Jayant Patil :  शेतकरी कामगार पक्षाचे (Shetkari Kamgar Paksh) माजी आमदार आणि सरचिटणीस जयंत पाटील (Jayant Patil) यांचे बंधू पंडित पाटील (Pandit Patil) यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. माजी आमदार पंडित पाटील आणि आस्वाद पाटील यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी आज भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय. यावर शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते आधीच गेलेत अशी बोचरी टीका जयंत पाटील यांनी केली. पंडित पाटील आणि आस्वाद पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतच पक्षाच्या विरोधात काम केलं होतं, असे जयंत पाटील म्हणाले. या दोघांच्या जाण्याने पक्षाला कोणताच फरक पडणार नाही असे जयंत पाटील म्हणाले. 

पक्षाचा मतदार अजूनही कायम

पदवीधर निवडणुकीत शेकापमधून भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांनी विरोधी उमेदवारांकडून पैसे घेऊन कार्यकर्त्यांना वाटण्याचा प्रयत्न केला होता असे म्हणत जयंत पाटील यांची माजी आमदार पंडित पाटील यांच्यावर टीका. शेतकरी कामगार पक्षाला 75 वर्षे झाली आहेत. अनेक नेते मंत्री आमदार या पक्षातून गेले, मात्र, पक्षाचा मतदार अजूनही कायम आहे. पंडित पाटील आणि आस्वाद पाटील यांच्या जाण्याने पक्षाला कोणताच फरक पडणार नाही असेही जयंत पाटील म्हणाले. आमची ताकद अजून तशीच असल्याचा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला. पक्षात नेत्यांना किती मोठं करायचं त्याच आत्मपरीक्षण करण्याची आता वेळ आली असल्याचे जयंत पाटील म्हणाले.

कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मी निर्णय घेतला : पंडित पाटील

नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस ही मुख्य नदी आहे, म्हणून मी भाजपात आलो. भाजप काम करणार्‍या लोकांना संधी देतो. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मी निर्णय घेतला असल्याची पहिली प्रतिक्रिया पंडित पाटील (Pandit Patil) यांनी दिली आहे. माजी आमदार पंडित पाटील यांनी आज  आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय. भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाणांच्या नेतृत्वात आज त्यांनी आपला पक्ष प्रवेश केलाय. मुंबई भाजप प्रदेश कार्यालयात आज त्यांनी आपला पक्षप्रवेश करताना तूफान फटके बाजी केलीय. मला भांडण करायची गरज नाही. जिल्हा बँक संचालक, जिल्हा परिषद सदस्य, सगळे आज आले आहेत. पंडीत शेट भाजपात येणे शक्य नव्हते. पण मी धारप साहेब आणि चव्हाण साहेब यांना शब्द दिला होता. शेकापच्या माध्यमातून आम्ही खासदार केले. आमच्या शिडीने अनेक लोक वर गेले पण कार्यकर्ता संपला. गेल्या निवडणुकीत आम्ही तटकरेंना खासदार केले, आघाडी मार्फत खासदार झाले, पण आम्हाला ते विसरले. मला अभिमान आहे, भाजप नेते रविंद्र चव्हाण यांना भविष्यात काय पद मिळेल, पण त्यांनी सांगितले की तुम्ही भाजपात या, तुमच्या ज्ञानाचा फायदा होईल असे पंडित पाटील म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

Pandit Patil : मोदी अन् फडणवीस म्हणजे मुख्य नदी, गंगेत गेलेलं बरं; भाजपमध्ये प्रवेश करताच पंडित पाटील काय-काय म्हणाले?