कोल्हापूर: गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे. अनेक नेते पक्षांतर करत आहेत, त्याचबरोबर गाठी भेटी वाढल्या आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने घडामोडींना वेग आला आहे, अशातच काही दिवसांपुर्वी भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेले राहुल देसाई यांनी यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली आहे. राहुल देसाई (Rahul Desai) हे माजी आमदार बजरंग देसाई यांचे चिरंजीव आहे.

  


कोल्हापुरात पुन्हा एक मोठी राजकीय घडामोड घडल्याचं वृत्त आहे. भाजपच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेले राहुल देसाई यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली आहे. राधानगरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी राहुल देसाई (Rahul Desai) हे देखील इच्छुक आहेत. या भेटीनंतर आता कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपचा दुसरा मोहरा देखील शरद पवारांच्या गळाला लागला का अशा चर्चांना उधाण आलं आहे. 


राहुल देसाई हे माजी आमदार बजरंग देसाई याचे चिरंजीव आहेत. राहुल देसाई (Rahul Desai) यांनी शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील याची एकत्रित घेतली भेट घेतली आहे. शरद पवार (Sharad Pawar)यांच्या भेटीनंतर राहुल देसाई यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी केली सविस्तर चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. राधानगरी विधानसभा मतदारसंघातून के पी पाटील, ए वाय पाटील यांच्या नंतर आता राहुल देसाई हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती आहे, त्यामुळे आता कोणाला उमेदवारी मिळणार आणि काय गणित ठरणार हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे. 


दोन पाटील आणि राहुल देसाई एकाच मतदारसंघासाठी इच्छुक 


के. पी. पाटील (K P Patil) आणि ए.वाय. पाटील (A Y Patil) या दोघांनी आज शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेतली, त्यांनी राधानगरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 


शरद पवारांना भेटताच के. पी. पाटलांचा 180 डिग्रीचा टर्न 


राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे सध्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या दोन बड्या नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. के. पी. पाटील (K P Patil) आणि ए.वाय. पाटील (A Y Patil) या दोन्ही नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. हे दोन्ही नेते राधानगरी-भुदरगड विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छूक असून शरद पवारांच्या भेटीनंतर के. पी. पाटलांनी अजितदादांसोबत काडीचा संबंध नसल्याचा दावा केल्याने चर्चांना उधाण आले आहे. 


दोन्ही पाटील एकाच मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक


 के.पी. पाटील आणि ए.वाय. पाटील हे राधानगरी भुदरगड विधानसभा मतदरासंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले हे दोन्ही नेते अजित पवार गटात होते. मात्र, या दोघांनी आता विधानसभेच्या उमेदवारीसाठी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देत महाविकास आघाडीकडून तिकीट मिळवण्याची तयारी सुरु केल्याचे चित्र आहे. 


अजित पवार गटात पक्ष प्रवेश केला नाही : के पी पाटील 


शरद पवारांच्या भेटीनंतर माजी आमदार के पी पाटील म्हणाले की, मी अजित पवारांसोबत कधीच गेलो नाही. अजित पवार गटामध्ये मी कधी गेलोय, मी कधीही शरद पवार गटाचा राजीनामा दिलेला नव्हता.  मी पहिल्यापासून राष्ट्रवादीमध्येच आहे. मी कधीही अजित पवार गटात पक्ष प्रवेश केला नाही. त्यामुळे पुन्हा पक्षप्रवेश करण्याचा प्रश्नच कुठे येतो. मी महाविकास आघाडीच्या सोबतच कायम राहणार आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. 


शरद पवार मला उमेदवारी देतील : ए वाय पाटील


तर ए वाय पाटील म्हणाले की, मी गेली दहा वर्ष राधानगरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे.  मात्र दोन वेळा मला शरद पवार साहेबांनी थांबायला सांगितले. नेत्यांच्या शब्दाला मान देऊन मी निवडणूक लढवायचं थांबलो. पण आता शरद पवार यांच्या आशीर्वादामुळे मी ही विधानसभा निवडणूक लढवणार आहे. शरद पवार मला उमेदवारी देतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. आता या दोन्ही नेत्यांमधून कुणाला उमेदवारी मिळणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.