KDMC School : मार्कशीट अन् लिविंग सर्टिफिकेट न देता पालिकेच्या शाळांमधील नववी-दहावीचे वर्ग बंद; 60 विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला, कल्याण-डोंबिवली आयुक्तांचे कारवाईचे आदेश
KDMC School : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC municipal School) मराठी माध्यमाच्या शाळेत नववी आणि दहावीचे वर्ग अचानक बंद करण्यात आल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

KDMC School : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC municipal School) मराठी माध्यमाच्या शाळेत नववी आणि दहावीचे वर्ग अचानक बंद करण्यात आल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. धक्कादायक बाब म्हणजे 2026 मध्ये दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सुमारे 60 विद्यार्थ्यांना अद्याप गुणपत्रिका आणि शाळा सोडल्याचा दाखला मिळालेला नाही. त्यामुळे अकरावी प्रवेशाची अंतिम मुदत जवळ येत असताना विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे.
दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेत (KDMC) उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी संबंधित शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने बोलावून विद्यार्थ्यांना त्यांची गुणपत्रिका आणि लिव्हिंग सर्टिफिकेट देण्याचे आदेश दिले. विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे सांगितले. या प्रकरणात संबंधितावर चौकशी करून कारवाई केली जाईल असं प्रसाद बोरकर यांनी सांगितले आहे.
Raigad News : युनिव्हर्सल बिझनेस स्कुल विरोधात स्थानिक कामगार आक्रमक; सत्ताधारी पक्षांचे नेते उपोषणात सहभागी
कर्जत तालुक्यातील कुशीवली मधील युनिव्हर्सल स्कूल विरोधात स्थानिक कामगारांनी काम बंद आंदोलन पुकारत आमरण उपोषण सुरू केले आहे.वदाप ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या या शैक्षणिक संस्थेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी 27 दीर्घकाळ सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेणे, तसेच आदिवासी महिला कर्मचाऱ्यांना दुय्यम वागणूक दिल्याचा आरोप यांचा समावेश आहे. सकाळपासून सुरू असलेल्या या आंदोलनाला युनिव्हर्सल स्कूल प्रशासनाला 10 जून पर्यंत तोडगा काढण्यात यावा, शिवाय 10 जून पर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा उपोषण सुरूच राहणार, असा इशारा अजित दादांच्या राष्ट्रवादीचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी दिला आहे.
मुंबईतील आरोग्य सुविधांच्या विस्तारासाठी अमित साटम यांची बीएमसीकडे मागणी
मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी बीएमसीकडे डायलिसिस सुविधांचा विस्तार, शहरव्यापी 'मधुमेहमुक्त मुंबई' अभियान, मानसिक आरोग्य केंद्रांची स्थापना आणि कर्करोग उपचारांसाठी प्रस्तावित खाटा वेळेत सुरू करण्याची मागणी केली आहे. पालकमंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत साटम यांनी महापालिकेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याची गरज व्यक्त केली. आगामी काळात 5 हजार नव्या खाटा उपलब्ध होणार असल्याने आवश्यक डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे नियोजन आतापासूनच करण्याचे आवाहनही त्यांनी केले. रुग्णांना अधिक सन्मानजनक आणि कार्यक्षम सेवा मिळण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना संवेदनशीलतेचे प्रशिक्षण देण्याचीही मागणी साटम यांनी केली. बैठकीत उपस्थित मुद्द्यांवर बीएमसी प्रशासनाला कृती अहवाल तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI
Before You Go
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
महत्त्वाच्या बातम्या






















