शासनाचा नवा GR, 347 तालु्क्यातील पूरग्रस्तांसाठी आणखी सवलती, 10 अन् 12 वीची परीक्षा फी देखील माफ
सरकारनं आज नवीन जीआर काढला आहे. यामध्ये राज्यातील 34 जिल्ह्यातील 347 तालुक्यांचे नुकसान झाल्याचे सांगितले आहे. तसेच 10 वी आणि 12 वी च्या विद्यार्थ्यांची फी माफी करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : पूरग्रस्त आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारनं 31 हजार 628 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं आहे. या पॅकेज संदर्भातील जीआर सरकारने काल जाहीर केला होता. यामध्ये राज्यातील 29 जिल्ह्यातील 253 तालुक्यांचे नुकसान झाल्याचं सांगण्यात आलं आहे. यामध्ये काही जिल्हे वगळले होते. मात्र, मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी आवाज उठवल्यांतर सरकारनं आज पुन्हा नवीन जीआर काढला आहे. यामध्ये सरकारनं राज्यातील 34 जिल्ह्यातील 347 तालुक्यांचे नुकसान झाल्याचे सांगितले आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी आणि 10 वी आणि 12 वी च्या विद्यार्थ्यांची फी माफी करण्याचा निर्णय सरकारनं या नवीन जीआरमध्ये घेतला आहे.
एकूण 65 लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान
राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये 347 तालुक्यातील शेती पिकांचे, शेतजमिनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच जनावरे दगावणे, मनुष्य हानी होणे, घराची पडझड होणे यासाठी सरकारनं मदतीचा नवीन जीआर जाहीर केला आहे. राज्य सरकारनं जाहीर केलेल्या जीआरमध्ये दिलेल्या माहितीनुसार, जून ते ऑगस्ट या तीन महिन्यात राज्यातीस 26.69 लाख हेक्टर क्षेत्र आणि सप्टेंबरमध्ये 39 लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. म्हणजे एकूण 65 लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालं आहे.
नवीन जीआरनुसार नेमक्या काय मिळणार सवलती?
1) जमिन महसुलात सूट
2) सहकारी कर्जाचे पुनर्गठन
3) शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीसाठी स्थगिती (एक वर्षासाठी)
4) तिमाही वीज बिलात माफ
5)परीक्षा शुल्कात माफी व 10 वी 12 वी च्या विद्यार्थ्यांची फी माफी
काय आहेत शासकीय मदतीचे निकष?
आपातग्रस्त मृत व्यक्तीच्या वारसांना 4 लाख अर्थसाहाय्य मिळेल. ६० टक्क्यांहून अधिक अपंगत्व आल्यास 2.50 लाख आणि जखमी व्यक्ती रुग्णालयात दाखल असल्यास 5,400 ते Rs 16,000 पर्यंत मदत मिळणार आहे.
पूर्णतः नष्ट झालेल्या घरांसाठी (पक्क्या/कच्च्या) सपाट भागात 1.20 लाख, तर डोंगराळ भागात 1.30 लाख आणि अंशतः पडझड झालेल्या घरांसाठी 6,500 (पक्के) ते 4,000 (कच्चे) पर्यंत मदत दिली जाईल. झोपडीसाठी 8,000 आणि गोठ्यासाठी Rs 3,000 ची मदत मिळणार आहे.
किती मिळणार नुकसान भरपाई
जिरायत पिकांसाठी 8,500 प्रति हेक्टर, बागायत पिकांसाठी 17,000 प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक पिकांसाठी 22,500 प्रति हेक्टर (जास्तीत जास्त ३ हेक्टरच्या मर्यादेत) मदत मिळेल.
नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतजमिनीवरील गाळ काढण्यासाठी 18,000 प्रति हेक्टर, तर जमीन खरडून गेली असल्यास (केवळ अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना) 47,000 प्रति हेक्टर मदत जाहीर करण्यात आली आहे.
बाधित झालेले 34 जिल्हे कोणते
ठाणे
पालघर
रायगड
रल्तागिरी
सिंधुदुर्ग
नाशिक
धुळे
जळगाव
नंदुरबार
अहिल्यानगर
पुणे
सोलापूर
सांगली
सातारा
कोल्हापूर
छत्रपती संभाजीनगर
जालना
बीड
लातूर
धाराशीव
नांदेड
परभणी
हिंगोली
बुलढाणा
अमरावती
अकोला
वाशिम
यवतमाळ
वर्धा
नागपूर
भंडारा
गोंदिया
चंद्रपूर
गडचिरोली
महत्वाच्या बातम्या:


















