Maharashtra Breaking LIVE Updates: कुर्ल्यातील मदर डेअरीची जागा धारावी प्रकल्पाला, राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशासह राज्यातील क्रिडा, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचा आढावा फक्त एका क्लिकवर...
पार्श्वभूमी
Maharashtra Breaking LIVE Updates: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज बीडच्या जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात सुनावणी आहे.. आजच्या सुनावणीला विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची उपस्थिती असणार आहे. मागील...More
-आरोग्य विभागात नोकरी लावून देण्याच्या आमिषाने नव्वद जणांची फसवणूक तर,दीड कोटी रुपयांचा अपहार...
- आरोग्य विभागात नोकरी लावून देण्यासाठी 90 जणांची फसवणूक...
- माजी केंद्रीय मंत्री सुभाष भामरे यांच्या नावाचा वापर केल्याचा संशय...
- आरोग्य विभागात विविध पदांवर पद भरतीच्या नावाने दीड कोटी रुपये उकळले...
- नाशिक आणि धुळे जिल्ह्यातील आरोग्य विभागात विविध पदांवर कंत्राटी पद्धतीने नोकरी लावून देण्याच्या आमिषाने फसवणूक...
- नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात कविता भदाणे आणि वैभव पोळ या दोघांविरोधात गुन्हा दाखल...
धुळे, नाशिक जिल्ह्यातील आरोग्य विभागात विविध पदांवर कंत्राटी पद्धतीने नोकर भरती लावून देण्याचा अमित दाखवून तब्बल 90 उमेदवारांची दीड कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. कुणाल भदाणे यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर नाशिकच्या सरकार वडा पोलीस ठाण्यात कविता भदाने आणि वैभव पोळ या दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणांमध्ये माजी केंद्रीय मंत्री सुभाष भामरे यांच्या नावाचा देखील वापर झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे यासंदर्भात सरकारवाडा पोलीस अधिकचा तपास करत आहेत.
राजकीय मंडळींकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम, योजना, आणि प्रलोभनात्मक कार्यक्रम राबवले जातात. डोंबिवलीत लागलेल्या अनोख्या आणि विचित्र वाटणाऱ्या बॅनरची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आणि टीकेची लाट उसळवली आहे. "मोफत हेअर कलर शिबिराचे आयोजन", आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमाचं उद्घाटन एका मराठी सिनेअभिनेत्रीच्या हस्ते करण्यात आले. हा बॅनर पाहताच अनेकांनी ट्रोल करत कमेंट पास केल्या आहे.
राजकीय मंडळींकडून वेगवेगळ्या कार्यक्रमाचे विकास कामांचे बॅनर झळकलेले आपण अनेकवेळा पाहिले असतील मात्र एक अनोख्या उपक्रमाचा बॅनर सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे तो चर्चेचा ठरलेला बॅनर म्हणजे मोफत हेअर कलरचा या उपक्रमाचे उदघाटन सिनेअभिनेत्रीच्या हस्ते पार पडले. या अनोख्या उपक्रमाचे आयोजन शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक जनार्धन म्हात्रे त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका रेखा जनार्धन म्हात्रे यांनी आयोजन केले होते. मोफत हेअर कलर उपक्रम प्रभागातील महिला आणि पुरुषांसाठी ठेवण्यात आले होते या उपक्रमाचा लाभ शेकडो महिला आणि पुरुषांनी घेतला
राजकीय मंडळींकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम, योजना, आणि प्रलोभनात्मक कार्यक्रम राबवले जातात. डोंबिवलीत लागलेल्या अनोख्या आणि विचित्र वाटणाऱ्या बॅनरची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आणि टीकेची लाट उसळवली आहे. "मोफत हेअर कलर शिबिराचे आयोजन", आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमाचं उद्घाटन एका मराठी सिनेअभिनेत्रीच्या हस्ते करण्यात आले. हा बॅनर पाहताच अनेकांनी ट्रोल करत कमेंट पास केल्या आहे.
राजकीय मंडळींकडून वेगवेगळ्या कार्यक्रमाचे विकास कामांचे बॅनर झळकलेले आपण अनेकवेळा पाहिले असतील मात्र एक अनोख्या उपक्रमाचा बॅनर सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे तो चर्चेचा ठरलेला बॅनर म्हणजे मोफत हेअर कलरचा या उपक्रमाचे उदघाटन सिनेअभिनेत्रीच्या हस्ते पार पडले. या अनोख्या उपक्रमाचे आयोजन शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक जनार्धन म्हात्रे त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका रेखा जनार्धन म्हात्रे यांनी आयोजन केले होते. मोफत हेअर कलर उपक्रम प्रभागातील महिला आणि पुरुषांसाठी ठेवण्यात आले होते या उपक्रमाचा लाभ शेकडो महिला आणि पुरुषांनी घेतला
सातारा : सह्याद्री देवराई च्या निमित्ताने अभिनेते सयाजी शिंदे यांनी एक लाख झाडांचे उद्दिष्ट यावर्षी समोर ठेवले असून महाराष्ट्रातून विविध प्रजातीची रोपे या प्रकल्पाच्या अंतर्गत लागवड करण्याचा मानस त्यांचा आहे महाराष्ट्रातून अनेक ठिकाणाहून सह्याद्री देवराई साठी मदतीचे हात पुढे येऊ लागले आहेत. निसर्गप्रेमी सुरेश शिंदे यांच्या मंगळवेढा पुष्प रत्न नर्सरी ने तैवान पिंक जातीचे पेरू याबरोबरच इतर जिल्ह्यातील निसर्गप्रेमींकडून कलमी आंबे आणि बेलाची झाडे घेऊन राज्यभरात मोठ्या प्रमाणात झाडे लावण्याचा संकल्प केला असून 1000 तैवान पिंक पेरूची रोपे आज साताऱ्यातील सह्याद्री देवराई प्रकल्प परिसरात आणण्यात आली. यापुढील काळात वृक्षारोपण बाबत सर्वांनी पुढाकार घेऊन मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करावी अशी इच्छा व्यक्त केली आहे.
