Devendra Fadnavis : महाराष्ट्रातील 50 टक्के भाग हा दुष्काळग्रस्त आहे. या भागात जास्त प्रमाणात पाऊस पडत नाही. त्यामुळं त्या ठिकाणी पाण्याची समस्या निर्माण होते. त्यामुळं या भागाला पाणी मिळालं पाहिजे. जोपर्यंत या ठिकाणी पाणी मिळत नाही तोपर्यंत महाराष्ट्राला मागच्या 50 वर्षात लागलेला आत्महत्येचा कलंक समाप्त करु शकणार नसल्याचे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. हे काम पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातच पूर्ण होऊ शकते असे निवेदन देवेंद्र फडणवीस यांनी केलं. 


...मराठवाड्याला सुजलाम सुफलाम करु शकतो 


पश्चिमी वाहिनी असणाऱ्या नद्यांचे जे पाणी समुद्रात जात आहे, ते पाणी गोदावरी नदीत घेऊन अहमदनगर, नाशिकसह संपूर्ण मराठवाड्याला सुजलाम सुफलाम करु शकतो असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. याची पूर्ण व्यवस्था, याचे पूर्ण स्ट्रक्चर आम्ही तयार केल्याचे फडणवीस म्हणाले. विदर्भात असणाऱ्या वैनगंगा नदीचे वाया जाणारे पाणी देखील विदर्भातील दुष्काळी भागात नेण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे फडणवीस म्हणाले. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र हे तिन्ही भाग कायम दुष्काळमुक्त करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आशिर्वादाची गरज असल्याचे फडणवीस म्हणाले. यापूर्वी तुम्ही आम्हाला कायम मदत केली आहे. पुढच्या काळातही केंद्र सरकार मदत करेल. दरम्यान, येणाऱ्या काळात मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील पुढच्या पिढीला दुष्काळ पाहावा लागणार नसल्याचा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला. आजच्या या कार्यक्रमाला पंतप्रधान आल्याबद्दल फडणवीसांनी त्यांचे आभार मानले.  


 



पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन  


पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज शिर्डीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते साई भूमितील विविध विकासकामांचे उद्घाटन झाले. तसेच निळवंडे धरणाच्या प्रकल्पाचा शुभारंभ देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. यानंतर आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यासह विविध राजकीय नेते उपस्थित होते.  जगभरातून साईभक्त सातत्यानं शिर्डीत येत असतात. याठिकाणी विविध उपक्रम होत असल्याचे फडणीस म्हणाले. निळवंडे सारखा प्रकल्प सुरु होत आहे. माझ्या जन्माच्या पूर्वी हा प्रकल्प सुरु करण्यात आला होता. आज त्याचे उद्घाटन तुमच्या हस्ते होत आहे याचा आनंद असल्याचे फडणवीस म्हणाले. 


अहमदनगर जिल्ह्यासह सिन्नर (Sinner) तालुक्यातील 182 गावांच्या पाण्याचा प्रश्न मिटणार


पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचे उद्घाटन करण्यात आले. तसेच मोदी यांच्या हस्ते धरणाच्या पाण्याचे जलपूजनही करण्यात आले. या धरणाच्या माध्यमातून जवळपास अहमदनगर जिल्ह्यासह सिन्नर (Sinner) तालुक्यातील 182 गावांच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Devendra Fadnavis : पंतप्रधानांनी नऊ वर्षात सिंचनासाठी 30 हजार कोटी दिले : देवेंद्र फडणवीस