Maharashtra Breaking LIVE Updates: रत्नागिरी, रायगडसह साताऱ्यातील घाट परिसरात पावसाचा रेड अलर्ट
Maharashtra Breaking LIVE Updates: रत्नागिरी, रायगडसह साताऱ्यातील घाट परिसरात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील विविध घडामोडींसह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, एका क्लिकवर...
पार्श्वभूमी
Maharashtra Breaking LIVE Updates: रत्नागिरी, रायगडसह साताऱ्यातील घाट परिसरात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. साताऱ्यात चिंचणेर...More
कणकवली आचरा रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. या मार्गावरील वरवडे पुलाचे काम अपूर्ण राहिल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. कणकवली ते आचरा आणि आचरा ते कणकवली येथे येण्यासाठी कलमठ कुंभारवाडी मार्गे जावे लागणार आहे. त्यासाठी वाहन चालकांना चार किलोमीटरचा वळसा घालून जावे लागणार आहे. यंदा पावसाळ्यापूर्वी वरवडे येथील पुलाचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र हे काम अपूर्ण स्थितीत राहिले आहे. गेले सहा महिने वरवडे येथील जुना पूल तोडून तेथे नवीन पुलाची उभारणी केली जात होती. त्यासाठी नदीपात्रातून पर्यायी रस्ता काढण्यात आला होता. मात्र गेले चार दिवस होत असलेल्या मुसळधार पावसामुळे हा रस्ता पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे पाणी जाण्यासाठी पर्यायी रस्त्याची माती जेसीबीच्या साहाय्याने बाजूला करून हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे.
सिंधुदुर्ग : जिल्ह्यात गेले चार दिवस मुसळधार पाऊस पडत असून तरेळे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील वैभववाडी तालुक्यातील करुळ घाटात दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली होती. करुळ घाट गेली दीड वर्षे नूतनीकरणाकरिता बंद होता, त्यानंतर वाहतुकीला खुला करण्यात आला होता. मात्र, मुसळधार पावसामुळे घाटात दरड कोसळण्याची घटना घडली. आता ठेकेदाराच्या माध्यमातून दरड बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आले आहे. मात्र ही वाहतूक धिम्या गतीने सुरू करण्यात आली आहे.
गडचिरोली : महाराष्ट्र- छत्तीसगड सीमेवर नव्याने स्थापन करण्यात आलेल्या कवंडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत नक्षल आणि पोलीस यांच्यात चकमक उडाली. या चकमकीत चार कट्टर नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले आहे. मृतक नक्षलवाद्यांची अद्याप ओळख पटली नसली तरी ते कट्टर नक्षलवादी असल्याची माहिती पोलीस दलाने दिली आहे. कवंडे आणि नेलगुंडा येथून इंद्रावती नदीच्या काठावरील परिसरात मुसळधार पावसादरम्यान ही कारवाई करण्यात आली. पोलीस पथकाने परिसरात शोध मोहीम राबवल्यानंतर 4 जहाल नक्षलवाद्यांचे मृतदेह, एक स्वयंचलित सेल्फ लोडिंग रायफल (SLR), दोन 303 रायफल आणि एक भरमार बंदूक मिळून आले आहेत. याशिवाय, घटनास्थळावरून वॉकी टॉकी, छावणी साहित्य, नक्षलवादी साहित्य इत्यादी जप्त करण्यात आले आहेत. घटनास्थळावर शोध मोहीम आताही सुरू आहे.
