Maharashtra Live News Updates: पावसाळ्यामुळे सोलापूर-गोवा, सोलापूर-हैदराबाद विमानसेवा ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय
Maharashtra Live News Updates: आज दिल्लीमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीची बैठक होणार आहे.
LIVE

Background
Maharashtra Live News Updates: आज दिल्लीमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. जवळपास वर्षभरानंतरच्या विरोधकांच्या आघाडीची बैठक होती. त्याला पाच राज्यांच्या विधानसभा निकालाची पार्श्वभूमी आहे. खरंतर, पश्चिम बंगालमध्ये झालेला ममता बॅनर्जींचा पराभव आणि तामिळनाडू काँग्रेसनं पारंपरिक मित्र डीएमकेची सोडलेली साथ...अशा दोन महत्वाच्या राजकीय घडामोडींनीनंतर होणारी बैठक महत्वाची ठरते.. अशाच तामिळनाडूमध्ये काँग्रेसनं नवा राजकीय पक्ष टीव्हीकेसोबत सत्तेत जात डीएमकेची साथ सोडली.. त्यामुळे इंडिया आघाडीच्या डीएमके येणार नसल्याचीही माहिती आहे.. असं असतानाच तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय जोसेफ यांची टीव्हीके आज होणाऱ्या बैठकीत उपस्थित होणार का? याकडेही लक्ष असेल.. त्याबरोबरच महाराष्ट्रातूनही ठाकरेंची काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादीकडूुन आजच्या बैठकीला कोण जाणा, याकड़ेही लक्ष असेल.
राज्यात मान्सूनची आणखी आगेकूच; राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज
राज्यात मान्सूनची आणखी आगेकूच
८ जून रोजी नैऋत्य मान्सून महाराष्ट्राच्या आणखी काही भागांत दाखल
मध्य अरबी समुद्र, महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या आणखी भागांवर मान्सूनची प्रगती
तेलंगणाच्या काही भागांमध्ये देखील मोसमी वारे सक्रिय
हरनाई, सोलापूर मार्गे मान्सूनची उत्तर सीमा पुढे सरकली
पुढील २ ते ३ दिवसांत महाराष्ट्राच्या आणखी भागांत मान्सून दाखल होण्याची शक्यता
कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या काही भागांतही मान्सूनच्या पुढील प्रगतीस अनुकूल वातावरण
ईशान्य भारतातील उर्वरित राज्यांमध्येही लवकरच मान्सूनचे आगमन अपेक्षित
राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज
Beed Rain : पहिल्याच पावसात कृषी दुकानातील खतं बियाणं पाण्यात
बीडच्या वडवणी तालुक्यात मध्यरात्री झालेल्या पावसाने दाना दान उडवून दिलीय. वडवणीतील अनेक दुकानांमध्ये पाणी साचल्याने नुकसान झाले आहे. यात विशेषतः कृषी दुकानातील खतं आणि बियाणं पाण्यात भिजली आहेत. त्यामुळे दुकानदाराचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. खरीप हंगामाच्या अनुषंगाने कृषी दुकानात मोठ्या प्रमाणात खतांचा साठा होता. परंतु पहिल्याच पावसात दुकानात पाणी आल्यानं प्रचंड नुकसान झाले आहे. मोटार पंपाच्या साह्याने दुकानातील पाणी बाहेर काढलं जातंय.






