मालेगावच्या गिरणा नदीवर असलेल्या पुलाच्या भिंतीवरून काही टवाळखोर तरुण पाण्यात उड्या घेऊन जीवघेणी स्टंटबाजी करीत आहे..स्टंटबाजी करणारे बहुतांश मुले ही अल्पवयीन आहेत विशेष म्हणजे ही मुले केवळ भिंतीवरून पाण्यात उड्याचं मारत नाही तर पाणी अडविण्यासाठी लावण्यात आलेल्या लोखण्डी प्लेट आणि भिंतीत असलेल्या गॅप मधून दुसऱ्या बाजूला जीवघेणी कसरत देखील करतात..अशीच स्टंटबाजी करताना मागील वर्षी एका तरुणाचा मृत्यू देखील झालेला होता..पोलिसांनी घटनास्थळी येऊन या टवाळखोरांना हुसकविले मात्र पोलीस गेल्यावर पुन्हा हे टवाळखोर स्टंटबाजी करतात..
छञपती शिवाजी महाराज यांच्या 6 जुन रोजी रायगडावर होणाऱ्या 351 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी श्री तुळजाभवानी मातेच्या सिंहगाभाऱ्यातून कवड्याची माळ व कुंकु देवीचरणी लावुन व शिरकाई देवीला मानाची साडीचोळी हे साहित्य रायगडाकडे रवाना करण्यात आले. तुळजापूर येथुन हे साहित्य ५ जूनला रायगडावर पोहचणार पाच कवड्याच्या माळा रायगडावरील छञपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास घालण्यात येणार कुंकू हे सदरेवरिल छञपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास लावण्यात येणार आहे. तर मानाची साडी शिरकाई देविमातेस अर्पण केली जाणार आहे.
कौटुंबिक सरंक्षण कायद्यावर जूनच्या शेवटी बैठक
विधानपरिषदेच्या उप सभापती घेणार ही बैठक
बैठकीला महिला आयोग बाल हक्क आयोग तसेच अनेक महिला नेतृत्व यांची उपस्थिती असणार
कौटुंबिक सरंक्षण कायद्यात काहो बदल करता येतील का त्याला अधिक कडक कठोर कसे बनवता येतील यावर चर्चा
पावसामुळे सातपुड्यातील कैरी उत्पादक शेतकरी संकटात....
कैरी पासून तयार होणाऱ्या आमचूर उद्योगाला बसला फटका....
सततच्या पावसामुळे आमचुल ला लागली बुरशी...
आदिवासी बांधवांचा आमचुलला मिळत आहे कवडीमोल भाव...
आमचुलच्या दरात 50 टक्क्यांनी घट...
गेल्या वर्षी आमचुलला मिळत होता 200 ते 300 रुपये दर....
आमचुल खराब झाल्याने सध्या मिळतोय 80 ते 100 रुपये चा दर...
पावसामुळे सातपुड्यातील कैरी उत्पादक शेतकरी संकटात....
कैरी पासून तयार होणाऱ्या आमचूर उद्योगाला बसला फटका....
सततच्या पावसामुळे आमचुल ला लागली बुरशी...
आदिवासी बांधवांचा आमचुलला मिळत आहे कवडीमोल भाव...
आमचुलच्या दरात 50 टक्क्यांनी घट...
गेल्या वर्षी आमचुलला मिळत होता 200 ते 300 रुपये दर....
आमचुल खराब झाल्याने सध्या मिळतोय 80 ते 100 रुपये चा दर...
Beed News : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली.. सरकारी पक्षाचे वकील उज्वल निकम यांच्या उपस्थितीत आजचा युक्तिवाद झाला.. देशमुख हत्या प्रकरणात आरोप निश्चिती बाबत पुरेसे पुरावे असून आरोप निश्चिती करून घ्यावी.. असा अर्ज उज्वल निकम यांनी न्यायालयाला सादर केला..
तर वाल्मीक कराडच्या वकीला कडून अद्याप सरकारी पक्षाकडून डिजिटल एव्हिडन्स मिळाले नसल्याचं म्हणणे मांडण्यात आलं.. तर वाल्मीक कराडच्या दोष मुक्तीच्या अर्ज
Beed News : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली.. सरकारी पक्षाचे वकील उज्वल निकम यांच्या उपस्थितीत आजचा युक्तिवाद झाला.. देशमुख हत्या प्रकरणात आरोप निश्चिती बाबत पुरेसे पुरावे असून आरोप निश्चिती करून घ्यावी.. असा अर्ज उज्वल निकम यांनी न्यायालयाला सादर केला..
