Maharashtra Breaking Live Updates: महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी; सर्व अपडेट्स, एका क्लिकवर
Maharashtra Breaking Live Updates: राज्यभरात शिवजयंतीचा मोठा उत्साह असून ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे.
पार्श्वभूमी
Maharashtra Breaking Live Updates: छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 395 वी जयंती आहे. राज्यभरात शिवजयंतीचा मोठा उत्साह असून ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे. संतोष देशमुखांचा मृतदेह केजकडे न...More
पुणे: पिंपरी चिंचवडमध्ये आगळ्या वेगळ्या पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. शिवजयंतीचे औचित्य साधत छावा चित्रपटाचे मोफत शो चे आयोजन करण्यात आले. यानिमित्ताने छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान सर्वदूर पोहचावे यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. पारंपरिक वेशभूषेत शिवभक्तांनी यासाठी हजेरी लावली. अजित पवारच्या राष्ट्रवादीने याचं आयोजन केलं होतं, यानिमित्ताने छावा चित्रपट करमुक्त करावा अशी मागणी करण्यात आली.
रायगड: छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रमुख भूमिकेत असणारे छावा सिनेमाचे अभिनेते विकी कौशल यांनी आज शिवजयंतीच्या निमित्ताने किल्ले रायगडवर उपस्थिती लावली.यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज सदरेवरील पुतळ्याच दर्शन घेऊन राजांना मुजरा अर्पण केला. यावेळी त्यांच्यासोबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे छावा सिनेमाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि छावा ची टीम सुधा उपस्थित होती. विकी कौशल ला पाहण्यासाठी हजारोंच्या संखेने शिवभक्त आणि छावा सिनेमाचे फॅन मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलिसांच्या मानवंदनेत किल्ले रायगडावर यावेळी सलामी देण्यात आली.
यवतमाळमध्ये जहाल नक्षल कमांडर नक्षलवाद्याला अटक.
भुतिया पहाडगंज दलम चा होता कमांडर.
दिलीप उर्फ तुलसी मेहतो अस कमांडर चे नाव
गेल्या 13 वर्षापासून राहत होता यवतमाळ शहरात. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे केली अटक.
आमच्या आयुष्यात पहिल्यांदाच आमच्या वडिलाशिवाय आम्ही शिवजयंती साजरी करत आहोत या गावांमध्ये शिवजयंतीला दरवर्षी संतोष देशमुख मोठी जयंती साजरी करायचे आज त्यांच्या पक्षात त्यांची मुलगी वैभवी आणि भाऊ धनंजय देशमुख यांनी गावातील सार्वजनिक शिवजयंती ला हजेरी लावली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केलं
डॉ. अजित गोपछडे, खासदार, राज्यसभा
महाराजांनी हिंदुस्थानला स्वराज्य दिलं
आम्ही सगळ्यांनी आज महाराष्ट्र सदनात अभिवादन केले वंदन केले
ऑन आरएसएस कार्यालय
आज आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सगळे स्वयंसेवक आनंद साजरा करत आहोत
आम्ही महाराजांचे भक्त आहोत
शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी संघाचे कार्यालय दिमाखात डोलणार
माझा उर अभिमानाने भरून आले आहे
शिवाजी महाराजांच्या जयंतीचे
कमाल खान ने औकतीत राहावे
कमाल खानला अद्दल घडवली पाहिजे
पुन्हा त्याने असे प्रयत्न केला तर देशाची जनता त्याला धडा शिकवेल
ऑन संजय राऊत
संजय राऊत यांनी विपश्यना केंद्रात गेले पाहिजे
संजय राऊत यांना काळात नाही
मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात दोन्ही उपमुख्यमंत्र्यां कुटुंबासारखे काम करत आहेत
ऑन विजय वडेत्तीवर आरोप
शिवजयंतीच्या दिवशी जेम्स लेनचे नाव घेणे हा माझ्या राजाचा अपमान
विजय वडेट्टीवर यांना काहीही करून आम्हाला काहीतरी बोलायचं असतं
ऑन एकनाथ शिंदेंना ठाकरे मुख्यमंत्री करणार होते हा राऊत आरोप
संजय राऊत आज काय बोलतात उद्या त्यांना आठवत नाही
त्यांनी काहीही बरळू सवय लागली आहे
नाशिक शहरात शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा फौजफाटा पोलीस तैनात...
- नाशिकच्या अति संवेदनशील असलेल्या जुन्या नाशिक परिसरातून मिरवणुकांना सुरुवात...
- मुस्लिम बहुल भागात पोलिसांचे विविध पथक तैनात, दंगल नियंत्रण पथक, गुन्हे शोध पथकांचा समावेश...
- नाशिक शहरात आज तब्बल 3000 पोलीस असणार
- शहरातील मिरवणूक मार्गांमध्ये असणार टीव्ही यंत्रणा, पोलिसांचा शहरात कडक बंदोबस्त...
