Maharashtra Breaking Live Updates: एसटी महामंडळाची आर्थिक संकटावर श्वेतपत्रिका जाहीर, महसूल वाढवण्याची व खर्च कमी करण्याची उपाययोजना
Maharashtra Breaking Live Updates: अमेरिकेला प्रत्युत्तर देण्याची वेळ आमचं लष्कर ठरवेल असा इशारा इराणचा संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत देण्यात आला आहे.
पार्श्वभूमी
Maharashtra Breaking Live Updates: इराण आणि इस्रायलमधील युद्धाचा आज 11 वा दिवस आहे. तेल अवीव, हैफासह इस्रायलच्या अनेक शहरांवर जोरदार बॉम्बहल्ला करण्यात आला. तर इस्रायलकडून जोरदार प्रत्युत्तर सुरूच आहे. अमेरिकेला...More
कराड : राज्य सरकारने दिलेला शब्द पाळला पाहिजे. राज्याची परिस्थिती योग्य नाही, शेतकऱ्यांना जेव्हा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. त्यावेळेस राज्याची परिस्थिती योग्य होती म्हणून दिले होते का? आता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अभ्यास कसला करता राज्याची परिस्थिती चांगली असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे. तसेच शहरांमध्ये मेट्रो बुलेट ट्रेन बांधायला सरकारकडे पैसा आहे. परंतु शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी फक्त 25 ते 30 हजार कोटी लागणार आहेत. त्यासाठी सरकार तयार नाही जर आमच्या मागण्याकडे शासनाने लक्ष दिले नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहोत, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला.
सोलापूर : तस्करी करण्यासाठी वाघाची कातडी आणि हस्तिदंतजवळ बाळगणाऱ्या टेंभुर्णीतील एका व्यापाऱ्यास सोलापूर नियंत्रण कक्ष आणि टेंभुर्णी पोलीसांनी संयुक्त कारवाई करीत अटक केली आहे. टेंभुर्णीतील कलर व्यापारी अमोल विजयकुमार शहा यांच्याकडून वाघाची कातडी व हस्तिदंत जप्त करीत पोलिसांनी त्यास अटक केली आहे. या कारवाईने माढा परिसरात खळबळ उडाली असून वन्य प्राण्यांच्या अवयवांची तस्करी करणारे मोठे रॅकेट पोलिसांच्या तपासातून उघड होण्याची शक्यता आहे.
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) आपल्या आर्थिक संकटावर एक श्वेतपत्रक जाहीर केले असून, या श्वेतपत्रकात सध्याच्या आर्थिक स्थितीची स्पष्ट मांडणी करत संभाव्य उपाययोजनांची रूपरेषा दिली आहे. या दस्तऐवजानुसार, गेल्या ४५ आर्थिक वर्षांपैकी केवळ ८ वर्षांमध्येच महामंडळाने नफा मिळवला असून, उर्वरित वर्षांमध्ये सातत्याने तोटा झालेला आहे.
हे श्वेतपत्रक सर्वसामान्य नागरिक, शासन, कर्मचाऱ्यांसह इतर भागधारकांना MSRTC ची आर्थिक स्थिती पारदर्शकपणे समजावून देण्याच्या हेतूने प्रसिद्ध करण्यात आले आहे. यात आगामी धोरण निर्णय, खर्चकपात योजना, तसेच महसूल वाढ व प्रवासी सेवांमध्ये सुधारणा करण्याचे नियोजन नमूद करण्यात आले आहे. महामंडळाच्या शाश्वत प्रगतीसाठी श्वेतपत्रकात महसूल वाढवणे, खर्च कमी करणे व प्रवाशांच्या सुरक्षिततेसह सोयी-सुविधा वाढवण्यावर भर देण्यात आला आहे.
मुंबई : पंधरा दिवस उलटून देखील मुंब्रा रेल्वे अपघाताचा अहवाल अपूर्ण आहे. मध्य रेल्वेने मुंब्रा येथील अपघात कसा झाला? याचे कारण शोधण्यासाठी एक समिती स्थापन केली होती. ज्या समितीत पाच कनिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या समावेश होता. अजूनही या समितीकडून मुंब्रा अपघात का झाला? याचे कारण काय? या संदर्भात चौकशी सुरूच आहे. हा अहवाल पूर्ण करण्यासाठी आणखीन काही दिवस लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंब्रा येथील अपघातात 5 जणांचा मृत्यू झालाय, तर अजूनही काही जखमींवर उपचार सुरू आहेत.