जालना : एका महिन्यात मुंबई, तर दोन महिन्यात महाराष्ट्र भोंगे मुक्त होणार, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी दिलीय. सोमय्या आज जालना दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील बोगस जन्म प्रमाणपत्र संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आढावा बैठक घेतली. त्यांनतर ते माध्यमांशी बोलत होते. मुंबईत आतापर्यंत 60 टक्के बेकायदेशीर भोंगे खाली उतरवण्यात आले असून एका महिन्यात मुंबई, तर दोन महिन्यात महाराष्ट्र भोंगे मुक्त होणार असल्याचं सोमय्या यांनी म्हटलंय. दरम्यान, जालन्याच्या अंबड तालुक्यात 1760 जन्म प्रमाणपत्र खोट्या पद्धतीने नायब तहसीलदारांनी दिले असून जिल्ह्यातील एकूण 3 हजार 595 प्रमाणपत्र परत घेतले जाणार असल्याची माहिती सोमय्या यांनी दिलीय. तसेच जिल्ह्यातील बाकी तहसीलदार यांनी दिलेल्या प्रमाणपत्राची देखील चौकशी करण्यात येणार असल्याचं सोमय्या म्हणालेत. राज्यात आणि देशात विरोधी पक्षातील नेत्यांचे भोंगे 4 महिने सतत वाजत आहेत. त्यांचे भोंगे वाजू द्या, पण राज्यात बेकायदेशीररित्या मशिदींवर एकही भोंगा वाजू देणार नाही, असा इशाराही सोमय्या यांनी दिलाय.
आम्ही वारंवार हीच भूमिका आम्ही मांडत आलेली आहोत, ईडी मनमानी करते, केंद्र सरकारच्या दबावाखाली काम करते. ज्या पद्धतीने अटक केल्यानंतर दोन-दोन वर्ष जामीन न देण्यासाठी प्रयत्न करणे, या सगळ्या गोष्टी बघितल्या तर ईडी ही केंद्र सरकारची बटीक झालेली आहे. सुप्रीम कोर्टाने याची भूमिका मांडलेली आहे. याचं स्वागत सर्वांनीच केलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली आहे.
नाशिक कुंभमेळ्यात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस शाहीस्नान घालण्याची मागणी...
- महिला आखाड्याच्या प्रमुख त्रिकाल भवंता सरस्वती महाराज यांची मोठी मागणी...
- तसेच महिला आखाडयासह शाही स्नानासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याची केली मागणी...
- गोदावरी नदीमुळे कुंभ होतो, त्यामुळे गोदावरी नदी प्रदूषण मुक्त झाली पाहिजे, गोदावरी नदीच्या प्रदूषणावर नाराजी...
- तर महाराष्ट्रासह देशातील महिलांना आर्थिक समृद्ध केलं पाहिजे
- पुणे हुंडाबळी प्रकरणावर प्रतिक्रिया देत कठोर कारवाईची केली मागणी
भंडारा : वाळूच्या अवैध उपसा आणि वाहतुकीवर निर्बंध घालण्यासाठी राज्य सरकारनं वाळू धोरण अस्तित्वात आणलं. मात्र, वाळू धोरणाला भंडाऱ्यात वाळू तस्करांनीचं सुरुंग लावल्याचं चित्र बघायला मिळत आहे. भंडाऱ्याच्या लाखांदूर येथील अंतरगावं - चिचोली येथील वाळू डेपो घाटावरून वाळूचा उपसा करून ट्रॅक्टरच्या माध्यमातून त्याची वाहतूक करण्यात येत आहे. लाखांदूर येथील एका नागरिकांनं वाळूच्या या अवैध उपसा आणि वाहतुकीचा व्हिडिओ त्यांच्या मोबाईलमध्ये आज सकाळी कैद केले. वाळू वाहतुकीचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
नाशिक : शहरात टवाळखोरांनी मोठा उच्छाद मांडला असून, वाहनांच्या काचा फोडणे, तोडफोड करणे, कोयता नाचवणे असे प्रकार आता सर्रास सुरू आहेत. गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. काल रात्री सातपूर येथील श्रमीकनगरला असलेल्या खंडेराव महाराज मंदिर परिसरातील मोकळ्या जागेत पार्क करण्यात आलेल्या चार ते पाच वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या. सकाळी ही बाब उघडकीस आली आहे. याबाबत वाहनधारकांनी पोलिसात धाव घेतली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात टवाळखोरांनी मोठा उच्छाद मांडला आहेत. विविध भागात रात्रीच्या वेळी टवाळखोर वाहनाची तोडफोड करत असल्याने पोलिसांनी तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.