तर वाल्मीक कराडच्या वकीला कडून अद्याप सरकारी पक्षाकडून डिजिटल एव्हिडन्स मिळाले नसल्याचं म्हणणे मांडण्यात आलं.. तर वाल्मीक कराडच्या दोष मुक्तीच्या अर्ज
Beed News : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली.. सरकारी पक्षाचे वकील उज्वल निकम यांच्या उपस्थितीत आजचा युक्तिवाद झाला.. देशमुख हत्या प्रकरणात आरोप निश्चिती बाबत पुरेसे पुरावे असून आरोप निश्चिती करून घ्यावी.. असा अर्ज उज्वल निकम यांनी न्यायालयाला सादर केला..
तर वाल्मीक कराडच्या वकीला कडून अद्याप सरकारी पक्षाकडून डिजिटल एव्हिडन्स मिळाले नसल्याचं म्हणणे मांडण्यात आलं.. तर वाल्मीक कराडच्या दोष मुक्तीच्या अर्ज
मंत्रीमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय
कुर्ल्यातील मदर डेअरीची जागा धारावी प्रकल्पाला देण्याचा मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय
धारावी प्रकल्पाच्या नावाखाली अदाणी समुहाला ही जागा देऊ नये यासाठी खासदार वर्षा गायकवाड यांच्यासह स्थानिकांनी अनेक दिवसांपासून केल होत आंदोलन
मात्र हा विरोध न जुमानता राज्य सरकारने आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला निर्णय
कुर्ल्यातील जवळपास ८.५ हेक्टर जागा धारावी पुनर्विकासाला देण्यात आली आहे
मविआ शिष्टमंडळात नाराजी नाट्य
ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून काँग्रेसला डावलले
कॉंग्रेसच्या महिला नेत्या संगीता तिवारी राजभवनच्या बाहेरच
शिष्टमंडळात फक्त ठाकरे गटाच्या आणि शरद पवार गटाच्या महिला नेत्याच राज्यपालांच्या भेटीला गेल्या
संगीता तिवारी बाईट
आम्हाला का डावलले हे त्यानाच विचारा
सुषमा अंधारे यांनी जयश्री शेळके यांना घेऊन गेल्या, आम्ही त्यांच्या पुढ्यात होतो, आम्हाला पण घेऊन गेले असते
कदाचित त्यांना काँग्रेसला बाजूला ठेवायचं असेल
महिला अध्यक्षा संध्या सव्वालाखे यांना का सांगितलं नाही
बीड: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण सुनावणी
सरकारी पक्ष - चार्ज फ्रेम करण्यासाठी पुरेसे पुरावे आहेत
त्यामुळे चार्ज फ्रेम करून घ्या असा अर्ज उज्वल निकम यांनी दिला
आरोपी वकिल - आम्ही डिस्चार्ज एप्लीकेशन वर अपयशी ठरलो तर पुढील प्रक्रिया करू
अद्यापही डिजिटल एव्हिडन्स मिळाले नाहीत आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद
बऱ्याच अर्जावर दोन्ही पक्षाचे म्हणणे बाकी आहे
डिस्चार्ज एप्लीकेशन वर तपास अधिकारी आणि सरकारी पक्षाचे म्हणणे आले आहे
त्यामुळे सरकारी पक्षाचे म्हणणे आधी चार्ज फ्रेम वर सुनावणी घ्या
50 मिनिटे सुनावणी झाली
पुढील तारीख 17 जून
शिवसेना उबाठा गटाचे सुधाकर बडगुजर पक्षात नाराज
सुधाकर बडगुजर यांनी कालच घेतली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट
मी स्वतःवर नाराज आहे, पण पक्ष संघटनेत झालेल्या बदलामुळे महानगर प्रमुख विलास शिंदें यांच्यासह 10 ते 12 जण नाराज असल्याचा गौप्यस्फोट
सुधाकर बडगुजर यांच्या वक्त्याने शिवसेना ठाकरे गटात खळबळ
बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमधेचे केले होते सूचक वक्तव्य
गिरीश महाजन यांच्यां वक्तव्या नंतर आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गिरीश महाजन यांच्यावर केली सडकून टीका
सेल्समनने सोन्याची चोरी करुन सराफी पेढीला घातला तब्बल ४ कोटी ५८ लाख रुपयांना गंडा
पुण्यातील प्रसिद्ध निळकंठ ज्वेलर्स मधील सेल्समन चा प्रताप
विश्रामबाग पोलिसांनी सेल्समनला केली अटक
दोन महिन्यात सेल्समन ने सराफी दुकानातील अंगठी, कॉइन, वेडणी असे तब्बल ४ कोटी ५८ लाख १३ हजार ६७९ रुपयांचे सोने नेले चोरून
याबाबत नितीन इरप्पा डांगे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे
यावरून पोलिसांनी प्रतिक नगरकर याला अटक करण्यात आली आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतीक हा नीलकंठ ज्वेलर्स या सराफी दुकानात कामाला होता. त्याच्याकडे सराफी पेढी मधील अंगठी, कॉइन व वेडणी या काउंटर ची जबाबदारी होती. दररोज, तो तिथल्या दागिन्यांचे लेबल काढून ठेऊन तिथेच ठेवत होता. विक्री झालेल्या वस्तू व शिल्लक वस्तू यांची नोंद ठेवताना तो चोरुन नेलेल्या वस्तूंचा शिल्लक वस्तूमध्ये दाखवत होता यामुळे दुकानात हा प्रकार कोणाच्या लक्षात आला नाही
२६ मे रोजी स्टॉक तपासणी करताना नितीन डांगे यांना संशय आला. त्यांनी सर्व स्टॉक मोजून पाहिला तर त्यात तब्बल ४ कोटी ५८ लाख १३ हजार ६७९ किमतीच्या वस्तू गायब असल्याचे समोर आलं.
