MP High Court On Vijay Shah भोपाळ: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल वादग्रस्त करणारे भाजप मंत्री विजय शाह अडचणीत सापडले आहेत. मध्य प्रदेश उच्च न्यायालयानं विजय शाह यांच्या वक्तव्याबाबत कठोरभूमिकाघेतली आहे. विजय शाह यांच्यावर पुढील चार तासात एफआयआर करण्यात यावी असे निर्देश मध्यप्रदेशच्या डीजीपींना दिले आहेत. हायकोर्टानं या वक्तव्याबाबत स्वत:दखल घेत म्हटलं की या प्रकरणी एफआयआर दाखल झाली आहे. या प्रकरणी उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे.
मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अतुल श्रीधरन यांच्या खंडपीठानं विजय शाह यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे असं म्हटलं. आता उद्या सकाळी पुन्हा या प्रकरणी सुनावणी होईल.
विजय शाह काय म्हणाले होते?
भाजप मंत्री विजय शाह यांनी कर्नल सोफिया कुरेशींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं."त्यांनी आपल्या मुलींचे कुंकू पुसले होते, त्या लोकांना आम्ही त्यांच्याच बहिणीला पाठवून चांगलाच धडा शिकवला. त्यांनी आमच्या हिंदूंना कपडे काढून मारले, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याच समाजातील बहिणीला पाठवले की, जेणेकरुन ज्यांनी आमच्या बहिणी विधवा केल्या, त्यांना त्यांच्या समाजातील बहीण नग्न करुन सोडेल", असं विजय शाह म्हणाले होते.
विजय शाह यांच्या वक्तव्यामुळं काँग्रेस आक्रमक
भाजप मंत्री विजय शाह यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद उमटत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जितू पटवारी यांच्यासह काँग्रेसचं शिष्टमंडळ श्यामला हिल्स पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल होतं. काँग्रेसनं विजय शाह यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करण्याची मागणी केली. मध्य प्रदेश काँग्रेस उद्या या प्रकरणी राज्यभरात पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार देणार आहे.
काँग्रेस अध्यक्ष जितू पटवारी म्हणाले, भाजपच्या विजय शाह यांनी सैन्याचा अपमान केला आहे. त्यांना एक मिनिट देखील मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही. विजय शाह यांच्या वक्तव्यामुळं देशातील लोकांमध्ये नाराजी आहे. श्यामला हिल्स पोलीस ठाण्यामध्ये यासंदर्भातील निवेदन दिलं आहे. काँग्रेसनं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री मोहन यादव यांना पत्र लिहिलं आहे.
विजय शाह यांचा माफीनामा
सोफिय कुरेश यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर मंत्री विजय शाह यांनी माफी मागितली आहे. मी दहावेळा माफी मागण्यास तयार आहे. माझ्याकडून चुकून अपशब्द निघाले, असं विजय शाह म्हणाले. माझे संपूर्ण कुटुंब, कुळ लष्करी आहे. माझ्या कुटुंबातील अनेक लोक कारगिल आणि इतर ठिकाणी शहीद झाले, असंही विजय शाह यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.