जळगावात भीषण अपघात, टेम्पो पलटून 16 जणांचा मृत्यू

जळगावात भीषण अपघातात 16 जणांचा मृत्यू झाला आहे. किनगावजवळील मनूदेवी मंदिराच्या परिसरात टेम्पो पलटी होऊन हा भीषण अपघात झाला.

Continues below advertisement

जळगाव : जळगावात भीषण अपघातात 16 जणांचा मृत्यू झाला आहे.  किनगावजवळील मनूदेवी मंदिराच्या परिसरात टेम्पो पलटी होऊन हा भीषण अपघात झाला. यात आभोडा येथील 12 , केऱ्हाळा येथील 2 आणि रावेर येथील 2 असे 16 मजूर मृत्यूमुखी पडले आहेत तर  5 गंभीर जखमी झाले आहेत.  मध्यरात्रीच्या सुमारास किनगावजवळ आयशर टेम्पो पलटून हा अपघात झाला, ज्यात 16 जणांचा मृत्यू झाला. यातील बहुतांश मृतक हे रावेर तालुक्यातील असल्यानं तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

Continues below advertisement

माहितीनुसार या टेम्पोत पपई भरुन हा टेम्पो रावेरकडे निघाला होता. त्याचवेळी मध्यरात्रीच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटल्यानं टेम्पो पलटी झाला. या अपघातात 16 जणांचा मृत्यू झाला आहे.

(सविस्तर वृत्त लवकरच)

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola