Charansingh Thakur on Nagpur SBL Company Blast : नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथे काल (1 मार्च 2026) सकाळच्या सुमारास एसबीएल एनर्जी लिमिटेड कंपनीमध्ये मोठा स्फोट (SBL Blast Update)  झाला होता. या भीषण अपघातात आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू झाला आहे. तर या प्रकरणी कंपनीच्या 21 वरिष्ठ अधिकाऱ्यांवर भारतीय न्याय संहितेच्या (BNS) Section 105) अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे, एसबीएल एनर्जी लिमिटेड (SBL Energy Company) कंपनीच्या मालक आणि संचालकांवरील सदोष मनुष्य वधाच्या गुन्ह्याने समाधान होणार नाही, तर मालकाविरोधात मनुष्य वधाचा (हत्येचा) गुन्हा दाखल करण्यात यावा. अशीआग्रहीमागणीकाटोलचेभाजपआमदार चरणसिंह ठाकूर यांनीकेलीआहे. तसेच मृतांच्या वारसांना 75 लाख रुपये नुकसान भरपाई मिळाल्याशिवाय अंत्यसंस्कार होऊ देणार नाही, असाइशाराही आमदार चरणसिंह ठाकूर यांनीदिलाआहे.

Charansingh Thakur : एसबीएल एनर्जीच्या प्लांटमध्ये अनेक चुका, मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा

नागपूर स्फोट प्रकरणात मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी काटोल विधानसभा मतदारसंघाचे आमदार चरण सिंग ठाकूर यांनी केली आहे. ते विभागीय आयुक्त कार्यालयात होणाऱ्या बैठकीसाठी आल्यावर बोलत होते. एसबीएल एनर्जीच्या प्लांटमध्ये अनेक चुका आढळून आल्या आहेत. या सगळ्याची गंभीर दाखल घेतली पाहिजे. स्फोटक कंपनीत मजुरांना योग्य प्रशिक्षण दिल्याशिवाय कामावर लावू नये. राज्य सरकारचे अधिकारी, केंद्र सरकारच्या एजन्सीकडे बोट दाखवतात, त्यामुळे हे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. परिणामी, या घटनेतील मृतांना 75 लाख रुपये नुकसान भरपाई दिल्याशिवाय, तर जखमींना 25 लाखाचा मदत मंजूर झाल्याशिवाय आम्ही मानणार नाही. असाआक्रमकपवित्रा आमदार चरणसिंह ठाकूर यांनीघेतलाय.

Charansingh Thakur on SBL Company Blast : मृतांना 75 लाख, तर जखमींना 25 लाखांचीनुकसानभरपाईद्यावी, अन्यथा...

जोवर मृतांच्या वारसांना नुकसान भरपाई मिळत नाही, तोवर मृतकांचे अंत्यसंस्कार करू देणार नाही. राज्यसरकारने SOP जाहिर करावी, त्याशिवाय कारखाना सुरू होऊ देणार नाही. SBL एनर्जी कारखाना बंद ठेवला पाहिजे. राज्य सरकारचे आणि केंद्राचे अधिकारी एकमेकांवर ढकलत जवाबदारी टाळत आहे. SOP तयार करून निरीक्षक ठेवले पाहिजे. असेही आमदार चरणसिंह ठाकूर म्हणाले.

SBL Company Blast : एसबीएल एनर्जी कंपनीती भीषण स्फो, आत्तापर्यंतनेमकंकायघडलं?

नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथे का (1 मार्च 2026) सकाळच्या सुमारास एसबीएल एनर्जी लिमिटेड कंपनीमध्ये मोठा स्फोट झालाहोता. बारुद आणि त्यापासून डेटोनेटरसह इतर स्फोटक बनवणाऱ्या कंपनीत हा मोठा स्फोट (SBL Blast Update) झाला. स्फोट झाल्यानंतरआगीनंमोठापेट घेतला. त्यामुळेबचावकार्यातमोठेअडथळेनिर्माणझाले. दरम्यानयाभीषणअपघातातआतापर्यंत 19 जणांचामृत्यूझालाआहे. तरयाप्रकरणी कंपनीच्या 21 वरिष्ठ अधिकाऱ्यांवर भारतीय न्याय संहितेच्या (BNS) Section 105) अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा (Culpable Homicide Not Amounting to Murder) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यातआलाआहे. तरदुसरीकडे, यासंपूर्णप्रकरणाच्यासखोल चौकशीचेआदेशमुख्यमंत्रीदेवेंद्रफडणवीसयांनीदिलेआहेत.

 इतर महत्वाच्या बातम्या