पोलिसांनी आता प्रतीक नगरकर याला ताब्यात घेतले असून त्याच्याकडे चौकशी सुरु आहे
कल्याण: मोगऱ्याचे भाव अचानक खाली आल्याने संतप्त झालेल्या पालघर मधील शेतकऱ्यांनी आपला शेकडो किलो मोगरा थेट कल्याणच्या खाडीत फेकत सरकारचा निषेध व्यक्त केला. हिरवी 200 ते 400 रुपये प्रति किलो तर लग्नसराईच्या काळात 800 ते हजार रुपये प्रति किलो विकला जाणारा मोगरा मागील आठवडाभरापासून पन्नास रुपये प्रति किलो झाल्याने संत झालेल्या शेतकऱ्यांना हा मोगरा खाडीत फेकत अनोख्या पद्धतीने आंदोलन केले . पालघरच्या वाडा येथून कल्याण येथे मोगरा विक्रीसाठी गेलेल्या 40 पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी विक्रीसाठी मेलेला मोगरा थेट खाडीत फेकत सरकारी विरोधात घोषणाबाजी केली .
चंद्रपूर : बँकेतून पैसे काढून निघाल्यावर १ लाख ४० हजारांची लूट... सीसीटीव्हीत घटना कैद, राजुरा येथील घटना, डॉ. आंबेडकर वॉर्डातील बंडू देठे यांनी बँक ऑफ इंडियामधून पैसे काढून दुचाकीच्या पेट्रोल टँकवरील बॅगेत ठेवले होते, त्याच वेळी एका युवकाने त्यांच्या पायाजवळ २० रुपयांची नोट टाकून "तुमचे पैसे पडलेत" अशी बतावणी केली. देठे यांनी जरा दूर जात याविषयी खातरजमा केली. त्याचवेळी चोरट्याने बॅगमधील पैसे चोरून घेतले आणि साथीदाराच्या दुचाकीवरून पसार झाले. ही घटना बँकेसमोरील दुकानातल्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
बीड: संतोष देशमुख हत्या प्रकरण
बीडच्या विशेष न्यायालयात सुनावणी सुरू
विशेष सरकारी वकील ॲड उज्ज्वल निकम कोर्टात दाखल
आरोपीचे वकील देखील कोर्टात उपस्थित
आरोपी वाल्मीक कराड आणि इतर आरोपींबाबत आज महत्वाची सुनावणी
वाल्मीक कराडच्या डिस्चार्ज अप्लिकेशन वर देखील होणार सुनावणी
Mumbai Crime News: मुंबईत चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे मुंबईच्या सांताक्रुज वाकोला परिसरात देखील रात्रीच्या वेळी एमटीएनएलचे केबल चोरीची घटना उघडकीस आली आहे वाकोला पोलीस ठाण्याच्या 100 मीटर अंतरावर असणाऱ्या एका मॅन हॉल मधून एम टी एन एल चे केबल चोरी करणाऱ्या चोराला वरिष्ठ अधिकाऱ्याने रंगेहात पकडले आहे. विशेष म्हणजे चोरीच्या घटनेपासून 30 मीटर अंतरावर पोलिसांची नाकाबंदी देखील सुरू होती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून केबल चोर, एमटीएनएलचा माल, टेम्पो, जेसीबी पोलीस ठाण्यात आणण्यात आला आहे. या चोरीत काही भंगार विक्रेते आणि काही एमटीएनएल कामगारांचाही सहभाग असल्याचे शंका पोलिसांकडून उपस्थित करण्यात आली आहे. या प्रकरणाचा सध्या वाकोला पोलिसांकडून तपास सुरू आहे....
भारतात गोहत्या बंदी आहे. त्यामुळे बकर ईदला गो हत्याचा करण्याचा प्रश्नच नाही.
नितेश राणे यांच्या वक्तव्याने काही विवाद झाला तर सेक्शन १० अंतर्गत नोटीस देवून उत्तर मागितले जाईल.
नितेश राणे पंतप्रधान नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांचे नाव खराब करत आहे.
भारतीय मुसलमान प्रामाणिक आहे. जे बेईमान होते ते आधीच पाकिस्तानात गेले.
नितेश राणे ची भुमिका भाजपची आहे असे वाटत नाही.