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज नाशिकमध्ये पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आलेला असून शहरातील अति संवेदनशील असलेल्या मुस्लिम बहुल भागातून शिव मिरवणुकांना सुरुवात झाली आहे. विविध पथके नाशिक पोलिसांचे मिरवणूक आमच्या मार्गांमध्ये तैनात करण्यात आले असून शहरात तब्बल 3000 पोलिसांचा बंदोबस्त असणार असल्याची माहिती पोलीस उपयुक्त किरण कुमार चव्हाण यांनी दिली आहे. मिरवणुकांमध्ये विविध प्रकारच्या वेशभूषा परिधान करून मोठ्या उत्साहाने नाशिक मध्ये शिवजयंती साजरी होत आहेत.
अनिल देसाई, खासदार
दरवर्षी प्रमाणे इथे शिवजयंती साजरी करतोय
३९५ वी महाराजांची जयंती आहे
शिवनेरी किल्ल्यावर शिवप्रभूंचा जन्म
मात्र, त्याची पार्श्वभूमी भयंकर होती
मोगलाच्या शक्तीला काहीसे मावळे घेत स्वराज्य स्थापन करणं सोपं नव्हतं
आपण भाग्यवान आहोत, हिंदुस्तान कोणी निर्माण केला आणि त्याचे सार्वभौमत्व कोणी राखलं
फुलासारखा व्यापार करताना आपण देखील असे कार्यक्रम करत आपण देणं लागतो ही भावना ठेवत आपण कार्यक्रम करत असता
फुल बाजाराच्या असंख्या समस्या खासदार आमदार आणि आमचा पक्ष म्हणून आम्ही काम करु
मुंबईवर ज्यांचे डोळे आहेत, त्यांना त्यांची जागा दाखवण्याची गरज आहे
ही मुंबई भगवी आहे आणि ती तशीच राहिल
चंद्रशेखर बावनकुळे tictak
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त केंद्र सरकारच्या दिशानिर्देशानुसार नागपूर महानगरपालिकेद्वारे ‘जय छत्रपती शिवाजी महाराज, जय भारत पदयात्रा’चे आयोजन करण्यात आलेले आहे. या पदयात्रेत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालिका आयुक्त, जिल्हाधिकारी सहभागी झाले होते. सोबत वेगळ्या शाळेचे विद्यार्थी सहभागी झाले होते .महाराजांचे विचार लोकांनापर्यंत साठी शासनाचा हा उपक्रम स्तुत्य असल्याचे चंदशेखर बावनकुळे म्हणाले
सिंधुदुर्ग
मालवण राजकोट किल्ल्यावर नवीन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पायाभरणी
राजकोट किल्यावर पहिला बांधलेला पुतळा कोसळल्यानंतर आता त्याच ठिकाणी नवीन पुतळा उभारण्यात येणार
पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत पायाभरणी
राजकोट किल्ल्यावर भव्यदिव्य पुतळा उभारला जाईल अशी सरकारकडून करण्यात आली होती यापूर्वीच घोषणा
मालवण कुडाळचे आमदार निलेश राणे, आमदार दीपक केसरकर, आमदार कालिदास कोळंमकर यांची किल्यावर उपस्थिती
सांगली-:
म्हैसाळ कागवाड रोडवर कर्नाटकची बस आणि ट्रॅक्टर मध्ये अपघात
अपघातानंतर बस रस्त्याच्या कडेला जाऊन पलटली
अपघातात 16 महिला जखमी, जखमी मध्ये लहान मुलांचाही समावेश, जखमींना तात्काळ मिरज शासकीय रुग्णालयात हलवले
सुदैवाने अपघातात जीवितहानी नाही
Gadchiroli: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अजय पराक्रमाचा आणि राष्ट्रप्रेमाचा जागर करणारी 'जय शिवाजी, जय भारत' पदयात्रा बुधवारी उत्साहात काढण्यात आली. या पदयात्रेचा शुभारंभ जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते करण्यात आले. शहरातील इंदिरा गांधी चौकातून पदयात्रेला सुरुवात करून ही यात्रा मुख्य मार्गाने एलआयसी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात विसर्जित करण्यात आली. या पदयात्रेत शिव विचारांचा जागर करत शहरातील विविध शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी स्कूल ड्रेस आणि पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांचे ढोलताशा पथक, लेझीम पथक व अन्य पारंपारिक खेळांचे प्रदर्शन यावेळी करण्यात आले. यावेळी शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यासह महिला तसेच ज्येष्ठ नागरिक या पदयात्रेत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
धुळे
सोनगीर दोंडाईचा रस्त्यावर ट्रॅव्हल बस च आगीचा थरार...
अकोला कडून शहादा जाणाऱ्या ट्रॅव्हल्स बसला डांगुर्णे गावाजवळ लागली अचानक आग..
आगीत संपूर्ण ट्रॅव्हल्स जवळून खाक..
अकोल्याहून शहादा कडे जाणारी सिद्धी ट्रॅव्हल्सला अचानक पणे लागली भीषण आग...
सुदैवाने जीवित हानी नाही..
घटनास्थळी अग्निशामक दलाचे बंब दाखल...
आगीचं कारण अद्याप स्पष्ट नाही..
