मुंबई: अमरावती मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे हत्या प्रकरणी पोस्टमॉर्टम रिपोर्ट जारी करण्यात आला आहे. उमेश कोल्हे यांच्यावर आरोपींनी ज्याप्रकारे हल्ला केला, त्यात उमेश कोल्हे यांच्या मेंदूची नस, श्वास नलिका, अन्ननलिका, डोळ्याची रक्तवाहिनीला चाकूने हल्ला केल्याने इजा झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. 


पोस्टमॉर्टममध्ये ही जखम 5 इंच रुंद, 7 इंच लांब आणि 5 इंच खोल असल्याचेही समोर आले आहे. दरम्यान, या हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. इरफान शेख असं त्याचं नाव असून तो एक एनजीओ चालवतो. या प्रकरणी पोलिसांनी आधीच सहा जणांना अटक केली आहे. इरफान शेखची अटक ही अमरावती पोलिसांची मोठी कारवाई समजली जाते. इरफान शेख याला आज अमरावती न्यायालयात हजर करण्यात आलं, त्याला 7 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.


नुपूर शर्मा यांचे समर्थन केलं म्हणून अमरावतीच्या मेडिकल व्यावासायिक असलेल्या उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा मास्टरमाईंड असलेल्या इरफान शेखला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. इरफान शेख हा रहबर नावाची एक एनजीओ चालवतो. त्यानेच आरोपींना उमेश कोल्हे यांची हत्या करण्याचा आदेश दिला होता हे समोर आलं आहे. त्यानंतर आरोपींनी 21 जून रोजी उमेश कोल्हे यांची हत्या केली


नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट करणाऱ्या 10 जणांना, तीच पोस्ट फॉरवर्ड करत त्यांनी अशी पोस्ट केल्यास त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. यानंतर त्यांना त्यांची फॉरवर्ड आणि पोस्ट हटवण्यास सांगण्यात आले. ज्यानंतर अनेकांनी माफी मागितली आणि यानंतर अशी पोस्ट टाकणार नाही असे सांगितले. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. या माफीचा व्हिडिओ एबीपी माझाला मिळाला आहे. या प्रकरणातील आरोपींमध्ये उमेश कोल्हेंनाही धमकी देण्यात आली होती.


काय आहे प्रकरण?
नुपूर शर्मा यांचे समर्थन केलं म्हणून अमरावतीच्या मेडिकल व्यावासायिक असलेल्या उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा मास्टरमाईंड असलेल्या इरफान खानला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. इरफान खान हा रहबर नावाची एक एनजीओ चालवतो. त्यानेच आरोपींना उमेश कोल्हे यांची हत्या करण्याचा आदेश दिला होता हे समोर आलं आहे. त्यानंतर आरोपींनी 21 जून रोजी उमेश कोल्हे यांची हत्या केली. प्रथमदर्शनी ही हत्त्या लूटपाट करण्याच्या उद्देशाने झाली असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. मात्र आज तब्बल 12 दिवसांच्या तापसानंतर अमरावती शहर पोलिसांनी ही हत्या नुपूर शर्मा यांच्या पोस्ट व्हायरल केल्यामुळेच झाली असल्याचे स्पष्ट केले. आजच केंद्रीय गृहमंत्रालयाने कोल्हे यांच्या हत्येचा तपास एनआयएकडे सोपविण्यात आल्याचं ट्विट केलं आणि त्यानंतर अमरावती पोलिसांनी ही माहिती दिली.