सातारा: खा.संजय राऊत यांचे 'नरकातील स्वर्ग' या पुस्तकाची पोवई नाका येथे शिंदे गटाच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली होळी..
शिवसेना शिंदे गटाचे नवनिर्वाचित जिल्हाप्रमुख रणजीत भोसले यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पुस्तकाच्या प्रती फाडून जाळून केला निषेध..
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खा.संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवर शिंदे गट शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक..
संजय राऊत यांना सातारा जिल्ह्यात येण्याचे शिवसेना पदाधिकाऱ्यांचे खुले आव्हान...
ओसाड गाव ची पाटील की आहेत त्याचं नंदनवन मध्ये रूपांतर करण्याची जबाबदारी कोकाटे यांची आहे. अजित पवारांनी भरीव तरतूद कांद्याला दिली पाहिजे होती. सरकारने सातत्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सापत्न वागणूक देतं आहेत. लोकांनी केंद्र सरकला जाब विचारला पाहिजे
बिबट्या ची संख्या वाढली आहे,बिबट्याच्या हल्ल्या च्या घटना वाढल्या आहेत त्याचे जीवनमान बदलले आहे, मानवी जीवमानकडे बिबट्या येतो, त्यामुळे त्याचे संतती नियमन केले पाहिजे किंवा पिंजऱ्यात जेरबंद केले पाहिजे
आम्ही वाघ सिंह बाबतीत बोलत नाही, बिबट्या ची संख्या वाढत असल्याने त्यांना जिथे जिथे संख्या कमी आहे तिथे सोडले पाहिजे
लातूर जिल्ह्यातील शिरूर ताजबंद जवळील भवनवाडी शिवारात शेतजमीन मोजणी वरून वाद झाला होता. हा वाद विकोपाला गेला. शेत जमीन मोजून सीमा निश्चित करायच्या होत्या. त्यावरून वाद होता . या वादातून दमकोंडावर कुटुंबातील दोघांना सहा जणांनी बेदम मारहाण केली ... मारहाणीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय..याबाबत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक: जिल्ह्यात अमली पदार्थविरोधी पथकाकडून विशेष मोहीम सुरू केली आहे. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी सोमवारी जिल्ह्यातील 40 पोलिस ठाण्यांच्या हद्दीत अचानक मोहिम राबवत एनडीपीएसचे 22 गुन्हे दाखल करण्यात आले. 29 संशयितांना अटक करण्यात आली. गांजा, कुत्ता गोली, भांगसह जिल्ह्यात एकाच दिवसात 8.50 लाखांचा अमली पदार्थ जप्त केलाय. ग्रामीण पोलिस दलाचा पदभार स्वीकारताच अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी अमली पदार्थविरोधी मोहीम सुरु केली. सोमवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एही कारवाई केली. कुठेही अंमली पदार्थ विक्री, वापर, सेवन, साठा असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
केंद्र सरकार च्या निर्णयाचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पुन्हा फटका बसणार
निर्यात प्रोत्साहन योजने अंतर्गत कांद्या निर्यात दारांना मिळणारी 1.9 टक्के परताव्याची सवलत सरकारने बंद केली
यामुळे निर्यातीला मिळणारे प्रोत्साहन कमी होऊन कांदाची मागणी कमी होण्याची शक्यता केली जात आहे
देशांतर्गत बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात कांदा पीक असल्यानं बाजार भाव कोसळत आहेत
त्यामुळे सरकारने कांदा निर्यातीला प्रोत्साहन देण्याची मागणी होत आहे
केंद्र सरकार च्या निर्णयाचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पुन्हा फटका बसणार
निर्यात प्रोत्साहन योजने अंतर्गत कांद्या निर्यात दारांना मिळणारी 1.9 टक्के परताव्याची सवलत सरकारने बंद केली
यामुळे निर्यातीला मिळणारे प्रोत्साहन कमी होऊन कांदाची मागणी कमी होण्याची शक्यता केली जात आहे
देशांतर्गत बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात कांदा पीक असल्यानं बाजार भाव कोसळत आहेत
त्यामुळे सरकारने कांदा निर्यातीला प्रोत्साहन देण्याची मागणी होत आहे
केंद्र सरकार च्या निर्णयाचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पुन्हा फटका बसणार
निर्यात प्रोत्साहन योजने अंतर्गत कांद्या निर्यात दारांना मिळणारी 1.9 टक्के परताव्याची सवलत सरकारने बंद केली
यामुळे निर्यातीला मिळणारे प्रोत्साहन कमी होऊन कांदाची मागणी कमी होण्याची शक्यता केली जात आहे
देशांतर्गत बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात कांदा पीक असल्यानं बाजार भाव कोसळत आहेत
त्यामुळे सरकारने कांदा निर्यातीला प्रोत्साहन देण्याची मागणी होत आहे
बीड: बीडच्या गेवराई तालुक्यात दोन कृषी सेवा केंद्रांचा परवाना रद्द करण्यात आलाय. जादा दराने खत विक्री करणे, रासायनिक खतांचे बिल न ठेवणे यासह इतर कारणास्तव, गेवराईतील पद्म कृषी सेवा आणि सुनील कृषी सेवा केंद्राचा यात समावेश आहे.. कृषी विभागाच्या भरारी पथकाने ही कारवाई केलीय..
