BhandaraAccidentNews:भंडाऱ्यातभीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.वऱ्हाड्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये पाच जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. तर दोन गंभीर जखमी झाले आहेत. तर दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. मृतकांमध्ये चार महिला आणि एका पुरुषांचा समावेश आहे.भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील सौंदडइथं ही घटना घडली आहे.
अड्याळ येथील वऱ्हाडीकोंढायेथून विवाह आटोपून अड्याळ गावाकडे परत येत असताना अपघात घडला आहे. व्हॅनमध्ये9 जण होते. त्यापैकी 5वऱ्हाड्यांचाघटनास्थळीच मृत्यू झाला आगे तर दोन जण गंभीर असून अन्य दोन किरकोळ जखमी आहेत. गंभीर दोघांना भंडाऱ्याला हलविले तर, किरकोळ दोघांवर अड्याळ ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
अड्याळ पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्यासौंदड येथील घटना आहे.वऱ्हाड्यांच्याव्हॅनचाटायर फुटल्याने जाणाऱ्याट्रेलरवरव्हॅनधडकून भीषण अपघात झाला आहे. घटनास्थळीअड्याळ पोलीस आणि परिसरातील नागरिकांची मदतीसाठी धाव.ही संपूर्ण माहिती अड्याळपोलिसांनी दिलेली आहे.
पिकअपची दुचाकीला जोरादार धडक, एकाच कुटुंबातील तीन जणांचा जागीच मृत्यू
वाशिम जिल्ह्यात भीषण अपघाताची धक्कादायक घटना घडली आहे. वाशिम मंगरुळपीर महामार्गावर पारडी टकमोर गावाजवळ आंबे वाहून नेणाऱ्या पिकअप वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीवरील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. पिकअप वाहनाने दुचाकीला धडक दिल्यानं हा अपघात झाला आहे. अपघात इतका भीषण होता की अपघातनंतर पिकअप वाहन रस्त्यालगत असलेल्या शेतात खाली पलटी झाला आहे. पिकअप वाहनात या धडकेत वारा देपुळ गावातील एकाच कुटंबातील तीन जण जागीच ठार झाले आहेत. या घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
गोंदिया जिल्ह्यात भरधाव टिप्परने माय-लेकाला चिरडले, भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू
