''केंद्र सरकारने घेतलेला निर्णय दुर्दैवी आहे. यामुळे कांदा उत्पादकांचं नुकसान होणार आहे. एकवेळ अशी होती, जेव्हा 300 रुपये प्रति टन दराने कांदा विकावा लागला. मात्र आता भाव वाढले असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान होतं. त्यातच सरकारने राजकीय हस्तक्षेप केला'', असा आरोप देवदत्त होळकर यांनी केला.
''सध्या नवीन लाल कांद्याचा सीजन सुरु झाला आहे. हा कांदा फार काळ टिकणारा नसतो. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावं लागणार आहे. सरकारला वेळोवेळी पत्रव्यवहार केला होता. मात्र तरीही हा निर्णय घेतला. या निर्णयाविरोधात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे'', असंही देवदत्त होळकर म्हणाले.