कसारा : कसारा-उंबरमाळी स्टेशनदरम्यान पंजाब मेलचे इंजिन बंद पडल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.


सकाळी साडेसातच्या दरम्यान पंजाब मेल कसाऱ्याहून मुंबईकडे येत होती. त्याचवेळी इंजिनमध्ये बिघाड झाला. यामुळे कसारा-मुंबई लोकल सेवा ठप्प झाली आहे. कार्यालयीन वेळेदरम्यानच रेल्वे वाहतूक ठप्प झाल्यानं नोकरदारांची मोठी गैरसोय झाली आहे.

या मार्गावरून मुंबईकडे जाणाऱ्या सर्व मेल-एक्स्प्रेस जागच्या जागी थांबल्या आहेत.  रेल्वे प्रशासनाकडून इंजिन दुरूस्तीसाठी त्वरीत प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. मात्र, मुंबईकडे येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.