शेतीच्या बांधावरून जाणारा शेत रस्ता यापुढे बारा फुटांचा
आधुनिक शेतीचा पूर्ण लाभ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी महसूल विभागाचा 60 वर्षानंतर महत्वाचा निर्णय
तीन ते चार मीटर रुंद असे रस्ते बांधण्याची महसूल विभागाची परवानगी
ट्रॅक्टर, रोटावेटर हार्वेस्टर यासारखी मोठी कृषी अवजारे आता थेट शेतातून घेऊन जाता येणार
शेतीतील वाद मिटवण्यासाठी या रस्त्याची नोंद सातबारा उताऱ्यावर 90 दिवसात करण्याचे शासनाचे आदेश जारी
महसूल मंत्र्यांकडून ऐतिहासिक निर्णय
बार्शी : तालुक्यातील कोरेगाव येथे उडीद पिकाचे मान्सूनपूर्व पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे ऐन काढणीला आलेल्या उडीद पिक मातीमोल झालं आहे. बार्शी तालुक्यातील कोरेगाव मधील शेतकरी रमेश वसंत काळे यांनी आपल्या शेतात सव्वा एकर क्षेत्रावर उन्हाळी उडीद पिक घेतले होते. उन्हाळ्यात प्रचंड कष्ट घेऊन, पिकाला नियमित पाणी पुरवठा केला, फवारणी करून त्यांनी उडीद पिक पूर्ण जोमात आणले होते. मात्र, बार्शी तालुक्यात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून सुरू असलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे काढणीला आलेल्या उडीद पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने याची लवकरात लवकर दखल घेत पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
सिंधुदुर्ग : तळकोकणात आज ऑरेंज अलर्ट असून रात्रभर मुसळधार पावसाने झोडपून काढला. सकाळपासून पावसाने उसंत घेतली असून आता पावसाची संततधार सुरू आहे. समुद्र खवळलेल्या स्थितीत असून किनाऱ्यावर २ ते ३ मीटर उंचीच्या लाटा उसळत आहेत. पुढील तीन दिवस सिंधुदुर्गात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. वेंगुर्ले तालुक्यातील गेले चार दिवस वीज पुरवठा खंडित आहे.
धुळे : महाराष्ट्र राज्य विधान मंडळाची अंदाज समिती तीन दिवसाच्या धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आली असून गुलमोहर शासकीय विश्रामगृहात सापडलेल्या कोट्यावधी रुपयांच्या घटनेनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आज या अंदाज समितीची धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात बैठक होणार आहे. अंदाज समितीचे 11 सदस्य आणि जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान काल रात्री उशिरापर्यंत अर्जुन खोतकर यांचे स्विय सहाय्यक किशोर पाटील यांची पोलीस अधीक्षकांकडून चौकशी करण्यात आली आहे.
बांग्लादेशी व रोहिंग्यांना महसूल विभागाचा मोठा दणका
बोगस जन्मदाखले परत घेण्यासाठी सरकार आक्रमक
रद्द केलेली सर्व जन्म प्रमाणपत्र शासनाकडे जमा करा
जन्म प्रमाणपत्र देताना महसूल विभागाने एसओपीचा वापर करावा
महसूल सोबत सार्वजनिक आरोग्य, नगरविकास व पोलीस विभागाने संयुक्त कार्यवाही करावी
अपर मुख्य सचिव दर १५ दिवसांनी घेणार आढावा
रायगड जिल्ह्यात आज सर्वत्र आकाशात ढगाळ वातावरण असून रायगड जिल्ह्याला आज हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला असून . समुद्र किनारी भागालगत असणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पावसाची अद्याप सुरुवात नसली तरी आकाशात मात्र ढगाळ वातावरण असल्यामुळे पावसाची चाहूल असल्याची चिन्हे दिसत आहेत. समुद्रात देखील मोठ्या लाटा उसळल्या असून मासेमारी करणाऱ्या मच्छीमार बांधवांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सलग 10 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने घेतली काहीशी विश्रांती
1 ते 22 मे या कालावधीत सोलापूर जिल्ह्यात ११६ मिमी पावसाची नोंद
या मान्सूनपूर्व पावसाने सोलापूर जिल्ह्यातील 142 गावात नुकसान
यामध्ये वीज पडून दोन व्यक्तींचा तर 57 जनावरांचा मृत्यू
जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अहवालनुसार में महिन्यात एकूण 80 घरांची पडझड झाली असून 630 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान
6 मे रोजी माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथील करिष्मा विकास तांबवे यांचा तर 19 मे रोजी माढा तालुक्यातील बाळासाहेब माणिक पाटील यांचा वीज अंगावर पडल्याने मृत्यू
1 ते 22 मे दरम्यान पडलेल्या अवकाळी पावसामुळे आणि वीज पडल्याने जिल्ह्यातील 14 लहान तर 43 मोठे अशा एकूण 57 पशुधन दगावले
याशिवाय 80 घरांची अंशतः पडझड झाली.
तसेच 1557 शेतकऱ्यांचे 630 हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष, आंबा यासारख्या पिकांचे नुकसान झाले.
दरम्यान ही प्राथमिक अहवालतील माहिती असून नुकसानीचे पंचनामे करुन तत्काळ संबंधितांना मदत मिळवून देण्याचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी प्रशासनाला दिले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार बीडचे पालकमंत्री आहेत.. चार दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी जिल्हा नियोजन समितीचे बैठक घेतली.. या बैठकीतून जिल्ह्यातील अनेक विषयांसह शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केलेल्या मागण्या देखील पूर्ण करण्यात आल्यात.. शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी अजित पवार यांचे आभार मानणारे बॅनर लावल्याने चर्चेचा विषय ठरला आहे. एकीकडे अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असताना या बॅनरचा राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. सध्या बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तीन आमदार असून शरद पवार गटाचे संदीप क्षीरसागर हे एकमेव आमदार आहेत..
मुंबईत पालिका निवडणुकीसाठी भाजपकडून मिशन १५० राबवलं जाणार
मुंबई महापालिका जिंकणं हा भाजपचा प्रयत्न
युतीमध्ये असताना अनेक वर्ष शिवसेनेकडे सत्ता
देशाचं आर्थिक केंद्रबिंदू भाजप ताब्यात घेण्याचा प्रयत्न करणार
दोडामार्ग तालुक्यातील वझरे तळेखोल विर्डी मार्गावरील हळदीचा गुंडा येथील नदीवर नवीन पुलाचे बांधकाम सुरू होते. यासाठी पुलाच्या बाजूने वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग काढण्यात आला होता. सतत कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे पर्यायी मार्गच वाहून गेल्याने ग्रामस्थांची तारांबळ उडाली आहे. रस्ताच वाहून गेल्यामुळे तळेखोल, विर्डी या गावांचा संपर्क तुटल्याने लोकांचे मोठे हाल होत आहेत.
धाराशिव जिल्ह्यातील 7 मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये 81 मिलिमीटर एवढ्या सर्वाधिक पाऊसाची नोंद ही माकणी मंडळात झाली असून धाराशिव शहरात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. जिल्ह्यात गेल्या 8 दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे आंब्यांच्या बागा, केळीच्या बागा, भाजीपाल्याचे अतोनात नुकसान होत आहे. या पावसासह वादळी वाऱ्यामुळे विद्युत खांब पडणे, तारा तुटण्याचे प्रकार समोर येत असून त्यामुळे अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडित होत आहे. काल रात्री देखील जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.
भारतीय हवामान विभागाकडून दिनांक 22.5.2025 रोजीच्या अंदाजानुसार दिनांक 22 ते 26 मे दरम्यान जिल्ह्यात किनारी भागात आणि काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसाह मुसळधार ते अतिमुसळधार पर्जन्यमान होण्याची शक्यता आहे. दिनांक 22 ते 26 मे दरम्यान 45-50 किमी प्रतितास ते 55 किमी प्रतितास या वेगाने वारे वाण्याची शक्यता आहे. त्यामुळे दि. 23 मे रोजी रात्रीपर्यंत समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता आहे. 24 मे ते 26 मे दरम्यान अति खवळलेला राहण्याची शक्यता आहे.
