मुंबई : एअरटेलकडून (Airtel) महाराष्ट्रातील दोन शहरात 5G सेवेला (5G Internet Service) आजपासून सुरुवात करण्यात आली आहे. मुंबई (Mumbai) आणि नागपूरमध्ये (Nagpur) ही इंटरनेट सुविधा सुरु होत आहे. देशातील एकूण आठ शहरांमध्ये आजपासून एअरटेलची 5G सेवा सुरु करण्यात आली आहे. त्यामध्ये दिल्ली, वाराणसी, मुंबई, नागपूर, बंगळुरु, हैदराबाद, चेन्नई आणि सिलिगुडीचा समावेश आहे. 


एअरटेलकडून येत्या दोन ते तीन दिवसात 5G प्लॅन्स रीलिज करण्यात येणार असल्याची माहिती आहे.  4G प्लॅन्सच्या किंमतींच्या जवळपासच 5G प्लॅन्सच्या किंमती असल्याचं स्पष्ट झालं आहे. मार्च 2023 पर्यंत 50 ते 60 शहरं एअरटेल 5G सेवेने जोडण्यात येणार आहेत. तर मार्च 2023 पर्यंत संपूर्ण भारतात एअरटेलकडून 5G सेवा सुरु करण्यात येणार आहे.  


4G पेक्षा 5Gमध्ये 20 ते 30 पटीनं इंटरनेटच्या स्पीडचा दावा एअरटेलकडून करण्यात आला आहे. महाराष्ट्रात मुंबई आणि पुणे या दोन शहरांमध्ये 5G इंटरनेट सेवा सुरू होणार आहे.


देशात 5G इंटरनेट सुविधेला सुरुवात 


देशात 1 ऑक्टोबपासून 5G इंटरनेट सुविधेला (5G Internet Service) सुरुवात झाली आहे. सुरुवातीला देशातील 13 शहरांमध्ये 5G सेवा सुरु करण्यात येत आहे. दिवाळीपर्यंत या 13 शहरांमध्ये 5G इंटरनेट सेवा सुरु होईल. त्यानंतर हळूहळू 5G इंटरनेट सेवेचं जाळं देशभर विस्तारत जाईल. 


5G इंटरनेट सुविधेच्या पहिल्या टप्प्यात मुंबई, पुणे आणि दिल्लीसह देशात 13 शहरांमध्ये 5G सेवा सुरु करण्यात येईल. मुंबई, पुणे, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू, चंदीगड, गुरुग्राम, हैदराबाद, लखनौ, गांधीनगर, अहमदाबाद आणि जामनगर या 13 शहरांमध्ये 5G सेवा सुरु होणार आहे.


भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फायदा 


देशात 5G तंत्रज्ञानाचा भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होणार आहे. याचा भारतीय अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात फायदा होण्याची शक्यता आहे. आगामी काळात 5G नेटवर्कमुळे भारतातील टेलिकॉम क्षेत्रात मोठे बदल घडण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारकडून यासाठी प्रयत्न सुरु आहेत. भारतीय टेलिकॉम क्षेत्राला जागतिक पातळीवर जोडण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. या पार्श्वभूमीवर 5G नेटवर्कचा शुभारंभ हे एक मोठं आणि महत्त्वाचं पाऊल आहे. भारतील टेलिकॉम क्षेत्राचा ग्लोबल बेंचमार्कसोबत ताळमेळ बसवण्यासाठी सरकारचा प्रयत्न असल्याचं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं आहे.