक वातावरण मिळाले आहे. या अतिक्रमणामुळे नदीतील पाण्यातील ऑक्सिजनची पातळी झपाट्याने घटत असून, मासे व इतर जलचर प्राणी यांना धोका निर्माण झाले आहे. जलपर्णीमुळे नदीचा प्रवाह मंदावल्याने पावसाळ्यात पूर येण्याचा धोका निर्माण झाला आहे.
प्रशासनाकडून ना जलपर्णी हटवण्यासाठी मोहीम राबवली जात आहे, ना सांडपाणी थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात आली आहे. नदीचे प्रदूषण थांबवण्यासाठी त्वरित उपाययोजना राबवून जलपर्णी नियंत्रण करणे गरजेचे असताना याकडे प्रशासनाचा अक्षरशः दुर्लक्ष झाला आहे. नदी स्वच्छतेसाठी करोडो रुपये खर्च गेले गेले परंतु नदीचे परिस्थिती जैसे थेच आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण महामंडळ व भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका नक्की करते तरी काय असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आहे. लवकरच योग्य ते पाऊल उचलण्याची गरज आहे अन्यथा कामवारी नदीचे अस्तित्वच धोक्यात येईल.
छत्तीसगडच्या जंगलात नक्षलवादी आणि सुरक्षा दल यांच्या चकमक सुरू... वीस पेक्षा जास्त नक्षलवादी ठार..
विजापूर नारायणपूर जिल्ह्याच्या सीमेवर अबुजमडच्या जंगलात चकमक सुरू आहे..
मृतक नक्षलवाद्यांमध्ये काही बडे नेते असण्याची शक्यता आहे..
आज सकाळपासून ही चकमक सुरू आहे..
Washim News : वाशिम जिल्ह्यात गेल्या आठ दिवसा पासून सुरू असलेला मान्सून पूर्व पावसाने अनेक भागात धुमाकूळ घातला ..त्याचा फटका उन्हाळी पिकांना बसताना दिसतोय परिपक्व झालेला भुईमूग काढण्यास उशीर झाल्यानं जमिनीतच भुईमूगाच्या शेंगाना अंकुर फुटू लागल्याचा प्रकार समोर आलाय. वाशिम जिल्ह्यात गेलात आठ ते दहा दिवसांपासून मान्सून पूर्व पाऊस बरसत असल्याने काढणीस आलेल्या भुईमूगाला उशीर झाला त्यामुळे शेंगा परिपक्व होऊन कालावधी उलटल्याने जमिनीतच शेंगांना अंकुर फुटू लागल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होत असून अवकाळीचा हा दुहेरी फटका शेतकऱ्यांना बसू लागला आहे.
वाशिम जिल्ह्यात उन्हाळी भुईमुगाचा पेरा 5 हजार 143 हेक्टरवर झाला होता. सध्या भुईमुगाचा काढणीचा हंगाम सुरू आहे. मात्र मागील काही दिवसात जिल्ह्यात अवकाळी पाऊसामुळे दुहेरी फटका बसला आहे.
-डॉक्टर जयंत नारळीकरांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी आयुका संस्थेत आनण्यात आलंय .
-थोडक्यात वेळात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अंत्यदर्शनासाठी पोहचतील.
- तर आज दुपारी नारळीकरांवर वैकुंठ स्मशान भुमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील.
सिंधुदुर्ग, रत्नागिरीत पुढील ३-४ तासांत काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा
सिंधुदुर्गात ४०-५० किमा प्रति ताशी वेगाने वारे वाहण्याची शक्यता, सोबतच विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज
रत्नागिरीत काही भागात मुसळधार तर काही ठिकाणी तुरळक पाऊस, ३०-४० किमी प्रती ताशी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज
अवकाळी पावसाने कांदासह शेती पिकाचे मोठे नुकसान
उन्हाळ कांदा शेतातून काढणीचे काम सुरू असतानाच अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना दणका
शेतातून कांदा चाळीत साठवणीसाठी काढलेल्या कंदाचे मोठे नुकसान
काही भागात अजूनही शेतात उन्हाळ कांदा असल्याने कांदा फेकून देण्याची वेळ
आधीच कांद्याला बाजार भाव नाही त्यात अवकाळी चा फटका बसल्याने मातीमोल भावाने कांदा विकावा लागणार*
पावसाचे वातावरण आणि लग्नसराई मुळे मजूर ही मिळत नसल्याने नुकसानीचा आकडा वाढणार
चांगला आणि खराब कांदा बाजूला करण्याच्या कामाला वेग
-
दुपार नंतर पावसाला सुरुवात होत असल्याने दोन तीन तासच कामासाठी मिळत असल्यानं शेतकऱ्यांसमोर अडचणी
Buldhana : राज्यातील बहुतांश भागात मान्सूनपूर्व पावसाने (Pre-monsoon Rains) जोरदार बॅटिंग करत अक्षरक्ष: झोडपून काढले आहे. अशातच मे महिन्यात बुलढाणा जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाचे प्रमाण वाढले असून, त्यामुळे खरीप हंगामाच्या मशागतीच्या कामात अडथळा निर्माण झाला आहे. त्याचबरोबर उन्हाळी पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.. आतापर्यंत जिल्ह्यातील 56 गावांमध्ये जवळपास 500 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील उन्हाळी पिके आणि फळबागांना मान्सूनपूर्व पावसाचा फटका बसला आहे... या पावसामुळे जिल्ह्यात तिघांचा मृत्यू झाला असून, वीज पडून 12 जनावरांचा मृत्यु झालाय ..
Maharashtra Weather Update: अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असल्याने कोकणात मुसळधार ते अतिमुसाधार पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्याला मान्सूनपूर्व पावसाने झोडपून काढलं आहे. तर अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला असून अर्ध्यापेक्षा जास्त जिल्हा अंधारात आहे. शेतकऱ्यांची मशागतीची काम देखील या अवकाळी पावसामुळे खोळंबून पडली आहेत. तर मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असा इशारा मत्स्य खात्याकडून देण्यात आला आहे. कोकणातील अनेक भागांत गेल्या 12 ते 13 तासांपासून लाईट नसल्याचे ही पुढे आले आहे. दमदार पाऊस आणि वादळी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जिल्ह्यातील मालवण, आचरा, कुंभारमात्ठ, वेंगुर्ला, माणगाव, पेंडुर वीजखंडीत झालेली असून ती पूर्ववत करण्याचे काम सध्या MSEB मार्फत सुरु आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असल्याने कोकणात मुसळधार ते अतिमुसाधार पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपून काढलं आहे. तर अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला असून अर्ध्यापेक्षा जास्त जिल्हा अंधारात आहे. शेतकऱ्यांची मशागतीची काम देखील या अवकाळी पावसामुळे खोळंबून पडली आहेत. तर मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असा इशारा मत्स्य खात्याकडून देण्यात आला आहे.
Beed News : बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईमध्ये बैठक घेणार असल्याची माहिती आहे. यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुढाकार असणार असून जिल्ह्यातील सर्व आमदारांना बैठकीसाठी बोलावले जाणार आहे.
मागील काही दिवसांमध्ये जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनलाय.. मारहाणीचे व्हिडिओ सोशल माध्यमात वायरल होत आहेत.. याबाबत पालकमंत्री अजित पवार यांनी कोणाचीही गय केली जाणार नाही. असं ठणकावून सांगितले असून पोलिसांना कारवाईचे अधिकार देण्यात आले आहे. दरम्यान जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी.. याकरिता मुख्यमंत्र्यांसोबत ही बैठक असणार आहे.
मनमाड शहर व परिसरात काल उशिरा पुन्हा विजांच्या गडगडासह जोरदार पावसाने धुतले..सलग १५ दिवसां पासून कधी जोरदार तर कधी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे..मनमाड शहर व परिसरात काल झालेल्या पावसाने रस्त्यांवर मात्र पाणीच पाणी झाल्याचे चित्र पहावयास मिळाले..तर नेहमी प्रमाणे विजांचा गडगडाट सुरू होताच वीज मात्र गायब झाल्याने मनमाडकर नागरिकांना अंधारात बसावे लागले.
अवकाळी पाऊस आणि वादळी वारा यामुळे जिल्ह्यातील अनेक भागांत (जवळपास सहा सबस्टेशन : मालवण, आचरा, कुंभारमठ, वेंगुर्ला, माणगाव, पेंडुर) वीजखंडीत झालेली असून ती पूर्ववत करण्याचे काम MSEB मार्फत सुरु आहे.
