कसाऱ्याजवळ मेलच्या इंजिनमध्ये बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
एबीपी माझा वेब टीम | 11 Oct 2017 09:14 AM (IST)
सकाळी साडेसातच्या दरम्यान पंजाब मेल कसाऱ्याहून मुंबईकडे येत होती. त्याचवेळी इंजिनमध्ये बिघाड झाला. यामुळे कसारा-मुंबई लोकल सेवा ठप्प झाली आहे.
कसारा : कसारा-उंबरमाळी स्टेशनदरम्यान पंजाब मेलचे इंजिन बंद पडल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. सकाळी साडेसातच्या दरम्यान पंजाब मेल कसाऱ्याहून मुंबईकडे येत होती. त्याचवेळी इंजिनमध्ये बिघाड झाला. यामुळे कसारा-मुंबई लोकल सेवा ठप्प झाली आहे. कार्यालयीन वेळेदरम्यानच रेल्वे वाहतूक ठप्प झाल्यानं नोकरदारांची मोठी गैरसोय झाली आहे. या मार्गावरून मुंबईकडे जाणाऱ्या सर्व मेल-एक्स्प्रेस जागच्या जागी थांबल्या आहेत. रेल्वे प्रशासनाकडून इंजिन दुरूस्तीसाठी त्वरीत प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. मात्र, मुंबईकडे येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.