विरार : शिवजयंतीचे औचित्य साधून, वसईच्या उमेळमान येथील आठवर्षीय स्वयंतक पाटील याने छत्रपती शिवाजी महाराजाला आगळी वेगळी मानवादना केली. अर्नाळा किल्ला ते वसई किल्ला असा सुमारे २५ किमी अंतर पोहून पार करत आहे.आज पहाटे सहा वाजता अर्नाळा किल्ला येथून निगाला असून शेवट दुपारी वसई किल्ला येथे होणार आहे. स्वयंतक हा नागरी समाज विकास शिक्षण • संस्थेच्या शाळेत इयत्ता तिसरीमध्ये शिकत आहे. त्याला प्रशिक्षक राकेश कदम यांचे मार्गदर्शन लाभले. त्याला लहानपणापासूनच पोहण्याची आवड निर्माण आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांना ही या चिमूरड्याची मानवंदना एक अभिमानाची बाब समजली जात आहे.
वाघबीळ घाटात बिबट्याच्या बछड्याचे दर्शन
कोल्हापूर- पन्हाळा रस्त्यावर वाघबीळ घाटात बिबट्याच्या बछड्याच दर्शन झाले. यापूर्वी अनेकदा या परिसरात बिबट्या असल्याचं निदर्शनास आलं होतं.आज एका चार चाकी वाहणाला रस्ता क्रॉस करत असताना बिबट्याचा लहान बछडा दिसून आलाय. वाहन चालकाने ही आपल्या मोबाईल मध्ये या बिबट्याचा व्हिडिओ कैद केलाय.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज सकाळी लातुरात 'जय शिवाजी, जय भारत' पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील दयानंद महाविद्यालय येथून आ. विक्रम काळे, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे आणि पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या उपस्थितीत पदयात्रेला सुरुवात झाली. दयानंद महाविद्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी ही भव्य पदयात्रा निघाली. या पदयात्रेत चित्ररथासह ढोल - ताशा पथक, लेझीम पथक, झांज पथकसह भजनी मंडळ पथक मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. तसेच या पदयात्रेत विविध वेशभूषा परिधान केलेले विद्यार्थी, शिक्षक यांच्यासह विविध शाळांचे विद्यार्थी, नागरिक आणि शासकीय अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणा देत निघालेल्या या पदयात्रेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
मराठा आरक्षणाचा प्रश्न संपूर्ण निकाली निघेपर्यंत स्वस्थ बसणार नाही... मनोज जरांगे पाटील
मनोज जरांगे यांची मुरुड येथे धावती भेट... छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला केलं अभिवादन... छोटेखानी भाषणात साधला संवाद
मनोज जरांगे पाटील बीड वरून धाराशिव कडे जात असताना लातूर जिल्ह्यातील मुरुड येथे काही काळासाठी थांबले होते. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. उपस्थित असलेल्या लोकांशी त्यांनी यावेळी संवाद साधला. अतिशय छोटे खाणी भाषणात एकजूट राहण्याचा आव्हान केला आहे.. मराठा आरक्षणाचा प्रश्न संपूर्ण निकाली निघेपर्यंत स्वस्थ बसणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली...
विजय वडेट्टीवार, विधिमंडळ नेते.
नागपूर
मुख्यमंत्र्यांचा काही चुकलं नाही झोपनीय तिची शपथ घेत असेल तर त्याला बाहेर जाऊ नये, चॅनलला हेडलाईन दाखवण्यासाठी तुम्ही सोर्स वापरता त्याला एखादा कॅबिनेट मंत्री बळी पडतो... प्रत्येक मुख्यमंत्री या सूचना देत असतात. मंत्रिमंडळात फितूर आहे का देवेंद्र फडके यांच्या माध्यमातून फितूर याचा शोध घेण्यासाठी विरोधकांचा आवश्यकता असेल तर आहे त्यांना मदत करू ते जर आम्हाला मागणी करतील तर आम्ही त्यांना नाव देऊ.डान्सबार संदर्भात जी माहिती होती ती आम्हाला मीडियातून मिळाली, आम्ही आमची बाजू मांडत असतो डान्सबार संदर्भात काय नियम आणि अटी होती.
धस मुंडे भेटीवर
आता ती भेट चार तास झाली, की चार मिनिट झाले पण भेट झाली हे खर आहे..
एकमेकांचे पप्पी घेण्यासाठी गेले होते का? डोळ्याच ऑपरेशन हे नॉर्मल असतं... काही सिरीयस होते का. त्यावेळेस जाऊन भेटायला मंत्रिमंडळातील कोणीच गेले नाही. हे कशाला भेटायला गेले. कुछ तो गडबड है. काहीतरी साध्य करण्यासाठी धस गेले असतील... त्यावर संशय निर्माण होत आहे.. ते धस स्वतःच्या प्रदेशाध्यक्ष संदर्भात प्रश्न निर्माण करत असतील तर सुरेश धस कोणाच्या इशाऱ्यावर हिम्मत दाखवत आहे ते बावनकुळे यांनी शोधून काढावं.
मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवनेरी किल्ल्यावर शिव जन्माचा सोहळा पार पडल्यावर दोन्ही उपमुख्यमंत्री मुंबईईला रवाना. त्यामुळे पुण्यात शिवजंतिनिमित्त आयोजित कार्यक्रमांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच उपस्थित राहणार. पुण्यात पदयात्रेचे आयोजन करण्यात आलंय . त्यानंतर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पुढाकारातुन उभारलेल्या शिवशृष्टीच्या दुसर्या टप्प्याचे उद्घाटन देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थित होणार आहे. या दोन्ही कार्यक्रमांना दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहतील असं सांगण्यात आलं होतं. मात्र दोघे हे मुंबईला रवाना झाल्याने पुण्यातील कार्यक्रमांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्याबरोबर राज्य मंत्रीमंडळातील इतर मंत्र्यांची उपस्थिती असेल.
भाई जगताप
- मुंबईच्या विमानतळावर शिवजयंती आणि हा पुतळा आम्ही सुरू केला
- मात्र अदानी सारखी माजलेली माणसं याकडे लक्ष ठेवत नाहीत
- आदानी हे मालक नाही तर एअरपोर्टच्या ऑपरेटर आहेत हा विषय मी विधानसभेत मांडणार
- संभाजी महाराजांबद्दल जो काही मजकूर विकिपिडीया वरती लिहिण्यात आला त्याची निषेध करतो
- संभाजी महाराज बदनाम करण्याचा प्रयत्न याआधी ही झाला
आॅन कांग्रेस प्रदेशाध्यक्ष
- इंग्रजांना हाकलण्याची सुरुवात सर्वोदय इथून झालेली होती आणि याच सर्वोदय कार्यकर्ता हर्षवर्धन सपकाळ आहे
- त्यामुळे प्रदेशाध्यक्ष म्हणून चांगली निवड केलेली आहे आणि काँग्रेसला नक्की ते मोठे करतील यात काही शंका नाही
आॅन डान्सबार
- आर आर पाटील यांनी डान्सबार बंदी आणली होती कारण त्यांच्या कुटूंबाची यातून धुळधाण झाली होती
- जर सरकार परत हा निर्णय घेत असेल तर हे दुर्दैव आहे
-
* डिल झाल्याशिवाय सुरेश धस ज्या वेगाने पुढे गेले ज्या वेगाने ज्या वेगाने त्यांनी आकार आणि आकाच्या वर हल्ले गेले ज्या पद्धतीने त्यांनी काही कागद आणि पुरावे पुढे आणले आणि अचानक ब्रेक लागला आपण कोणाला भेटायला जात आहोत आणि आपण कोणासाठी भेटलो आपण कालपर्यंत कोणासाठी लढत होतो याचा भान त्यांनी ठेवायला पाहिजे होतं
* मला एका प्रमुख माणसाने आली सांगितलं सुरेश धस मागे घेतील त्यांची ती परंपरा आहे एखादा मोठा डील पदरात पाडून घेतील आणि ते नंतर शांत बसतील
* एक फार मोठ डील झाला आहे
* या संदर्भात जे लढ्यात उतरले आहेत सुप्रिया सुळे असतील जितेंद्र आव्हाड असतील अंजली दमाने असतील त्यांच्याशी या विषयावर बोलेन
* बावनकुळे त्यांचे बॉस आहेत असे ते म्हणतात देवेंद्र फडणवीस देखील त्यांच्या बॉस आहेत मग त्यांच्या बॉसने त्यांना ट्रॅपमध्ये पकडलं का इतकं मोठं प्रकरण सुरू असताना त्यांनी या विषयावर कोणाला भेटणं जावो हे पूर्णपणे निराधार आणि चुकीचे आहे
* ज्या क्षणी तिकडे आकाचे आका आले त्याच्याने त्याने तिकडून बैठकीतून बाहेर पडले पाहिजे याला नैतिकता म्हणतात
* आणि सांगायला पाहिजे बाहेर येऊन माझ्या बाबतीत अशा प्रकारचा घात झाला आणि मला ट्रॅप मध्ये पकडण्याचा प्रयत्न झाला म्हणून मी इथून बाहेर पडलो हीमत आहे का सांगायची
* संवाद राजकारणात असला पाहिजे पण गुन्हेगाराची असावा का ज्यांच्यावर आरोप आहे ज्यांचा राजीनामा मागितला जातो कोणाच्या प्रकरणात त्यांच्याशी संवाद ठेवावा असं कोणाचं मन असेल तर महाराष्ट्रात प्रत्येक गुन्हेगाराची राजकारणात नसावा ठेवा लागेल
* हे टोलवाटोलवी करत आहेत या कोर्टातून त्या कोर्टावर टाकत आहेत
* आम्ही लवकरच शिवसेनेचे सर्व नेते बीडला जाणार आहोत त्यानंतर आम्ही तिकडे गेल्यावर उद्धव ठाकरे तिकडे येतील आम्ही देशमुख कुटुंबीयांची जाऊन भेट घेणार आहोत
* शिवसेनेला आता या विषयात लक्ष घालावे लागेल
* देशमुख कुटुंबियांचे फसवणूक झाली आहे
* छत्रपती शिवाजी महाराज हे सरकारी दैवत नाही हे महाराष्ट्र देशाचे प्रेरणास्थान आणि दैवत
* छत्रपती शिवाजी महाराज यांनी देखील राजकारण केले छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून प्रेरणा घेऊन आम्ही राजकारण करतो पण छत्रपती शिवाजी महाराज यांनी कधीही सुडाच राजकारण केलं नाही सर्वांना एकत्र येऊन त्याने महाराष्ट्र राज्य हिंदवी स्वराज्य स्थापन केलं
* छत्रपती शिवाजी महाराज यांनी कधी बडेजाव केला नाही त्यांच्या राज्यात सुद्धा लोकशाही होते जरी निवडणुका नसल्या निवडणूक आयोग नसला गृहमंत्री नसला तरी लोकशाही होती त्याला आम्ही शिवशाही म्हणतो
* आता जे छत्रपती शिवाजी महाराज यांचा सन्मान करायला रायगडावर गेले आहेत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजून घेतला पाहिजे त्यांनी असं नाही आम्ही सर्वांनीच आणि त्यानुसार आचरण केलं पाहिजे
* निवडणुका आल्या की आम्ही छत्रपती यांच्या मार्गाने जाणार छत्रपती यांच्या वरती विश्वास ठेवण्यात हे निवडणूक आपण सांगतो
* पण छत्रपती राज्य कारभाराची आचारसंहिता निर्माण केली त्याच्यावरती त्या पावलावरती पाऊल ठेवून आज कोणतेही राज्य दिल्लीचा असेल किंवा महाराष्ट्राचा असेल हे चाललं नाही
* छत्रपतींच्या राज्यात खून बलात्कार करणाऱ्यांना कठोर शिक्षा होती आज बीडमध्ये आणि परभणीत काय चालू आहे भ्रष्टाचारी बँक लुटणाऱ्यांना या छत्रपतींच्या राज्यांचा राज्यात अभय आहे जनतेचा पैसा खुल्या लुटला जातो
* आज छत्रपतींचा स्मरणाचा दिवस आहे त्यांचा आम्ही सदैव स्मरण करतो रोजच स्मरण करतो
* आमचा जो पक्ष आहे शिवसेना तो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेतून स्थापन झाला आहे
* महाराष्ट्रात जागोजागच्या शिवजयंती साजरा करतो ती सुरुवात शिवसेनेने हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी केली
* पण या राज्यात छत्रपतींचा पुतळा उध्वस्त झाला मालवणच्या किनाऱ्यावर या राज्यात छत्रपतींचा विचार उध्वस्त झाला राज्यकर्त्यांकडून या राज्यात छत्रपतींना जे अपेक्षित भूमिका होती ती आज त्या दिशेने कोणी जाताना दिसत नाही हे दुर्दैव आहे
* छत्रपती शिवाजी महाराज यांची मिरवणूक ही प्रत्येक ठिकाणी निघाला पाहिजे जगात सुद्धा निघते अमेरिकेत कॅनडात पण निघते इंग्लंडमध्ये देखील निघते त्यासाठी कोणी इथून जायची गरज नसते लोक उस्फूर्तपणे काढतात
* ज्या पद्धतीने पुतळ्यात भ्रष्टाचार झाला लाखो रुपयांचा आणि तो भ्रष्टाचार करणारे हेच लोक होते ते आज मिरवणुका काढत आहेत हेच सरकार होतं यांच्या काळात भ्रष्टाचार झाला आणि छत्रपती शिवरायांचा पुतळा एका क्षणात खाली पडला आणि महाराष्ट्राचा मन त्या दिवशी जे दुखी झालं त्या दुःखात महाराष्ट्र अखंड राहिला आणि आज परत तुम्ही नव्याने पुतळा करत आहात जे झालं त्याचे जबाबदारी कोणी घेतली नाही
* तेव्हा निषेध करायला आमचे लोक जे गेले रस्त्यात आडवे आले छत्रपती चा पुतळा पडला किंवा पाडला भ्रष्टाचाराने त्याचा निषेध करायलाही या लोकांनी दिला नाही आणि तिथे रस्त्यावर राडे केले
सातारा पोलीस दलातील आठ वर्षे वयाच्या सूर्या श्वानाने झारखंड या ठिकाणी झालेल्या श्वान स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवून साताऱ्याच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा
झारखंड या ठिकाणी पोलीस दलामार्फत घेण्यात आलेल्या श्वान स्पर्धेत दीडशे श्वानांनी सहभाग नोंदवला होता यामध्ये सातारा पोलीस दलातील आठ वर्षे वयाच्या सूर्या श्वानाने या स्पर्धेत सहभाग घेऊन गोल्डमेडल मिळवून नावलौकिक मिळवले आहे. आज सूर्या श्वान साताऱ्यात दाखल झाल्यानंतर पोवई नाक्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून ढोल ताशाच्या गजरात या श्वानाची सातारा पोलीस दलातील कर्मचाऱ्यांनी मिरवणूक काढली आहे. यावेळी पोलीस दलातील बँड पथक, पोलीस अधीक्षक समीर शेख, पोलीस कर्मचारी उपस्थित होते
संभाजीराजे छत्रपती TT
ऑन शिवजयंती
आम्ही गेले अनेक वर्षे शिवजयंती साजरी करत आहोत
आता त्याला व्यापक स्वरूप प्राप्त झालाय
ऑन एबीपी माझा अरबी समुद्र शिवस्मारक स्टोरी
अरबी समुद्रातील शिव स्मारक तर आहेच
पण दुर्गराज रायगड आहे
गडकिल्ले आहेत
त्याचे संवर्धन केले पाहिजे
ते जपले पाहिजेत
कल्याण तालुक्यातील कोळीवली गावातील कुस्तीपटू कै. बळीराम महादू कारभारी यांचे सुपुत्र अजित कारभारी यांनी रशियामधील एरोग्लॅड कोलम्ना येथे -३६°C तापमानात ५१०० मीटर (१६,७३२ फूट) उंचीवरून स्कायडायव्हिंग करत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा ध्वज फडकवला. या साहसी मानवंदनेमुळे अजित कारभारी हे आंतरराष्ट्रीय स्तरावर छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देणारे पहिले भारतीय ठरले आहेत. ब्रिगेडियर सौरभ सिंग शेखावत यांच्या प्रोत्साहनाने ही कामगिरी पार पडली. कर्नल कोस्त्या क्रिवोशिव (रशियन आर्मी स्कायडायव्ह मुख्य प्रशिक्षक) आणि अमेरिकेतील युनायटेड स्टेट्स पॅराशूट असोसिएशनचे प्रशिक्षक राहुल देसाई (डकरे) यांच्या मार्गदर्शनाखाली अजित कारभारी यांनी हे साहस यशस्वीरीत्या पूर्ण केले.
नवी मुंबई नागरी संरक्षण समूह ठाणे विभागीय क्षेत्ररक्षक असलेल्या अजित कारभारी यांच्या या साहसी कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या या कृतीमुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची जागतिक स्तरावर उजळणी झाली आहे.
रायगड शिवजयंती update
किल्ले रायगडावर शिवजयंतीला शिवभक्तांचा उत्साह
मंत्री आदिती तटकरे यांच्यासह छावा सिनेमा कलाकार विकी कौशल राहणार उपस्थित
किल्ले रायगडवर आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीला राज्यभरातून शिवभक्त दाखल झालेत. राजसदरेवरील मेघडंबरी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पानांची आणि फुलांची सजावट करण्यात आली आहे. राज्याच्या मंत्री आदिती तटकरे आणि छावा सिनेमाचे कलाकार विकी कौशल सुधा थोड्याच वेळात किल्ले रायगडावर महाराजांचे दर्शन घेण्यासाठी उपस्थित राहणार आहेत
नागपूर
चंद्रशेखर बावनकुळे
- सर्व अधिकारी प्रशासन या रॅलीमध्ये सहभागी झाले. या ठिकाणी आपला जेवण समर्पित करण्यासाठी जनता रस्त्यावर आलेली आहे नागपूरसाठी या ऐतिहासिक दिवस आहे,
- छत्रपती शिवाजी महाराजांची खरा तर ही प्रेरणा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि घेऊन पुढे जाणारे लोक आहेत योग्य रीतीने काम करण्याची ऊर्जा आजच्या दिवशी मिळते हे ऊर्जा घेऊन आम्ही जात आहे.
कमल खान बद्दल मी नंतर बोलणार
- हा संपूर्ण महाराष्ट्रात देशामध्ये जाज्वल्य इतिहास शिवाजी महाराजांची प्रेरणा, त्यांची प्रेरणा युवकांवर बालमनावर व्हावी यासाठी मोठ्या आयोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे.... मोठ्या संख्येने या रॅलीत लोक सहभागी झालेले आहे.
- त्यावर कारवाई झाले पाहिजे मी त्यासाठी प्रयत्न करेल
On वाघ नख
- सर्वांनी जाऊन वाघ नख नागपुरातील जाब बंगालात जाऊन पाहावे.
महादेव मुंडे खून प्रकरणात साक्षीदार तपासण्याच्या कामाला सुरुवात..
महादेव मुंडे यांचा 15 महिन्यांपूर्वी कोण झाला त्यानंतर पहिल्यांदाच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर त्या खुनाच्या तपासा संदर्भात चर्चेला सुरुवात झाली आणि बीडच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हा शाखेकडून तपासाला सुरुवात सुद्धा केली आहे मागच्या आठवड्यापासून या तपासाला सुरुवात झाली असून यात हा तपास सुरुवातीपासून करण्याचा मानस तपास पथकाचा आहे..
या खून प्रकरणातील साक्षीदार तपासणीला आता सुरुवात झाली आहे आणि यातूनच हा खून कोणी केला आणि कशासाठी केला हे समजणार आहे या तपासासाठी या पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक संतोष साबळे हे परळी मध्ये दाखल झाले आहेत..
पुणे
पुण्यात शिवजयंतीनिमित्त पदयात्रेच आयोजन
पुण्यात"जय शिवाजी जय भारत पदयात्रा"
पुण्यातील पदयात्रेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहणार उपस्थित
पुण्यातील सीओईपी कॉलेजच्या मैदानावरून फर्ग्युसन कॉलेज पर्यंत पदयात्रा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार , मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ ,मनसुख मांडवीया आणि रक्षा खडसे देखील राहणार उपस्थित
COEP कॉलेजच्या ग्राउंड वर मोठ्या कार्यक्रमाचं देखील आयोजन
मुंबई क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि सुनील गावस्कर यांचे जवळचे मित्र मिलिंद रेगे यांचे आज (१९ फेब्रुवारी २०२५) रोजी वयाच्या ७६ व्या वर्षी निधन झाले.
भिवंडी तालुक्यातील मुंबई-नाशिक महामार्गालगत येवई गावच्या हद्दीत आर. के. लॉजिस्टिक गोदाम संकुलात लागलेल्या भीषण आगीने तीन कंपन्यांची गोदामे जळून खाक झाली आहेत. बॅकारोझ परफ्युम्स अँड ब्युटी प्रोडक्ट्स प्रा. ली., इंटरक्राफ्ट ट्रेडिंग प्रा. ली., आणि फ्रेगरन्स शॉप प्रा. ली. या कंपन्यांच्या गोदामांना मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
कोल्हापूर- पन्हाळा रस्त्यावर वाघबीळ घाटात बिबट्याच्या बछड्याच दर्शन झाले. यापूर्वी अनेकदा या परिसरात बिबट्या असल्याचं निदर्शनास आलं होतं.आज एका चार चाकी वाहणाला रस्ता क्रॉस करत असताना बिबट्याचा लहान बछडा दिसून आलाय. वाहन चालकाने ही आपल्या मोबाईल मध्ये या बिबट्याचा व्हिडिओ कैद केलाय.
मुंबई गोवा महामार्गावरील भोसले घाटातली संरक्षक भिंत कोसळली.
वारंवार होणाऱ्या अपघातांचा संरक्षक भिंतीवर परिणाम. भिंत झालीय कमकुवत
तीव्र वळण असल्यामुळे भोस्ते घाटातील अपघातांचे प्रमाण वाढले.
संरक्षक भिंत तुटल्यामुळे घाटातून वाहतूक करणे बनले आहे धोकादायक....उर्वरित भिंतही कोसळण्याची भीती.
खोल दरी असल्यामुळे भोस्ते घाटातून प्रवास करणाऱ्या प्रवासाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर.
महाराष्ट्र सायबर विभागाने पन्नासहून अधिक सेलिब्रेटींना बजावला समन्स
इंडियाज गॉट लेटंट वाद प्रकरणात आता पर्यंत पाच जणांचे जबाब नोंद..
त्यात बहुतांश सेलिब्रेटी आहेत या प्रकरणी आतापर्यंत पाच जणांचे जबाब नोंदवले आहेत.
महाराष्ट्र सायबर विभाग इंडियाज गॉट लेटंटच्या १ ते ६ सर्व भागांची तपासणी करत आहेत..
या प्रकरणी ३० हून अधिक व्यक्तींना आरोपी करण्यात आले आहे..
राखी सावंत, समय रैनासह ५० नामवंत सेलिब्रेटींना चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आले आहे.
शिवजन्माचे ठिकाण असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्माचा सोहळा पार पडणार आहे. त्यासाठी शिवनेरी गडावर जीथे शिवाजी महाराजांचा जन्म झाला ते ठिकाण फुलांनी सजवण्यात आलंय. पोलीस दलाच्या बॅंड पथकाकडून वादन करण्यात येतय. राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री या सोहळ्यासाठी हेलीकॉप्टरने शिवनेरी किल्ल्यावर थोड्या पोहचणार आहेत. त्यांच्या हस्ते शिवजन्माचा पाळणा जोजावण्यात येणार आहे. त्यानंतर साहसी क्रीडा प्रकारांचे सादरीकरण होईल . त्यानंतर एका सभेचे आयोजन करण्यात आलंय.
भिवंडीत आगीचे सत्र सुरू
भिवंडी तालुक्यातील मुंबई नाशिक महामार्ग लगत येवई गावच्या हद्दीत भीषण आग
आर.के.लॉजिस्टीक गोदाम संकुलात परफ्यूमच्या गोदामास भीषण आग
आग लागल्याने संपूर्ण गोदाम जळून खाक
या आगीत तीन कंपन्यांचे गोदाम जोडून खाक
बॅकारोझ परफ्युमस अण्ड ब्युटी प्रोडक्टस् प्रा ली , इन्टरक्राफ्ट ट्रेडिंग प्रा. ली, फ्रेगरेंस शॉप प्रा. लि या तीन कंपन्यांचे गोदामाला भीषण आग
सुदैवाने कोणतीही जिवित हानी नाही.
आग लागण्याचे कारण अस्पष्ट आहे.
घटनास्थळी भिवंडी अग्निशामक दलाची दोन गाडी दाखल
आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
नंदुरबार:- जिल्ह्यात रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत मंजूर विहिरींपैकी पैकी 6000 विहिरींचा कामांना अजूनही सुरुवात नाही....
रोजगार हमी योजनेवर मजूर मिळत नसल्याने विहिरींच्या कामांना सुरुवात होत नसल्याची माहिती.....
तर 9600 विहिरींच्या कामांना सुरवात...
