Eknath Shinde Dasara Melava : हे सरकार पंधरा दिवस, एक महिना, सहा महिन्यात पडेल, असे म्हणत होते पण एकनाथ शिंदे पुरून उरला. मी घासून पुसून नाही ठासून 2 वर्ष पूर्ण केली. मला हलक्यात घेऊ नका मी पळवणारा आहे, कट्टर शिवसैनिक मैदान सोडून पळत नाही, 2 वर्षात अगदी कमी काळात आपलं सरकार लाडकं सरकार झालं आहे, असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यातून केला. 



एकनाथ शिंदे म्हणाले की, आपण उठाव का केला हे सांगायची गरज नाही. अन्याय होत होता म्हणून उठाव केला. आपलं सरकार सत्तेवर आल्यावर महाराष्ट्र पुन्हा नंबर वन वर आणला आहे. परदेशी गुंतवणूक, महिला सक्षमीकरण,उद्योगामध्ये पहिल्या नंबरवर आहे. सत्तांतर झाले नसते तर लाखो कोटी रुपयांच्या योजना आल्या नसत्या, बहिणीची योजना आली नसती, ज्येष्ठांना वयिष्री योजना आली नसती, बँक मध्ये पैसे आले नसते, असे शिंदे म्हणाले. 

 

इतर महत्वाच्या बातम्या