एक्स्प्लोर

खांद्यावर नांगर, डोळ्यांत अश्रू, पायात चपलाही नाहीत, कर्जमाफीसाठी लातूरच्या शेतकऱ्यांची 500 किमी पदयात्रा   

लातूर (Latur) जिल्ह्यातील सहदेव होणाळे आणि गणेश सूर्यवंशी या शेतकऱ्यांनी पाठीवर नांगर घेत 500  किमीची पायी पदयात्रा करत थेट मंत्रालय गाठण्याचा निर्धार केला आहे.

Agriculture News : मरण येतं, पण कर्ज जात नाही, ही शोकांतिका अनुभवणारे शेतकरी आजही न्यायासाठी रस्त्यावर आहेत. लातूर (Latur) जिल्ह्यातील सहदेव होणाळे आणि गणेश सूर्यवंशी या शेतकऱ्यांनी पाठीवर नांगर घेत 500  किमीची पायी पदयात्रा करत थेट मंत्रालय गाठण्याचा निर्धार केला आहे. आज त्यांच्या या संघर्षाचा नववा दिवस आहे.

डोळ्यांत अश्रू आहेत, पायात चपला नाहीत, फोड फुटले आहेत  पण मनात आहे फक्त एकच ध्यास  कर्जमुक्तीचा आणि न्यायाचा. आपली व्यथा मांडताना सहदेव होणाळे यांना अक्षरशः अश्रूंना बांध घालता आला नाही. ते म्हणाले व्हिडिओ व्हायरल झाला म्हणून कर्जमाफी मिळते, मग आमचं रोजचं जगणं सरकारला दिसत नाही का? या दोघांनी 450 किमीहून अधिक अंतर पार केलं असून आज ते भिवंडीत दाखल झाले आहेत. चालताना त्यांच्या पायांवर फोड फुटले आहेत. पण नांगर जणू एक बाण बनवून, त्यांनी व्यवस्थेच्या हृदयावरच घाव घालायचं ठरवलं आहे.

शेतकऱ्यांच्या व्यथा मायबाप सरकारला कधी दिसणार? 

निवडणुकीच्या तोंडावर सरकार अनेक घोषणा करते. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या गाजावाजा करतात, पण प्रत्यक्षात या घोषणा कधी वास्तवात उतरणार का? हा सवाल सहदेव यांच्यासारख्या शेतकऱ्यांच्या मनात धगधगतोय. भाषणात आम्हाला हिरो बनवलं जातं. पण रस्त्यावर चालताना आम्ही कोण? सहदेव म्हणाले माझ्यावर दीड लाख कर्ज आहे ते मी कसेही फिडेल पण बाकी शेतकऱ्यांचं काय? अनेक शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना न्याय कोण देणार एका वृद्ध शेतकऱ्याची व्यथा व्हायरल व्हिडिओमुळे दिसून येते. मग इतर शेतकऱ्यांच्या व्यथा मायबाप सरकारला कधी दिसणार? असा सवाल सहदेव होणाळे यांनी उपस्थित केला आहे.

राजकारण्यांनी राज्यात मराठा व ओबीसी समाजात भांडण लावण्याचं काम केलं 

राज्यात मराठा व ओबीसी समाजात राजकारण्यांनी भांडण लाऊन स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला गेला. दुर्दैव म्हणजे त्यामुळे शेतकऱ्यांच्या मूळ प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या मूळ प्रश्नाला हात घालण्यासाठी ओबीसी समाजाचा सहदेव निघाला. त्याला साथ देण्यासाठी गणेश मराठा त्याच्या सोबत निघाले आहेत. देशातील शेतकऱ्याचा हा नांगर केवळ शेत नांगरत नाही तर तो सरकारच्या काळजाविना व्यवस्थेवर ही आता घाव घालत रस्त्यावर उतरला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बैलाऐवजी स्वतःलाचं औताला जुंपले, लातूरच्या शेतकऱ्याची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं घेतली दखल, जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस जारी 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

त्या' दोन षटकांनी फिरवला सामन्याचा निकाल, भारत चौथ्यांदा T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत
IND vs ENG : 'त्या' दोन षटकांनी फिरवला सामन्याचा निकाल, भारत चौथ्यांदा T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत
Jishnu Dev Varma : महाराष्ट्राचे नवे राज्यपाल, कोण आहेत जिष्णू देव वर्मा? त्रिपुरा ते मुंबई, राजकीय प्रवासाची कहाणी!
महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जिष्णू देव वर्मांची नियुक्ती; त्रिपुराच्या राजघराण्याशी संबंधित, कशी आहे राजकीय कारकीर्द
दादाविना अर्थ नसलेला अर्थसंकल्प, संपूर्ण राज्याला त्यांची उणीव जाणवेल, अर्थसंकल्पापूर्वी मिटकरींची भावूक प्रतिक्रिया 
दादाविना अर्थ नसलेला अर्थसंकल्प, संपूर्ण राज्याला त्यांची उणीव जाणवेल, अर्थसंकल्पापूर्वी मिटकरींची भावूक प्रतिक्रिया 
Rajya Sabha Election : राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण

व्हिडीओ

Arjun Tendulkar Marriage : अर्जुनची नवी इनिंग, सेलिब्रिटी वऱ्हाडी Special Report
Nitish Kumar Rajyasabha Bihar : राज्यसभेत नितीशकुमार, भाजपसाठी मोकळं बिहार Special Report
Jyoti Waghmare Rajysabha : राज्यसभेत वाघमारे आणि नाराजीचे नगारे Special Report
Maharashtra Rajyasabha Election : सर्वांचा विजय पक्का 'बिनविरोध'वर शिक्का Special Report
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jishnu Dev Varma : महाराष्ट्राचे नवे राज्यपाल, कोण आहेत जिष्णू देव वर्मा? त्रिपुरा ते मुंबई, राजकीय प्रवासाची कहाणी!
महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जिष्णू देव वर्मांची नियुक्ती; त्रिपुराच्या राजघराण्याशी संबंधित, कशी आहे राजकीय कारकीर्द
Sanju Samson : संजू सॅमसनचा सलग दुसऱ्या मॅचमध्ये धडाका, रोहित शर्माला मागं टाकलं, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार संजूच्या नाववार 
संजू सॅमसननं रोहित शर्माचा विक्रम मोडला, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम नावावर नोंदवला
भारताचा 7 धावांनी विजय, शोएब अख्तरनं विजयाचं श्रेय कोणाला दिलं? टीम इंडियाच्या दोन खेळाडूंचं नाव घेत म्हणाला...
भारताचा इंग्लंडवर 7 धावांनी विजय,मोहम्मद कैफ आणि शोएब अख्तरकडून भारताच्या दोन खेळाडूंचं कौतुक, टीम इंडियाचं अभिनंदन करत म्हणाला...
Rajya Sabha Election : राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
Iran : इराणची होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात मोठी खेळी, भारताला फायदा होणार, अमेरिका- इस्त्रायलची कोंडी करण्याचा प्लॅन
इराणची होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात मोठी खेळी, भारताला फायदा होणार, अमेरिका- इस्त्रायलची कोंडी करण्याचा प्लॅन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
BMC Election : गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
Share Market: सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक 
सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक
Embed widget