कोल्हापूर: लोकसभा निकालानंतर (Lok Sabha Election)  भाजपला  (BJP) गळती लागली असून  अनेक नेत्यांचे विधानसभेच्या तोंडावर राजीनामासत्र सुरू झाले आहे.  कोल्हापुरात भाजपला मोठा धक्का बसला आहे.  पुढील काही दिवसांत महाराष्ट्रात मोठे राजकीय हादरे बसणार असल्याचा दावा केला जात आहे. भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी  राजीनामा दिला आहे.राहुल देसाई हे माजी आमदार बजरंग देसाई यांचे चिरंजीव आहे.

  


समरजीत घाटगे हे तुतारी घेणार हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यानंतर आता भाजपचे  ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी राजीनामा दिला आहे. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर असताना राहुल देसाई यांनी राजीनामा दिला आहे. राहुल देसाई यांचा राधानगरी- बुदरगड विधासभा मतदारसंघ हा कार्यक्षेत्र आहे. याच विधानसभा मतदारसंघाची  उमेदवारी मागितली होती. त्याच मागणीवर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. 


कोल्हापुरात भाजपला गळती


भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई हे काँग्रेसमध्ये होते. त्यांचे वडील देखील काँग्रसचे माजी आमदार होते. विधानसभेसाठी तिकिट मिळेल म्हणूनच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र आता झालेल्या उलथापलथीनंतर  त्यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे कोल्हापुरात भाजपला गळती लागली असे म्हटले आहे. 


शरद पवार यांच्या उपस्थितीतच प्रवेश होणार


भाजप नेते समरजित घाटगे यांनी 23 ऑगस्टला कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन केले आहे.  मेळाव्यात राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करण्याबाबत कार्यकर्त्यांची मतं जाणून घेतली जाणार आहे.  प्रमुख कार्यकर्ते आणि  पदाधिकाऱ्यांना रात्री उशिरापासून निरोप जायला सुरुवात झाली आहे.   शाहू सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर मेळावा  होणार आहे.   उद्या होणाऱ्या महायुतीच्या जाहीर सभेला देखील समरजित घाटगे उपस्थित राहणार नसल्याची माहिती आहे.  सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात शरद पवार यांच्या उपस्थितीतच प्रवेश होणार असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती दिली आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात उमेदवार देण्यासाठी खुद्द शरद पवार यांनी केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.


हे ही वाचा :


मुश्रीफांच्या विरोधात समरजित घाटगेंसाठी शरद पवारांचं जाळं? एकाचवेळी देवेंद्र फडणवीस-अजितदादा चेक मेट होणार?