सोसायट्याच्या वाऱ्यामुळे सदर कामात अडथळा निर्माण होत आहे. सद्यस्थिती वेंगुर्ला आणि माणगाव सबस्टेशन वरील पुरवठा पूर्ववत झाला असून उर्वरित मालवण, पेंडुर, आचरा, कुंभारमठ या सबस्टेशन वरील पुरवठा पुढील चार तासांत पूर्ववत होईल असे MSEB कडून कळविण्यात आले आहे.
काल संध्याकाळच्या पावसानंतर मुंबईत मध्यरात्रीपासून पावसाची उसंत
सकाळपासून मुंबई आणि उपनगरांत कुठेही पाऊस नाही
ठाणे, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, पालघर, नवी मुंबई मधेही सकाळपासून उघडीप
उपनगरीय रेल्वे आणि रस्ते वाहतूक सुरळीत सुरू
विमानवाहतुकही वेळेवर
Pune : पुण्यातील थंड हवेचं ठिकाण असणाऱ्या लोणावळ्याला अवकाळी पावसाने झोडपून काढलं. काल दिवसभरात पावसाने अनपेक्षित बॅटिंग करत, गेल्या चोवीस तासात 66 मिलीमीटर पावसाची नोंद केली. उन्हाळ्यात ओस पडलेल्या लोणवळ्यात पावसामुळं थोडा गारवा निर्माण झालाय, पावसाची अशीच संततधार सुरु राहिली तर पर्यटकांचे पाय पुन्हा एकदा पर्यटननगरिकडे ओढले जातील अन लोणावळा पुन्हा गजबजून जाईल. अशी अपेक्षा व्यावसायिकांना आहे.
घराच्या अंगणात अंधारात दबा धरून बसलेल्या बिबट्यानं हल्ला करून इसमाला जखमी केलं. यावेळी समयसूचकता दाखवीत इसमानं बिबट्याला धक्का देत स्वतःची सुटका केली. त्यानंतर बिबट्यानं तिथून धूम ठोकल्यानं इसमाचा जीव वाचला. ही घटना साकोलीच्या पिटेझरी गावात पहाटे घडली. गिरधारी उईके (३५) असं बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या इसमाचं नावं आहे. गिरधारी हे पहाटे वॉशरुमला जाण्यासाठी उठले असता, बिबट्यानं हा हल्ला केला.
नाशिक जिल्ह्याच्या पिंपळगाव बसवंत येथे काल ( मंगळवारी) सायंकाळी आलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे नाशिकच्या निफाड तालुक्यातील पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटो व्यापाऱ्यांसाठी बांधलेले शेड वादळामुळे कोसळले.यामुळे बाजार समितीचे मोठे नुकसान झाले आहे.तर बाजार समितीच्या आवारात असलेले झाडे देखील वादळामुळे उन्मळून पडली आहे..व्यापाऱ्याचा कांद्याचा शेड व पॉलिहाऊस कोसळल्यामुळे या अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले..गेल्या आठवडाभरापासून अवकाळी पावसाने नाशिक जिल्ह्यात जोर धरला असून शेतकरी वर्गासह व्यापारीही धास्तावले आहे..
वादळाच्या पार्श्वभूमीवर मच्छिमार बोटी लागल्या किनाऱ्यावर, मासेमारी हंगाम आठवडा अखेर संपण्याची शक्यता
सहा ते सात तासाच्या मान्सूनपूर्व पावसानं पुण्यात ठीक ठिकाणी पाणी साचले
कात्रज, कोंढवा, कोथरूड, चांदणे चौक, बाणेर, बालेवाडी, धायरी, कॅम्प या सगळ्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं
त्यासोबतच शहरात तीस ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या होत्या
येरवडा, एरंडवणे, कोरेगाव पार्क, देवाची आळंदी, बावधन, मुकुंद नगर, हडपसर या ठिकाणी झाडपट्टीच्या घटना .