संपूर्ण राज्याला हादरवणाऱ्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकऱणी पोलिसांनी अखेर सासरा राजेंद्र हगवणेला अटक केलीय. त्याचसोबत वैष्णवीचा दीर सुशीललाही अटक झालीय. वैष्णवीने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्यावर सात दिवसांपासून राजेंद्र आणि सुशील मोकाट होते. पोलीस त्यांचा शोध घेत होते.
पुढील ६-७ दिवस पश्चिम किनाऱ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता. दक्षिण कोकण-गोवा किनाऱ्यापासून पूर्वमध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार.
रत्नागिरी, रायगडसह साताऱ्यातील घाट परिसरात पावसाचा रेड अलर्ट जारी...तर सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता
बीडच्या आष्टी तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी. पावसामुळे नदी आणि नाल्यांना पूरसदृश परिस्थिती.
धाराशिवमध्ये भर उन्हाळ्यात पावसाची हजेरी. धाराशिवला चार ते पाच दिवसापासून अवकाळीचा मोठा तडाखा.पावसामुळे शेतामध्ये पाणी साचलं, शेतकऱ्यांची मशागतीची कामं ठप्प.
मांडवा ते मुंबई या मार्गावरील प्रवासी जलवाहतूक सेवा सोमवारपासून म्हणजेच येत्या 26 मे पासून बंद राहणार आहे. सध्या सुरू असलेल्या खराब वातावरणामुळे मेरिटाइम मंडळाकडून जलवाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मांडवा-मुंबई जलमार्गाबरोबरच जंजिरा किल्ल्यात जाणारी जलवाहतूक सेवादेखील साधारण 30 सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, भाऊचा धक्का ते मांडवा रो-रो सेवा, करंजा ते रेवस, आगरदंडा ते दिघी ही प्रवासी जलवाहतूक सुरू राहील, असे मेरिटाइम मंडळाकडून सांगण्यात आले आले आहे. दरवर्षी पावसाळा 7 जूननंतर सक्रिय होतो, मात्र यंदा लवकर पाऊस दाखल होणार असल्यामुळे ही प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आली आहे.
राज्यात मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली असताना, मुंबईत मात्र पहिल्याच पावसात सखल भागात पाणी साचल्याच्या घटना समोर
मुंबईत मान्सून पूर्वी नालेसफाई ही फक्त ६५ % झाल्याचे पालिकेकडून स्पष्ठ
त्यामुळे येत्या काळाता मुंबईत पावसाने जोरदार बॅटींग केल्यास पून्हा मुंबईची तुंबई होणार ?
पालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार एकूण फक्त ६५ % नाले सफाई मुंबई महानगर पालिकेकडून करण्यात आल्याचं म्हटलं आहे
यात शहरी भागात ७०.६९ %, पूर्व उपनगरात ८६.८७%, पश्चिम उपनगरात ८८.६९%, नाल्यांची साफ सफाई झालेली आहे
तर मिठी नदीची सफाई ही फक्त ५०.३७ % झालेली आहे.
आधीच यंदा चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली असताना मुंबई महानगर पालिकेकडून तयारी असणे अपेक्षित असताना
मुंबई महानगर पालिकेकडून अपेक्षित कामचं झालेली नसल्याची टिका होतं आहे
काही दिवसांपूर्वी भाजप नेते आशिष शेलार यांनीही २० मे पर्यंतची डेड लाईन असताना काम पूर्ण न झालेल्या रस्त्यांच्या कामावर प्रश्न उपस्थित केले होते
अशात आज स्वत: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईतील रस्त्यांची पाहणी करणार आहेत
इतकच काय तर माजी नगरसेवकांच्या बैठकित पालिकेकडून प्रलंबित प्रश्नांचा पाडाचं या नगरसेवकांनी शिंदेंसमोर वाचत नाराजी नोंदवली
त्यामुळेच येत्या दोन दिवसात एकनाथ शिंदेंकडून पालकमंत्री या नात्याने मान्सूर पूर्व आढावा बैठक घेतली जाणार आहे
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Breaking LIVE Updates: रत्नागिरी, रायगडसह साताऱ्यातील घाट परिसरात पावसाचा रेड अलर्ट