पद्म कृषी सेवा केंद्र चालकाकडून जादा दराने खत विक्री केली जात असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. या अनुषंगाने भरारी फथकाने तपासणी केली असता नियमांची पायमल्ली झाल्याचं आढळून आलं. दरम्यान हाच ठपका ठेवत ही कारवाई केली गेलीय..
बीड : दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या ११ व्या स्मृति दिनानिमित्त आज गोपीनाथ गडावर अभिवादन आज विविध कार्यक्रमांचे आयोजन केले गेले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही पंकजा मुंडे आपल्या कुटुंबासह या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे यंदा पहिल्यांदाच त्यांच्यासोबत माजी मंत्री धनंजय मुंडे हेही उपस्थित राहणार असून,11 वर्षांनंतर गोपीनाथ गडावर मुंडे बंधू भगिनी एकत्र येणार आहेत.
एकीकडे मंत्रीपद भेटल्यानंतर पंकजा मुंडे गोपीनाथ गडावरील आपल्या भाषणात काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहेच तर दुसरीकडे मंत्रीपदाच्या राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे हे पहिल्यांदाच गोपीनथगडवरील सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होणार असून ते उपस्थितांना संबोधित करणार का याकडे सर्वांचे आता लक्ष लागले आहे.
सकाळी ११ वा.मुंडे कुटुंबीय गोपीनाथ गडावर जाऊन गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतील आणि त्यानंतर सभेला संबोधित करतील.
याचबरोबर ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे देखील आज गोपीनाथ गडावर पुण्य स्मरणानिमित्त दर्शन घेण्यासाठी येणार आहेत.
परीक्षा देऊन स्व:गावी परतणाऱ्या दुचाकीस्वार दोन विद्यार्थ्यांना मुरुमाची वाहतूक करणाऱ्या भरधाव टिप्परनं चिरडलं. या भीषण अपघातात एका विद्यार्थ्याचा घटनास्थळीचं मृत्यू झाला. तर, दुसरा गंभीर जखमी असून त्याच्यावर भंडारा इथं उपचार करण्यात येत आहे. ही घटना भंडाऱ्याच्या अड्याळ पोलीस स्टेशन हद्दीतील सोमनाडा इथं काल सायंकाळी घडली. अपघाताची माहिती होताचं कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळावर राडा घातला. मृतक आणि जखमीच्या कुटुंबियांना तातडीनं आर्थिक मदत द्यावी, या मागणीला घेऊन संतप्त आप्तेष्टांनी रात्री उशिरापर्यंत मृतदेह घटनास्थळीचं ठेवला. यावेळी घटनास्थळी तणावाची परिस्थिती बघता भंडारा, लाखांदूर येथून पोलिसांची अतिरिक्त कुमक मागविण्यात आली. रात्री उशिरा प्रकरणावर तोडगा निघाल्यानंतर मृतदेह उचलण्यात आला. याप्रकरणी अड्याळ पोलिसांनी टिप्पर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शुभम हटवार (२३) असं मृत विद्यार्थ्याचं नावं आहे. तर, वेदांत करंजेकर (२३) असं गंभीर जखमी विद्यार्थ्याचं नावं आहे. हे दोघेही कॉमर्सचे विद्यार्थी असून लाखांदूर तालुक्यातील मासळ येथील परीक्षा केंद्रावरून परीक्षा देऊन गावाकडं परतत असताना हा अपघात घडला.
- नाशिक मध्ये कोयता गॅंगचा पुन्हा धुमाकूळ
- रविवारी नाशिक शहराच्या दोन वेगवेगळ्या भागात कोयता गँग दहशत मजविण्याचा व्हिडीओ समोर*
- नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संजीवनगर भागात आणि नाशिकरोड परिसरातील जेलरोड भागात कोयता गॅंग कडून वाहनांची तोडफोड
- *हातामध्ये नंगे कोयते नाचवत केला वाहनाची तोडफोड करत दहशत माजवली
- अंबड येथे पार्किंग मध्ये घुसून केली कोयत्याने वाहनांची नासधूस जुन्या वादातून नासधूस केल्याची पोलिसांची माहिती
- तर नाशिकच्या जेलरोड भागात रस्त्यात उभ्या असलेल्या तरुणावर हल्ला करत परिसरातील वाहनांवर केले कोयत्याने वार , तरुणावर खाजगी रुग्णालयात उपचार
कोयता गँगची दहशत मोडुन काढण्याचे पोलिसांसमोर आव्हान
- नाशिक मध्ये कोयता गॅंगचा पुन्हा धुमाकूळ
- रविवारी नाशिक शहराच्या दोन वेगवेगळ्या भागात कोयता गँग दहशत मजविण्याचा व्हिडीओ समोर*
- नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संजीवनगर भागात आणि नाशिकरोड परिसरातील जेलरोड भागात कोयता गॅंग कडून वाहनांची तोडफोड
- *हातामध्ये नंगे कोयते नाचवत केला वाहनाची तोडफोड करत दहशत माजवली
- अंबड येथे पार्किंग मध्ये घुसून केली कोयत्याने वाहनांची नासधूस जुन्या वादातून नासधूस केल्याची पोलिसांची माहिती
