इतर पक्षात स्वार्थ साध्य न झाल्याने भाजपात जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. भाजपने खोटी आश्वासने देऊन पक्षात भरणा चालवला आहे. त्यामुळे भाजप हा गुंडांचा पक्ष बनत चालला आहे. अशी टिका अजित पवारांनी केली.
दरम्यान, यावेळी त्यांनी शिवसेनेवरही निशाणा साधला. 'पटत नसेल तर बाहेर का पडत नाही? टिकाही करायची आणि सत्तेत मांडीला मांडी लावून बसायचं, हा देखावा का?' असा सवालही त्यांनी विचारला.