Pune News : पुणे रेल्वे स्टेशनला श्रीमंत थोरले बाजीराव यांचे नाव द्या, अशी मागणी खासदार मेधा कुलकर्णी यांनी केली आहे. पुणे शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. म्हणून रेल्वे स्टेशनला थोरले बाजीराव यांचे नाव देण्यात यावे, असे त्यांनी म्हटले आहे.
मुंबई : कोकण किनारपट्टीला आज सायंकाळी 5-30 पासून दिनांक 25 जूनच्या रात्री 8-30 वाजेपर्यंत भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (आय.एन.सी.ओ.आय.एस.) तर्फे उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे. लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. तर राज्यात पुढील 24 तास रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह पुणे घाट आणि सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. राज्यातील पूर परिस्थिती नियंत्रणात असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने कळविले आहे.
वाशिम : दीर्घ विश्रांतीनंतर वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे खरिपातील पिकांना नवसंजीवनी मिळाली असून खोळंबलेल्या पेरणीला वेग येणार असल्याचं चित्र आहे. मात्र, जिल्ह्यातील इतर तालुक्यात दमदार पावसाची प्रतीक्षा शेतकरी करत आहेत.
नंदुरबार : जिल्ह्यातील सातपुडा पर्वत रांगेत मुसळधार पाऊस सुरु आहे. महाराष्ट्र आणि गुजरातला जोडणाऱ्या पिंपळखुटा गावानजीक असलेल्या पुलावरून पाणी गेले आहे. हाकडी नदीच्या पुलावरून पाणी जात असल्याने मार्गावर वाहतूक बंद करण्यात आली आहे. सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सातपुड्याचा नद्यांना पूर आला आहे हाकडी नदीला पुरामुळे मोलगी आणि पिंपळखुटा या भागातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. गेल्या 6 वर्षांपासून पुलाची दुरावस्था असल्याने पावसाळ्यात जीव धोक्यात घालून नागरिकांना प्रवास करावा लागत आहे.
Kalyan News : कल्याण पूर्वेतील पुना लिंक रोडवरील शिवांगी अपार्टमेंटमध्ये आज अचानक एक नारळाचं झाड पार्किंगमध्ये कोसळले. या घटनेत तिथे उभ्या असलेल्या तीन वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
बीड : मान्सूनपूर्व पावसानंतर माजलगाव तालुक्यात खरिपाच्या पेरण्या करण्यात आल्या. मात्र जून महिन्यात पावसाने उघडी घेतल्यानंतर पेरणीसाठी शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. माजलगाव तालुक्यात केवळ 33 टक्केच पेरण्या करण्यात आल्या आहेत. माजलगाव तालुक्यात 78 हजार 778 हेक्टर इतके खरिपाचे क्षेत्र आहे. यापैकी 20 हजार 325 हेक्टर वर 16 जून पर्यंत खरिपाची पेरणी करण्यात आली आहे. मे महिन्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र पुढे पावसाचा जोर कमी झाल्याने अद्यापही उर्वरित क्षेत्रावर पेरण्या बाकी आहेत. त्यातच गेल्या दहा दिवसापासून पाऊस नसल्याने पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे खते बियाणे पेरणीसाठी वापरल्याने आता पेरणी केलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. पाऊस पडल्यावर पेरणी करावी असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
- नाशिकच्या द्वारका सर्कलचा विषय नितीन गडकरींच्या दरबारी...
- कळंबोली जंक्शनच्या धर्तीवर होणार विकसित ...
- नाशिकच्या द्वारका चौकात होणार दोन अंडर बायपास...
- द्वारका ते नाशिक रोड पर्यंत सहा लेन विथ फूटपाथ करण्याचा निर्णय ...
- काल आमदार देवयानी फरांदे यांनी घेतली नितीन गडकरी यांची भेट ...