शिवाजीनगर भागात 23.6 मम्मी पावसाची नोंद तर पिंपरी चिंचवड मध्ये सर्वाधिक 80mm पावसाची नोंद
मॉन्सूनपूर्व पावसातच पुणे महानगरपालिकेची पोलखोल
बंगळुरू येथे गेल्या 36 तासांपासून पावसाचा अक्षरशः कहर पाहायला मिळत आहे. पावसामुळे शहरातील अनेक भाग जलमय झाले असून, जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
तर 500 हून अधिक घरांमध्ये पाणी शिरले आहे.
येणाऱ्या काही दिवसात वादळी वारे आणि अति मुसळधार पाऊस लक्षात घेता खोल समुद्रात मच्छिमार करणाऱ्या मच्छीमारांना आता आपल्या बोटी किनाऱ्यावर दाखल करण्याच्या सूचना मत्स्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे हळूहळू या बोटी किनाऱ्यावर दाखल होत आहेत.1 जून ते 31 जुलैपर्यंत ही मासेमारी बंद राहणार असल्याचे आदेश मत्स्यव्यवसाय विभागाकडून आले आहेत. या कालावधीत मासेमारी करताना कोणी आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा मत्स्य विभागाकडून देण्यात आला आहे. यामध्ये यंत्रचलित आणि यांत्रिक मासेमारी बंद राहणार आहे.
महाराष्ट्र आणि गोव्या जवळ अरबी समुद्रात 21 मेपासून कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 24 मेपर्यंत तो अधिक तीव्र होऊन उत्तरेकडे सरकू शकतो. राज्याच्या किनाऱ्याला थेट धोका नसला तरी याचा परिणाम म्हणून समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता आहे.
22 ते 24 मे दरम्यान रायगड, रत्नागिरी, मुंबई आणि पालघरजवळ समुद्र खवळू शकतो, तर खोल समुद्रात जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मासेमाऱ्यांनी हवामान बदलांवर लक्ष ठेवून या काळात खोल समुद्रात जाणे टाळावे, असा इशारा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिला आहे.
21 ते 24 मे दरम्यान मच्छीमारांनी घ्यावयाची सावधगिरी
✅हवामान खात्याच्या अपडेट्स नियमितपणे तपासत राहावेत.
✅स्थानिक प्रशासन व मच्छीमार सहकारी संस्थांकडून मिळणाऱ्या सूचनांचे पालन करावे.
✅खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणे पूर्णतः टाळावे.
✅लहान बोटींचा वापर टाळावा, किनाऱ्यालगतच कार्य करावे.
✅सुरक्षेसाठी आवश्यक ती साधने (लाईफ जॅकेट्स, वायरलेस सेट) जवळ बाळगावीत.
✅संभाव्य वाऱ्याचा वेग व लाटांचा जोर लक्षात घेऊन किनाऱ्यावरील होड्या व बोटी सुरक्षित स्थळी हलवाव्यात.
✅समुद्र खवळलेला असताना मासेमारी टाळून स्वतःची व इतरांची सुरक्षितता जपावी.
हिंगोली जिल्ह्यांमध्ये आज संध्याकाळी विजांच्या कडकडाटासह जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला आहे जिल्ह्यातील ईसापुर-रमणा अंभेरी गावाच्या शिवारामध्ये एक तास ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत असल्यामुळे इसापूर रमणा गावाच्या जवळ असलेल्या ओढ्याला पूर आला आहे दरम्यान पुराचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक रात्री काही काळ ठप्प झाली होती दरम्यान या जोरदार पावसामुळे हवेत कमालीचा गारवा पसरला आहे.
कर्ज घेऊन भातपिकाची लागवड केली. कापणीला आलेल्या भातपिकाची येत्या चार दिवसात कापणी करून....शेतीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करायचं, असं स्वप्न बघणाऱ्या शेतकऱ्यांचं स्वप्न वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं भंग केलं. भंडारा जिल्ह्यात काल वळवाच्या पावसानं जोरदार हजेरी लावली. याचा सर्वाधिक फटका बसलाय तो पवनी तालुक्यातील पहेला परिसरातील शेती पिकाला. वादळी वाऱ्यानं कापणीला आलेलं शेकडो हेक्टरमधील भातपीक अक्षरश: भुईसपाट झालं.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Breaking LIVE Updates: मुंबई-पुण्यात मुसळधार पावसाने झोडपले; राज्यभर पावसाची हजेरी