कोल्हापूर : कोल्हापूरला महाराष्ट्रातील फुटबॉल हब मानलं जातं. फुटबॉल हा खेळ तरुणांमध्ये लोकप्रिय आहे. महायुती आणि इंडिया आघाडीमधील हा सामना 2-0 असा जिंकणार असून इंडिया आघाडीने दोन सेल्फ गोल केल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi In Kolhapur) यांनी केली. कोल्हापुरात महायुतीच्या (Mahayuti) प्रचारार्थ पीएम मोदी यांची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना मोदी यांनी स्थानिकसह राष्ट्रीय मुद्यांपर्यंत भाष्य केले. कोल्हापूरचं फुटबाॅल प्रेम अधोरेखित करत त्यांनी फुटबाॅल भाषेत कोल्हापूरच्या उमेदवारीवर भाष्य केले. मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली. 



ते म्हणाले की, तिसऱ्या टप्प्यातील जबाबदारी कोल्हापूरकरांवर असून असा गोल करा की येणारे चार राउंडमध्ये इंडिया आघाडी चितपट होईल. त्यांनी सांगितले की, सरकार बनावो आणि नोट कमाओ हा काँग्रेस आणि इंडिया आघाडीचा अजेंडा आहे. भाजप तरुणांना अधिक संधी देणार आहे. बिना व्याज 20 लाख कर्ज दिलं जाणार आहे. महिलांची सुरक्षा ही मोदींची गॅरेटीं आहे. तीन कोटी महिलांना लखपती महिला बनवण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्र सरकार चांगल्या पद्धतीने काम करत आहे. माझं एक काम करा, भेटेल त्याला सांगा मोदींना मताच्या रूपाने आशीर्वाद द्यायला असेही मोदी म्हणाले. तुमचा आशीर्वाद हीच माझी प्रेरणा असल्याचे त्यांनी सांगितले. 


एक वर्ष एक पीएम पाच वर्षात पाच पंतप्रधान करतील


मोदी यांनी इंडिया आघाडीच्या पंतप्रधानपदावरूनही भाष्य केले. ते म्हणाले की, काँग्रेसचा अजेंडा सत्तेवर आल्यानंतर 370 कलम पुन्हा आणणार असा आहे, पण कुणाच्यात हिंमत आहे का मोदीनं घेतलेले निर्णय मागे घेण्याची? अशी विचारणा त्यांनी केली. सीएए कायदा मागे घेण्याची हिंमत आहे का कुणाची? इंडिया आघाडी एक वर्ष एक पीएम पाच वर्षात पाच पंतप्रधान करतील, अशा परिस्थितीत हा देश कधी सहन करणार नाही. 


त्यांनी पुढे सांगितले की,कर्नाटक आणि तामिळनाडू वेगळा देश करण्याची भाषा करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत हे सहन होईल का? त्यांना उत्तर दिलं पाहिजे. 500 वर्षांचे स्वप्न राम मंदिराच्या निमित्ताने पूर्ण झालं असून जे रामाचे  निमंत्रण स्वीकारत नाही त्यांचं काय होणार? ज्यांनी सनातन धर्म डेंग्यू मलेरिया आहे असं म्हटलं त्याना महाराष्ट्रात आणून सत्कार केला, यावरून बाळसाहेब ठाकरे यांची काय अवस्था झाली असेल हे लक्षात येत असल्याचे म्हणाले. नकली शिवसेना औरंगजेबाला मानणारी झाली असल्याचेही ते म्हणाले. कर्नाटकात एका रात्रीत मुस्लिमांना ओबीसी बनवलं असून त्यामुळे ओबीसींवर अन्याय झाल्याचे मोदी म्हणाले. हाच फॉर्म्युला त्यांना देशभर वापरायचा असून धर्माच्या नावाखाली तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या