- आगामी कुंभमेळ्याच्या अगोदर आणि नंतर अशी दोन टप्प्यात होणार कामे ...
- सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अखेरपर्यंत बहुचर्चित नाशिक रोड ते द्वारका उड्डाणपूल होण्याची शक्यता ...
- आमदार देवयानी फरांदे यांची माहिती
यवतमाळ : जिल्हा परिषद, नगरपालिका, सर्व शाळांची नवीन शैक्षणिक सत्रासाठी पहिली घंटा आज वाजली. प्रवेशित विद्यार्थ्यांना आनंददायी वातावरण अनुभवता यावे, यासाठी प्रवेशाेत्सव साजरा करण्यात आला. यवतमाळ तालुक्यातील तिवसा येथील आदर्श जिल्हा परिषद शाळेत जिल्हाधिकारी विकास मिना यांनी हजेरी लावली. शाळा सजवण्यात आली होती. विद्यार्थ्यांना पुष्पगुछ, मोफत पुस्तके, गणवेश देऊन स्वागत करण्यात आले. याच शाळेला मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा पुरस्कार देखील मिळाला आहे. जिल्हाधिकारी मिना यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला.
गेल्या 41 वर्षापासून तहानलेल्या बांधवांना आता 31 डिसेंबर 2026 पूर्वी पाणी द्या या मागणीसाठी शरद पवार गटाचे आमदार उत्तमराव जानकर यांनी आज शिंगोर्णी ते शिंगणापूर अशी संघर्ष यात्रेची सुरुवात करीत शासनाविरुद्ध एल्गार पुकारला आहे. आज सकाळी शिंगोर्णी येथून या संघर्ष यात्रेला सुरुवात झाली आहे. शेकडो दुष्काळी शेतकऱ्यांसमवेद निघालेली ही संघर्ष यात्रा 29 जून रोजी शंभर किलोमीटरचे अंतर पायी पार करीत शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाच्या मंदिरात पोहोचणार आहे.
नीरेचे पाणी माळशिरस तालुक्यातील कायम दुष्काळी असणाऱ्या बावीस गावांना मिळावे या मागणीसाठी ही संघर्ष यात्रा सुरू करण्यात आली असून आजवर या भागातील जनता पाण्यासाठी वर्षानुवर्ष वणवण फिरत असल्याचे जानकर यांनी सांगितले. या दुष्काळी भागात जवळपास 55 हजार नागरिक तहानलेले असून 80 हजार हेक्टरला पाणी मिळणार आहे. 2600 कोटी रुपयांची ही योजना शासनाने मंजूर केली असली तरी त्याला निधीच पुरेसा मिळत नसल्याने आता एका वर्षात हा संपूर्ण निधी द्यावा आणि आमची तहान भागवावी असा आक्रमक पवित्रा आमदार उत्तम जानकर यांनी घेतला आहे. गोसेखुर्द प्रकल्पाला 32 हजार कोटी देता मग आमच्या भागातील योजनेसाठी 2600 कोटी देणे काय अवघड आहे असा सवाल जानकर करीत आहेत.
आमदार उत्तम जानकर यांच्या प्रमुख मागण्या
१) पुढच्या पंधरा दिवसात शिंगोर्णी पर्यंतच्या 16 गावांचा यात समावेश करा ...
२) पुढच्या शंभर दिवसात या संपूर्ण योजनेची निविदा काढा
३) 31 डिसेंबर 2026 पूर्वी आमच्या शिवारात पाणी येऊ द्या
धाराशिवच्या परंडा इथं भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू तर सहा ते सात जन गंभीर जखमी
ड्रायव्हरचा ताबा सुटल्याने पिकअप पलटी होऊन अपघात, अपघातात महिलेचा मृत्यू
जखमींना बार्शी येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी करण्यात आले दाखल
नातेवाईकांच्या अंत्यविधीच्या कार्यक्रमाला जात असताना अपघात
तांबेवाडी चौकातून भूमकडे जात असताना अर्धा किलोमीटर अंतरावर अपघात
धाराशिवच्या परंडा इथं भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू तर सहा ते सात जन गंभीर जखमी
ड्रायव्हरचा ताबा सुटल्याने पिकअप पलटी होऊन अपघात, अपघातात महिलेचा मृत्यू
जखमींना बार्शी येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी करण्यात आले दाखल
नातेवाईकांच्या अंत्यविधीच्या कार्यक्रमाला जात असताना अपघात
तांबेवाडी चौकातून भूमकडे जात असताना अर्धा किलोमीटर अंतरावर अपघात
धाराशिवच्या परंडा इथं भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू तर सहा ते सात जन गंभीर जखमी
ड्रायव्हरचा ताबा सुटल्याने पिकअप पलटी होऊन अपघात, अपघातात महिलेचा मृत्यू
जखमींना बार्शी येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी करण्यात आले दाखल
नातेवाईकांच्या अंत्यविधीच्या कार्यक्रमाला जात असताना अपघात
तांबेवाडी चौकातून भूमकडे जात असताना अर्धा किलोमीटर अंतरावर अपघात
धाराशिवच्या परंडा इथं भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू तर सहा ते सात जन गंभीर जखमी
ड्रायव्हरचा ताबा सुटल्याने पिकअप पलटी होऊन अपघात, अपघातात महिलेचा मृत्यू
जखमींना बार्शी येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी करण्यात आले दाखल
नातेवाईकांच्या अंत्यविधीच्या कार्यक्रमाला जात असताना अपघात
तांबेवाडी चौकातून भूमकडे जात असताना अर्धा किलोमीटर अंतरावर अपघात
Beed Crime: सायबर गुन्हेगारांनी आता ज्येष्ठ नागरिकांना टार्गेट ठेवले आहे.. बीड जिल्ह्यात मागील पाच महिन्यात 50 ज्येष्ठ नागरिकांना फसविल्याची बाब समोर आली आहे.
जानेवारी ते मे 2025 या पाच महिन्यांच्या कालावधीत आर्थिक फसवणुकीच्या 50 प्रकरणातून नागरिकांनी एक कोटी 71 लाख रुपये गमावले आहेत. यापैकी 89 हजार रुपये परत मिळवून देण्यास सायबर विभागाला यश आल आहे.
बनावट बँक अधिकारी, लॉटरी बक्षीसाचे आमिष, केवायसी अपडेट, वीज बिल थकबाकी, बनावट मेसेज आणि सोशल माध्यमावर मैत्री करून होणारी आर्थिक फसवणूक हे मुख्य प्रकार यात समोर आले आहेत.
तंत्रज्ञानाशी कमी परिचय नवीन गोष्टी शिकण्यास अनिच्छा आणि सहज विश्वास ठेवण्याच्या वृत्तीमुळे ज्येष्ठ नागरिक सायबर भामट्यांना लवकर बळी पडतात. दरम्यान ज्येष्ठ नागरिकांनी सायबर गुन्हेगारांपासून सावध राहावे. तसेच फसवणूक झाल्यास त्वरित 1930 या हेल्पलाइनवर संपर्क साधावा असे आवाहन बीड पोलिसांनी केले आहे.
समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी पंढरपूरची वारी व नमाज पठण अशी तुलना करत एक विधान केले..या वक्तव्याचा मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी समाचार घेतला..पुन्हा बोलशील तर तिथे स्वर्गीय रमेश वांजळे यांची आठवण करून दिली जाईल असा धमकीवजा इशारा दिला.. तर मालेगाव मध्यचे माजी आमदार आसिफ शेख यांनी औरंगजेब यांच्याविषयी एक वक्तव्य केले..त्या वक्तव्याबद्दलही माजी आमदार आसिफ शेख यांना खडे बोल सुनावत औरंगजेबाचे लांगुलचालन केले जाणार नाही असा इशारा दिला...
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांना जाब विचारण्यासाठी शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बँकांची शाळा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ज्यात मराठवाडा स्तरावर शिवसैनिक बँकांवर धडक देणार आहे. आज सकाळी ११ वाजता बँकांची शाळा हा उपक्रम मराठवाडा स्तरावर राबविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी पीक कर्जासाठी बँकांकडे अर्ज केलेले असून ,मंजुरीसाठी बँका शेतकऱ्यांकडे सिबिल व थकबाकी मागवत आहे. त्यामुळे बँक व्यवस्थापक यांना या संबंधित बाबींवर जाब विचारण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना कर्ज मिळवून देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली.
