Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली आहे. मात्र, अजूनही जिल्ह्यातील 17 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरणाचा स्वयंचलित दरवाजा क्र. 6 पुन्हा खुला झाला आहे. त्यामुळे उघडललेला दरवाजा आणि पाॅवर हाऊस मिळून धरणातून 2828 क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदी पात्रात सुरु आहे. आंबेओहळ मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. यामुळे उत्तर आणि गडहिंग्लज परिसरातील पिण्याच्या पाण्याची आणि शेतीच्या सिंचनाची चिंता मिटली आहे. आजरा तालुक्यातील चित्री प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. सांडव्यातून 180 क्युसेकने विसर्ग सुरू झाला आहे. उचंगी प्रकल्प भरला आहे, पण प्रकल्पात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा केलेला नाही. 


गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 22.6 मिमी पावसाची नोंद


कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 22.6  मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली.


जिल्ह्यात 24 तासात पडलेला एकूण पाऊस 


हातकणंगले- 4.1 मिमी, शिरोळ – 2.8 मिमी, पन्हाळा- 7.8, शाहूवाडी- 8.9 मिमी, राधानगरी- 9.9 मिमी, गगनबावडा-22.6 मिमी, करवीर- 5.8 मिमी, कागल- 5 मिमी, गडहिंग्लज- 2.6 मिमी, भुदरगड- 12.6 मिमी,  आजरा-6 मिमी, चंदगड- 5.3  मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे. 


जिल्ह्यातील धरणातील पाणीपातळी पुढीलप्रमाणे 


राधानगरी - 8.26 (8.361 टीएमसी), तुळशी 2.59 (3.471 टीएमसी), वारणा 29.24  (34.399 टीएमसी), दुधगंगा 20.55 (25.393 टीएमसी), कासारी 2.63 (2.774 टीएमसी), कडवी 2.52 (2.516), कुंभी 2.41 (2.715 टी एमसी), पाटगाव 3.33 (3.716 टीएमसी), चिकोत्रा 1.23 (1.522 टी. एम. सी), चित्री 1.89 (1.886 टी. एम. सी), जंगमहट्टी 1.22 (1.223), घटप्रभा 1.56 (1.560), जांबरे 0.82 (0.820 टीएमसी ) आंबेओहोळ  1.24 (1.240 टी. एम. सी ),  कोदे ल.पा. 0.21 (0.214 टीएमसी )


कोल्हापूर जिल्ह्यातील कोणते बंधारे पाणयाखाली?



  • पंचगंगा नदी : शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड आणि शिरोळ

  • भोगावती नदी : तारळे, हळदी, राशिवडे, सरकारी कोगे व खडक कोगे

  • वारणा नदी : चिंचोली आणि तांदूळवाडी

  • दुधगंगा नदी : दत्तवाड 

  • कासारी नदी : यवलूज आणि ठाणे आळवे असे 17 बंधारे पाण्याखाली आहेत


जिल्ह्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. पाणलोट क्षेत्रात अधूनमधून येणाऱ्या जोरदार पावसामुळे धरणातील पाणीसाठा कमीअधिक प्रमाणात वाढत आहे. कालपर्यंत धरणाचे सर्व दरवाजे बंद होते. आज सकाळी राधानगरी धरणाचा एक दरवाजा खुला झाल्यामुळे भोगावती नदीत येणारा पाण्याचा विसर्ग वाढला आहे. काळम्मावाडी धरणात जेवढा पाणीसाठा अपेक्षित होता, तेवढा पाणीसाठा झाल्याने मोठ्या प्रमाणात विसर्ग वाढवला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना काळजी घेण्याचे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या :