Fisherman : राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मच्छीमार बांधवांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आज 7 ऑक्टोबर 2025 रोजी मंत्रालयात झालेल्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. नुकसानग्रस्त मच्छिमार बांधवांसाठी व मच्छीमारांच्या बोटींच्या नुकसान भरपाईसाठी 100 कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे. याची घोषणा आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच इतर मंत्रीगण उपस्थित होते.

Continues below advertisement


 नितेश राणे यांनी ट्विट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानले आभार


मच्छीमार बांधवांसाठी केलेल्या या तरतुदीबद्दल मंत्री नितेश राणे यांनी ट्विट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त केले आहेत. मंत्री नितेश राणे यांनी मच्छीमार बांधवांच्या नुकसानीची पाहणी केली होती. राज्यातील मच्छीमार बांधवांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी व मच्छीमार बांधवांना दिलासा देण्यासाठी मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन मच्छीमारांच्या नुकसानीचा आढावा घेतला होता. यावेळी मच्छीमारांच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करुन नुकसानग्रस्त मच्छीमारांना तातडीने मदत जाहीर करण्याचे निर्देश मंत्री नितेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. तसेच या संदर्भात मंत्री नितेश राणे यांनी वेळोवेळी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. याची दखल घेत आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नुकसानग्रस्त मच्छीमार बांधवांसाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 


एकही पूरग्रस्त सुटणार नाही, याची काळजी घ्या


एकही पूरग्रस्त सुटणार नाही, याची काळजी घ्या. तसेच पूरग्रस्तांपर्यंत 100 टक्के मदत पोहोचवण्यावर भर द्या, अशा सूचना महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत देण्यात आल्या आहेत. शासकीय यंत्रणेवर पालकमंत्र्यांना वॉच ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महायुती सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजवर बैठकीत चर्चा झाली आहे. महायुतीचे पालकमंत्री पॅकेजच्या अंमलबजावणीवर भर देणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री पत्रकार परिषद घेत माहिती देणार आहेत.  राज्यातील मच्छीमार बांधवांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी व मच्छीमार बांधवांना दिलासा देण्यासाठी मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन मच्छीमारांच्या नुकसानीचा आढावा घेतला होता. यावेळी मच्छीमारांच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करुन नुकसानग्रस्त मच्छीमारांना तातडीने मदत जाहीर करण्याचे निर्देश त्यांनी दिले होते, अखेर सरकारनं आज मोठा निर्णय घेतला आहे. 


महत्वाच्या बातम्या:


Nitesh Rane : भारतीयांनी कोळंबी खाण्याचे प्रमाण वाढवावे; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ अस्त्रावर नितेश राणेंचा उतारा