Devendra Fadnavis on Ajit Pawar plane crash : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारीला विमान अपघातात मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात विविध शंका उपस्थित केल्या जात आहे. हा अपघात आहे की घात आहे असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 13 निर्धारित मुद्यांवर सध्या चौकशी सुरु असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

Continues below advertisement

नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?

अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, डिजिटल रेकॉर्ड घेतला आहे. डेटा उपलब्ध होणार नाही, अशी काही बाब नाही. व्हाईस रेकॉर्ड झालेला डेटा रिकव्हर केलं जात आहे. व्हीएसआर कंपनीचे ऑडिट केलं जात आहे. केवळ अपघात वेळीच नाही सर्वच वर्षाच ऑडिट केलं जाणार आहे. लॉगबुक पासून सगळ्या बाजू तपासल्या जातील. ज्या काही शंका आहे त्या सोडवल्या जातील असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

केंद्र सरकार आणि हवाई उड्डाण खात्याला लपवण्यासारखं काहीच नाही

केंद्र सरकार आणि हवाई उड्डाण खात्याला लपवण्यासारखं काहीच नाही. या चौकशीतून जे काही समोर येईल ते आम्हाला देखील महत्वाचं आहे असे मुख्यमंत्री म्हणाले. अजित पवारांचा अपघात झाला त्या विमानातून मी स्वत: 4 ते 5 वेळा प्रवास केला असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. 

Continues below advertisement

सोमवारपासून (23 फेब्रुवारी) महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होणार आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अर्थसंकल्प मांडणार आहेत. दरम्यान, अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारची आज पत्रकार परिषद पार पडली. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. 

या अधिवेशनात एकूण 15 विधेयक मांडले जाणार आहेत

या अधिवेशनात एकूण 15 विधेयक मांडले जाणार आहेत. 2 जुनी आहेत. आम्ही भरपूर चर्चेची संधी देणार आहोत. पुर्णकाळ अधिवेशन चालेल चांगला अर्थसंकल्प मांडण्याचा प्रयत्न आम्ही करु असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.  जनसामान्यांना दिलासा देत असताना काही कठोर पावले देखील उचलू असेही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले. विरोधी पक्षाने आरोप केला पाहिजे, परंतू, माहिती घेऊन अभ्यास करुन आरोप केला पाहिजेत. नुसतं आरोप करुन पळून जायचं बरोबर नाही असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली.