Farmer Loan Waiver : बळीराजा दुबार संकटात! एकीकडे कर्जमाफीची घोषणा, दुसरीकडे बँकांकडून शेतकऱ्यांचे खाते 'होल्ड'
Farmer Loan Waiver : एकीकडे शासनाकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे. मात्र त्याचवेळी ज्या शेतकऱ्यांनी बँकांकडून पीककर्ज घेतले होते, अशा शेतकऱ्यांचे खाते काही बँकांनी होल्ड केले आहेत.

Farmer Loan Waiver : एकीकडे शासनाकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे. मात्र त्याचवेळी ज्या शेतकऱ्यांनी बँकांकडून पीककर्ज घेतले होते, अशा शेतकऱ्यांचे खाते काही बँकांनी होल्ड केले आहेत. चंद्रपूर (Chandrapur News) जिल्ह्यातील नागभिड तालुक्यात हा प्रकार उघडकीस आलाय. नागभीड येथील बँक ऑफ इंडियाकडून अशा प्रकारे 15 शेतकऱ्यांचे खाते गोठवण्यात आलेले आहेत. नुकताच धानाचा हंगाम आटोपला असून तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी धानाची विक्री शासनाने प्राधिकृत केलेल्या आधारभूत हमीभाव केंद्रांवर केली. त्यानंतर शेतकऱ्यांचे चुकारे आणि बोनसची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली. त्यानंतर धानाचे चुकारे जमा झाल्याचा मॅसेज येताच लोकांचे देणेघेणे करण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी बँकेत जाऊन पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता, तुमच्यावर पीककर्ज थकीत असल्याने तुमचे खाते वरिष्ठ पातळीवरूनच होल्ड करण्यात आले आहेत, त्यामुळे तुम्हाला खात्यावर असलेले पैसे काढता येणार नाही, अशी माहिती बँकेकडून या शेतकऱ्यांना देण्यात आली.
Chandrapur News : तुमचे खाते वरिष्ठ पातळीवरूनच होल्ड करण्यात आल्याची शेतकऱ्यांना माहिती
नुकताच धानाचा हंगाम आटोपलाय. तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी धानाची विक्री शासनाने प्राधिकृत केलेल्या आधारभूत हमीभाव केंद्रांवर केली. शासनाने शेतकऱ्यांच्या खात्यावर धानाचे चुकारे आणि बोनस जमा करण्यास सुरुवात केलीय. तर धानाचे चुकारे जमा झाल्याचा मॅसेज येताच लोकांचे देणेघेणे करण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी बँकेत जाऊन पैसे काढण्याचा प्रयत्न केला, मात्र तुमच्यावर पीककर्ज थकीत असल्याने तुमचे खाते वरिष्ठ पातळीवरूनच होल्ड करण्यात आल्याची त्यांना माहिती देण्यात आलीय. दरम्यान, बँकेने किमान 15 शेतकऱ्यांचे खाते अशाप्रकारे होल्ड केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यांवर बँकांकडून लादण्यात आलेली बंदी त्वरित उठविण्यात यावी, अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे.
Gadchiroli News : गडचिरोली जिल्ह्यातील 4 हजार 247 शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफीचा लाभ
गडचिरोली : राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना शुक्रवारी जाहीर केली. या योजनेअंतर्गत 2 लाखापर्यंतचे थकीत कर्ज माफ होणार आहे. याचा लाभ गडचिरोली जिल्ह्यातील 4 हजार 247 कर्जदार शेतकऱ्यांना मिळणार आहे. जिल्ह्यातील 4 हजार 247 शेतकऱ्यांचे तब्बल 36 कोटी 14 लाख 63 हजार रुपयांचे कर्ज थकीत होते. मात्र आता कर्जमाफी योजनेमुळे हे सर्व शेतकरी कर्जमुक्त होणार आहेत. तर नियमित कर्ज भरणाऱ्या 23 हजार 932 शेतकऱ्यांना 50 हजार रुपयाचे प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे. आतापर्यंत 4 हजार 247 कर्जदार शेतकऱ्यांपैकी 4 हजार 163 शेतकऱ्यांनी संपूर्ण माहिती पोर्टलवर अपलोड केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या





















