Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 17 ऑक्टोबर 2021 रविवार | ABP Majha
 


1. केरळमध्ये पावसाचा हाहाकार, आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता, मदतीसाठी लष्कराला पाचारण करण्याची मुख्यमंत्री विजयन यांची मागणी


2.बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळं मराठवाडा, विदर्भातही अनेक ठिकाणी पावसाची हजेरी, 20 जिल्ह्यांना यलो अलर्ट, पिकांच्या नुकसानीची शक्यता


3. पंजाबला अशांत होऊ देऊ नका, आपण इंदिरा गांधींच्या हत्येपर्यंत मोठी किंमत मोजलीय असा इशारा शरद पवारांनी केंद्र सरकारला दिला आहे. पंजाब हे सीमेवरचं राज्य आहे आणि सीमेवरच्या बहुसंख्य शेतकऱ्यांना आपण अस्वस्थ केलं तर त्याचे दुष्परिणाम होतात. एकदा या देशाने अशांत पंजाबची किंमत दिलेली आहे असं ते म्हणाले.


4. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडीचा पेच सुटणार, पुढच्या वर्षी सप्टेंबरमध्ये निवडणूक तर ऑक्टोबरमध्ये नवा अध्यक्ष मिळणार आहे. काँग्रेस पक्षाची पुनर्बांधणी व्हावी असं सर्वांनाच वाटतं. पण त्यासाठी पक्षाचे हित सर्वोतपरी मानत आपण एकी बाळगणं आवश्यक आहे. मनमोकळ्या संवादाचं कायमचं मी समर्थन केलंय. पण माझ्यापर्यंत एखादी गोष्ट पोहचवण्यासाठी कुणी माध्यमांचा वापर करु नये असं सोनिया गांधी म्हणाल्या.   


5. पितृपक्ष म्हणजे भोंदूगिरी आहे, प्रबोधनकारांवरील पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंचं परखड मत, पितृपक्षात चांगल्या कामाची सुरुवात न करण्याच्या रुढीवर बोट


 



6. केंद्र सरकार देशाचं संविधान बदलवू पहात आहे, मुख्यमंत्री ठाकरेंच्या आरोपाला प्रकाश आंबेडकरांचं समर्थन


7. मुंबई पालिकेच्या सफाई कामगारांसाठीच्या गृह योजनेत 1844 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा भाजपचा आरोप, राज्य शासनाने याची चौकशी करावी अशी मागणी 


8. विठ्ठल चरणी अर्पण करण्यात आलेल्या कोट्यवधींच्या दागिन्यांबाबत विधी व न्याय विभाग गंभीर नाही, 28 किलो सोनं आणि 996 किलो चांदीच्या वस्तू पोत्यात बांधून ठेवण्याची वेळ


9. कारवाई करणार असेल तरच ईडीनं यावं, खासदार उदयनराजे यांचा हल्लाबोल, ईडीच्या कारवाईत पारदर्शीपणा नसल्याचंही टीकास्त्र


10. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर गर्व वाटेल असं काम करुन दाखवेन, समुपदेशनावेळी आर्यन खानचं एनसीबीला आश्वासन