मुंबई : महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकांचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आजची शेवटची तारीख आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांसाठी आज कसरतीचा दिवस आहे.


मुंबई आणि ठाण्यात शिवसेना तसंच भाजपला मोठ्या प्रमाणात बंडखोरीचा सामना करावा लागत आहे. ठाण्यात तर भाजपला तब्बल 22 बंडखोरांनी आव्हान दिलं आहे. तर पुणे, नाशिक आणि नागपूरातही मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली आहे.

त्यामुळे आज महापालिका आणि जिल्हा परिषदेत आपल्या पक्षाविरोधात थंड थोपटणाऱ्या बंडोबांना थंड करण्यात पक्षांना यश येतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.