सिंचन विहिरींच्यामुळे रोजगार आणि सिंचन क्षेत्रात वाढ होत आहे
मात्र मोठ्या प्रमाणात मजुरांचे स्थलांतर होत असल्याने मजूर मिळत नसल्याने सिंचन विहिरींच्या कामाला ब्रेक
धाराशिवचे जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांची सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली. महाराष्ट्र सरकारने याबाबतचा आदेश काढला असून लवकरच ते पदभार स्वीकारतील. डॉ .सचिन ओंबासे यांची धाराशिव जिल्हाधिकारी म्हणून 30 सप्टेंबर 2022 रोजी नियुक्ती झाली होती. ओंबासे आता सोलापुरात मनपाआयुक्त म्हणून काम पाहतील. ओंबासे यांनी धाराशिवमध्ये नवीन तुळजापूर मंदिर विकास आराखडा तयार करण्यात पुढाकार घेतला. तसेच अनेक महत्त्वाच्या योजना पुन्हा सुरू केल्या . दरम्यान धाराशिवचे नवे जिल्हाधिकारी कोण असणार याकडे लक्ष लागले आहे.
धाराशिव जिल्ह्यात शिवजन्मोत्सव सोहळ्याची जोरदार तयारी करण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील यावर्षी धाराशिव मध्ये शिवजयंती उत्सव साजरा करणार आहेत. सकाळी नऊ वाजता कळम येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मनोज जरांगे पाटील अभिवादन करतील. दुपारी धाराशिव शहरात भव्य दुचाकी रॅली काढण्यात येणार असून मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत ही रॅली निघणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंती निमित्त वाशिम शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल हिंदुत्ववादी संघटनाच्यावतीने शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणार आहे. त्या निमित्ताने छत्रपती चौक भगवामय करण्यात आला असून भगव्या कपड्याच्या झालर लावून आकर्षक सजवले आहे.
दिल्लीत होणाऱ्या साहित्य संमेलनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच विशेष लक्ष
साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्रातील ३ वरिष्ठ अधिकारी दिल्लीत तळ ठोकून
संमेलनाच्या वातावरण निर्मितीच्या जाहिराती करण्यासाठी सरकारकडून विशेष निधी
विश्वसनीय सूत्रांची माहिती
संमेलनाच्या आधल्या दिवशीपासून मुख्यमंत्री दिल्लीत असणार
साहित्य संमेलनाच्या सुरुवातीला निघणाऱ्या ग्रंथदिंडीत मुख्यमंत्री संसद भवन ते तालकटोरा स्टेडियम पर्यंत पायी सहभागी होणार
मागच्या काही दिवसांपासून संमेलनावर होत असलेली टीका पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घातल्याची माहिती
- नागपुरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीचा उत्सव सुरु
- श्री शिवराज्याभिषेक सोहळा समिती च्या वतीने मोठ्या उत्साहात आयोजन
- पारंपरिक वेशभूषेत अनेक तरुण आणि तरुणी पालखी सोहळ्यात उपस्थित
- महाराजांचा दुग्धअभिषेक प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते माल्यार्पण होईल
- ढोलताशा पथकांचं सादरीकरण
- शिवकालीन क्रीडा प्रात्यक्षिकांचं सादरीकरण
- महाल येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजन
दरवर्षी शिवजयंतीला किल्ले रायगडावर हजारों शिवभक्त शिवज्योत आणण्यासाठी दाखल होत असतात शिवजयंतीच्या आदल्या दिवशी हे शिवभक्त राज्याचा ठिकठिकाणाहून किल्ले रायगडवर शिवज्योत घेऊन जाण्यासाठी येतात त्यानंतर ही शिवज्योत अनवाणी पायाने धावत आपापल्या गावी मार्गस्थ होत असतात रात्रीच्या वेळी पहाटे हे शिवभक्त गडावरून शिवज्योत घेऊन येतात. काल मध्यरात्रीपासून किल्ले रायगडावर शिवभक्तांनी शिवज्योत आणण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती हजारो शिवभक्त गडावर शिवज्योत आणण्यासाठी दाखल झाले होते.
बुलढाणा जिल्ह्यातील मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेल्या सुनगाव या गावी महान तपस्वी आवजी सिद्ध महाराज होऊन गेलेत सुमारे दोनशे वर्षांपूर्वी ते या परिसरातील आदिवासी बांधवांची सेवा करायचे त्यावेळी पासून सूनगाव येथे भव्य अस महाराजांचं मंदिर आहे . याठिकाणी दरवर्षी जिल्ह्यातील सर्वात मोठा असा भंडारा आयोजित करण्यात येतो. यात लाखो आदिवासी बांधवांना ज्वारीची भाकरी व वरण असा प्रसाद म्हणून वितरीत करण्यात येतो.अतिशय शिस्तबद्ध रीतीने हा भंडारा होत असतो. यात जिल्हाभरातील भाविकांसह शेजारी मध्यप्रदेशातील हजारो भाविक सामील होत असतात. विशेष म्हणजे या भांडाऱ्याला केंद्रीय राज्यमंत्री असलेले प्रतापराव जाधव , भाजपा नेते संजय कुटे दरवर्षी हजेरी लावतात.काल रात्री हा भंडारा संपन्न झालाय.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Breaking Live Updates: महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी; सर्व अपडेट्स, एका क्लिकवर