Aaditya Thackeray in KOlhapur : युवासेना प्रमुख आणि शिवसेना आदित्य ठाकरे यांची बंडखोरांच्या मतदारसंघातील शिवसंवाद यात्रा आज कोल्हापूरमध्ये पोहोचली आहे. त्यांचे सिंधुदुर्गमधून आजऱ्यामध्ये पोहोचल्यानंतर जल्लोषी स्वागत करण्यात आले. त्यांनी यावेळी बोलताना बंडखोर आमदार प्रकाश आबिटकर यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केला. 


जल्लोषी स्वागतानंतर आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना संबोधित करताना राधानगरी भुदरगड मतदारसंघाचे बंडखोर शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर यांच्यावर हल्ला चढवला. ते आपल्या जवळचे होते, अगदी उद्धव ठाकरे यांच्याही जवळचे होते. डोळे बंद करून त्यांच्यावर विश्वास ठेवला. आबिटकारांना या मतदारसंघात उद्धव साहेबांनी 567 कोटी देऊ केले आहेत.इतका निधी मिळाल्यानंतरही या आमदाराने असं वागावं? अशी विचारणा त्यांनी केली. 


त्यामुळे आबिटकरांनी अजूनही बंडखोरी केली आहेय असे मला वाटत नसल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. ते पुढे म्हणाले की, या बंडखोरांमध्ये दोन गट आहेत.त्यामधील एक गट असा  आहे ज्यांची राक्षसी महत्वकांक्षा आहे. त्यांची अजूनही भूक भागलेली नाही. त्यांनी अजूनही खायचं आहे. दुसरा गट असा आहे ज्यांना फसवून नेलं आहे. माझ्या मनात यांच्याबद्दल द्वेष नाही. ज्यांना सर्व काही दिलं. राजकीय ओळख मिळवून दिली, अशा माणसांनी उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला. 


महाराष्ट्र विकासाच्या दिशेने जात होता. जातीय दंगली होत नव्हत्या. साहे सहा लाखांची गुंतवणूक आपण आणू शकलो होतो. दोन वर्ष उद्धव  ठाकरे टाॅप 5  मुख्यमंत्र्यांमध्ये होते. त्यांनी बंडखोरी केलेल्या खासदारांवरही हल्ला चढवताना राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जाण्याचे आव्हान दिले.