मुंबई : कोरोनाचा फैलाव रोखण्याच्या दृष्टीने राज्यशासनने दिलेल्या निर्देशानुसार वगळता राज्यातील इतर विभागामध्ये काही अटी शर्तींच्या अधीन राहून शुक्रवार ( 22 मे) पासून जिल्हांतर्गत एसटी बससेवा सुरु होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे.


अनिल परब म्हणाले, 23 मार्च पासून गेले दोन महिने मुंबई व उपनगरात अत्यावश्यक सेवा वगळता एसटी बस सेवा संपूर्ण महाराष्ट्रात बंद आहे. परंतु लॉकडाऊनच्या चौथ्या कालावधीत राज्य शासनाने रेड झोन आणि कंटेंन्मेंट झोन वगळता काही अटींसह एसटी महामंडळाला केवळ जिल्ह्यांतर्गत (जिल्ह्याच्या सीमेपर्यंतच) एसटी बस सेवा सुरू करण्याची परवानगी दिली आहे त्यानुसार जिल्ह्यातील निवडक मार्गावर शुक्रवार (22 मे) पासून एसटी बस सेवा सुरू होणार आहे.


खालील नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.


1. जिल्हा-अंतर्गत सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंतच ही बस सेवा सुरू राहणार आहे.
2. प्रवासासाठी द्यावयाच्या सर्व बसेस योग्य सॅनिटायझरचा वापर करुन निर्जंतुक केलेल्या असतील.
3. सोशल डिस्टन्सिंगचा वापर करून बसच्या एकूण क्षमतेच्या केवळ 50 टक्के प्रवाशांनाच प्रवास करण्याची मुभा असेल. ( साधारण एका बस मध्ये २० ते २२ प्रवाशी , एका सीट वर एकच प्रवासी )
4. ज्येष्ठ नागरिक व 10 वर्षाखालील लहान मुलांना बस प्रवासाची परवानगी असणार नाही. (अत्यावश्यक वैद्यकीय कारण वगळून )
5. प्रत्येक प्रवाशाने व एसटी कर्मचाऱ्याने प्रवास सुरु करताना सॅनिटायझरने आपले हात निर्जंतुक करणे गरजेचे आहे.
6. प्रवासामध्ये प्रत्येक प्रवाशाने व एसटी कर्मचाऱ्याने तोंडाला मास्क लावणे आवश्यक आहे.


अटी व शर्तींचे काटेकोरपाने पालन करुन सर्वसामान्य प्रवाशांनी कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एसटी महामंडळास सहकार्य करावे असे आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलं आहे.


Lockdown 4.0 | उद्यापासून जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरु होणार




संबंधित बातम्या :