एक्स्प्लोर

धक्कादायक! हिंगोलीत शेतकऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल, पोलिसांनी मारहाण करत धमकावलं, नातेवाईकांचे गंभीर आरोप 

हिंगोली जिल्ह्यातील धनगरवाडी गावच्या शिवारात धक्कादायक घटना घडली आहे. एका शेतकऱ्याने जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. गोरख पातळे असे या शेतकऱ्याचं नाव आहे.  

Hingoli News :  हिंगोली जिल्ह्यातील धनगरवाडी गावच्या शिवारात धक्कादायक घटना घडली आहे. एका शेतकऱ्याने जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. गोरख पातळे असे या शेतकऱ्याचं नाव आहे.  या शेतकऱ्याचा मृतदेह तब्बल तीन तासांपासून झाडाला लटकलेल्या अवस्थेत असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी धमकावल्याने शेतकऱ्याने जीवन संपल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. 

चौकशीदरम्यान पोलिसांनी त्यांना मारहाण केली तसेच धमकावले

या घटनेनंतर मृत शेतकरी गोरख पातळे यांच्या नातेवाईकांनी पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. धनगरवाडी परिसरात शेतकऱ्यांच्या नावे विहिरी मंजूर करुन अनुदान लाटल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. या प्रकरणाची चौकशी सुरू असताना हिंगोली आर्थिक गुन्हे शाखेकडून गोरख पातळे यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र, चौकशीदरम्यान पोलिसांनी त्यांना मारहाण केली तसेच धमकावले, असा गंभीर आरोप मयताच्या कुटुंबीयांनी केला आहे. या दबावातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात येत आहे.

घटनास्थळी तणावपूर्ण वातावरण

दरम्यान, संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह झाडावरुन खाली उतरवणार नाही, अशी ठाम भूमिका कुटुंबीयांनी घेतली आहे. त्यामुळे घटनास्थळी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे शासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, एका शेतकऱ्याचा जीव गेल्याने प्रशासनाच्या कामकाजावर गंभीर टीका होत आहे. आता या प्रकरणात पुढे काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

About the author माधव दिपके

माधव दिपके
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्र तापला! अमरावतीसह अकोला आणि वर्ध्यात तापमानाचा पारा 46 अंशावर, कोणत्या जिल्ह्यात किती तापमान?
महाराष्ट्र तापला! अमरावतीसह अकोला आणि वर्ध्यात तापमानाचा पारा 46 अंशावर, कोणत्या जिल्ह्यात किती तापमान?
UDID Card : दिव्यांगांना मोठा दिलासा, UDID वैश्विक ओळखपत्र काढण्यासाठी चार महिन्यांची मुदतवाढ
दिव्यांगांना मोठा दिलासा, UDID वैश्विक ओळखपत्र काढण्यासाठी चार महिन्यांची मुदतवाढ
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मे 2026 |शनिवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मे 2026 |शनिवार
Latur Pattern : ज्ञानार्जनाच्या ध्येयापासून पेपरफुटीच्या अर्थकारणापर्यंत, 'लातूर पॅटर्न' चं बदललेलं रसायनशास्त्र 
Latur Pattern : ज्ञानार्जनाच्या ध्येयापासून पेपरफुटीच्या अर्थकारणापर्यंत, 'लातूर पॅटर्न' चं बदललेलं रसायनशास्त्र 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report Pimpri Chinchwad Teddy bear case : टेडी की बॉम्ब, प्रियकराचा गिफ्टनं सुटला घाम
Special Report Mumbai Goa Highway Toll Naka : मुंबई-गोवा महामार्ग अजून अपूर्णच, पण टोलवसुलीही सुरू
Coffee with Kaushik : Rohit Pawar : बारामतीचा पुढचा दादा कोण? तटकरे-पटेलांचा 'तो' ऑडिओ कोणता?
Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi Speech : स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
Kalyan : बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
CBSE :  सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार, दोन भारतीय भाषा अनिवार्य
सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
Rahul Gandhi : 22 लाख विद्यार्थ्यांची मेहनत वाया, परीक्षेपूर्वी दोन दिवस NEET चा पेपर व्हाटसअपवर वाटला गेला, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा : राहुल गांधी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, त्यांना पदावरुन काढावं, अन्यथा पंतप्रधानांनी जबाबदारी घ्यावी : राहुल गांधी 
Silver News:  सोन्यावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर सरकारचं चांदी आयातीबाबत कठोर धोरण, नवा नियम लागू
सोन्यावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर सरकारचं चांदी आयातीबाबत कठोर धोरण, नवा नियम लागू
Andhra Pradesh : आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता मिळणार,चंद्राबाबू  नायडूंची मोठी घोषणा 
आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा भत्ता मिळणार:चंद्राबाबू  नायडू
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
Embed widget