बीड: आदिशक्ती संत मुक्ताईंची पालखी दोन दिवस बीडमध्ये मुक्कामी आहे.. शहरातील माळवेस भागातील हनुमान मंदिरात पालखीचा मुक्काम झाल्यानंतर पालखी पुढे मार्गस्थ होत आहे. आज बीड शहरातील बालाजी मंदिरात पालखीचा मुक्काम असेल...
काल बीडमध्ये मुक्ताईंची पालखी दाखल झाल्यानंतर मोठ्या उत्साहात बीडकरांनी स्वागत केले.. कालचा मुक्काम झाल्यानंतर आणखी एक मुक्काम हा बीडमध्ये असणार आहे.. उद्या आजोबा गोविंद पंत आणि मुक्ताई या आजोबा नातीची भेट झाल्यानंतर पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होईल.
मुक्ताईंच्या पालखीचा साडेसहाशे किलोमीटरचा प्रवास आणि 23 मुक्काम ठिकठिकाणी आहेत.. आज 17 वा मुक्काम बीडमध्ये होतोय. आजोळी मुक्कामी असणाऱ्या मुक्ताईच्या दर्शनासाठी बीडकरांची गर्दी आहे..
पुणे - सिंगापूर विमानसेवा १५ जुलै पर्यंत स्थगित
एयर इंडियाच्या विमानांची तपासणी होणार
अहमदाबाद विमान अपघातानंतर नागरिक वाहतूक महासंचालनालयाने प्रवासी सुरक्षेसाठी उचलले कठोर पावलं
पुणे - सिंगापूर एअर इंडियाच्या ताफ्यातील बोईंग आणि इतर विमानांची तपासणी होणार
दिल्ली- पुणे- सिंगापूर अशी विमानसेवा आहे. यात आता स्थगिती दिल्याने दिल्ली- पुणे विमानप्रवासादेखील फटका बसलाय
सोमवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि रविवार या दिवशी पुणे-सिंगापूर विमानसेवा आहे
एअर इंडियाने तिकीटांचा परतावा दिलाय मात्र प्रवाशांना फटका बसलाय
- नाशिक शहर आणि परिसरात संततधार पाऊस सुरूच
- गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील पाणीसाठा 43 टक्क्यांवर
- जून महिन्यातच नाशिक जिल्ह्यातील पाणीसाठा 43 टक्क्यांवर झाल्याने समाधान व्यक्त...
- गेल्या वर्षी याच वेळी जिल्ह्यातील पाणीसाठा फक्त 5 ते 6 टक्क्यांवर होता...
- सतत सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गंगापूर, दारणा, नांदूरमध्यमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच...
- गंगापूर धरणातून 4 हजार क्युसेक पाण्याचा सुरू आहे विसर्ग..
- गंगापूर धरणातून गोदावरी नदीत सुरू असलेल्या पाण्याचा विसर्गामुळे गोदावरी नदीची पूर सदृश्य परिस्थिती कायम
अहिल्यानगरहून छत्रपती संभाजीनगरकडे गोदावरी दूध घेऊन येणाऱ्या गाडीला भरधाव आयशर ट्रकने जोरदार धडक दिल्याची घटना एएस क्लब चौकात घडली. ही दुर्घटना पहाटे साधारणतः २ वाजेच्या सुमारास घडली असून, यात गाडीचे आणि दूध पुरवठ्याचे मोठे नुकसान झाले आहे. घटना सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाली आहे
अकोले तालुक्यातील हरिश्चंद्रगड, रतनगडासह सांदणदरी ही पर्यटन स्थळे वन्यजीव विभागाने पर्यटकांसाठी बंद केली आहेत.. सध्या भंडारदरा, हरिश्चंद्रगड परिसरात जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत.. सांदण दरीत पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी येत असते. पावसाबरोबरच येथे मोठ्या प्रमाणावर धुकेही पडत असते. अशा परिस्थितीत पर्यटकांना कुठलाही धोका होऊ नये म्हणून नाशिक वन्यजीव विभागाने ही पर्यटन स्थळे पर्यटनासाठी बंद केली आहेत... कोणी या पर्यटन स्थळी जाण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे..
ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावरती वाहतूक कोंडी...
माजीवाडा, नितीन कंपनी,आनंद नगर जकात नाका या ठिकाणी झाली वाहतूक कोंडी...
मोठ्या प्रमाणात वाहनांच्या लांबचा लांब रांगा...
वाहतूक कोंडी मुळे होत आहे वाहन चालका त्रास..
Sangli News: साधना भोसले ही बारावीमध्ये शिक्षण घेत होती. डॉक्टर बनण्याचे तिसचे स्वप्न होते. तिचा नीटच्या चाचणी परिक्षेत कमी गुण मिळाले होते. त्यामुळे तिचे वडील मुख्याध्यक धोंडीराम भोसले हे संतापले होते. साधना ही आपटपाडीमधील विद्यालयात राहत होती. दोन दिवसांपूर्वी ती घरी नेलकरंजी येथे गेली होती. त्यावेळी नीट परिक्षेच्या चाचणी परिक्षेत कमी गुण मिळाल्याने तिला मुख्यापध्यापक पित्याने जात्याच्या लाकडी खुंट्याने रात्री बेदम मारहाण केली होती. त्यामध्ये ती गंभीर जखमी झाले होती. परंतु त्यानंतर तिला रुग्णालयात उपचारासाठी न नेता दुसर्या दिवशी सकाळी ते योग दिन साजरा करण्यासाठी शाळेत निघून गेले. साधनाचे वडील घरी आल्यानंतर त्यांना साधना बेशुद्ध अवस्थेत दिसून आली. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. साधना ही हुशार होती. तिला दहावीमध्ये 95 टक्के गुण मिळाले होती. डॉक्टर बनण्याचे तिचे स्वप्न होते. परंतु केवळ नीटच्या चाचणी परिक्षेत कमी गुण मिळाले म्हणून मुख्याध्यापक वडिलांकडूनच झालेल्या मारहाणीत तिचा हकनाक बळी गेलाय. याप्रकरणी धोंडीराम भोसले याला आटपाडी पोलिसांनी अटक केलीये.
गोरेगाव फिल्म सिटी मध्ये आग
अनुपमा या मालिकेच्या सेट वर आग लागल्याची माहिती
अग्निशामक दलाची तुकडी घटना स्थळी
आग आटोक्यात आणण्यात यश
मोटरमनच्या केबिनमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे काम सुरु
लोकलमध्ये सुरक्षितता वाढवण्यासाठी मध्ये आणि पश्चिम रेल्वे मोटरमनच्या केबिनमध्ये सीसीटीव्ही बसवण्याच्या कामाला सुरुवात
मतदार रेल्वेच्या 25 लोकलमध्ये तर पश्चिम रेल्वेच्या 26 लोकांमध्ये यंत्रणा बसवण्यात आली
मुंब्रा लोकल दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाकडून सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याला गती
सीसीटीव्ही यंत्रणेमुळे अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होईल
मध्य रेल्वे मोटरमन चा या यंत्रणेला विरोध होता मात्र मुंब्रा रेल्वे दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाचा सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याच्या कामाला वेग
बुलढाणा: उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर विदर्भातील शाळांचे शैक्षणिक सत्र आज पासून सुरू होत आहे त्यामुळे शाळेचा आज पहिलाच दिवस.... शिक्षण मंत्री दादा भुसे हे आज बुलढाणा जिल्ह्यातील सीनगाव जहांगीर या गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा स्वागत करणार आहे शाळेचा पहिला दिवस असल्याने विद्यार्थ्यांमध्येही खुद्द राज्याचे शिक्षण मंत्री आपलं स्वागत करायला येणार असल्यामुळे मोठा उत्साह बघायला मिळत आहे यासोबतच शाळा सजवण्यात आली असून गावातील नागरिक व शिक्षकांमध्ये ही मोठ्या प्रमाणात उत्साह बघायला मिळत आहे.
