शेतमालाला योग्य भाव द्या अन्यथा शेतमाल विकणार नाही आणि पिकवणारही नाही अशी भूमिका घेत शेतकऱ्यांनी संपाचा इशारा दिला आहे. शेतीमध्ये घाम गाळूनही त्याचा मोबदला मिळत नसल्यानं 1 जूनपासून शेतकरी संपावर जाणार आहेत. यासाठी विशेष ग्रामसभा घेत संपाचा ठराव शेतकऱ्यांनी केला आहे.
नगर जिल्ह्यातील पुणतांबा गावातून शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सुरुवात होणार आहे. त्यासाठी 3 एप्रिलला शेतकरी पुणतांब्यामध्ये दाखल होणार आहेत. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहनही करण्यात येत आहे.