- तर नाशिकच्या जेलरोड भागात रस्त्यात उभ्या असलेल्या तरुणावर हल्ला करत परिसरातील वाहनांवर केले कोयत्याने वार , तरुणावर खाजगी रुग्णालयात उपचार
कोयता गँगची दहशत मोडुन काढण्याचे पोलिसांसमोर आव्हान
एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना थकीत महागाई भत्ता जाहीर होणार
सोबतच, कर्मचारी व त्याचे कुटुंबीय यांच्या साठी सध्या अस्तित्वात असलेल्या वैद्यकीय योजनेत मोठे बदल करत वाढीव रक्कम देण्याचा विचार
ज्यात, कर्मचाऱ्यांना ओपीडीची रक्कम देखील आता मिळू शकणार
सह्याद्री अतिथीगृहावर राज्यातील एसटी संघटनांच्या विविध मागण्यांसंदर्भात बैठक
महागाई भत्ता आणि मेडिकल कॅशलेस योजनेसंदर्भात एसटी कार्मचारी संघटनांच्या मागण्या
एसटी कर्मचाऱ्यांना सध्या ४६ टक्के महागाई भत्ता दिला जातो
मात्र, त्यात वाढ होत सरकारी कर्मचाऱ्यांला लागू झालेला ५३ टक्के महागाई भत्ता जाहीर होणार, सूत्रांची माहिती
दरम्यान, महागाई भत्ता ५० टक्क्यांच्या वर गेल्यावर घरभाडे भत्ता देखील वाढतो, अशात त्यात वाढ होणार का? याकडे सर्वांचे लक्ष
एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना थकीत महागाई भत्ता जाहीर होणार
सोबतच, कर्मचारी व त्याचे कुटुंबीय यांच्या साठी सध्या अस्तित्वात असलेल्या वैद्यकीय योजनेत मोठे बदल करत वाढीव रक्कम देण्याचा विचार
ज्यात, कर्मचाऱ्यांना ओपीडीची रक्कम देखील आता मिळू शकणार
सह्याद्री अतिथीगृहावर राज्यातील एसटी संघटनांच्या विविध मागण्यांसंदर्भात बैठक
महागाई भत्ता आणि मेडिकल कॅशलेस योजनेसंदर्भात एसटी कार्मचारी संघटनांच्या मागण्या
एसटी कर्मचाऱ्यांना सध्या ४६ टक्के महागाई भत्ता दिला जातो
मात्र, त्यात वाढ होत सरकारी कर्मचाऱ्यांला लागू झालेला ५३ टक्के महागाई भत्ता जाहीर होणार, सूत्रांची माहिती
दरम्यान, महागाई भत्ता ५० टक्क्यांच्या वर गेल्यावर घरभाडे भत्ता देखील वाढतो, अशात त्यात वाढ होणार का? याकडे सर्वांचे लक्ष
रायगड : जिल्ह्यातील पर्यटन स्थळ असलेल्या मुरुड शहराच्या अगदी जवळ असणाऱ्या समुद्र किनारी पर्यटकांसाठी मोठे वाहन बांधण्यात आले आहे.पर्यटकांच्या वाहनांची गैरसोय होऊ नये याकरिता हे वाहनतळ बांधण्यात एक आहे.मात्र या वाहनतळासाठी यापुढे पैसे आकारले जाणार आहेत दोन चाकीसाठी 50 रुपये ते चार चाकीसाठी 100 रुपये दर असणार आहे. यापूर्वी या भागात कसेही वाहन पार्क केले जात होते आता मात्र सुसज्ज आणि सुरक्षित वाहनतळ बांधण्यात आल्याने पर्यटकांसह इतरांना सुधा या जागेत सुरक्षित वाहन लावता येणार आहे.
कॅबिनेट मंत्र्यांकडून अद्याप राज्यमंत्र्यांना अधिकाराचे वाटप नाही?
राज्यमंत्र्यांकडून मुख्यमंत्र्यांना कॅबिनेट मंत्र्यांची तक्रार करणारे दोन वेळा पत्र
शिवसेनेच्या कॅबिनेट मंत्र्यांकडून अधिकार दिले जात नसल्याची राज्यमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
मंत्र्यांकडून सूचना देऊन देखील कॅबिनेट मंत्र्यांकडून मुख्यमंत्र्यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष
सध्या राज्यात भाजपकडून मेघना बोर्डीकर, माधुरी मिसाळ पंकज भोयर राष्ट्रवादी इंद्रनील नाईक आणि शिवसेना योगेश कदम राज्यमंत्री
राज्यमंत्र्यांकडून मुख्यमंत्र्यांना तक्रार अर्ज देताना २०१४ साली राज्यमंत्र्यांना काय अधिकार होते आणि आता काय दिले आहेत याची देखील माहिती जोडण्यात आली
२०१४ च्या तुलनेत आत्ता अतिशय कमी अधिकार देण्यात आल्याने राज्यमंत्र्यांची नाराजी
विश्वसनीय सूत्रांची माहिती
वाशिम: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडक्या बहिणींना सरसकट लाभ देणं सरकारची चूक असल्याची कबुली दिल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पवारांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला. निवडणुकीत पैसा फेक तमाशा देख, असा खेळ महायुती सरकारणं केला. महिला सबलीकरणाची यांची कधीच भावना नव्हती. यांना जनतेच्या प्रश्नाचं देणंघेणं नाही. केवळ भ्रष्टाचारासाठी बसलेलं हे अवकाळी सरकार आहे अशी जोरदार टीका सपकाळ यांनी केली. ते वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी इथ दर्शनासाठी आले असता त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देतांना हे वक्तव्य केलं.