भंडारा: मागील 9 वर्षांपासून न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेली भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम अखेर घोषित झाला. भंडाऱ्याच्या सहकार क्षेत्रातील मोठी निवडणूक म्हणून बँकेच्या निवडणुकीकडं बघितल्या जातं. या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्याची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 21 संचालक निवडून देण्यासाठी1056 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार असून या निवडणुकीसाठी आजपासून 27 जूनपर्यंत नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. 27 जुलैला मतदान होणार असून 28 जुलैला मतमोजणी होणार आहे. सहकार क्षेत्राच्या या निवडणुकीकडं आता भंडारा जिल्ह्याततील सर्वच पक्षांच्या दिग्गज नेत्यांची धावपळ बघायला मिळणार आहेत.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठ्यात गेल्या आठवड्यातील पावसामुळे चांगलीच वाढ झालीय..
सातही धरणात मिळून २६.८४ टक्के पाणीसाठा जमा झाला..
गेल्या तीन वर्षातील जून महिन्यातील हा सर्वाधिक साठा.
पाणीसाठ्यात चांगली वाढ झाल्यामुळे राखीव साठ्याचा वापर बंद करण्यात आला आहे.
दोन ते तीन दिवसात मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठ्यात १८ टक्क्यांनी वाढ झालिये
त्यामुळे मुंबई पालिकेची जून महिन्यातील पाण्याची चिंता मिटली.
आज वर्षावर रात्री 9 वाजता त्रिभाषा सूत्रीसंदर्भात महत्त्वाची बैठक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक
मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सचिव बैठकीला राहणार उपस्थितीत
हिंदी भाषेला मनसे तसेच सामाजिक कार्यकर्ते, लेखक आणि साहित्यिकांचा विरोध
सरकार आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता
उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर विदर्भातील शाळांचे शैक्षणिक सत्र आज पासून सुरू होत आहे त्यामुळे शाळेचा आज पहिलाच दिवस.... शिक्षण मंत्री दादा भुसे हे आज बुलढाणा जिल्ह्यातील सेनगाव जहांगीर या गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा स्वागत करणार आहे शाळेचा पहिला दिवस असल्याने विद्यार्थ्यांमध्येही खुद्द राज्याचे शिक्षण मंत्री आपलं स्वागत करायला येणार असल्यामुळे मोठा उत्साह बघायला मिळत आहे यासोबतच शाळा सजवण्यात आली असून गावातील नागरिक व शिक्षकांमध्ये ही मोठ्या प्रमाणात उत्साह बघायला मिळत आहे
मुंबईसह ठाणे आणि पालघरमध्ये पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज...उर्वरित भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसण्याची शक्यता...
संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दिवेघाट पार केल्यानंतर आज सासवड मुक्कामी, संत तुकाराम महाराजांची पालखी आज लोणी काळभोरहून पुढे मार्गस्थ होणार
अमेरिका-इस्रायल-इराण युद्धामुळं कच्चं तेल भडकलं, बॅरलचा भाव ८८ डॉलर्सवर..इराणनं होर्मुजची सामुद्रधुनी केल्यानंतर अमेरिका म्हणाली ही तर आर्थिक आत्महत्या, आमच्यावर परिणाम होणार नाही असं भारताचं स्पष्टीकरण...
अमेरिकेला प्रत्युत्तर देण्याची वेळ आमचं लष्कर ठरवेल, इराणचा संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत इशारा, अमेरिका म्हणाली प्रतिहल्ला कराल तर तुमचा विनाश झालाच समजा...
इराण आणि इस्रायलमधील युद्धाचा ११ वा दिवस.. अमेरिकेच्या हल्ल्याने खमेनी संतप्त. तेल अवीव, हैफासह इस्रायलच्या अनेक शहरांवर जोरदार बॉम्बहल्ला. इस्रायलकडून जोरदार प्रत्युत्तर सुरूच...
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Breaking Live Updates: एसटी महामंडळाची आर्थिक संकटावर श्वेतपत्रिका जाहीर, महसूल वाढवण्याची व खर्च कमी करण्याची उपाययोजना