मुंबई : शासकीय कर्मचाऱ्यांना शिस्तभंगाची नोटीस व्हॉट्सअॅप, ईमेलवरही पाठविली जाणार आहे. शिस्तभंगाच्या नोटीसीला वेळेत उत्तर देता यावे आणि यासंदर्भातील कारवाईला गती देण्यासाठी आता ईमेल आणि व्हॉट्सअॅपवरही नोटीस पाठविली जाणार आहे. सामान्य प्रशासन विभागाकडून याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. शिस्तभंगाच्या प्रकरणांचा निपटारा जलद होण्याची अपेक्षा आहे. यापूर्वी दोषारोप पत्र किंवा चौकशी अहवाल अशी शिस्तभंगाशी संबंधित कागदपत्रे व्यक्तिशः किंवा टपालाने पाठवली जायची. मात्र, अनेकदा ही कागदपत्रे संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचत नसल्याच्या तक्रारी होत्या. यामुळे आता सरकारने नवीन पद्धती अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे.
बीड पोलीस दलातील बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासले विरोधात आणखी एक गुन्हा दाखल
भाजपा आयटीसेल प्रदेश सहसंयोजक संभाजी सुर्वे यांच्या फिर्यादीवरून सायबर विभागात गुन्हा नोंदविण्यात आला आहे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संबंधित सोशल माध्यमावर बदनामीकारक आणि आक्षेपार्ह विधान केल्याची तक्रार नोंदविण्यात आली
भारतीय न्याय संहिता बीएनएस नुसार कलम 197, 353(2) माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000, कलम 66 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला
युक्रेनचा रशियावर आत्तापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला
युक्रेनचं रशियावर ऑपरेशन स्पायडर वेब
युक्रेनच्या ड्रोन ने रशियाच्या आत हजारो किलोमीटर जाऊन पाच प्रमुख हवाई तळांवर हल्ला केल्या यात बेलाया, ओलेन्या, ड्यागिलेवो, इव्हानोवो आणि उक्रैनका या महत्त्वाच्या त़ळांचा समावेश आहे
या हल्ल्याचं नियोजन 18 महिन्यांहून अधिक काळापासून करण्यात आल्याची माहिती
युक्रेनने एका लाकडी छत असलेल्या ट्रकच्या आधारे ड्रोन रशियाच्या आत आणले
ही ड्रोन्स लाकडी शेड्सच्या छताखाली लपवली आणि नियोजित हल्ल्याच्या दिवशी बाहेर काढली…
युक्रेन ने केलेल्या दाव्यानुसार हल्ल्यात रशियाची 41 लष्करी विमाने नष्ट किंवा खराब झाली आहेत, यामध्ये Tu-95, Tu-22M3 आणि A-50 यांसारख्या मिसाईल डागणाऱ्या विमानांचा समावेश आहे
युक्रेन ने केलेल्या या हल्ल्यामुळे बलाढ्य रशियासारख्या देशाचं मोठं नुकसान झालं आहे
त्याचबरोबर युक्रेनने रशिया सारख्या देशांच्या सीमेमध्ये १००० किलोमीटर प्रवेश करून हल्ला केल्यानं सायकॉलोजीकल वॉर मध्ये रशियाला झटका दिला आहे…
त्याचबरोबर अलिकडच्या काळातील ड्रोन आधारित वॉर मुळं मोठ्या देशांची डोकेदुखी वाढली आहे
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज बीडच्या जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात सुनावणी आहे.. आजच्या सुनावणीला विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची उपस्थिती असणार आहे. मागील झालेल्या सुनावणीत आरोपीच्या वकिलांकडून डिजिटल एव्हिडन्सची मागणी करण्यात आली होती.. मात्र अद्याप या प्रकरणातील डिजिटल एव्हिडन्स मिळाले नसल्याचा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला होता. त्यामुळे आजच्या सुनावणीत पुन्हा याची मागणी केली जाऊ शकते. तसेच वाल्मीक कराडच्या डिस्चार्ज एप्लीकेशनवर त्याच्या वकिलांकडून म्हणणे मांडले जाईल. याबरोबरच विष्णू चाटेला लातूरहून बीडच्या जिल्हा कारागृहात आणण्याची मागणी वकिलांकडून करण्यात आली. या संपूर्ण महत्त्वाच्या बाबींवर आज सरकारी पक्ष आणि आरोपीच्या वकीलांकडून युक्तिवाद होईल.
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Breaking LIVE Updates: कुर्ल्यातील मदर डेअरीची जागा धारावी प्रकल्पाला, राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय